ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ४ जून रोजी त्यांना उत्तम युद्ध सेवा पदक (UYSM) प्रदान करण्यात आले. तसेच, सोमवारी त्यांना DGMO तसेच उप-प्रमुख लष्कर प्रमुख (रणनीती) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बनत चाललात “रिचर्ड निक्सन” आणि जागतिक सत्ता संतुलनात अमेरिकेचा घसरत चाललाय पाय असेच ट्रम्प यांच्या सध्याच्या राजकीय हालचालींमधून समोर आले.
ईदच्या उत्सवानंतर सार्वजनिक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकल्या जात असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आरोप केला की राज्यातील हिंदूंविरुद्ध गोमांस हे शस्त्र बनवले जात आहे.
काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे धाकटे भाऊ लक्ष्मण सिंह यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे लक्ष्मण सिंह यांना काँग्रेसने ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधील सात जिल्ह्यांचा समावेश आहे.
बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भारताविराेधातच संघर्ष करण्याची तयारी केली हाेती. मात्र, बांग्ला देशाच्या लष्करप्रमुखांनीच हा डाव उधळून लावला. सरकारवरील नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी युनूस यांनी भारतासोबत सीमेवर छोटा मोठा संघर्ष करण्याची योजना बनवली होती. त्यातून देशप्रेमाची भावना निर्माण होईल आणि लोक त्यांच्यासोबत उभे राहतील ही अपेक्षा होती. विना निवडणूक सरकार टिकवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. परंतु बांगलादेशाचे सैन्य प्रमुख वकार उज जमां यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी हा डाव उधळून लावला.
नितीश कुमार यांच्यावर over dependency म्हणजेच ज्यादा अवलंबित्व ठेवल्याने भाजपला तोटा चिराग पासवान यांनी मध्येच दामटला घोडा!! ही बिहारच्या राजकारणातल्या निवडणुकीपूर्वीची सुरुवात आहे.
Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले.
ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल जगाला सांगून परतलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले.
महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक मोठी आर्थिक झळ ठरणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मद्याच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, उत्पादन शुल्कात (Excise Duty) वाढ केली आहे. त्यामुळे आता देशी दारूपासून ते विदेशी प्रीमियम ब्रँडपर्यंत सगळ्याच मद्य प्रकारांची किंमत वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडणार असली तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.
शुभांशु शुक्ला हे फ्लोरिडा (यूएसए) येथून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) कडे रवाना झाले आहेत. त्यांच्या १४ दिवसांच्या प्रवासात ते भारतीय संशोधकांनी तयार केलेले सात महत्वपूर्ण प्रयोग करणार आहेत. हे प्रयोग दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कर्नाटक सरकारने राज्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही जनगणना पारदर्शक आणि सर्व समाजघटकांचा समावेश असलेली असेल. या प्रक्रियेसाठी वेळापत्रक लवकरच निश्चित होईल आणि ९० दिवसांत अहवाल तयार केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगभरात पाकिस्तानाच खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता का होती, हे सांगण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली.
भारतीय लष्कराला लवकरच एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र, ड्रोन भारताच्या सीमेवरून सहज पाडले जाईल.
दिल्लीतील द्वारका Dwarka येथे आज (मंगळवार) सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली.
राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एका नवीन पोस्टद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी तेज प्रताप यांनी त्यांच्या वडिलांबद्दल पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तेजप्रताप यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि एका ओळीचे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये भिंतीवर लालू यादव यांचा फोटो बनवलेला दिसत आहे, ज्याला तेजप्रताप यादव मिठी मारताना दिसत आहेत.
पुण्यातून शरद पवारांचा आणि कोलकत्यातून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला, पण दोघांनीही काँग्रेसच्याच पायाखालच्या सतरंज्या खेचल्या हेच राजकीय वास्तव चित्र आज समोर आले.
मणिपूरमधील हिंसाचारानंतर, महामार्ग अडथळे आणि वाहतूक मार्गांमध्ये व्यत्यय आल्याने सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चुराचांदपूर आणि राजधानी इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
भारतीय हवाई दलाला (IAF) लवकरच तीन आधुनिक I-STAR (गुप्तचर, पाळत ठेवणे, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध) गुप्तचर विमाने मिळणार आहेत. या प्रकल्पाची किंमत १०,००० कोटी रुपये आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आहे, असे म्हणत फ्रँचायझीने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
केरळमधील कोची येथे सोमवारी सकाळी सिंगापूरचे मालवाहू जहाज MV WAN HAI 503 मध्ये आग लागली. घटनेच्या वेळी कार्गोमध्ये 22 क्रू मेंबर्स होते. आग लागल्यानंतर त्यापैकी 18 जणांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यापैकी काहींना भाजून दुखापत झाली. तथापि, सर्वांना वाचवण्यात आले आहे. परंतु, 4 क्रू मेंबर्स बेपत्ता असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथे सोमवारी घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या अपघातात 13 प्रवासी खाली पडले असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.
सोमवारी मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप मुख्यालयात सरकारचे काम, निर्णय आणि धोरणे यावर पत्रकार परिषद घेतली.
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स भारतात त्यांची स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीला भारतात कामकाज सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना देखील मिळाला. आता, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील दोन महिन्यांत भारतात त्यांच्या सेवा सुरू करेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App