डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ अकाउंट वर भारताविरुद्ध पुन्हा आगपाखड केली. भारत रशियाकडून अजूनही तेल घेतोच आहे. पण नुसते तेल घेऊन तो थांबत नाही
कॅलिफोर्नियामध्ये राहणारे आणि खलिस्तानी विचारसरणीचे विरोधक असलेले भारतीय-अमेरिकन व्यावसायिक सुखी चहल यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे.त्यांच्या जवळचे मित्र जसपाल सिंग यांनी शनिवारी सांगितले की, ३१ जुलै रोजी सुखीला एका ओळखीच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. जेवणानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
राज्यसभा खासदार आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (गुरुजी) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते तिथेच दाखल होते. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी म्हटले – काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशद्रोही आहेत. ते फक्त बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांसोबत आहेत. राहुल गांधी भारतीय हिंदूंसोबत नाहीत आणि भारतीय मुस्लिमांसोबतही नाहीत.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शनिवारी पक्ष नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत अर्थव्यवस्थेवरील विधानाला पाठिंबा दिल्यावर भाष्य करण्यास नकार दिला. थरूर म्हणाले- मी माझ्या पक्षाच्या नेत्याच्या शब्दांवर भाष्य करू इच्छित नाही. असे म्हणण्यामागे त्यांची स्वतःची कारणे आहेत.
चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवला. एक दिवसीय सामन्यासारखी चुरस असलेल्या सामन्यात इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी मात केली. मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत इंग्लंडच्या संघाचे शेपूट गुंडाळून टाकले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आलीये. यासंदर्भातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. यानंतर शनिवारी याच खटल्यातून निर्दोष सुटलेल्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराचा खुलासा केला.
राहुल गांधींनी भारत आणि चीन यांच्यातल्या वादात चीनची बाजू उचलून धरल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना ठोकले.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले की, आपले खासदार पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी संपूर्ण जगात गेले, पण कोणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून म्हणालो की पाकिस्तान जबाबदार आहे, पण कोणीही त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही.
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ३७ आवश्यक औषधांच्या किमती १०-१५% ने कमी केल्या आहेत. यामध्ये हृदय, मधुमेह आणि संसर्गाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटामॉल, एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन सारख्या औषधांचा समावेश आहे.
माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले की, समान नागरी संहितेची इच्छा संविधानात व्यक्त करण्यात आली आहे. संविधानाच्या ७५ वर्षांनंतर, आता हे ध्येय साध्य करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्व जाती, समुदाय आणि वर्गांना विश्वासात घेऊनच हे पाऊल उचलले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तुम्ही खरे भारतीय असता, तर असलं बोलला नसतात, अशा परखड शब्दांमध्ये सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींचे वाभाडे काढले. भारतीय सैन्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारले. चीनने 2000 किलोमीटर जमीन बळकावल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. पण खरा भारतीय असे कधीच म्हणणार नाही
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.
२९ जुलै रोजी बांगला भवनला लिहिलेल्या अधिकृत पत्रात दिल्ली पोलिसांनी बांगला भाषेचे वर्णन बांगलादेशी भाषा असे केले. त्यात लिहिले होते, ‘भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे बांगलादेशी भाषेत आहेत. अशा परिस्थितीत, पुढील तपासासाठी बांगलादेशी राष्ट्रीय भाषेचा अधिकृत अनुवादक उपलब्ध करून द्या.’
निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना मतदार कार्डचे दोन EPIC क्रमांक कसे मिळाले, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. बिहारच्या दिघा विधानसभेच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तुम्ही EPIC क्रमांक RAB2916120 दाखवला होता, जो अधिकृतपणे जारी केलेला नाही.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये टॅरिफ जाहीर केल्यानंतर भारताने अमेरिकेकडून कच्च्या तेलाची खरेदी दुप्पट केली आहे. एप्रिल-जून तिमाहीत, वार्षिक आधारावर त्यात ११४% वाढ […]
रात्रीच्या पार्ट्यांमध्ये जाऊ नका, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो… मित्रांसोबत अंधारात, निर्जन ठिकाणी जाऊ नका. सामूहिक बलात्कार होऊ शकतो… शुक्रवारी सकाळी अहमदाबादच्या रस्त्यांवर या वादग्रस्त शब्दांचे पोस्टर दिसले. तथापि, वादानंतर, काही वेळातच हे पोस्टर्स काढून टाकण्यात आले.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकाच कॅटेगरीत आले. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आरोपांचे हिट अँड रन केले, पण निवडणूक आयोगाने त्यांना बरोबर कायद्याच्या कचाट्यात अडकवले!!
लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहार मधल्या मतदार यादीच्या मुद्द्यावर संपूर्ण देशभर गाजावाजा केला निवडणूक आयोगापासून ते भाजप पर्यंत सगळ्यांना ठोकून काढले. पण राहुल गांधी नेमके काय आहेत??, याची पोल प्रशांत किशोर यांनी खोलली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शेतकरी कायद्याला आणि सरकारला विरोध केल्याबद्दल धमकी दिल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, मला आठवते की जेव्हा मी शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते.
शनिवारी गुरुग्राममध्ये केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राहुल गांधी यांच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचे पुरावे निवडणूक आयोगाला द्यावेत. खट्टर म्हणाले की, केवळ २०२४ मध्येच नाही, तर २०१९ मध्येही राहुल गांधी हेच बोलत होते आणि २०२९ च्या निवडणुकांबद्दलही ते हेच म्हणतील.
अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे ३ ऑगस्ट रोजीच ती थांबवण्यात आली.काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी म्हणाले की, पावसामुळे यात्रा मार्गांचे बरेच नुकसान झाले आहे. बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम केले जाईल, त्यामुळे यात्रा थांबवावी लागली आहे. मार्गांवर सतत मशीन आणि कर्मचारी तैनात असल्याने यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. शनिवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी स्वतः ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की बीएलओने येऊन आमची पडताळणी केली. तरीही आमचे नाव मतदार यादीत नाही.
राहुल गांधी यांनी गेल्या १० दिवसांत तिसऱ्यांदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राहुल म्हणाले, भारताची निवडणूक व्यवस्था मृतप्राय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कशी धांधली होऊ शकते हे आम्ही येत्या काळात तुम्हाला सिद्ध करू आणि ते घडलेही आहे.
बंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने माजी जेडीएस खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला मोलकरीण बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रेवण्णाला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने शुक्रवारी रेवण्णाला दोषी ठरवले. रेवण्णाने आपण काहीही चुकीचे केले नाही असा दावा करत कमी शिक्षेसाठी न्यायालयात अपील केले होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App