सुप्रीम कोर्ट गुरुवारी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करत आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकारांनी किंवा राज्य निवडणूक आयोगांनी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना SIR ची कर्तव्ये पार पाडावी लागतील.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबाबत चर्चा करण्यासाठी लोकसभेत पोहोचलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 % ची कपात जाहीर करून कर्जदारांना दिलासा दिला.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर पोहोचत असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. मोदी आणि पुतिन यांनी विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत एकाच गाडीने प्रवास केला.
रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर लादिमीर पुतीन यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातले राजनैतिक, लष्करी आणि सामरिक संबंध मोठ्या उंचीवर जाण्याची अपेक्षा असताना केवळ राजनैतिक आणि लष्करी संबंधांवर भर न देता ते अन्य क्षेत्रांमध्ये विस्तारित व्हावेत याकडेही पुतिन यांच्या दौऱ्यातून भर देण्यात येणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांची सरकारी आणि प्रशासने त्या दृष्टीने तयारी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय लष्कराच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) मधील अनेक महिला हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन न दिल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाच्याही दबावाखाली बिलकूल काम करत नसल्याचा निर्वाळा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतिन यांनी दिला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासोबत नाश्ता केल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी एका महिला रिपोर्टरला मांसाहारी खाण्याबद्दल प्रश्न विचारला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एरवी मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण करणाऱ्या ममता बॅनर्जींनी सुद्धा बाबरीची धास्ती घेतली. पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधायची घोषणा करणाऱ्या आमदाराची त्यांनी तृणमूळ काँग्रेस मधून हकालपट्टी करून टाकली.
छत्तीसगडमध्ये दंतेवाडा-बीजापूर सीमेवर जवानांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. याचवेळी, चकमकीत DRG चे 3 जवान शहीद झाले असून 2 जखमी झाले आहेत. बस्तर रेंजचे IG सुंदरराज पी. यांनी याची पुष्टी केली आहे.
केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले की, संचार साथी ॲपद्वारे हेरगिरी करणे शक्य नाही आणि हेरगिरी होणारही नाही. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ॲपबाबत काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, फीडबॅकच्या आधारावर मंत्रालय ॲप इन्स्टॉल करण्याच्या आदेशात बदल करण्यास तयार आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी X पोस्टमध्ये केंद्र सरकारच्या जात जनगणनेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.त्यांनी लिहिले- संसदेत मी सरकारला जात जनगणनेबद्दल प्रश्न विचारला, त्यांचे उत्तर धक्कादायक आहे. ना कोणती ठोस रूपरेषा, ना वेळेनुसार योजना, ना संसदेत चर्चा, आणि ना जनतेशी संवाद. इतर राज्यांच्या यशस्वी जात जनगणनेच्या रणनीतीतून शिकण्याची कोणतीही इच्छा नाही. मोदी सरकारची ही जात जनगणना देशातील बहुजनांसोबत उघड विश्वासघात आहे
कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले की, चार नवीन कामगार संहितांचे मसुदा नियम लवकरच पूर्व-प्रकाशित केले जातील. त्यानंतर 5 दिवसांपर्यंत कोणीही सूचना देऊ शकेल आणि नंतर अंतिम अधिसूचना येईल.
भारतीय रेल्वे तत्काळ तिकिटांच्या काउंटर बुकिंगमध्ये बदल करणार आहे. आता प्रवाशांना तिकीट कन्फर्म करण्यासाठी मोबाईलवर OTP व्हेरिफाय करावा लागेल. ही प्रणाली पुढील काही दिवसांत देशभरातील सर्व गाड्यांवर लागू होईल.
पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा कोट्यवधी रुपयांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार शीतल किसनचंद तेजवानी हिला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे नाव समोर आल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शीतल तेजवानी परदेशात पळून गेल्याची चर्चा असतानाच तिला बेड्या ठोकल्याने तपासाला वेग येणार आहे..
इंडिया आर्कियोलॉजिकल सर्वे (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक केके मुहम्मद यांनी म्हटले आहे की, मुस्लिमांनी आणखी दोन ऐतिहासिक जागा सोडून द्याव्यात, जी मंदिरेदेखील आहेत. पहिली- मथुरा, जे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. दुसरी- ज्ञानवापी, जे भगवान शिवाशी संबंधित आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने आणि कठोर साधनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे असे या तरुणाचे नाव असून, त्याने काशी (वाराणसी) येथे अत्यंत कठीण मानले जाणारे ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण केले आहे. त्याच्या या अद्वितीय कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबैया सईद यांचे 1989 मध्ये घरातून अर्धा किलोमीटर दूर अपहरण करण्यात आले होते. रुबैया या जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या बहीण आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी सांगितले की, आज जागतिक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले जाते आणि हे भारताची वाढती जागतिक ताकद दर्शवते. भारत आता जगात आपले योग्य स्थान प्राप्त करत आहे.
कुत्र्यापायी सत्ता गेली, तरी काँग्रेस नेत्यांची जिरली नाही मस्ती; कॅमेऱ्यासमोर भुंकल्या रेणुका चौधरी!!, असेच चित्र संसदेच्या परिसरात दिसले.
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. मे 2025 मध्ये सुरू झालेल्या या ऑपरेशनदरम्यान भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाविरुद्ध मजबूत तैनाती केली. यामुळे पाकिस्तान नौदल आपली जहाजे बंदरांमधून बाहेर काढू शकले नाही आणि अरबी समुद्राजवळच्या मकरान किनारपट्टीपर्यंतच मर्यादित राहिले.’
इकडे महाराष्ट्रात महायुती फुटण्याकडे डोळे लावून बसले; तिकडे झारखंडमध्ये Indi आघाडीच्या पायाचे दगड हादरले!!, असेच राजकीय चित्र आज दिसून आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी दावा केला की, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बाबरी मशिदीचे बांधकाम सरकारी पैशातून करू इच्छित होते, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना तसे करू दिले नाही.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही ‘घालमेल’ किंवा फेरफार करण्यासाठी पुरेसा आहे,” अशी भीती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App