राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शुक्रवारी अयोध्या राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणासंदर्भात आपले पहिले निवेदन जारी केले. महासचिव दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, “रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमधून निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का बसला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
विपक्षी पक्षांच्या INDIA ब्लॉक आघाडीने भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) एक संयुक्त पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पत्रात (SIR) थांबवण्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याचा विचार करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका स्वयंसेवकाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या (Defamation) खटल्यात न्यायालयाने प्रियांक खर्गे आणि मोहम्मद हॅरिस नलापाद यांना अधिकृत समन्स बजावले असून २१ जुलै २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्याच चर्चा पण अजून कार्यवाही का होई ना??, असा सवाल काही राजकीय हालचालींमुळे आणि त्या संबंधांमधल्या बातम्यांमुळे समोर आला.
भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंडने बुधवारी रात्री एडनच्या आखातात एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. एमव्ही गोल्डन आर्सेनल या जहाजावर एक भारतीय खलाशीही होता आणि ते भारतासाठी महत्त्वाचा माल घेऊन येत होते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार केलेल्या बनावट कायदेशीर उदाहरणांचा वापर धोकादायक आहे. याची गंभीरता समजावून सांगण्यासाठी न्यायालयाने म्हटले की, हा धोका भोपाळ गॅस दुर्घटनेतील विषारी (AI) वायू गळतीइतकाच मोठा आहे.
अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात देणगीची चोरी झाली. या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज अधिकृतपणे कठोर भूमिका जाहीर केली.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी सांगितले की, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील की नाही, यावर पुढील दोन-तीन महिन्यांतच निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या काहीही सांगणे शक्य नाही.
राजधानी नवी दिल्लीत घातपाती कारवाया घडवून आणायच्या बेतात असलेल्या चार दहशतवाद्यांना कालच दिल्ली पोलिसांच्या अँटी टेररिस्ट स्व्काडने (ATS) अटक केली
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर गटाने गुरुवारी दुपारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. बंडखोर गटाचे 10 सदस्यीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनात त्यांना आपली ‘धाकटी बहीण’ असे संबोधले. त्यांनी सांगितले की, ताकाइची यांची ही भारताची पहिलीच भेट आहे आणि जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे स्वागत करणे आनंदाची बाब आहे.
अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाचा तपास अधिक तीव्र झाला आहे. गुरुवारी, विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरातील एका बंद खोलीत विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांची चौकशी करत आहे. आमंत्रित विश्वस्त सदस्य गोपाल राव यांना खोलीबाहेर बसवण्यात आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय बारगळल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षात विलीन करायच्या बातम्या सुरू झाल्या. या बातम्यांना आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हवा दिली.
चार दिवसांत समोरच्याला प्रेमात पाडा.’ हा काही फिल्मी डायलॉग नाही, तर म्यानमारमधील सायबर स्कॅम सेंटर्समध्ये काम करणाऱ्यांना दिला जाणारा आदेश आहे. डिजिटल जगात विश्वास आणि भावनांना शस्त्र बनवून चाललेल्या सायबर महाफसवणुकीच्या कारखान्यात नोकरीचे आमिष दाखवून भारत आणि इतर अनेक देशांतून तस्करी करून आणलेले तरुण-तरुणी सामील आहेत.
भारत आणि अमेरिका, भारत आणि युरोप यांच्यातल्या मुक्त व्यापार करारांची अजून चर्चाच सुरू असताना भारत आणि जपान यांच्यात मात्र व्यापार वृद्धी अनेक क्षेत्रांचा विस्तार या विषयावर व्यापक विचार विनिमय झाला.
तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांचे सरकार पाडण्यासाठी तमिलगा वेत्री कळगम (टीव्हीके) च्या आमदारांना 35 कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याच्या कथित कटाचा पर्दाफाश केला आहे.
जून 2026 मध्ये 1.94 लाख कोटी रुपयांचे GST संकलन झाले आहे. हे एप्रिलमधील विक्रमी 2.42 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 20% कमी आहे. तथापि, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या म्हणजेच जून 2025 च्या तुलनेत ते 14% जास्त आहे. जून 2025 मध्ये ₹1.71 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. सरकारने आज म्हणजेच 1 जुलै रोजी GST संकलनाचे आकडे जाहीर केले.
भारत आणि जपान व्यापारात अमेरिकन डॉलरची भूमिका कमी करण्याच्या तयारीत आहेत. निक्की एशियाच्या अहवालानुसार, दोन्ही देश अशी व्यवस्था तयार करण्यावर काम करत आहेत, ज्यामुळे व्यवसायाचे पेमेंट थेट भारतीय रुपया आणि जपानी येनमध्ये होऊ शकेल.
राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी अविनाश शुक्लाच्या अयोध्येतील योग केंद्रातून पोलिसांनी एक पेटी जप्त केली आहे. त्यावर लाल रंगाने ‘रामराज्य कोष’ असे लिहिले होते. पेटीएमचा QR कोड लावलेला होता. 28 जून रोजी झालेल्या या छापामारीचा व्हिडिओ बुधवारी सकाळी समोर आला.
भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांतील 117 मान्यवरांनी पंतप्रधान मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पत्र लिहिले आहे.
भारताने सिंधू जलकरार आवळून धरल्यामुळे एकीकडे पाकिस्तानला भारताशी चर्चेची तहान; दुसरीकडे भारतातच हल्ले करायचा ISI मॉड्यूलचा पर्दाफाश!!, असला प्रकार समोर आलाय.
जर एखादा पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्यमंत्री गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाल्यानंतर सलग 30 दिवस न्यायालयीन कोठडीत राहिल्यास, त्यांना पद सोडावे लागू शकते. यासंबंधीची विधेयके सरकार पावसाळी अधिवेशनात पुन्हा सादर करू शकते.
भारताने सिंधू करार आवळून पाकिस्तानचा घसा कोरडा पाडताच “बुद्धिमत्तांना” लागली भारत – पाकिस्तान शांततेची तहान!!, हे राजकीय वास्तव समोर आले.
केंद्रातल्या मोदी सरकारला बारा वर्षे पूर्ण झाली म्हणजेच मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू झाली. या तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि भविष्यात करणार काय??, याचे तपशील आकडेवारीसकट समोर आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App