ईव्हीएम मतपत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे असतील. शिवाय, उमेदवारांचे क्रमांक आणि फॉन्ट आकार मोठा असेल, ज्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होईल.
मतदारांसाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. मतपत्रिकेवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्रे असतील. उमेदवारांचे क्रमांक आणि फॉन्ट आकार मोठा असेल, ज्यामुळे मतदारांना ते वाचणे आणि पाहणे सोपे होईल.
रिटायरमेंटची चर्चा derail, मोदींसमोरच्या नव्या आव्हानांची चर्चा पुन्हा track वर!!, ही नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घडलेल्या घटना घडामोडींची “अति उच्चशिक्षित बौद्धिक” फलश्रुती ठरली!!
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पहिल्यांदाच कबूल केले आहे की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हल्ल्यात त्यांचा प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले होते.
17 सप्टेंबरचा दिवस ढळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिटायरमेंट घेण्याची विरोधकांची मावळली आशा; पण त्याचवेळी जागतिक नेत्यांनी मोदींना दिल्या शुभेच्छा!!, त्यामुळे राहुल गांधींचा सकट सगळ्या विरोधकांच्या राजकीय जखमेवर राजकीय मीठ चोळले गेले.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी धर्मांतराशी संबंधित कायद्यांबाबत ८ राज्यांना नोटीस बजावली आणि त्यांना ४ आठवड्यांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड आणि कर्नाटकच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालय सुनावणी करत होते.
खजुराहोच्या जवारी (वामन) मंदिरात भगवान विष्णूची ७ फूट उंच तुटलेली मूर्ती पुनर्संचयित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मंगळवारी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. याचिकाकर्त्याने दावा केला की मुघल आक्रमणादरम्यान ही मूर्ती तुटली होती आणि तेव्हापासून ती याच स्थितीत आहे.
Vote chori च्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या आल्या नव्या गाईडलाईन्स; उमेदवारांच्या रंगीत फोटोसह गुलाबी पेपर वर सिरीयल नंबरची ठळक छपाई!!
मदर डेअरीने मंगळवारी (१६ सप्टेंबर) त्यांच्या अनेक दुग्धजन्य पदार्थांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली. जीएसटी दरांमध्ये अलीकडेच कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उत्पादन आणि पॅकेजिंगनुसार उत्पादनांच्या किमती 2 रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.
शरद पवारांच्या शुभेच्छांनी मुलायम सिंग यादव यांच्या भाषणाची आठवण; राहुल गांधींचे दोन ओळींचे ट्विट, पण पवारांचे मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब!!, या तिन्ही गोष्टी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घडल्या.
कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे की, एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा श्रद्धेच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या सणांमध्ये भाग घेणे हे संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन नाही.
फक्त कामाने सगळे राजकारण स्वतःभोवती खेळवत ठेवणारा नेता!!, या शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाच्या 75 वर्षांच्या व्यक्तीचे वर्णन करावे लागेल. मोदींकडे ना स्वतःचे कुठले मोठे नाव होते
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जात, भाषा आणि इतर गोष्टींच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो चिंतेचा विषय आहे.मंगळवारी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चालला आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की मी मागास आहे. जाती आणि भाषेच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जेव्हा लोक एकजूट राहतील तेव्हाच देश प्रगती करेल आणि मजबूत होईल.
विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी अदानी समूहाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांना २० सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश गांधीनगरच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) पालिका निवडणुका ३ वर्षांनी पुढे ढकलल्याबद्दल फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले.
खजुराहोतील जावरी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंच मूर्ती उभी आहे. ही मूर्ती शतकांपूर्वी मुघल आक्रमणांदरम्यान शिरच्छेदित झाली आणि आजही भग्न अवस्थेत आहे. या मूर्तीची पुनर्स्थापना करून मंदिराची पवित्रता अबाधित करण्यासाठी राकेश दलाल या श्रद्धावान भक्ताने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की ही केवळ पुरातत्त्वाशी संबंधित बाब नाही, तर अखंड देवप्रतिमेची पूजा करण्याचा हा मूलभूत धार्मिक अधिकार आहे.
Good economics is bad politics, असा 1990 च्या दशकानंतर भारतात समज व्हावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती हे खरे. कारण त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था सुधारणारे नेते राजकारणात मात्र जिंकण्याची चमक दाखवू शकले नव्हते. राजकीय प्रतिभेने हे नेते कमी नव्हते.
दुबईत आशिया कपच्या झालेल्या सामन्यात भारताचा भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान्यांचा राग अनावर झाला. त्यातही भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन केले नाही म्हणून तो राग जास्तच भडकला. पाकिस्तानी क्रिकेट फोटो भारताविरुद्ध वाटेल ते बराळायला लागले. पण तरी देखील काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतातल्या राजकारणावर शेरेबाजी करून आपल्या पसंती क्रमात राहुल गांधींना सगळ्यांमध्ये वरचे स्थान दिले.
भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी टाटांनी पुढाकार घेतला असून त्यांनी अन्य भारतीय कंपन्यांनाही सहकार्याचा हात पुढे केला आहे. कारण भारतीय संरक्षण क्षेत्र केवळ मागणी आणि व्यापार एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर भारताची संरक्षण क्षमता जगात वाढविणे, भारताच्या वाढत्या गरजेनुसार संरक्षण सामग्रीचे उत्पादन भारतात करणे हे जास्त महत्त्वाचे आहे, अशा शब्दांमध्ये टाटा संस्थेचे चेअरमन चंद्रशेखरन यांनी टाटा सुमूहाची भूमिका स्पष्ट केली. नागपूर मध्ये सोलर सिस्टिम उद्योगाच्या पाहणीसाठी गेले होते.
आसाम मध्ये पैशासाठी हिंदू महिला अधिकाऱ्याने लँड जिहाद केल्याची धक्कादायक बाब चौकशी आणि तपासात समोर आली. संबंधित हिंदू महिला अधिकाऱ्याच्या घरी आसाम पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तिच्याकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आढळली.
आज, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने बिहारमधील एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. या दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सांगितले की निवडणूक आयोग प्रक्रिया पाळत नाही. नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वाेच्च न्यायालयात केला आहे. जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक पुढे ढकलाव्यात अशी विनंती या अर्जात करण्यात आली आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ५.१% पर्यंत खाली आला आहे. जुलैमध्ये तो ५.२% आणि जूनमध्ये ५.६% होता. हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा त्यात घट झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सोमवारी (१५ सप्टेंबर) बेरोजगारी दराचे आकडे जाहीर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, १५ सप्टेंबर रोजी बिहारसाठी ४०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App