यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्ती तयार करण्यावरील आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याची सक्ती कायम राहणार असून, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास सक्त मनाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी गोळीबारामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २५ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की पाकिस्तानी गोळीबारामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २ लाख रुपये आणि अंशतः उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल.
क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंन्सील अर्थात आयसीसीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिच्याविरोधात तक्रार दाखल करणारा वजाहत खान यालाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे
बांगलादेशातला नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता नाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून harmony award स्वीकारण्यासाठी लंडनला गेलाय.
आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.
संघप्रमुख मोहन भागवत कानपूरमध्ये आहेत. रविवारी संघप्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रादेशिक कार्यकर्ता विकास वर्गाला हजेरी लावली. सकाळी ५ वाजता त्यांनी नवाबगंज येथील दीनदयाळ विद्यालयात प्रशिक्षण वर्गातील लोकांसोबत एक शाखा आयोजित केली.
गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सुरक्षा दलांनाही यश मिळाले आहे. यामुळेच अनेक जिल्ह्यांमधून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला विचारले की ते महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतदार यादी कधी उपलब्ध करणार? निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी २००९ ते २०२४ पर्यंतची मतदार यादीची माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
मुंबईतल्या रेल्वे अपघातामध्ये प्रवाशांचे बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून मुंबई आणि देशातल्या अन्य लोकलमध्ये नव्या डिझाईनचे कोच बसविण्याचा निर्णय रेल्वेने तातडीने घेतला आहे
लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान म्हणाले की, जर लोकांनी विचारले की ते निवडणूक लढवतील का, तर हो ते निवडणूक लढवतील. मी २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहे. एनडीएला बळकटी देण्यासाठी मी बिहारमधील २४३ जागांवर चिराग पासवान म्हणून निवडणूक लढवणार आहे. माझे ध्येय आहे की आपण एनडीएच्या विजयाकडे पुढे जावे.
पटियाला हाऊस कोर्टाने २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला त्याच्या कुटुंबाशी एकदा फोनवर बोलण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सोमवारपासून १० दिवसांच्या आत राणाच्या प्रकृतीबाबत नवीन अहवाल मागितला आहे.
२०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीए तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी सरकार स्थापन करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला.
मध्य प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा नूरी खान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शनिवारी ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदच्या निमित्ताने बनवलेल्या या व्हिडिओमध्ये नूरी खान म्हणत आहेत – बकरी ईदवर नाही, तर होळीवर मटणाची मागणी वाढते. होळीच्या वेळी मटणाची विक्री ६०० टक्क्यांनी वाढते. सामान्य दिवशी मटणाचा वापर दररोज सुमारे ४ हजार क्विंटल असतो, तर होळीच्या दिवशी तो २० हजार क्विंटलपर्यंत पोहोचतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ११ वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी ३.० सरकारने सोमवारी एक वर्ष पूर्ण केले. या खास प्रसंगी सरकारने ई-पुस्तक प्रकाशित केले आहे.
कर्नाटकातील बजरंग दलाचे नेते आणि २०२२ च्या फाजिल हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुहास शेट्टी याच्या हत्या प्रकरणाची चौकशी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) केली जाईल.
राष्ट्रवादीच्या ऐक्याची तापवत राहा हवा; तिचा राजकीय सौदेबाजीसाठी वापर करत राहा!!, असला प्रकार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याच्या बातम्यांमधून समोर येत आहे.
राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर अधिकृत निवेदन देण्याऐवजी माध्यमांतून आरोपांचे वार करणे सुरू आहे. आयोगाशी अधिकृतपणे संवाद साधणे राहुल गांधी टाळत आहेत. आतापर्यंत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला साधे पत्रही लिहिले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चेनाब नदीवर उभारलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च पूलाचं उद्घाटन नुकतंच झालं. या पुलामुळे ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ असा देशाचा अखंड लोहमार्ग अखेर पूर्णत्वास पोहोचला आहे.
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला गाझामध्ये सुरू असलेले नरसंहार थांबवण्याचे आणि तेथील भुकेल्या लोकांना अन्न पुरवण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना ओवेसी म्हणाले की, जगाला असे वाटत आहे की असहाय्य समजून ते त्यांच्यावर अत्याचार करत राहतील, परंतु आपण पाहत आहोत की जगाच्या कानाकोपऱ्यातील सरकारे अत्याचाऱ्यांना पाठिंबा देत आहेत, परंतु तेथील लोकही त्या अत्याचारित पॅलेस्टिनींसाठी हात वर करून प्रार्थना करत आहेत, त्यांच्या हक्कांसाठी प्रार्थना करत आहेत.
जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज म्हणून ओळखले जाणारे ‘एमएससी इरिना’ सोमवारी अदानी समूहाच्या विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदरावर पोहोचेल आणि मंगळवारपर्यंत तिथेच राहील. टीईयू क्षमतेच्या बाबतीत हे सर्वात मोठे जहाज आहे. हे संस्मरणीय आगमन बंदरासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मे रोजी राष्ट्राला समर्पित केले होते.
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळाचे कौतुक केले. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींचा कार्यकाळ सनातनचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील.
या दुर्घटनेत चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ५६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी म्हणतात की एनडीएमध्ये जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला धक्का बसला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य म्हणून दहशतवादाशी संबंधित चार समित्यांच्या नेतृत्वाची पाकिस्तानची मागणी परिषदेच्या इतर सदस्यांनी फेटाळली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App