लवकरच तुम्ही मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच तुमचे गॅस कनेक्शन कोणत्याही कंपनीला स्विच करू शकाल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि सेवा सुधारतील.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी प्रस्तावना लिहिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “गजवा-ए-हिंद”च्या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान ठरवत त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, “भारताने स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना केला आहे. आमचा शेजारी देश आजही जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे.”
क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!, असला प्रकार दुबईतल्या क्रिकेट स्टेडियम मधून समोर आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांमी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला फेटाळून लावत कठोर भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर आत्मसमर्पण करायचे असेल तर थेट बंदुका खाली ठेवा. त्यासाठी युद्धबंदीची गरज नाही. सरकारकडून एका गोळीचाही मारा होणार नाही. पण निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल.”
ऑनलाइन बेटिंग ॲप 1xBet च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवून आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या विजयानंतर लोक सोशल मीडियावर आनंद साजरा करत आहेत आणि भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करत आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले.
माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.
तुरुंगात असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी रविवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निषेध करत असत आणि ४ सप्टेंबरच्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते.
भारताने आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या स्पर्धेचे ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.रविवारी, भारतीय संघाने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १४७ धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ६९ धावा करून नाबाद राहिला.
दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘X’ वर लिहिले,
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी त्यांच्या सीमांचल न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी कटिहारमध्ये पोहोचले. ते बलरामपूर विधानसभा मतदारसंघात ३० किमीचा रोड शो करतील. त्याआधी ओवैसी यांनी बारसोई येथील पीडब्ल्यूडी मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले की, सीमांचलमधील लोकांना त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी राजकीय नेतृत्व मजबूत करण्याची आवश्यकता असेल.
दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर अनेक विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाचे शुल्क ६ लाख रुपयांवरून ८८ लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे. यामुळे अनेक कुशल कामगारांना तिथे प्रवास करणे कठीण झाले आहे. कॅनडा या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
महबूबनगरमधील जडचेरला येथील काँग्रेस आमदार जे. अनिरुद्ध रेड्डी यांनी प्रदूषणकारी अरबिंदो फार्मा युनिटला आग लावण्याची धमकी दिली आहे. आमदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला (पीसीबी) युनिटविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक दिवस दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने त्यांच्या क्लेम सेटलमेंट नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, बँकांनी मृत ग्राहकाच्या बँक खात्याचे किंवा लॉकरचे दावे १५ दिवसांच्या आत निकाली काढावेत. कोणत्याही विलंबामुळे नामनिर्देशित व्यक्तीला भरपाई मिळेल
दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू असा इशारा देत बरेली हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेशातील बरेली येथे “I Love Muhammad” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ‘एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट मौलाना तौकीर रझा यांच्यावर निशाणा साधला.
शनिवारी अररिया येथे अमित शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी त्यांना “स्वामी” म्हटले. ते म्हणाले, “सर्व पक्ष त्यांच्या नेत्यांच्या जोरावर निवडणुका जिंकतात. आमचा पक्ष असा एकमेव पक्ष आहे, ज्यांच्या निवडणुका जिंकण्याची शक्ती त्यांच्या नेत्यांमध्ये नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
शुक्रवारी एका मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांना हटवण्याबद्दल विचारले असता ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये सरकार आणि लष्कर एकत्रितपणे देश चालवतात.
भारतीय लष्कराची हवाई संरक्षण प्रणाली आता अधिक मजबूत केली जाईल. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेल्या “अनंत शस्त्र” या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी लष्कराने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ला अंदाजे ₹30,000 कोटींची निविदा जारी केली आहे.
भारताचे सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांच्या आई कमलताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे होणाऱ्या RSS कार्यक्रमात कमलताईंना प्रमुख पाहुण्या म्हणून निवडण्यात आले आहे.
लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल यांनी शनिवारी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एका सदस्याशी संपर्क होता. पीआयओ सदस्याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तो पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पाठवत होता. आमच्याकडे याचे रेकॉर्ड आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App