भारत माझा देश

yogi-adityanath

yogi-adityanath : ‘आम्ही कुणालाही छेडणार नाही, पण जर का कुणी आम्हाला छेडलंच तर…’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजधानी लखनऊमध्ये भारत शौर्य तिरंगा यात्रेची सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला.

Turkey and Azerbaijan,

Turkey and Azerbaijan : तुर्कस्तान आणि अझरबैजानचे नापाक कृत्य, पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे भारतीयांकडून पर्यटनावर बहिष्कार

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला जगातील बहुतांश देशांनी पाठिंबा दिला. मात्र तुर्कस्तान आणि अझरबैजान या देशांनी मात्र पाकिस्तानच्या नापाक कृत्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भारतीय जनतेने या दोन देशांविरुद्ध बहिष्काराची हाक दिली आहे. सोशल मीडियावर #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan हे हॅशटॅग्स ट्रेंडवर आहेत

United nations

United nations : भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर संयुक्त राष्ट्राकडून आली पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर जगाची परिस्थिती चांगली आहे.

BJP Minister Vijay Shah

BJP Minister Vijay Shah : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजप मंत्री विजय शाह यांचे वादग्रस्त वक्तव्य; संतापाची लाट

ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक मोहिमेची जगासमोर माहिती मांडणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या भाषणातील धर्माचा उल्लेख करत केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे देशभरात टीकेची लाट उसळली आहे.

S. Jaishankar

S. Jaishankar : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ

पहलगाम दहशतवादी हल्ला, त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्रमंत्र्यांना आधीच झेड दर्जाची सुरक्षा आहे. आता त्यांच्या ताफ्यात एक बुलेटप्रूफ वाहनही समाविष्ट करण्यात आले आहे.

Indian Iron Dome

Indian Iron Dome : ऑपरेशन सिंदूरमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला नवे बळ; आकाशतीर प्रणाली ठरते ‘भारतीय आयर्न डोम’

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केवळ दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले नाही, तर स्वदेशी संरक्षण क्षमतेचा प्रभावी वापर करत जगाला तांत्रिक प्रगती आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडविले. या कारवाईत भारतीय लष्कराने प्रगत हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने लष्करी तळ, धोरणात्मक स्थळे आणि नागरी ठिकाणांचे यशस्वीरित्या संरक्षण केले.

Sukhbir Badal

Sukhbir Badal : ‘’पाकिस्तानला युद्धबंदीची मागावी लागली भीक’’

शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख सुखबीर बादल यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ आणि स्पष्ट दृष्टिकोनाचे कौतुक केले.

वाजपेयींनी स्वीकारले होते, no first use; मोदींनी नाकारले nuclear blackmail; धोरणातल्या 360° बदलाने धास्तावल्या महासत्ता!!

Operation sindoor मध्ये पाकिस्तानात अगदी खोलवर जाऊन भारताने हल्ले केले, ते मराठ्यांची 1758 मधली रणनीती स्वीकारून. परकीय अफगाण हल्लेखोरांना हुसकावून लावताना मराठे अटकेपर्यंत पोहोचले होते.

US-Saudi Arabia

US-Saudi Arabia : अमेरिका-सौदी अरेबियामध्ये 12.1 लाख कोटींचा ऐतिहासिक संरक्षण करार

अमेरिका आणि सौदी अरेबियाने मंगळवारी १४२ अब्ज डॉलर्स (१२.१ लाख कोटी रुपये) चा संरक्षण करार केला. व्हाईट हाऊसने याला इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार म्हटले आहे.

Operation Sindoor

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरच्या विजयामुळे पाकिस्तान नमला, बीएसएफ जवानाची अखेर सुटका

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने केवळ दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले नाहीत, तर पाकिस्तानने ताब्यातघेतलेल्या भारतीय जवानाची सुटका करण्यास भाग पाडले.

Justice BR Gavai

Justice BR Gavai : न्यायमूर्ती बीआर गवई भारताचे नवे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (बीआर गवई) यांनी आज (बुधवार, १४ मे) रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश (सीजेआय) म्हणून शपथ घेतली. ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहेत. त्यांच्या आधी, न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश होते. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

Pakistani

Pakistani : पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी हकालपट्टी, २४ तासांत देश सोडण्याचे आदेश

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक राजनैतिक निर्णय घेतला आहे. दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला ‘persona non grata’ घोषित करत २४ तासांच्या आत देश सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या अधिकृत जबाबदारीच्या चौकटीबाहेर जाऊन अशा कृती केल्या असल्याचा आरोप भारताने केला असून, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर पावलं उचलण्यात आली आहेत.

