एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक भारतातील युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सोबत सहकार्याने काम करेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने बुधवारी याची घोषणा केली. UIDAI ने स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडला सब-ऑथेंटिकेशन यूजर एजन्सी बनवले आहे.
भारताने आपल्या पहिल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-५ ची यशस्वी चाचणी घेतली आहे. बुधवारी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर त्याची चाचणी घेण्यात आली. अग्नि-५ ची मारा क्षमता ५००० किमी आहे. हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. म्हणजेच ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर डागता येते. त्याची पहिली चाचणी एप्रिल २०१२ मध्ये घेण्यात आली.
गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत ३ विधेयके सादर केली. त्यात अशी तरतूद आहे की जर पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याला ५ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी अटक केली गेली किंवा ३० दिवसांसाठी ताब्यात ठेवले गेले तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयके लोकसभेत मांडली, ज्याद्वारे गेंड्यांची कातडी सोलण्याची त्यांनी सोय केली. पण काँग्रेसची प्रवृत्तीच्या वरिष्ठ वकिलांना ते खटकल्याने त्यांनी एखाद्या कॉन्स्टेबलही आता सरकार बदलू शकेल
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या चिंता फेटाळून लावल्या. बांगलादेशने दावा केला होता की माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे काही कार्यकर्ते भारतात त्यांच्याविरुद्ध राजकीय कारवाया करत आहेत.
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांच्या संख्येतील तफावतीचा चुकीचा दावा करणे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ला (सीएसडीएस) अंगलट आले आहे. याप्रकरणी माफी मागितल्यानंतरही सीएसडीएसला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा विचार भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएसएसआर) केला आहे. डेटातील फेरफारीने सीएसडीएसकडून अनुदान-सहाय्य नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका आयसीएसएसआरने ठेवला आहे.
रशियाकडून तेल खरेदी केल्याने भारतावर अमेरिकेने टाकलेला दबाव चुकीचा असल्याचे रशियाने म्हटले आहे. वरिष्ठ रशियन राजनयिक रोमन बाबुश्किन म्हणाले- भारताला हे समजते की तेल पुरवठा बदलण्याचा कोणताही पर्याय नाही, कारण रशियन तेल भारतासाठी खूप फायदेशीर आहे.
भारताने मध्यम अंतराच्या बॅलेस्टिक मिसाइल अग्नी-५ ची आणखी एक यशस्वी चाचणी करून जगाचे लक्ष वेधले आहे.
निवडणूक विश्लेषणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे आणि लोकनीती-सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांच्यावर मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, बैठकीत २ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये राजस्थानमधील कोटा येथील ग्रीनफिल्ड विमानतळ आणि ओडिशातील कटक-भुवनेश्वर ६-लेन रिंग रोडचा समावेश आहे.
एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यापूर्वी त्यांनी संसदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले. त्यांच्यासोबत २० प्रस्तावक आणि २० समर्थकांसह सुमारे १६० सदस्य उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
बेस्टच्या निवडणुकीत उबाठा-मनसेचा पराभव झाला आहे. त्यांनी तो स्वीकारत सुहास सामंत यांचा राजीनामा घ्यावा. उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीमध्ये भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा देत बेस्ट कामगारांना न्याय देणार का? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
भारत आणि चीनने सीमावाद सोडवण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती शक्य तितक्या लवकर सीमांकनावर तोडगा काढेल.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गेंड्यांची कातडी सोलणारी विधेयके!!, एवढे छोटे शीर्षक वाचून हा काय आणि कसला प्रकार आहे??, अशी शंका मनात उत्पन्न होईल आणि ती गैरही नाही.
भ्रष्टाचार किंवा फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यानंतर 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहणाऱ्या मंत्र्यांची त्यांच्या खुर्च्यांवरून उचलबांगडी करायचे विधेयक मोदी सरकारने आज लोकसभेत मांडले
इस्रो जगातील सर्वात मोठ्या रॉकेटपैकी एक बनवण्याची तयारी करत आहे. मंगळवारी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, अंतराळ संस्था ४० मजली इमारतीइतके उंच रॉकेट बनवत आहे. हे रॉकेट ७५,००० किलो म्हणजेच ७५ टन वजन पृथ्वीच्या खालच्या कक्षेत वाहून नेण्यास सक्षम असेल.
मंगळवारी, सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी अंतिम मुदत देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने म्हटले की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कलम १४३ अंतर्गत न्यायालयाचे मत मागणे चुकीचे नाही.’
सोमवारी संध्याकाळी लखनौचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी शुभांशूशी हस्तांदोलन केले आणि त्यांना मिठी मारली. त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे कौतुकही केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शुभांशूंची सुमारे ८ मिनिटे मुलाखत घेतली.
मुंबईतील एका महिला प्रवाशाने इंडिगो विमानाने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सेफगोल्ड (गिटल गोल्ड प्लॅटफॉर्म) च्या सह-संस्थापक रिया चॅटर्जी यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ती उड्डाणादरम्यान शौचालयात गेली होती, त्यादरम्यान सह-वैमानिकाने शौचालयाचा दरवाजा उघडला आणि तिच्याकडे पाहू लागला.
भारताने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली. त्यांचा सामना एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी होईल.
सामाजिक आणि राजकीय शास्त्र क्षेत्रात काम करणारे लोकनीती-CSDSचे प्राध्यापक संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात एक्स वर केलेली पोस्ट डिलीट केली आहे.
ऑनलाइन गेमिंग उद्योगावर गदा येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्याचा प्रस्तावित कायदा तयार केला आहे.
राजकारणात आकडेवारी ही सर्वात धारदार शस्त्र असते. पण तीच आकडेवारी चुकीची ठरली तर? काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सहा महिन्यांत मतदार यादीत तब्बल ४० टक्के घटवाढ झाली असल्याचा त्यांचा दावा ४८ तासांत कोसळला आणि माफी मागण्याची वेळ आली.
ही पहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना करणाऱ्या निवडणुकीत उभा केलंया!!, असं म्हणायची वेळ INDI आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीवरून आली.
राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!, असे त्यांच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडले.सावरकर अवमान प्रकरणात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज राहुल गांधींना किंवा त्यांच्या टीमला माहिती न देताच परस्पर पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यामुळे राहुल गांधींची पुरती गोची झाली. सगळीकडे बातम्या आल्यानंतर तो अर्ज मागे घेण्याची वेळ वकिलावर आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App