भारतीयांच्या घामातून, मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार होणाऱ्या प्रत्येक वस्तूला ‘स्वदेशी’ म्हणतात,” अशी साधी आणि प्रभावी व्याख्या करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये नागरिकांना “व्होकल फॉर लोकल” या मंत्राचे महत्त्व समजावून देत, स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे आवाहन केले.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना हरियाणातील गुरुग्राममधील शिकोहपूर गावातील संशयित जमीन व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाने नोटीस बजावली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने वाड्रा आणि इतर १० आरोपींना ही नोटीस पाठवली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र एटीएसवर गंभीर आरोप करताना खळबळजनक खुलासा केला आहे. “२४ दिवस अमानुष मारहाण झाली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी आणि प्रगल्भ नेत्याला नेमकं झालंय काय??, ते एकदम सुशीलकुमार शिंदे + पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह यांच्या रांगेत जाऊन का बसलेत??, असा सवाल पृथ्वीराज बाबांच्या वक्तव्यामुळे समोर आला.
जुलै २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) सरकारने १.९६ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. वार्षिक आधारावर त्यात ७.५% वाढ झाली आहे. शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये सरकारने १.८२ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा केले होते.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा ७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. २०२३ सालातील उत्कृष्ट चित्रपट, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंना या पुरस्कारांमधून गौरवण्यात आले आहे.
कंबोडियाच्या सरकारने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. कंबोडियाचे उपपंतप्रधान सन चंथोल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेल्या सीमासंघर्षावर ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावरून माघारी फिरले आणि शांतता प्रस्थापित झाली. ट्रम्प यांनी हे संकट शांततेने हाताळले आणि आमच्या देशात पुन्हा स्थिरता आली. त्यामुळे अशा नेत्यानं जागतिक शांततेसाठी मिळणारा सर्वोच्च सन्मान मिळवावा, अशी आमची भूमिका आहे,” असे चंथोल यांनी फ्नॉम पेन्ह येथे सांगितले.
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी 21 ऑगस्टपर्यंत नामांकन दाखल केले जाईल. जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला.
हिमाचल प्रदेशच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांची मानहानीची तक्रार रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांचे भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याच्या विधानाचे खंडन केले आहे. शुक्रवारी संसदेच्या आवारात माध्यमांनी थरूर यांना विचारले की, भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले – नाही, ते अजिबात नाही, सर्वांना माहिती आहे.
शुक्रवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा १० वा दिवस होता. बिहार मतदार पडताळणीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत सदस्यांना रोखण्यासाठी कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला. लोकशाहीच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे.
अमेरिकेच्या दबावाखाली भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्याचा दावा करणारे वृत्त भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितले की, भारत बाजारपेठेत काय आहे आणि जगातील परिस्थितीनुसार निर्णय घेतो.
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे. ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या आता कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासह कोणत्याही राजकीय पदासाठी निवडणूक लढवणार नाहीत.
शुक्रवारी, बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला मोलकरीण बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. न्यायालय शनिवारी शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयाचा निकाल जाहीर झाला तेव्हा रेवण्णा भावनिक झाला आणि बाहेर पडताना त्या रडला.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गेल्या ९ दिवसांत दुसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. शुक्रवारी संसदेबाहेर पडताना राहुल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, निवडणूक आयोग मते चोरत आहे. आमच्याकडे अणुबॉम्ब आहे. जेव्हा त्याचा स्फोट होईल तेव्हा निवडणूक आयोग वाचणार नाही.
बांगलादेशच्या वादग्रस्त नकाशाचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला. भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, बिहार, झारखंड आणि ओडिशा या ७ राज्यांचे काही भाग बांगलादेशच्या नकाशात दाखवण्यात आले आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी राज्यसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
श्यामची आई 71 वर्षानंतरही दिल्लीत सुपरहिट राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत पुन्हा फिट!!, असे आज घडले. साने गुरुजींच्या श्यामच्या आईने 71 वर्षांपूर्वी 1954 मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ पटकावले होते
पश्चिम बंगालच्या कोलकाता पोलिसांच्या अँटी-राउडी पथकाने जाधवपूर परिसरात छापा टाकून एका बांगलादेशी मॉडेलला अटक केली आहे. तिच्याकडे व्हिसा नव्हता, पण आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड होते. पोलिसांनी अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.
ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणाचा भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या आयफोनवर कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी १ ऑगस्ट २०२५ पासून भारतीय वस्तूंवर २५% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, परंतु स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना या टॅरिफमधून सूट देण्यात आली आहे.
अमेरिकेत इव्हेंट्स करून मोदींचे काय चुकले??, याचे एका वाक्यात उत्तर असे की अमेरिकन पप्पूला आपल्या बरोबरीचे स्थान दिले!!, असे म्हणायची वेळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यातून, राजकीय निर्णयांमधून आणि त्याहीपेक्षा विदूषकी वर्तणुकीतून आली.
गेल्या ५ वर्षांत, देशातील ११ सरकारी बँकांनी त्यांच्या बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून सुमारे ९,००० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून मासिक आधारावर दंड आकारला, तर काहींनी तिमाही आधारावर तो वसूल केला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजला मतदान करणाऱ्या खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी ही माहिती दिली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, निवडणुकीची तारीख पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकते.
मालेगाव मध्ये झालेले बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचाच नमुना असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस प्रणित UPA सरकारने जंग जंग पछाडले होते.
कर्नाटकात मतदान चोरीची सोडून पुडी; राहुल गांधींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकी!!, असला प्रकार आज संसदेबाहेर घडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘मोदी मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ शेतकरी आणि अन्न क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याच वेळी, ईशान्य क्षेत्रातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी चार निर्णय घेण्यात आले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App