पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांपासून थांबलेला नाही. नेहमीच सीमेपलीकडून भारताविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यावेळी त्यांचा एक कट अयशस्वी झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करायला भाग पाडले आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
बुधवारी दिल्लीत मोदी मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात विकासाबाबत पाच निर्णय घेण्यात आले. केंद्र सरकारने १४ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली. तसेच, केंद्र सरकारने २०२५-२६ साठी किसान क्रेडिट कार्डची व्याज अनुदान योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकशाहीवादी, बांगलादेशातल्या ग्रामीण जनतेचा मसीहा असे मुखवटे धारण करणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थतज्ज्ञाने बांगलादेशात पुरती चालूगिरी केली देशावर दिले सोडून वाऱ्यावर आणि स्वतःच्या ग्रामीण फॅमिलीच्या कंपन्यांची मात्र भांडवल भरती केली.
केंद्र सरकार रोख घोटाळा प्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, १५ जुलैनंतर सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तथापि, सरकार अजूनही न्यायमूर्ती वर्मा स्वतः राजीनामा देण्याची वाट पाहत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवले असे ट्रम्प आठ वेळा म्हणाल्याचे काँग्रेसच्या प्रवक्त्यांना दिसले. त्यांनी मोदी सरकारला वारंवार टोचले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने ceasefire घडवून आणले, असे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी आठ नाही
पनामाच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, भारताला शांततेत एकटे राहायचे आहे, परंतु पाकिस्तान हे होऊ देत नाही. त्यांनी स्पष्ट केले की भारताला युद्ध नको आहे, परंतु दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय सोडता येणार नाही.
मणिपूरमध्ये बुधवारी १० आमदारांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. यापैकी भाजपचे ८ आमदार, एनपीपीचा प्रत्येकी एक आणि एक अपक्ष आहे. त्यांनी 44 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३१ आहे.
केंद्र सरकारने धान, कापूस, सोयाबीन आणि तूर यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच २८ मे रोजी हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, धानाचा नवीन किमान आधारभूत किमतीचा दर २,३६९ रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो मागील किमान आधारभूत किमतीपेक्षा ६९ रुपये जास्त आहे.
सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात लोकपालाने क्लीन चिट दिली आहे. लोकपालच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने हिंडेनबर्ग प्रकरणात त्यांच्याविरुद्धच्या सर्व तक्रारी निकाली काढल्या आहेत. लोकपालने म्हटले आहे की बुचविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक मध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याची धमकी महा विकास आघाडी मधील घटक पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपशब्द सहन करणार नसल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महा विकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काँग्रेसच्या वतीने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मायावतींनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तथापि, पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाच्या खराब कामगिरीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय दर्जावर प्रश्न उपस्थित केले जात असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मायावतींना Z+ सुरक्षा आहे.
पंतप्रधान मोदी २९ आणि ३० मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशचा दौरा करतील.
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी राजकारणात प्रवेश करण्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मानसा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. बुधवारी मोदी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरीप पिकांसाठी ५० टक्के अधिक एमएसपी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली.
केंद्र सरकार संसदेत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेली रोकड सापडल्यापासून न्यायाधीश यशवंत वर्मा वादात सापडले होते.
पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर सगळा देश पाकिस्तानच्या विरोधात एकवटला भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानवर हल्ले करून तिथली नऊ दहशतवादी केंद्रे नष्ट करून टाकली. पाकिस्तानच्या हवाई दलाला पांगळे केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय खासदार आणि नेत्यांचे शिष्टमंडळ पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी विविध देशांना भेट देत आहेत. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात कुवेतला गेलेले गुलाम नबी आझाद आजारी पडले आहेत.
बऱ्याच वर्षांपासून राजकारणामध्ये एंट्रीचे वेगवेगळे प्रयोग केलेल्या कमल हसन यांना अखेर मार्ग सापडला. त्यांनी नुकताच तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये वाद निर्माण केला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले की, जून महिन्यात देशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८ टक्के असू शकतो.
जातील तिथे मित्र पक्षांवरच अजितदादांच्या कुरघोड्या म्हणून भाजप आमदारांनी अमित शहांपुढे वाचला तक्रारीचा पाढा, पण अमित शाह यांनी भाजपच्या आमदारांना मोठ्या संख्याबळावर रेटून काम करवून घ्यायचा सल्ला दिला.
केंद्र सरकार पुढील ६ महिन्यांत बँक ठेवींवरील विम्याची मर्यादा ५ लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत विचारमंथन सुरू आहे. तथापि, नवीन मर्यादा काय असेल याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
भारतात निर्मिती होणाऱ्या 5व्या पिढीतील लढाऊ विमानाच्या म्हणजेच अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) उत्पादन मॉडेलला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी गांधीनगरमध्ये २ किमी लांबीचा रोड शो केला. त्यानंतर त्यांनी गांधीनगरमध्ये गुजरातच्या २० वर्षांच्या शहरी विकास प्रवासाच्या उत्सवात भाग घेतला आणि ‘शहरी विकास वर्ष २०२५’ ला सुरुवात केली. पंतप्रधानांनी गुजरातसाठी ५,५३६ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.
चीनने गरीब देशांना आपल्या कर्जाच्या सापळ्यात कसे अडकवले याचे एक ताजे उदाहरण समोर आले आहे. एका नवीन अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की चीनने गरीब आणि असुरक्षित देशांना इतके कर्ज दिले आहे की त्यांना आता कर्ज फेडण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे. जगातील 75 सर्वात गरीब देश चीनच्या कर्जाच्या ओझ्याने दबले आहेत आणि त्यांना या वर्षी कर्जाचा हप्ता म्हणून चीनला २२ अब्ज डॉलर्स परत करावे लागत आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App