दिवाळी आणि हिवाळ्याच्या काळात प्रदूषणाचा सामना करण्यासाठी दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडला जाईल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) याला मान्यता दिली आहे. पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही चाचणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान घेतली जाईल. दिवाळी आणि सप्टेंबरमध्ये वाढणारे धुके कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान किती प्रभावी आहे हे समजून घेण्यासाठी एकूण ५ चाचण्या घेतल्या जातील. आयआयटी कानपूरच्या सहकार्याने या चाचण्या घेतल्या जातील.
राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे
२०-२१ जून रोजी हिमाचल प्रदेशात मान्सून दाखल झाला. आतापर्यंत २० हून अधिक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. ३० जूनच्या रात्रीच मंडी आणि किन्नौरमध्ये १६ ठिकाणी ढग फुटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आफ्रिकन देश घाना येथे पोहोचले. घानाचे राष्ट्रपती जॉन महामा यांनी राजधानी अक्रा येथील विमानतळावर त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींना २१ तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) यांनी त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे की, देशात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या अचानक मृत्यूंचा कोविड लसीशी थेट संबंध नाही.
जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या छायेखाली असताना भारतासाठी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या जागतिक गुंतवणूक समितीने (Global Investment Committee – GIC) आपल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहणार आहे. यामुळे भारतावर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.
नॅशनल हेराल्ड चौकशीतून अनेक काळे धंदे उघड होत आहेत. कर्ज देऊन एखादा सावकार ज्याप्रमाणे मालमत्ता हडपतो तसाच डाव काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या सोनिया आणि राहुल गांधी या मायलेकांनी आखला होता.
काँग्रेस केंद्रात सत्तेवर आली, तर आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालू, असे वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव कर्नाटक मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले.
देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेत काही तरुणांनी उडी घेऊन रंगीत धूर सोडत दहशत माजवली होती. यामुळे खासदारांनीही भीती व्यक्त केली होती. मात्र हे कृत्य देशविरोधी आहे का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकसभा सभागृहात उडी घेऊन रंगीत धूर सोडणाऱ्या दोघांना दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत तरी कुठे लागला दिवा??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेत्याच्या परफॉर्मन्स वरून आली.
काश्मीरमधील जगप्रसिद्ध डल लेकच्या स्वच्छतेसाठी एक डच महिला पर्यटक एलिस हुबर्टिना स्पानडरमन (वय ६९) गेल्या पाच वर्षांपासून झटत आहेत. नेदरलँड्समधून आलेल्या या पर्यटकाने स्वखर्चाने, कोणतीही जाहिरात न करता आणि कोणताही मोबदला न घेता दररोज स्वतः बोट चालवत डल लेकमधील प्लास्टिक आणि इतर कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.
दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे, आणि भारत आण्विक धमक्यांना घाबरणार नाही,” अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये मांडली. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी बोलताना त्यांनी जगाला आवाहन केलं की, दहशतवादाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ‘शून्य सहनशीलता’चं धोरण स्वीकारावं.
काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, जर केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, तर आरएसएसवर बंदी घातली जाईल. प्रियांक यांनी आरएसएसवर धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात काम करण्याचा आरोपही केला.
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक जण जखमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै ते १० जुलै या कालावधीत पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या पाच देशांपैकी तीन देशांना – घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि नामिबियाला भेट देणार आहेत.
लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा; संसदीय भाषणे सगळ्यात कमी, बाकीच्याच कार्यक्रमांचा गाजावाजा!!, हे सत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या अहवालातून समोर आले नसून दस्तूर खुद्द राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उघड झाले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे एक सुनियोजित आर्थिक युद्ध होते. त्याचा उद्देश काश्मीरमधील पर्यटन उद्योग नष्ट करणे होता.
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.
पाकिस्तानला मंगळवारपासून जुलै २०२५ महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळाले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य म्हणून पाकिस्तानच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा एक भाग आहे. पाकिस्तानला UNSC चा तात्पुरता सदस्य होण्यासाठी १९३ पैकी १८२ मते मिळाली. परिषदेचे अध्यक्षपद दरमहा त्याच्या १५ सदस्य देशांमध्ये वर्णक्रमानुसार फिरते आणि या क्रमाने पाकिस्तानला UNSC चे अध्यक्षपद मिळाले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव गंभीर वळण घेण्याआधीच अमेरिकेने मध्यस्थी केली आणि सध्यातरी शांतता पसरली. पण ही शांतता तात्पुरती आणि एकतर्फी वाटते. कारण इराणमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. या दोघांना ‘मोहरिब’ म्हणजेच ‘अल्लाहचे शत्रू’ ठरवून त्यांना शिक्षा देण्याचे आवाहन केले गेले आहे. यासाठी इराणच्या धर्मगुरूंनी इतर इस्लामिक देशांनाही एकत्र येण्यास सांगितले आहे.
दहशतवाद माजवणाऱ्या देशांना आणि दहशतवाद पीडित देशांना एकाच तागडीत तोलू नका, अशा परखड शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांना सुनावले.
इंदूरमधील ७५ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा घेतली जाणार आहे. इंदूर उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) पुन्हा परीक्षा घेण्याचे आणि निकाल लवकरच जाहीर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याचा रँक केवळ पुनर्परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विचारात घेतला जाईल.
कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या २४ वर्षीय विधी विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात गंभीर खुलासे समोर येत आहेत. या गुन्ह्याचा कट आरोपींनी दोन दिवस आधीपासूनच रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१), जो कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या कर्मचारी आणि तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी शाखेचा सक्रिय नेता आहे, त्याच्यासोबत झैब अहमद आणि प्रमीत मुखर्जी या दोन सध्याच्या विद्यार्थ्यांनी हा घृणास्पद गुन्हा केला, असा आरोप आहे.
दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी सीबीआयला जेएनयूच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचे नजीब अहमद प्रकरण बंद करण्याची परवानगी दिली, जो १५ ऑक्टोबर २०१६ रोजी बेपत्ता झाला होता. न्यायालयाने म्हटले की, एजन्सीने तपासाचे सर्व पर्याय वापरले आहेत. सुनावणीदरम्यान, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्योती माहेश्वरी यांनीही आशा व्यक्त केली की नजीब लवकरच सापडेल.
ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करणार आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की २०२९ पर्यंत (पुढील ४ वर्षांत) ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवले जातील, हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे बनतील आणि पाकिस्तान-चीन सीमेवर सतत लक्ष ठेवतील.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App