राजकारणात आकडेवारी ही सर्वात धारदार शस्त्र असते. पण तीच आकडेवारी चुकीची ठरली तर? काँग्रेस प्रवक्ते पवन खेऱा आणि सीएसडीएसचे संजय कुमार यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सहा महिन्यांत मतदार यादीत तब्बल ४० टक्के घटवाढ झाली असल्याचा त्यांचा दावा ४८ तासांत कोसळला आणि माफी मागण्याची वेळ आली.
ही पहा काँग्रेसची कृतघ्नता; सर्वोच्च नेत्यांना वाचविण्याचे निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना करणाऱ्या निवडणुकीत उभा केलंया!!, असं म्हणायची वेळ INDI आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीवरून आली.
राहुल गांधींचा घोटाळा, दुसऱ्या वरती विसंबला; कार्यभाग बुडाला!!, असे त्यांच्या बाबतीत अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडले.सावरकर अवमान प्रकरणात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज राहुल गांधींना किंवा त्यांच्या टीमला माहिती न देताच परस्पर पुण्याच्या कोर्टात सादर केला. त्यामुळे राहुल गांधींची पुरती गोची झाली. सगळीकडे बातम्या आल्यानंतर तो अर्ज मागे घेण्याची वेळ वकिलावर आली.
भारताला जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेणारे एक मोठे स्वप्न १९८९ साली मोहाली येथे लागलेल्या एका आगीत जळून खाक झाले. मोहालीतील सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड (SCL) हे देशातील पहिले चिप उत्पादन केंद्र होते. जगभरात त्या काळी ज्या काही देशांकडे अत्याधुनिक चिप बनवण्याची क्षमता होती, त्यामध्ये भारताचाही समावेश होत होता. परंतु ७ फेब्रुवारी १९८९ रोजी लागलेल्या आगीत हे संपूर्ण स्वप्न उद्ध्वस्त झाले.
लढायला अण्णा आणि निवृत्त न्यायमूर्ती; पंतप्रधान बनणार मात्र राहुल गांधी!!, असली तिरपागडी आणि पळपुटी राजकीय रणनीती INDI alliance मधल्या नेत्यांनी आज समोर आणली. मतदान चोरीच्या विरोधात अण्णांना लढायला सांगा
INDI आघाडीतल्या नेत्यांना पराभवाची भीती म्हणून सुप्रीम कोर्टाच्या माझी न्यायमूर्तींच्या गळ्यात घातली उपराष्ट्रपदाची उमेदवारी!!, असे राजकारण आज दिल्लीत घडले.
मतचोरीच्या आरोपावरून विरोधकांच्या गदारोळात, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेवर लोकसभेत दुपारी २ वाजता चर्चा सुरू झाली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, आज देश शुभांशूंच्या परतीच्या अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे परंतु विरोधी पक्ष अजूनही गोंधळ घालत आहेत आणि चर्चेसाठी तयार नाहीत.
दिल्लीमध्ये झालेल्या एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मोठे विधान केले. या बैठकीत NDAच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांचा औपचारिक परिचय करून देण्यात आला.
जगातली 6 मोठी युद्धे थांबवल्याच्या बाता मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सल्लागाराने भारताला अमेरिकेशी करायच्या वर्तणुकीबाबत दमबाजी केली
बिहारमध्ये, आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव जनशक्ती जनता दलाकडून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील. तेज प्रताप यांचे जवळचे सहकारी बालेंद्र दास यांनी हा पक्ष स्थापन केला होता आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी दिल्लीत एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सांगितले- मला जयपूरमध्ये विचारण्यात आले की संघात किती महिला आहेत? मी उत्तर दिले- संघात जितके पुरुष आहेत तितक्याच महिला आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल त्यांना सांगितले.
बिहारमध्ये ‘मतचोरी’ आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दल (एसआयआर) मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी हल्ला तीव्र केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतदार हक्क यात्रे’च्या दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये रस्त्यावर हा मुद्दा उपस्थित केला. त्याच वेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी संसदेत चर्चेची मागणी केली.
