पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या विरोधातच घटना दुरुस्ती कायदा आणला. पंतप्रधान जर जेलमध्ये गेले, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल पण विरोधकांना जेलमध्ये गेल्यावर देखील तिथून सरकार चालवायचे आहे
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) बीआर गवई यांनी शनिवारी सांगितले की, परीक्षेतील गुण आणि रँक हे विद्यार्थी किती यशस्वी होईल हे ठरवत नाही. यश हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि समर्पणातून येते. गोव्यातील व्हीएम साळगावकर लॉ कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात ते बोलत होते.
एकीकडे राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे मतदार अधिकार यात्रा; त्याचवेळी काँग्रेसच्या आमदाराने बोलून दाखवली कर्नाटकातली पक्षाची हतबलता!!, हा असला राजकीय काय आज एकाच दिवशी घडला.
कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. वीरेंद्र यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी ईडीने वीरेंद्र यांच्या घरावर छापा टाकला.
उत्साही तरुणाने राहुल गांधींचा घेतला मुका; सुरक्षारक्षक आणि हाणला ठोका!!, हा प्रकार राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेत घडला. राहुल गांधींनी विश्वनाथ प्रताप सिंग यांची कॉपी मारून बिहारमध्ये मोटरसायकल वरून मतदार अधिकार यात्रा काढली. यावेळी त्यांच्या समवेत तेजस्वी यादव देखील दुसऱ्या मोटरसायकलवर बसून त्या यात्रेत सामील झाले होते.
जीएसटी कौन्सिलची ५६ वी बैठक ३ ते ४ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे असेल. जीएसटीशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेते. या परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.
आतापर्यंत बांगलादेशातून मजूर आणि कामगार यांची घुसखोरी भारतात होत होती. पण आता त्यात बांगलादेशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचीही भर पडली असून बांगलादेशातला वरिष्ठ पोलीस अधिकारी आरिफ उज जमान याने भारतात घुसखोरी केली. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने त्याला पकडला. पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिला. आज बशीरहाट न्यायालयाने आरिफ उज जमान याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील संघटनेने (SCWLA) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या टिप्पण्या धक्कादायक आणि अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. २० ऑगस्ट रोजी काटजू यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मला डोळा मारणाऱ्या महिला वकिलांच्या बाजूने मी निर्णय दिला.
ट्रम्पच्या शुल्काला प्रतिसाद म्हणून, भारतीय टपाल विभाग २५ ऑगस्टपासून अमेरिकेला सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंचे बुकिंग स्थगित करणार आहे. सध्या हा निर्णय तात्पुरता लागू केला जाईल.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता १६३२ कोटी रुपयांची आहे. यातील सुमारे ५७% संपत्ती चंद्राबाबूंकडे आहे.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहार मधले स्वयंघोषित मुख्यमंत्री तेजस्वी यादव बनायला चाललेत व्ही. पी. सिंग आणि रामधन; पण फक्त मोटरसायकलवर फेरी मारून त्यांना प्राप्त होईल का सत्ताधन??
व्यापार कराराबाबत अमेरिकेशी चर्चा सुरू आहे, परंतु भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतकरी आणि लहान उत्पादकांच्या हितांशी तडजोड करणार नाही,असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणाले, या करारातील काही मुद्द्यांवर भारताची ‘लाल रेषा’ निश्चित आहे. या लाल रेषा प्रामुख्याने आपल्या शेतकऱ्यांच्या आणि काही प्रमाणात लहान उत्पादकांच्या हितांशी संबं
ऑनलाइन मनी गेमिंगवरील बंदीनंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजक ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने आज (२३ ऑगस्ट) एक नवीन वैयक्तिक वित्त अॅप लाँच केले आहे. हे ड्रीम मनी अॅप आर्थिक व्यवस्थापनासाठी काम करेल.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुग्राम आणि नवी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला. येथून, तंत्रज्ञानाच्या आधारे अमेरिकन नागरिकांना १५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १३० कोटी रुपये) फसवले गेले. एजन्सीने तीन आरोपींना अटक केली आहे.
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत अजूनही चर्चा सुरू आहे आणि आपल्यात कोणतेही “भांडण” झालेले नाही.शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की, भारत शेतकरी आणि लहान उत्पादकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे.
सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) आणि त्यांचे संचालक अनिल अंबानी यांच्याविरुद्ध २,९२९.०५ कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात एफआयआर दाखल केलाआहे. शनिवारी, एजन्सीने मुंबईतील कफ परेडमधील अंबानी यांच्या ‘सी विंड’ निवासस्थानाची आणि कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. एसबीआयच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. २०१८ च्या आकडेवारीनुसार त्यांचे २,९२९ कोटींचे नुकसान झाले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सांगितले की, चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या नियमातून सूट घेण्यास नकार दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारत आता जगाला मंद विकासातून बाहेर काढण्याच्या स्थितीत आहे.ते म्हणाले की आपण साचलेल्या पाण्यात खडे फेकणारे लोक नाही आहोत. वेगाने वाहणाऱ्या प्रवाहालाही वळवण्याची ताकद आपल्यात आहे. काळाच्या प्रवाहाला दिशा देण्याची क्षमता आता भारताकडे आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे म्हणाले की, भारत-चीन संबंध सुधारत आहेत हा योगायोग आहे. चीन देखील आपल्या सद्भावनेला प्रतिसाद देईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संबंध सुधारण्यासाठी राजकीय, राजनैतिक आणि लष्करी पातळीवर अनेक उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या भारताला चकाकणारी मर्सिडीज म्हणण्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुनीर यांचे विधान ते विनोद (ट्रोल) मानत नाहीत, तर त्यांच्या अपयशाची कबुली देतात.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद उपक्रमातून देशातल्या विविध राज्यांच्या महिला आयोगांची एकजूट बांधली. या एकजुटीतून सुरक्षिततेबरोबरच सक्षमीकरण आणि शक्तीचाही आत्मविश्वास महिलांना दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकाता दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी येथे ५२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदींनी जेसोर रोड मेट्रो स्टेशनवरून नोआपारा-जय हिंद विमानबंदर मेट्रो मार्ग, सियालदाह-एस्प्लानेड मेट्रो मार्ग आणि बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. या मार्गांची एकूण लांबी १३.६२ किमी आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केरळमध्ये सांगितले की, विरोधी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी नक्षलवाद्यांना मदत केली होती. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
नवीन आयकर कायदा २०२५ ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने नवीन नियम अधिसूचित केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ते १९६१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल. कर कायदे सोपे करण्यासाठी सरकारने नवीन आयकर विधेयक आणले आहे. यामुळे कर दरात कोणताही बदल होणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घातलेल्या जमात ए इस्लामी संघटनेच्या 215 शाळा केंद्र सरकारने बंद केल्या होत्या. जम्मू काश्मीर मधल्या विद्यार्थ्यांना इस्लामी कट्टरपंथाकडे ढकलण्याची प्रक्रिया थांबवली होती. त्याचे चांगले परिणाम गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिसले. जम्मू काश्मीर मधला फुटीरतावाद कमी झाला. विद्यार्थ्यांमधली विष पेरणी कमी झाली. काश्मीर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 215 शाळा बंद ठेवल्या. परंतु, त्याचा वेगळा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष देखील व्हायला लागले. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी जम्मू-काश्मीरमधल्या उमर अब्दुल्ला सरकारने केंद्र सरकारच्या पाठिंब्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App