निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर शनिवारी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे बाबरी मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी करत आहेत. त्यांचे समर्थक सकाळपासूनच डोक्यावर विटा घेऊन बांधकाम स्थळाकडे कूच करत आहेत.
सिगारेट-पान मसाला यांसारख्या उत्पादनांवर सरकार आता अतिरिक्त कर लावेल. अतिरिक्त करातून मिळणाऱ्या पैशांचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापर केला जाईल. ही माहिती शुक्रवारी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
देशात ३५,४३४ हून अधिक पोक्सो प्रकरणे दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, प्रलंबित प्रकरणांच्या संख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश (१०,५६६ प्रकरणे) देशात पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र (७,९६२ प्रकरणे) दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पश्चिम बंगाल (२,००३ प्रकरणे) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू (१,९१० प्रकरणे) चौथ्या क्रमांकावर आहे आणि मध्य प्रदेश (१,७३६ प्रकरणे) पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये ३७५ प्रकरणे, राजस्थानमध्ये २२४, बिहारमध्ये १,०७९, झारखंडमध्ये ३१५, पंजाबमध्ये १५२, हरियाणामध्ये ६०६, चंदीगडमध्ये १६, हिमाचल प्रदेशमध्ये १०१ आणि उत्तराखंडमध्ये ३७४ प्रकरणे दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.
कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुर्शिदाबादमध्ये बांधल्या जाणाऱ्या बाबरी मशिदीच्या कोनशिला कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच, या काळात शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असेही म्हटले.
भारत व रशियाच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही देशांनी २०३० पर्यंतच्या नवीन रोडमॅपला सहमती दर्शवली आहे. याअंतर्गत व्यापार ९ लाख कोटींपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत आशा व्यक्त केली की, ९ लाख कोटी रुपयांचे व्यापाराचे उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले जाईल.
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीत रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पुतिन यांना त्यांचे सुरक्षित परतणे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्यात किमान ४४ भारतीय अडकले आहेत.
कर्नाटकातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सशुल्क मासिक पाळी रजा लागू करण्यात आली आहे. महिलांना वर्षातून अशा 12 रजा मिळतील. राज्य सरकारने 9 ऑक्टोबर रोजी मासिक पाळी रजा धोरण (MLP) 2025 ला मंजुरी दिली होती. याचा फायदा सरकारी महिला कर्मचाऱ्यांसोबतच, खाजगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही मिळेल.
ओडिशा विधानसभेने बुधवारी ओडिशा शॉप्स अँड कॉमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स बिल 2025 मंजूर केले. आता महिला कर्मचारी अशा दुकानांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करू शकतील. नवीन बिलात सरकारने कामाचे तास 9 वरून 10 तास केले आहेत.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल पुढे गेले आहेत पण ते 21 डिसेंबर च्या पुढे ढकलू नका ते निकाल 21 डिसेंबरलाच लावा
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे पती आणि भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील स्वराज कौशल यांचे गुरुवारी निधन झाले. दिल्ली भाजपने X पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील बेलडांगा येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे आमदार हुमायूं कबीर यांना तृणमूल काँग्रेस (TMC) ने गुरुवारी पक्षातून निलंबित केले. कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी ही माहिती दिली. महापौर म्हणाले की, पक्ष जातीय राजकारणावर विश्वास ठेवत नाही.
सुप्रीम कोर्ट गुरुवारी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकारांनी किंवा राज्य निवडणूक आयोगांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना SIR ची कर्तव्ये पार पाडावी लागतील.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबाबत चर्चा करण्यासाठी लोकसभेत पोहोचलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 % ची कपात जाहीर करून कर्जदारांना दिलासा दिला.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर पोहोचत असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय लष्कराच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मधील अनेक महिला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन न दिल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत नाश्ता केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एका महिला रिपोर्टरला मांसाहारी खाण्याबद्दल प्रश्न विचारला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत DRG चे 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे IG सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.
केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले की, संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि हेरगिरी होणारही नाही. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ॲपबाबत काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, फीडबॅकच्या आधारावर मंत्रालय ॲप इन्स्टॉल करण्याच्या आदेशात बदल करण्यास तयार आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी X पोस्टमध्ये केंद्र सरकारच्या जात जनगणनेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.त्यांनी लिहिले- संसदेत मी सरकारला जात जनगणनेबद्दल प्रश्न विचारला, त्यांचे उत्तर धक्कादायक आहे. ना कोणती ठोस रूपरेषा, ना वेळेनुसार योजना, ना संसदेत चर्चा, आणि ना जनतेशी संवाद. इतर राज्यांच्या यशस्वी जात जनगणनेच्या रणनीतीतून शिकण्याची कोणतीही इच्छा नाही. मोदी सरकारची ही जात जनगणना देशातील बहुजनांसोबत उघड विश्वासघात आहे
कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, चार नवीन कामगार संहितांचे मसुदा नियम लवकरच पूर्व-प्रकाशित केले जातील. त्यानंतर 5 दिवसांपर्यंत कोणीही सूचना देऊ शकेल आणि नंतर अंतिम अधिसूचना येईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App