परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मवलावी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अफगाणिस्तानात तालिबान सरकारच्या पुनर्स्थापनेनंतर भारत आणि अफगाण तालिबान सरकारमधील ही पहिलीच मंत्रीस्तरीय चर्चा होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले.
ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करू शकते. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.यानुसार, संरक्षण मंत्रालयाने सरकारला अतिरिक्त ५०,००० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे, जो संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकतो.
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गमावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी शिक्षकांनी शिक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘विकास भवन’ बाहेरील बॅरिकेड्स तोडले आणि घोषणाबाजी करत निषेध सुरू केला.
operation Sindoor मध्ये भारताने प्रचंड यश मिळवल्यानंतर पाकिस्तान सकट अन्य काही घटकांना ते यश रुचले नाही त्यामध्ये जसा बाहेरच्या देशांमधल्या घटकांचा समावेश आहे
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, त्यांनी सांगितले की पाकिस्तान शांततेसाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहे परंतु त्यात काश्मीर मुद्दा समाविष्ट असला पाहिजे.
7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांमधून खासदारांची परदेशांमध्ये पाठवणी आणि कपिल सिब्बलांची (स्व)पाठ थोपटणी, असे राजकीय चित्र आज समोर आले.
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले की, भाजपशी स्पर्धा करण्यासाठी इंडिया आघाडी आवश्यक आहे, म्हणूनच काँग्रेसने काही जागांवर तडजोड केली.त्यांनी गुरुवारी सांगितले की, ‘आम्ही आघाडी केली आणि आमची जागाही सोडली. पण आता ही आघाडी अधिक मजबूत आणि चांगली करण्याची गरज आहे. इतर पक्षांनाही एकत्र काम करावे लागेल.
रोहिंग्या निर्वासितांना भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय समुद्रात फेकल्याचा खळबळजनक आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने याचिकेतील घटनांचे वर्णन “खूपच सुंदरपणे लिहिलेली गोष्ट” असे म्हणत याबाबत काडीचाही पुरावा नसल्याचे म्हटले आहे.
भारताने operation sindoor यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी मोदी सरकारने वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतला.
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे AWACS विमान (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) नष्ट झाले आहे. पाकिस्तानने ते चीनकडून खरेदी केले होते.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तान मध्ये अतिशय अचूक हल्ले करून तिथले हवाई तळ आणि दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तान विजय झाल्याचा दावा केला.
ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांना परदेशात पाठवेल. २२ मे पासून ५-६ खासदारांचे ८ गट १० दिवसांसाठी ५ देशांना भेट देतील. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देतील.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, हा फक्त एक ट्रेलर आहे, वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण चित्रपट दाखवू. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पहिल्यांदाच गुजरातमधील भूज हवाई दल तळावर पोहोचले.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये ९०.२३ मीटर भालाफेक केली. त्याने पहिल्या प्रयत्नात ८८.४४ मीटर धावा केल्या, तर दुसरा थ्रो अवैध घोषित करण्यात आला. त्यानंतर नीरजने तिसऱ्या प्रयत्नात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो केला.
१५ मे रोजी संध्याकाळी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्तकी यांच्यातील फोन कॉलमुळे पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय हल्ल्यांप्रमाणेच गोंधळ निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका पूर्णपणे बदललेली दिसते. यापूर्वी भारत अनेकदा संयम दाखवत होता. पण आता भारत संयम सोडून थेट कारवाई करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर.
देशासाठी झटणाऱ्या वीर अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याऐवजी, समाजवादी पक्षाचे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका रामगोपाल यादव यांनी थेट सैन्यातील अधिकाऱ्यांची जात काढून खळबळजनक विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये योगदान देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांविषयी अशा प्रकारची वादग्रस्त टिप्पणी करून त्यांनी स्वतःचा आणि पक्षाचाही पातळी दाखविल्याचा आरोप होत आहे.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक कारवाई करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. पाकिस्तानने लष्करीदृष्ट्या झालेल्या पराभवाचा बदला शब्दांच्या खेळातून घेण्याचा प्रयत्न केला असून, ब्लूमबर्ग, रॉयटर्स आणि न्यू यॉर्क टाइम्स यांसारख्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलं आहे.
operation sindoor दरम्यान अवघ्या चार दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला चांगलेच ठोकून काढल्यानंतर सगळ्या भारतात त्याचा आनंद झालेला दिसतोय, पण पाकिस्तानला धुतल्यामुळे इथली लिबरल जमात मात्र दुःखात लोटली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करून देखील लिबरल जमातीचे दुःख कमी व्हायला तयार नाही, याचेच प्रत्यंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यातून आज आले. मेहबूबा मुफ्ती यांच्या गळ्यातून आज पाकिस्तानी सूर उमटले. सिंधू जल करार स्थगित करून भारत सरकारने चूक केली. ती चूक सरकारने सुधारावी, अशी मागणी मेहबूबा मुफ्ती यांनी आज केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देशातील सहाव्या सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी देण्यात आली आहे. हे युनिट उत्तर प्रदेशातील जेवर येथे ३७०६ कोटी रुपये खर्चून स्थापन केले जाईल.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने तुर्कीविरोधात मोठे पाऊल उचलत सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे.
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी बुधवारी कतारमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यादरम्यान दोघांनीही हस्तांदोलन केले. मुकेश अंबानीही काही वेळ थांबून ट्रम्प यांच्याशी बोलताना दिसले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये राहुल गांधींसह २० नेत्यांचे आणि १०० अज्ञात समर्थकांचेही नाव आहे. हे गुन्हे दरभंगा जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे दाखल झाले आहेत.
मध्य प्रदेशातील एका मंत्र्याने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानावरून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या भाषेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी, उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने मंत्री विजय शाह यांच्याविरुद्धचा एफआयआर केवळ औपचारिकता असल्याचे म्हटले.
पाकिस्तानची दहशतवाद्यांना 14 कोटींची नुकसान भरपाई, बहावलपूर आणि मुरिदके मध्ये terror heavens ची पुन्हा अंडी उबवणी!!, असे घडू लागले आहे. कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे पुनरुज्जीवन केले जाते, पण दहशतवादाची मात्र अंडीच उबवली जातात. तेच पाकिस्तानात पुन्हा घडू लागले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App