भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आता 15 जुलै 2026 पासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे अंमलबजावणीची तारीख जाहीर केली असून, या करारामुळे भारत आणि यूकेमधील व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसमध्ये दाखल झाले. जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचले. विमानतळावर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
राजस्थानमधील कोटा येथे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी १७ जून रोजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर, परीक्षा व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या घटनांवर जोरदार टीका केली. हा कार्यक्रम “छात्रों की गूंज” या मोहिमेचा भाग असून, देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात कोट्यातून करण्यात आली.
फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतावर कोणताही हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासन दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होर्मूज मध्ये तीन भारतीय खलाशी मारले गेल्याचा विषय उपस्थित केला. त्यालाही डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले, पण ते “सौम्य” होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्याचा सगळा भर नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक स्तुतीवर आणि भारत – अमेरिका संबंधांवर दिला.
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निर्णय घेतील.
भारत सरकारने NEET-UG च्या पुनर्परीक्षेच्या संदर्भात भारतात टेलिग्राम मेसेजिंग ॲपच्या वापरास तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली.
कफ सिरप आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार नाहीत. केंद्र सरकारने औषध नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार, सिरपला आता त्या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यात औषधे थेट दुकानातून खरेदी करता येत होती.
ममता, उद्धव नंतर अखिलेशचा नंबर; पण शरद पवारांचे आठ खासदार बसणार हात चोळत!!, असेच राजकीय अवस्था दिल्लीत दिसून येतेय.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या याचिकेत न्यायालयाला निकालाच्या वैधतेवर विचार करण्याची मागणी केली आहे. ममता स्वतः मंगळवारी याचिका दाखल करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या.
अयोध्येतील राम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांच्या चोरीबाबत मंगळवारी पोलिसांकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या. पहिली तक्रार ‘धर्मसेना’चे संस्थापक संतोष दुबे यांनी, दुसरी उत्तर प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद शुक्ला यांनी आणि तिसरी करणी सेनेने दाखल केली. मात्र, पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मंगळवारी फ्रान्समधील एव्हियान येथे दाखल झाले. या बैठकीदरम्यान, जी-७ देशांचे आणि पाहुण्या देशांचे राष्ट्रप्रमुख भेटले, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली.
जिओ प्लॅटफॉर्म्सने ग्लोबल पेटंट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) च्या ताज्या पेटंट कोऑपरेशन ट्रीटी (PCT) रँकिंगमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्स ग्लोबल टॉप-20 मध्ये पोहोचले आहे. कंपनी 2025 च्या यादीत 320 स्थानांनी वर चढून 20 व्या स्थानावर पोहोचली आहे.
नीट परीक्षेचे आयोजन 21 जून रोजी पुन्हा केले जात आहे. परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पेन आणि पेपर मोडमध्ये होईल. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्सना एका अज्ञात ठिकाणी लॉकडाऊनमध्ये ठेवले जाईल. या काळात त्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागेल. नीटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की पेपरफुटीच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी पेपर सेटर्ससाठी कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
पाटणा येथील ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांनी फैजल खान उर्फ खान सर यांच्यावर भावाची हत्या केल्याचा आरोप केला आहे. रोशन आनंद यांनी सोमवारी सांगितले की, खान सर आणि किसान कोल्ड स्टोअरचे मालक आर.एस. प्रसाद यांनी मिळून माझा भाऊ प्रिन्स याची हत्या केली आहे.
भारताने लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्याची आपली क्षमता आणखी मजबूत करत, स्वदेशी लाँग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईल (LRLACM) ची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली, ज्यात क्षेपणास्त्राने आपली सर्व उद्दिष्ट्ये यशस्वीरित्या पूर्ण केली.
RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात कर्नाटकातल्या काँग्रेस सरकार मधले मंत्री प्रियांक खर्गे यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. संघाने नोंदणी करावी, उत्पन्नावर आयकर भरावा, वगैरे मुद्द्यांवर भर दिला.
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी करार झाला आहे. या बातमीनंतर सोमवारी जगभरातील शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावत म्हटले की, संघटना ना गुप्त आहे ना जनतेच्या नजरेपासून दूर काम करते.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले की, आरटीआय सक्रियता (अॅक्टिव्हिझम) हा एक नवीन व्यवसाय बनला आहे. न्यायालयाची ही टिप्पणी आरटीआय कार्यकर्ते राकेश बेहल आणि त्याच्या सहकाऱ्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या प्रकरणात आली. न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.
अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीच्या चौकशीसाठी एसआयटी (विशेष तपास पथक) सोमवारी दुपारी 3 वाजता अयोध्येत पोहोचले. सूत्रांनुसार, पथक थेट राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात गेले आणि तेथे चौकशी सुरू केली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.
नवी दिल्ली, पुणे आणि लखनऊ पाठोपाठ जयपूरला आंदोलन करायला गेलेल्या CJP अभिजीत दिपके वर आज “केजरीवाल प्रयोग” झाला. जयपूर मधल्या आंदोलनादरम्यान एकाने गर्दीतून येऊन अभिजीत दिपके याच्या कानाखाली जाळ काढला.
भगवान व्यंकटेश्वरांच्या चरणी अर्पण करण्यात येणारे केस आता तिरुमला मंदिरासाठी अक्षरशः ‘काळे सोने’ ठरत आहेत. श्रद्धेपोटी केले जाणारे केशदान मंदिराच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत बनले असून यंदा या माध्यमातून विक्रमी कमाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे २०२६ महिन्यात तिरुमलामध्ये केशदानाचा नवा उच्चांक नोंदवला गेला असून अवघ्या २७ दिवसांत १२ लाख ४३ हजारांहून अधिक भाविकांनी आपले केस देवाला अर्पण केले आहेत.
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडल्याचा दावा समोर आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तब्बल 28 खासदारांपैकी 20 खासदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारत त्रिपुरातील लहान प्रादेशिक पक्ष ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे या गटाने पंतप्रधान
ना शिंदे प्रयोग, ना अजितदादांचा खेळ, ना मालिवाल फालीवाल; भाजपने तृणमूलच्या बंडखोर खासदारांचा केला वेगळाच “डाव”!!, हे राजकीय सत्य कालच्या आणि आजच्या तृणमूळ काँग्रेसच्या 20 खासदारांच्या राजकीय खेळीतून समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App