राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी समारंभाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानावर प्रकाश टाकणारे एक स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील. हा कार्यक्रम सकाळी १०:३० वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होईल.
शतकानुशतकांची शेजारधर्माची नाती आता लोहमार्गातून आणखी घट्ट होणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यात पहिल्यांदाच रेल्वे दुव्याची घोषणा झाली असून, केंद्र सरकारने तब्बल 4,033 कोटींचा खर्च मंजूर केला आहे. हा प्रकल्प “मेक इन इंडिया”चा एक मोठा टप्पा मानला जात आहे.
राहुल गांधी आणि शरद पवारांच्या सकट लिबरल लोकांनी Gen Z च्या पोरांवर ठेवला भरवसा; पण त्या पोरांनी JNU मध्ये फडकवला संघाचा झेंडा!!, असला प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने घडलेला समोर आला.
भारत आणि भूतान दरम्यान पहिल्यांदाच रेल्वे सेवा सुरू होत आहे. यासाठी दोन रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे.परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे रेल्वे मार्ग आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफू आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत टाकले जातील.
केरळमधील शबरीमला मंदिरातून गायब झालेले चार किलो सोने २७ सप्टेंबर रोजी सापडले. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या (टीडीबी) दक्षता शाखेने वेंजरमुडू परिसरातून ते सोने जप्त केले.
मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असताना तिथल्या मदरशांमध्ये 500 पेक्षा जास्त हिंदू मुलांचे धर्मांतर करायचे कारस्थान उघडकीस आले आहे.
बिहारची निवडणूक वाऱ्यावर सोडून राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघून गेलेत. दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियात बोगाटाला पोहोचण्याचा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनीच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी दिल्ली भाजपच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. ते म्हणाले, “भाजपच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्या बीजापासून आज भाजप एवढ्या मोठ्या वटवृक्षात वाढला आहे, ते ऑक्टोबर १९५१ मध्ये रोवले गेले होते. त्यावेळी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना झाली.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावरून आता गवई कुटुंबात मोठा वाद उभा राहिला आहे.
लवकरच तुम्ही मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणेच तुमचे गॅस कनेक्शन कोणत्याही कंपनीला स्विच करू शकाल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (पीएनजीआरबी) यासाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील आणि सेवा सुधारतील.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ हे नाव लिहून त्यावरून दौड काढण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे मुस्लिम समाजाने आक्रमक होत कोतवाली पोलिस ठाणे गाठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीसाठी प्रस्तावना लिहिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “गजवा-ए-हिंद”च्या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थेट जहन्नुमची (नरकाची) तिकिटे मिळतील.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80 व्या अधिवेशनात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे आश्रयस्थान ठरवत त्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधत म्हटले की, “भारताने स्वातंत्र्यापासून दहशतवादाचा सामना केला आहे. आमचा शेजारी देश आजही जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे.”
क्रिकेटच्या मैदानावर केले माकड चाळे; पण दणकून पराभवानंतर पाकिस्तान्यांना आले खिलाडू वृत्तीचे उमाळे!!, असला प्रकार दुबईतल्या क्रिकेट स्टेडियम मधून समोर आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांमी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला फेटाळून लावत कठोर भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर आत्मसमर्पण करायचे असेल तर थेट बंदुका खाली ठेवा. त्यासाठी युद्धबंदीची गरज नाही. सरकारकडून एका गोळीचाही मारा होणार नाही. पण निरपराध नागरिकांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर गोळीला गोळीनेच उत्तर दिले जाईल.”
ऑनलाइन बेटिंग ॲप 1xBet च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवून आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या विजयानंतर लोक सोशल मीडियावर आनंद साजरा करत आहेत आणि भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करत आहेत. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खास शैलीत भारतीय संघाचे अभिनंदन केले.
माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (एजीएम) रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.
तुरुंगात असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी त्यांच्या पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी रविवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निषेध करत असत आणि ४ सप्टेंबरच्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते.
भारताने आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या स्पर्धेचे ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.रविवारी, भारतीय संघाने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १४७ धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ६९ धावा करून नाबाद राहिला.
दुबईत झालेल्या आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेट्सने मात करत नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘X’ वर लिहिले,
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी त्यांच्या सीमांचल न्याय यात्रेच्या चौथ्या दिवशी कटिहारमध्ये पोहोचले. ते बलरामपूर विधानसभा मतदारसंघात ३० किमीचा रोड शो करतील. त्याआधी ओवैसी यांनी बारसोई येथील पीडब्ल्यूडी मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. यादरम्यान ते म्हणाले की, सीमांचलमधील लोकांना त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी राजकीय नेतृत्व मजबूत करण्याची आवश्यकता असेल.
दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट-रिसर्चचे प्रमुख स्वामी चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थसारथी यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी आग्रा येथून अटक केली. चैतन्यानंदवर अनेक विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App