काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या भेटीचे कौतुक केले आहे आणि निवडणुकीदरम्यान एकमेकांवर झालेल्या कटू हल्ल्यांनंतरही लोकशाही भावना कायम राहिली असल्याचे म्हटले आहे.
हरियाणातील अल फलाह विद्यापीठात मनी लॉन्ड्री करण्यापासून ते दहशतवादापर्यंतचे सगळे खेळ उघडपणे झाले पण त्याच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उघडताच त्याच विद्यापीठाने विद्यार्थी आणि पालकांचे हित जपले पाहिजे असे अश्रू काढायचे चाळे सुरू केले.
२०२६च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्रपक्ष द्रमुकसोबत जागावाटपाची औपचारिक वाटाघाटी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे आणि ती दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या आराखड्यांबाबत चर्चा करेल.
वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करुन त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील. जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून, नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन, विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Justice Surya Kant भारताचे पुढचे सरन्यायाधीश बनण्याच्या तयारीत असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, देशातील ५ कोटींहून अधिक प्रलंबित खटले न्यायव्यवस्थेसमोर सर्वात […]
लोकसभेच्या बुलेटिनमध्ये शनिवारी वृत्त देण्यात आले की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अणुऊर्जा विधेयकासह दहा नवीन विधेयके सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. अणुऊर्जा विधेयक खासगी कंपन्यांना अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची परवानगी देईल.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी चार तस्करांना अटक करत १० परदेशी बनावटीची पिस्तुले आणि ९२ काडतुसे जप्त केली. यात ३ तुर्की बनावटीचे पीएक्स-५.७ पिस्तूल, पाच चिनी बनावटीचे पीएक्स-३ पिस्तुलांचा समावेश आहे. ही पिस्तुले विशेष दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाचे मॉडेल आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिष्काराला न जुमानता, सदस्य देशांनी शनिवारी, G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने तयार केलेल्या घोषणेस एकमताने मान्यता दिली. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, अमेरिका सामील झाली नसली तरी, अंतिम निवेदनावर सर्व देशांचे एकमत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बिहार विधानसभेच्या 2025 च्या निवडणुकीत एनडीएने मिळवलेला विक्रमी विजय हा जरी भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) व इतर सहयोगी पक्षांच्या संयुक्त प्रचारामुळे दिसत असला, तरी याचा पाया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घातला होता.
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराकडून धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप करत मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार नोंदवली आहे. मालवणीत सुरू असलेल्या सरकारी जागेवरील अतिक्रमणाबाबत करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये काही राजकीय व्यक्तींनी अडथळे आणत असल्याची आधीपासून चर्चा होती. मात्र, ही परिस्थिती आता राजकीय संघर्षात बदलत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे.
शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळले. या अपघातात कांगडा येथील रहिवासी विंग कमांडर नमन स्याल (३४) यांचा मृत्यू झाला. ही घटना उड्डाण सरावादरम्यान घडली. नमन यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. अपघाताच्या वेळी त्यांचे पालक सहलीवर होते आणि त्यांना तिथेच ही बातमी मिळाली. नमन यांच्या कुटुंबात त्यांचे पालक, त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे. त्यांची पत्नी देखील हवाई दलात ग्राउंड ऑफिसर आहे.
केरळ सरकारने एसआयआरविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाकडून (ईसी) उत्तर मागितले. केरळ आणि इतरांनी दाखल केलेल्या या याचिकांमध्ये केरळमध्ये एसआयआर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या शक्यता फेटाळून लावल्या. शिवकुमार यांनी शुक्रवारी एक्स वर पोस्ट केले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री आणि मी दोघांनीही वारंवार सांगितले आहे की आम्ही हाय कमांडचे पालन करतो.
G20 चे नव्या अलिप्त राष्ट्र संघटनेमध्ये रूपांतर; नरेंद्र मोदी ठरले जवाहरलाल नेहरूंची replacement!!, असे राजकीय चित्र दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग मध्ये भरलेल्या जी 20 शिखर परिषदेतून समोर आले.
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी संस्कृत भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. द्रमुक नेत्याने शुक्रवारी केंद्र सरकारवर टीका केली आणि म्हटले की, तमिळ विकासासाठी फक्त १५० कोटी रुपये दिले जातात, तर संस्कृत, जी एक मृतप्राय भाषा आहे, तिला २,४०० कोटी रुपये मिळतात.
नाराज बिराज काही नाही एकनाथ शिंदेही तेवढेच “तयार”; भाजपला जे जमले नाही ते करून दाखविणार!!, राजकीय चित्र एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यातून समोर आले.
सरकारने चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत, जे शुक्रवारपासून देशभरातील सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आहे. पूर्वी अस्तित्वात असलेल्या २९ वेगवेगळ्या कामगार कायद्यांमधील आवश्यक घटक चार सोप्या आणि स्पष्ट नियमांमध्ये विभागले गेले आहेत.
२५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावाला समन्स बजावण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सिद्धांतला समन्स बजावले आहे. सिद्धांतला २५ नोव्हेंबर रोजी त्याचे म्हणणे नोंदवावे लागेल.
दक्षिण आफ्रिकेतील श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवरील अत्याचारांचा उल्लेख करून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावर्षीच्या G20 शिखर परिषदेतून गैरहजर राहिले आहेत. दरम्यान, युक्रेन संघर्षासंदर्भात आयसीसीकडून अटक वॉरंट जारी होण्याची भीती असल्याने पुतिन यांनी उपस्थित राहण्याचे टाळले आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) केवळ अनेक नोकऱ्या बदलणार नाही, तर भविष्यात मोठ्या कंपन्यांच्या सीईओंची जागाही घेऊ शकते.
पंजाबमधील लुधियाना येथे पोलिसांनी दहशतवाद्यांचा एन्काउंटर केलाय. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावरील लाडोवाल टोल प्लाझाजवळ ही चकमक झाली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी एक दिवस आधी हरियाणा आणि बिहारमधील दहशतवाद्यांना हातबॉम्बसह अटक केली होती.
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. हा खटला ब्रिटिश शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांच्याशी संशयास्पद व्यवहारांशी संबंधित आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
नितीश कुमार हे १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी गुरुवारी पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत २६ मंत्र्यांनीही शपथ घेतली. नितीश यांच्या मंत्रिमंडळात जमुईमधून विजयी झालेल्या श्रेयसी सिंहसह दहा नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चार दिवसांच्या युद्धात (ऑपरेशन सिंदूर) पाकिस्तानला मोठे लष्करी यश मिळाल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आला आहे.
देशातील २७२ प्रमुख व्यक्तींनी काँग्रेस पक्षाला एक खुले पत्र लिहून म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी वारंवार संवैधानिक संस्थांवर हल्ला करत आहेत,
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App