पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर आणि मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!, असे घडू लागले आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पुनरुज्जीवन केले जाते, पण दहशतवादाची मात्र अंडीच उबवली जातात. तेच पाकिस्तानात पुन्हा घडू लागले आहे.
मध्य प्रदेशचे आदिवासी व्यवहार मंत्री विजय शाह कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शाह यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी ७ तास बिहारमध्ये राहिले. प्रशासनाची परवानगी न घेता ते दरभंगा येथील वसतिगृहात पोहोचले आणि १२ मिनिटे स्टेजवरून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
Operation sindoor दरम्यान पाकिस्तानातल्या अण्वस्त्रांना धक्का लागल्याबरोबर पाकिस्तान भित्र्या कुत्र्यासारखा दोन पायाचे पुढे घालून शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे धावला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी अंतिम मुदती निश्चित करण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी विचारले की जर संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही, तर सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयकांना मंजुरी देण्यासाठी वेळ मर्यादा कशी ठरवू शकते.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कायमचा बंद करेपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील. होंडुरासच्या दूतावासाच्या उद्घाटनानिमित्त परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी आहे, जी त्यांना आम्हाला सोपवावी लागेल.
मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाला दिले. न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना एक नवे खंडपीठ स्थापन करण्याचेही निर्देश दिलेत.
केंद्रामध्ये मोदी सरकारच्या राजकारणाच्या ॲडजस्टमेंट मध्ये राज्यमंत्रीपद टिकवलेल्या रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपदावर बसवून टाकले. यातून त्यांनी शरद पवारांना टोला हाणला, टोमणा मारला की त्यांच्या जखमेवर मीठ चोळले??, हा सवाल तर तयार झालाच, पण त्या पलीकडे जाऊन शरद पवार यांच्यासारख्या अतिउपद्रवी आणि अतिउपद्व्यापी राजकारण्याला आपल्या डोक्यावरच्या पदावर बसवून घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढे “राजकीय मूढ” आहेत का?
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. सीमेवरील त्याच्या नापाक कारवायांसाठी भारताकडून त्याला इतके योग्य उत्तर मिळाले की त्याने गुडघे टेकले. दरम्यान, पाकिस्तानने अनेक धमक्या दिल्या, तेथील मंत्र्यांनीही अणुहल्ला करण्याबद्दल बोलले
जर पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचे वर्णन कोणत्याही म्हणीद्वारे केले जाऊ शकते, तर ते म्हणजे- ‘जखमेवर मीठ चोळणे’. पाकिस्तानला अजूनही भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे दुःख जाणवत आहे
पाकिस्तान एखाद्या श्वानाप्रमाणे दोन पायांत शेपूट घालून युद्धविराम करण्यासाठी पळत सुटला. पाकिस्तानी सैन्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे केले. पाकिस्तानी लष्कर केवळ हरलेच नाही तर ते खूप वाईट रीतीने हरले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्ष दरम्यान भारताला थेट अणुबॉम्ब युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान आतून किती पोखरला गेलाय आणि त्याची आर्थिक अवस्था किती भीषण आहे, याचा आलेख एका वेगळ्याच बातमीतून आज समोर आला.
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे मध्य प्रदेशातील भाजप सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि रात्री 11.15 वाजता विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने बुधवारी पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,४०० कोटी रुपये) चा दुसरा हप्ता जारी केला. याआधी ९ मे रोजी आयएमएफने पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. हा निधी पाकिस्तानला एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी (EFF) कार्यक्रमांतर्गत देण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी काल (१३ मे) पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर होते. येथे ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानने ड्रोन, यूएव्ही, लष्करी विमाने आणि क्षेपणास्त्रांनी आमच्या लष्करी तळांना आणि नागरिकांना लक्ष्य केले, परंतु आमच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर ते सर्व अपयशी ठरले.’
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने भारतीय निर्मात्यांना तुर्कीएवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. फेडरेशन FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी एक पत्र लिहून सर्व भारतीय चित्रपट निर्मात्यांना तुर्की हे चित्रीकरणाचे ठिकाण निवडण्यापूर्वी विचार करण्याची विनंती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम करणाऱ्या बाबींमध्ये पाकिस्तानला तुर्कीचा वाढता पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, पोलिसांनी अखेर बुधवारी रात्री ११ वाजता मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यांच्याविरुद्ध इंदूरच्या मानपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकिस्तान हा एक बदमाश देश आहे. त्याने निर्माण केलेली अण्वस्त्रे त्याच्याच हातात “सुरक्षित” नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीच्या (IAEA) निगराणी खाली आणा, अशी महत्त्वपूर्ण मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरच्या धरतीवरून केली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचा भारताने एवढा दारुण पराभव केला की पाकिस्तान भित्र्या कुत्र्याप्रमाणे दोन पायांमध्ये शेपूट घालून अमेरिकेकडे शस्त्रसंधीसाठी धावला
पाकिस्तान उच्चायोगात (पीएचसी) तैनात असलेल्या अधिकाऱ्याला संवेदनशील माहिती लीक केल्याबद्दल एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीएचसी अधिकारी दानिश हा हँडलर असल्याचे समोर आले आहे. मालेरकोटलाचे एसएसपी गगन अजित सिंग म्हणाले की पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी पुष्टी केली आहे की आरोपी गोपनीय माहितीसाठी पैसे मिळवत असे.
सरकारने म्हटले आहे की भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची शस्त्रे नष्ट केली आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने ही माहिती दिली आहे. पीआयबीने वृत्त दिले आहे की भारतीय संरक्षण प्रणाली पेचोरा, ओएसए-एके आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालींनी पाकिस्तानी शस्त्रे नष्ट केली. ही शस्त्रे चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला दिली होती.
Operation Sindoor मधून भारताने केलेल्या precision attack मुळे अवघ्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झालाच पण त्याच वेळी पाकिस्तानने अत्याधुनिक म्हणून घेतलेल्या चायनीज बनावटीच्या शस्त्रास्त्र मालाचा बोगसपणा सगळ्या जगासमोर उघड्यावर आला.
‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे भारताने आपले धोरणात्मक उद्दिष्ट साध्य केले आहे, असे अमेरिकन लष्करी तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी म्हटले आहे.
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर चुकून पाकिस्तानच्या सीमेत घुसलेले बीएसएफ जवान पूर्णम कुमार साव यांची बुधवारी सुटका झाली. ते सुरक्षित परतले आहेत. साव यांच्या सुरक्षित सुटकेसाठी बीएसएफने अथक प्रयत्न केले होते.
ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यामुळे युरोप पासून अरबस्तानापर्यंत सगळी आंतरराष्ट्रीय माध्यमे बलूचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणेच्या बातम्यांनी भरून गेली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App