केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन म्हणाले की, शशी थरूर राष्ट्रीय सुरक्षेबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरममधील कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक झालेल्या राजीनाम्यानंतर राजधानी नवी दिल्ली सकट संपूर्ण देशातल्या राजकीय वर्तुळात नुसतेच तर्क वितर्क लढविले जात आहेत. पण प्रत्यक्षात कुणालाच त्यांच्या राजीनामाच्या खऱ्या कारणांच्या मूळापर्यंत जाता आले नाही.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. पुढील आठवड्यात, या मुद्द्यावर लोकसभेत १६ तास आणि राज्यसभेत ९ तास चर्चा होईल. तथापि, विरोधकांचे म्हणणे आहे की, चर्चा अधिवेशनाच्या सुरुवातीलाच झाली पाहिजे आणि पंतप्रधान मोदींनी त्यावर प्रतिक्रिया द्यावी.
विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळणारी किंवा न रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची विकेट काढण्यासाठी पवार कुटुंब एकवटले आहे. रोहित पवारांच्या बरोबरच सुप्रिया सुळेंनी दिल्लीतून त्यासाठी “राजकीय गोलंदाजी” केली आहे.
कर्नाटकातील हवेरी जिल्ह्यातील एका भाजी विक्रेत्याला केवळ UPI व्यवहारांमुळे 29 लाख रुपयांची GST नोटीस पाठवण्यात आली आहे. शंकरगौडा नावाचे हे विक्रेते गेली चार वर्षे भाजीपाल्याचं दुकान चालवत असून, त्यांनी या काळात एकूण 1.63 कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार केले. हे व्यवहार पाहून GST विभागाने त्यांच्याकडून कराची मागणी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध वाराणसीमध्ये खटला दाखल केला जाणार आहे. सोमवारी वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी पंतप्रधानांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. राहुल गांधींवर अमेरिकेत शिखांविरुद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे.
खलिस्तानी दहशतवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेत खलिस्तान स्वातंत्र्य रॅलीची घोषणा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाबाहेर ही रॅली काढण्यात येणार आहे. दोन दिवसांनी येथे खलिस्तानच्या समर्थनार्थ जनमत चाचणी घेण्यात येणार आहे.
कॅश घोटाळ्यात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २१ जुलै रोजी, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, त्यांच्याविरुद्ध महाभियोगाच्या नोटिसा संसदेच्या दोन्ही सभागृहातील पीठासीन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या २१५ खासदारांच्या (लोकसभेत १५२ आणि राज्यसभेत ६३) स्वाक्षऱ्या आहेत.
भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून कार्यरत असलेले जगदीप धनखड यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केलेल्या राजीनाम्यात त्यांनी वैद्यकीय कारणांचा उल्लेख करत आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले.
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात पायलटच्या चुकीचे वृत्त खोटे असल्याचे नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले आहे. नायडू यांनी परदेशी माध्यमांनाही संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी घाईघाईत कोणताही निष्कर्ष काढू नये असा सल्लाही दिला आहे.
श्रावणानिमित्त उत्तर प्रदेशातील रस्ते आणि महामार्गांवर कावडियांचा जमाव आहे. रविवारी दिल्लीहून परतताना मुख्यमंत्री योगी यांनी गाझियाबादमधील दुधेश्वर मंदिरात जलाभिषेक केला. त्यानंतर त्यांनी बागपतमध्ये हेलिकॉप्टरमधून कावडियांवर पुष्पवृष्टी केली.
अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानांची अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. सोमवारी विमान धावपट्टीवरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे.
कर्नाटक सरकारने धर्मस्थळ मंदिरात महिला आणि मुलींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपास पथकात आयपीएस अधिकारी डॉ. पुनव मोहंती, एमएन अनुचेत, सौम्या लथा आणि जितेंद्र कुमार दयाम यांचा समावेश आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात कर्नाटक सरकारने म्हटले आहे की या प्रकरणाव्यतिरिक्त, एसआयटी राज्यातील इतर संबंधित प्रकरणांची देखील चौकशी करेल. महिला आयोगाच्या शिफारशीवरून सिद्धरामय्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी त्यांच्या यूपीएससी मुलाखतीची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांची यूपीएससी मुलाखत २१ मार्च १९७७ रोजी झाली होती, ज्या दिवशी देशात आणीबाणी उठवण्यात आली होती
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) शाळांमध्ये मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. देशभरातील 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 7 कोटी मुलांचा बायोमेट्रिक डेटा (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि फोटो) आधारमध्ये अपडेट केला जाईल.
धर्मांतर टोळीचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाचा सहकारी राजेश उपाध्याय याला यूपी एटीएसने अटक केली. एटीएसने त्याला लखनौमधील चिन्हाट येथून अटक केली आहे. तो बलरामपूर कोर्टात लिपिक आहे. त्याच्यावर न्यायालयीन पातळीवर छांगूर बाबाला मदत करण्याचा आणि त्याला निधी देण्याचा आरोप आहे. राजेश हा छांगूर बाबाचा सहावा सहकारी आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 24 वेळा बडबड म्हणून काँग्रेस सकट विरोधकांना संसदेत आली उबळ!!, असे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत घडले.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी त्यांच्या यूपीएससी मुलाखतीची कहाणी सांगितली. ते म्हणाले की, त्यांची यूपीएससी मुलाखत २१ मार्च १९७७ रोजी झाली होती, ज्या दिवशी देशात आणीबाणी उठवण्यात आली होती.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत कोकाटेंवर जोरदार टीका केली आहे. “कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा, कर्जमाफी द्या!” अशा आशयाच्या हॅशटॅगसह त्यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला.
जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट क्षेत्रात भारताने जगात पहिले स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अलीकडील अहवालानुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मुळे भारताने डिजिटल व्यवहारांमध्ये हे स्थान मिळवले आहे.
कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.
काँग्रेस नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले की, कोणत्याही नेत्याची पहिली निष्ठा पक्षाशी नाही तर देशाशी असली पाहिजे. शनिवारी कोची येथे ‘शांतता, सौहार्द आणि राष्ट्रीय विकास’ या विषयावरील कार्यक्रमात थरूर बोलत होते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. या सर्व मुद्द्यांवर विरोधकांना पंतप्रधानांकडून उत्तरे हवी आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी रविवारी सर्व पक्षांची बैठक झाली. या दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्य मागितले. सर्व पक्षांनी आपले विचार मांडले.
जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या २५ वर्षांत संघ विकसित करेल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी दिली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App