Andaman and Nicobar Islands

Andaman and Nicobar Islands : मान्सून अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला 27 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला.

CJI Sanjiv Khanna'

CJI Sanjiv Khanna’ : कायदेशीर व्यवसायात सत्याचा अभाव त्रासदायक आहे; निरोप समारंभात CJI संजीव खन्ना यांची प्रतिक्रिया

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी निवृत्तीनंतर कोणतेही अधिकृत पद भूषवणार नाही, परंतु कायद्याच्या क्षेत्रात त्यांचे काम सुरू ठेवतील असे म्हटले आहे. १८ जानेवारी २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात बढती मिळालेले न्यायमूर्ती खन्ना यांची ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. मंगळवार हा सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता

Operation sindoor

Operation sindoor मधून काय मिळवले??, पाकिस्तानात “पंजाबी हार्ट लँड” वर प्रहार केले; करण थापरला ठणकावून शशी थरूर यांनी गप्पा केले!!

भारताने “ऑपरेशन सिंदूर” मधून काय मिळवले??, असा “अतिउच्चशिक्षित बौद्धिक” प्रश्न करण थापरने विचारला

PM Modi

PM Modi : पीएम मोदी म्हणाले- प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचे उत्तर आपल्या अटींवर देऊ; दहशतवाद्यांना घरात घुसून मारू

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. येथे ते हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. यानंतर त्यांनी २८ मिनिटे सैनिकांना संबोधित केले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर, आज होणार केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडेच झालेल्या युद्धबंदी करारानंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) नवी दिल्ली येथे होणार आहे.

Foreign Ministry

परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे 2 दावे फेटाळले; व्यापार थांबवण्याच्या धमकीवर युद्धबंदी केली नाही

जम्मू-काश्मीर प्रश्नात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप स्वीकारार्ह नाही, असे भारताने मंगळवारी म्हटले आहे. भारत-पाकिस्तान हे प्रश्न आपापसात सोडवतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, पाकिस्तानला पीओके रिकामा करावे लागेल. सर्व प्रकरणे द्विपक्षीय पद्धतीने सोडवली जातील.

Randhir Jaiswal

द फोकस एक्सप्लेनर : काश्मीर प्रश्नावर भारताची रोखठोक भूमिका; पाकिस्तानने PoK रिकामा करावा, तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नको

भारत सरकारने स्पष्ट केले आहे की जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणताही मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यातच द्विपक्षीय पद्धतीने सोडवला जाईल, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका राहणार नाही. मंगळवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की पाकिस्तानला बेकायदेशीरपणे व्यापलेले काश्मीर (पीओके) रिकामा करावे लागेल. त्यांनी पुनरुच्चार केला की हे भारताचे बऱ्याच काळापासूनचे धोरण आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.

PM Modi

PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

आज पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान सीमेजवळील आदमपूर एअरबेसला भेट दिली. हा तोच आदमपूर एअरबेस आहे, जो पाकिस्तानने चिनी सॅटेलाइट इमेजद्वारे नष्ट केल्याचा खोटा दावा केला होता. आदमपूर एअरबेसला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सीमेवरून पाकिस्तान आणि चीनला काय इशारा दिला, या भेटीद्वारे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण जगाला कसे दाखवले गेले, ते आजच्या द फोकस एक्सप्लेनरद्वारे जाणून घेऊया.

Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

मराठ्यांनी सिंधू नदी जिंकली, चिनाब, रावी, झेलम पार केली, अटक किल्ला जिंकून घेतला. अटकेपार झेंडे लावले, त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत लढाई नेऊन ठेवली.

Akhilesh Yadav

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया साइट X वर माहिती दिली आहे, की त्यांची मुलगी अदिती यादव हिच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. अखिलेश म्हणाले आहेत की आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. अखिलेश म्हणाले की, हे माझ्याकडून एफआयआरपेक्षा कमी समजू नये.

Rupee gains

Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नेत्रदीपक वाढ सुरूच आहे. मंगळवारी रुपया ७५ पैशांच्या वाढीसह ८४.६५ वर आला. तर मागील सत्रात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.३८ वर बंद झाला होता.

Slap on USA

Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. त्याचे credit अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याकडे ओढून घेतले. अमेरिकेने व्यापाराची लालूच दाखवून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध टाळले, असे ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात “मध्यस्थी” करायची “ऑफर” दिली. या दोन्ही बाबी भारताने आज ठामपणे फेटाळून लावल्या

Air India

Air India : एअर इंडियाने जारी केली अ‍ॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या रूपात भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात