केंद्र सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, OCI (Overseas Citizen of India) नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.गृह मंत्रालयाने केलेल्या सुधारणांनुसार, OCI नोंदणीसाठी आता कागदपत्रांची पारंपरिक पद्धत जवळपास संपुष्टात येत असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना दूतावास किंवा कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात तब्बल ₹993 ची वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत सुमारे ₹3,071.50 झाली आहे.
वाढत्या इंधन दरांमुळे आणि विमानांच्या सुट्या भागांच्या तुटवड्यामुळे एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी दररोज सुमारे 100 उड्डाणे रद्द करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर होणार असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील नर्मदा नदीवरील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १९ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. १५ हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.
अमेरिकेने भारताला सुमारे 1.4 कोटी डॉलर किमतीच्या 657 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. या कलाकृती तस्करी नेटवर्कद्वारे परदेशात पोहोचवण्यात आल्या होत्या, ज्या तपासानंतर जप्त करून परत करण्यात आल्या. मॅनहटन डिस्ट्रिक्ट ॲटर्नी एल्विन ब्रॅग यांनी मंगळवारी या कलाकृती परत करण्याची घोषणा केली. या सर्व कलाकृती आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्कच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारताने ऑपरेशन सिंदूर आपल्या इच्छेने आणि आपल्या अटींवर थांबवले होते. त्यांनी असेही सांगितले की, गरज पडल्यास देश पाकिस्तानविरुद्ध दीर्घकाळाच्या लढाईसाठी पूर्णपणे तयार आहे.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकांचे मतदान संपताच त्यांच्या निकालांची “अशी” काही चाहूल लागली, की तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आज शांतपणे कामगार दिनाच्या कार्यक्रमात सामील झाले, तर काल रात्रीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये घुसून जबरदस्त गोंधळ घातला. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल नेमका कसा लागेल, याची राजकीय चुणूक काल आणि आज व्यवस्थित दिसली.
सर्वोच्च न्यायालयाने 15 वर्षांच्या बलात्कार पीडितेला 30 आठवड्यांच्या गर्भधारणेत गर्भपाताच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मध्यरात्री 1 वाजता सांगितले, ‘जर EVM लुटण्याचा आणि मतमोजणीत फेरफार करण्याचा प्रयत्न झाला
दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस खरिया यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. ही घटना दुपारी १२:५६ वाजताची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हरदोई येथून यूपीच्या सर्वात लांब गंगा एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले. जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी घोषणा केली की, एक्सप्रेस-वे हरिद्वारलाही जोडला जाईल.
केरळमधील सबरीमाला मंदिरासह इतर धार्मिक स्थळांमध्ये महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. अधिवक्ता इंदिरा जयसिंग यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना न्यायालयाने म्हटले की, सामाजिक सुधारणांच्या नावाखाली धर्माला पोकळ करता येणार नाही. श्रद्धा आणि विवेकाच्या मुद्द्यांवर न्यायालयात वाद होऊ शकत नाही.
बंगळुरुमध्ये बुधवारी मुसळधार पावसादरम्यान रुग्णालयाची भिंत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ मुलांचाही समावेश आहे. ७ जखमींना वाचवण्यात आले आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदलाचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये ई८५ (८५ टक्के इथेनॉल आणि पेट्रोल) आणि ई १०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) यांसारख्या इंधनांचा औपचारिक समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आयात केल्या जाणाऱ्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल.
तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या एक्झिट पोलमध्ये अभिनेता विजय यांच्या पक्षाने मोठा धक्का दिल्याचे चित्र समोर आले आहे. या अंदाजानुसार विजय यांचा तमिझगा वेत्री कळगम (TVK) पक्ष 98 ते 120 जागांसह राज्यातील सर्वात मोठी ताकद बनू शकतो.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार असले, तरी त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजांमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
2026 च्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या एक्झिट पोल्सनी देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्तेचे चित्र स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणे दिसत आहेत. काही ठिकाणी सत्तांतराची चिन्हे आहेत, तर काही ठिकाणी विद्यमान सरकारला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाबमधील पटियाळा येथील राजपुरा येथे अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरमागे दहशतवाद्यांचा हात असू शकतो. रेल्वेच्या विशेष पोलीस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सांगितले की, यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. त्यांनी हे देखील उघड केले की, ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी रुळावरून मालगाडी जात होती. यामुळे मालगाडीला नुकसान झाले नाही, परंतु चालकाला धक्का बसला.
अमेरिकेत व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करणाऱ्या 31 वर्षीय कोल टॉमस ॲलनवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. डिनर कार्यक्रमात ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स, कॅबिनेट सदस्य आणि वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 1 मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चालक संघटनांकडून ४ मे रोजी संपाचा इशारा देण्यात आला होता. या तणावपूर्ण परिस्थितीत मंत्री सरनाईक यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीतून काही महत्त्वाचे निर्णय पुढे आले.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान 7 लोकांचा मृत्यू झाला, तर 75 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी, मुले आणि सामान्य नागरिक यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात १४९ मतदारसंघात आज मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांनी तिथे विक्रमादित्य वैदिक घड्याळ देखील पाहिले.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींनी ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध जोरदार प्रचार केला, पण आज मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते भाई जगताप यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्याच बाजूने कौल दिला. काँग्रेस मधली ही मोठी राजकीय विसंगती मतदानाच्या दिवशीच उघड्यावर आली
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) पहिल्यांदाच आपले अंतराळवीर कॅडर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोच्या अंतराळवीर निवड समितीने याची शिफारस केली आहे. मात्र, याचे निकष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App