सीमाप्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि चीनमधील चर्चेचा २४ वा टप्पा मंगळवारी होणार आहे. यासाठी चीनचे विशेष प्रतिनिधी परराष्ट्रमंत्री वांग यी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.
मुंबई, मराठवाड्यासह थेट विदर्भापर्यंत रविवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले. आता आज मंगळवार, 19 ऑगस्ट रोजीही मुंबई पुण्यासह एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केलाय.
ट्रम्प तात्यांची बडबड आणि रशिया – युक्रेन यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक घडामोडींना उत आला असताना आज एकाच दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतःहून फोन कॉल केला आणि त्याच दिवशी चीनचे परराष्ट्रमंत्री दिल्लीत येऊन भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. या दोन महत्त्वाच्या घटनांचा राजकीय योगायोग राजधानीत घडल्या.
जगदीप धनखड यांच्या बरोबर “राजकारण” खेळून त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालविण्याचा “पराक्रम” करणाऱ्या काँग्रेसने आता पुढचा “डाव” टाकला असून ओढवून घेतलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून उमेदवार देण्यापेक्षा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याला उमेदवार बनवून त्याच्या हाती पराभवाचा बांधायचा घाट घातल्याची राजकीय वस्तुस्थिती समोर आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना लक्ष्य करणारे काही फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवरून अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली असून देशातील तरुणाईला देखील चांगलेच खडसावले. मी दहा कायदे आणले आहेत, पण 90 वर्षांनंतरही मीच सगळे करत राहावे आणि तुम्ही झोपून राहावे ही अपेक्षा चुकीची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
मतदार पडताळणी आणि मत चोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणू शकतात. काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनीही वृत्तसंस्थेला सांगितले की, गरज पडल्यास महाभियोग प्रस्तावासह सर्व लोकशाही पद्धती वापरण्यास पक्ष तयार आहे. तथापि, अद्याप कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बीके हरिप्रसाद यांनी आरएसएसला तालिबान म्हटले आहे, या विधानावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने म्हटले आहे की काँग्रेस प्रत्येक राष्ट्रवादी संघटनेचा गैरवापर करते आणि पीएफआय आणि सिमी सारख्या बंदी घातलेल्या कट्टरपंथी संघटनांवर प्रेम करते.
जगदीप धनखड यांना घालवून बसले; आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या मागे लागले, पण हाती काय लागण्याची चिन्हे??, असा सवाल विचारण्याची वेळ राहुल गांधींच्या नादी लागलेल्या विरोधकांच्या राजकीय वर्तणुकीतून समोर आली.
बिहारमध्ये विशेष सघन सुधारणा (SIR, सामान्य शब्दात मतदार यादी सुधारणा) विरुद्ध राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ सासाराम येथून सुरू झाली. येथील सुआरा विमानतळ मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राहुल म्हणाले, ‘ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजप-आरएसएस संपूर्ण देशात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.’
गुरुग्राममध्ये आज सकाळी लोकप्रिय युट्यूबर आणि अलीकडेच टीव्ही शो ‘लाफ्टर शेफ’ मध्ये दिसलेला एल्विश यादवच्या घरी गोळीबार झाला. ही घटना सकाळी ६ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सेक्टर ५६ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीबाराच्या वेळी एल्विश घरात उपस्थित नव्हता. तथापि, त्याची आई आणि काळजीवाहक घरात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१७ ऑगस्ट) दिल्लीतील रोहिणी येथे देशातील पहिल्या ८-लेन एलिव्हेटेड हायवे द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्सटेंशन रोड-२ (UER-२) चे उद्घाटन केले. द्वारका एक्सप्रेसवे उघडल्याने गुरुग्राम ते दिल्ली आयजीआय विमानतळापर्यंतची वाहतूक कोंडी संपेल. या दोन्ही प्रकल्पांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना भारतीय वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले.
निवडणूक आयोग (EC) नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. राहुल गांधी यांचे नाव न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले – पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला डेटा आमचा नाही. मत चोरीच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र द्या किंवा देशाची माफी मागा. जर ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले नाही तर आरोप निराधार मानले जातील.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App