बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या जल्लोषादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ कुटुंबांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले. सरकारने पीडितांच्या कुटुंबियांना भरपाईची रक्कम २५ लाख रुपये केली आहे, परंतु हे पैसे त्यांचे दुःख कमी करू शकत नाहीत.
गेल्या ११ वर्षांत, सुमारे २७ कोटी देशवासीय अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत. २०११-१२ मध्ये २७.१ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये अत्यंत गरिबीचा दर फक्त ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. भारताला गरिबीमुक्त राष्ट्र बनवण्याच्या दिशेने ही कामगिरी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्यक्षात, मोदी सरकारच्या दूरदर्शी विचारसरणीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ परदेशात जातो, त्यामुळे देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागतो,” अशा शब्दांत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चॅम्पियन झाल्यानंतर, बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एक जल्लोष आयोजित करण्यात आला होता, मात्र त्याचे रूपांतर शोकसागरात झाले. RCB च्या विजयाच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आलेले काही चाहते त्यांच्या घरी परतू शकले नाहीत. कारण, मोठ्यासंख्येने चाहते जमल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली व त्यात ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले .
भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी, संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांची संख्या ५००० च्या पुढे गेली आहे. राज्य सरकारांनी कोरोनाबाबत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने सुविधा-स्तरीय तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन देखील केले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने दोन महिलांना कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की लग्न हा कुटुंब तयार करण्याचा एकमेव मार्ग नाही, समलैंगिक जोडपे कुटुंब तयार करू शकतात.
एकीकडे पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरवरून भारतावर खोटे आरोप करत आहे, तर दुसरीकडे दुसरीकडे विरोधी पक्षही यात मागे राहिलेले नाहीत. तेही या मुद्य्यावरून सरकारवर सतत निशाणा साधत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांनी ऑपरेशन सिंदूरवर एक वादग्रस्त विधान केले, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूर हा पूर्णपणे भाजपने सुरू केलेला युद्ध उन्माद होता.
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने चारही आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
सीबीआयने एका मोठ्या लाचखोरी प्रकरणात दोघांना अटक केली आहे, ज्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) दिमापूर शाखेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक आणि दिमापूरमधील एका खासगी कंपनीचे मालक यांचा समावेश आहे. बँक व्यवस्थापकाला गुवाहाटी (आसाम) येथून अटक करण्यात आली आहे, तर कंपनी मालकाला दिमापूर (नागालँड) येथून अटक करण्यात आली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आरोप करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर निवडणूक आयोगाने या आरोपांवर कडक भूमिका घेत सर्व प्रश्नांना अगदी मुद्देसूद आणि सडेतोड उत्तर दिले आहे.
मिठी नदीच्या स्वच्छतेतील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्याला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. ईडीने पाठवलेल्या वेळेत, त्याला पुढील आठवड्यात चौकशीसाठी येण्यास सांगितले आहे. शुक्रवारी ईडीने दिनो मोरियाच्या घरावर छापा टाकला.
भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची औपचारिक प्रक्रिया या महिन्यात म्हणजेच जूनच्या मध्यापर्यंत सुरू होऊ शकते.
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!! असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या लेखाने आणली.
मोदी सरकार ९ जून रोजी ११ वर्षे पूर्ण करत आहे. याआधी, केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांच्या कामगिरीची यादी देणारे एक ई-पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याला ‘विकसित भारताच्या अमृत काळातील ११ वर्षे सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण’ असे नाव देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कटरा येथे काश्मीरची पहिली ट्रेन वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले – मला विश्वास आहे की लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिल्यांदा जम्मू आणि काश्मीरला भेट दिली.
पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतरचे operation Sindoor या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी 16 विरोधी पक्षांनी केली
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने त्यांच्या पुढील चलनविषयक धोरण समिती (MPC) बैठकीची तारीख बदलली आहे. आता ही बैठक ५-७ ऑगस्ट २०२५ ऐवजी ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होईल. प्रशासकीय कारणांचा हवाला देत RBI ने आज (६ जून) एक प्रेस रिलीज जारी करून या बदलाची माहिती दिली.
: इराणने चीनकडून हजारो टन घन इंधन आणि रॉकेट ऑक्सिडायझर अमोनियम परक्लोरेट मागवले आहे. याच्या मदतीने ते ८०० हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवू शकते.
फरार उद्योगपती विजय मल्ल्याने दावा केला की देश सोडण्यापूर्वी त्याने तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की तो एका बैठकीसाठी जिनेव्हाला जात आहेत आणि परत येईल. परंतु त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, ज्यामुळे तो परत येऊ शकला नाही.
शुक्रवारी कटरा येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री ओमर देखील सातवी-आठवीपासून काश्मीरला रेल्वेशी जोडणारा श्रप्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत होते.
रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदर ०.५०% ने कमी करून ५.५०% केला आहे. याचा अर्थ असा की येत्या काळात कर्जे स्वस्त होऊ शकतात. तुमचा EMI देखील कमी होईल.
बाजार नियामक सेबीने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीवर मोठी कारवाई केली आहे. सेबीने मेहुल चोक्सीची बँक खाती, म्युच्युअल फंड आणि शेअर्स जप्त करण्याचे आदेश दिले आहेत
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आता विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने ४ जून रोजी एक विजयी रॅली आयोजित केली होती
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक मोहिमेचा भाग म्हणून हे शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचले आहे. हे शिष्टमंडळ राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पोहोचले तेव्हा तिथे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App