भारतामध्ये सक्रिय असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने सोमवारी सकाळपासून मोठी मोहीम उघडली. जम्मू-काश्मीरसह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधील एकूण २२ ठिकाणी समांतर धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत अनेक संशयितांवर चौकशी करण्यात आली असून, मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद असलेले पुरावे जप्त करण्यात आले.
आगामी सणासुदीच्या काळात भारतीय वस्तूंना प्राधान्य देऊन देशी उद्योगांना बळकटी मिळवून द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनडीए खासदारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघात ‘स्वदेशी मेळे’ आयोजित करावेत. यामधून स्थानिक उत्पादक, कारागीर, लघुउद्योग, महिला स्वयं-सहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होईल.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता न्यायालयात सहारा इंडिया ग्रुपविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात १.७४ लाख कोटी रुपयांच्या चिट फंड घोटाळ्याचा उल्लेख आहे.ईडीने सहारा संस्थापक दिवंगत सुब्रत रॉय यांच्या पत्नी सपना रॉय आणि मुलगा सुशांत रॉय यांना आरोपी म्हणून नाव दिले आहे. अनिल वलपारंपिल अब्राहम आणि जितेंद्र प्रसाद (जेपी) वर्मा यांच्यासह समूहाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील आरोपींमध्ये आहेत.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.
भारताने पुरुष हॉकी आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव केला. भारताने हे विजेतेपद चौथ्यांदा जिंकले. या विजयासह भारताने २०२६ च्या विश्वचषकातही स्थान मिळवले.
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने पुढील सात वर्षांत (आर्थिक वर्ष २०३२ पर्यंत) वीज उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि ट्रान्समिशन-वितरणात सुमारे ६० अब्ज डॉलर्स (सुमारे ५.३४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या गुंतवणुकीचा उद्देश भारताची वेगाने वाढणारी वीज मागणी पूर्ण करणे आणि देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यास मदत करणे आहे.
भाजप खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा रविवारी सुरू झाली. पंतप्रधान मोदींनीही त्यात सहभाग घेतला. यादरम्यान ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. फोटो शेअर करताना पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, संसद कार्यशाळेत, देशभरातील सहकारी संसद सदस्य आणि वरिष्ठ नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि जनतेची चांगली सेवा करण्यासाठी असे व्यासपीठ खूप महत्वाचे आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक काही तासांवर येऊन ठेपले आहे. या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए आघाडीने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Vice President Election : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले- लव्ह जिहाद आणि धर्मांतर हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सौहार्दासाठी गंभीर धोका आहे. ते म्हणाले- बळजबरीने, प्रलोभनाने किंवा फसवणुकीने केलेले धर्मांतर अयोग्य आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊ शकते. आमचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत हे थांबवणे आहे. या समस्येचे निराकरण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की लवकरच अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जसा प्रशांत किशोरने गांधी आंबेडकरांच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला मुस्लिमांना दिलाय
बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय.
शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे.
भारताच्या सुरक्षेसमोर उभे ठाकलेले धोके दिवसेंदिवस वाढत असून ते केवळ सीमारेषेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते बहुआयामी झाले आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी दिलेल्या भाषणात या धोक्यांची सविस्तर चर्चा करत सहा प्रमुख आव्हाने अधोरेखित केली. सीमारेषेवरच नव्हे तर डिजिटल व तांत्रिक रणांगणावरही ताकद दाखवावी लागणार आहे असे आवाहन त्यांनी केले.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हलचल. एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना दिलेला पाठिंबा काँग्रेससाठी वरदान की अडचण, यावरच आता चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देशभरात भव्य पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्याला ‘नवभारताचा रोडमॅप’ असे संबोधण्यात आले
ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबर रोजी बोलावलेल्या ब्रिक्स नेत्यांच्या व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर करतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.
भारताच्या लॉबिंग नंतर डोनाल्ड ट्रम्पची खरंच चुकीची कबुली की तात्पुरती उपरती??, असा सवाल विचारायची वेळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या वर्तणुकीतून समोर आली.
सत्ताधारी NDA खासदारांच्या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले शेवटच्या रांगेत!!, असे चित्र आज दिसून आले. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची दोन दिवसांची कार्यशाळा संसदेत असणाऱ्या जी एम सी बालयोगी सभागृहात आज सुरू झाली.
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. अभिनेत्याच्या फाउंडेशनने पूरग्रस्त मदतीसाठी ५ बोटी पाठवल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस आणि पंजाब पर्यटन अध्यक्ष दीपक बाली यांनी पूरग्रस्त फिरोजपूर गावाला भेट दिली आणि सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थेने पाठवलेल्या बोटी प्रशासनाला सुपूर्द केल्या. यापैकी २ बोटी फिरोजपूर सीमेवर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित बोटी राज्यभरातील बचाव कार्यात वापरल्या जातील.
बारामुल्ला लोकसभा खासदार रशीद इंजिनियर यांच्यावर दिल्लीच्या तिहार तुरुंगात हल्ला करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी ते त्यांच्या बॅरेकमध्ये असताना एका ट्रान्सजेंडरने त्यांच्यावर हल्ला केला. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की रशीद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ते सुरक्षित आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या एक दिवस आधी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणारा एनडीए खासदारांचा डिनरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच, शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भाजप खासदारांचा डिनरचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देऊ शकतात. हे ९ सप्टेंबर रोजी होऊ शकते. ज्यामध्ये मोदी पंजाबशिवाय हिमाचल आणि उत्तराखंडला भेट देऊ शकतात. पंजाबमध्ये ते गुरुदासपूरला जाऊ शकतात.
अमेरिका आता एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्या इतपत ती दुबळी झालीय का??, असा सवाल विचारायची वेळ एका अमेरिकन पत्रकार आणि विश्लेषकाच्या वक्तव्यामुळे समोर आली. Rick Sanchez
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सासाराम येथील फजलगंज स्टेडियममध्ये एनडीए आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नितीश कुमार हे फक्त निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्री राहतील. तेजस्वी यांनी दावा केला की, गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पुन्हा निवडले जातील.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App