भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षे पूर्ण केली आहेत. रोहितने २३ जून २००७ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण सामना खेळला, तो एकदिवसीय स्वरूपाचा होता. त्यानंतर त्याने ६ वर्षांनी टी-२० आणि नंतर कसोटी पदार्पण केले. या खास दिवसानिमित्त रोहितने एक भावनिक पोस्ट शेअर केली.
गुजरातच्या काडी विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा यांनी काँग्रेसचे रमेश चावडा यांचा ३९,४२७ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. राजेंद्र चावडा यांना एकूण ९९,७०९ मते मिळाली, तर रमेश चावडा यांना ६०,२८२ मते मिळाली. या विजयामुळे गुजरात विधानसभेत भाजपला आणखी बळकटी मिळाली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींची ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि संवाद साधण्याची तयारी हे जागतिक स्तरावर भारतासाठी एक महत्त्वाची संपत्ती असल्याचे वर्णन केले आहे. शशी थरूर यांनी इंग्रजी दैनिक ‘द हिंदू’ मधील एका लेखात हे म्हटले आहे.
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात रविवारी अमेरिकेनेही उडी घेतली आणि इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला केला. यानंतर, रशिया आणि चीननेही अमेरिकेच्या हल्ल्याला चुकीचे म्हटले आहे आणि त्याचा तीव्र निषेध केला आहे, त्यामुळे हे युद्ध एक नवीन रूप घेऊ शकते असे म्हटले जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला एक गंभीर इशारा दिला आहे की, जर उड्डाण ऑपरेशन्समध्ये अनियमितता सुरू राहिली, तर एअरलाइनचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो किंवा तो रद्दही केला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायलट ड्युटी शेड्यूलिंग आणि देखरेखीमध्ये सतत आणि गंभीर उल्लंघनांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी जिंकल्याने अरविंद केजरीवाल खुश झाले. त्यांचा राजकारणात कमबॅक करायचा मार्ग खुला झाला. पण या कमबॅकमुळे संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे.
IND विरुद्ध ENG: लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 बळी घेत एक नवा विक्रम रचला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने 471 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड पहिल्या डावात 465 धावांवर कोसळले. टीम इंडियाला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. त्याच वेळी, बुमराहने 24.4 षटकांत 83 धावा देत 5 बळी घेतले.
उत्तर प्रदेशच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. समाजवादी पक्षाने त्यांच्या ३ आमदारांना पक्षातून काढून टाकले आहे. सपा अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार पक्षाने ३ आमदारांना पक्षातून काढले आहे. समाजवादी पक्षाने सोशल मीडिया X वर ट्विट करून ही माहिती दिली आहे.
अमेरिकेने इराणविरुद्ध त्यांचे सर्वात वेगवान आणि सर्वात धोकादायक लष्करी ऑपरेशन ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ यशस्वीरीत्या पार पाडले. या ऑपरेशनमध्ये इराणच्या तीन महत्त्वाच्या अणु तळांना अवघ्या २५ मिनिटांत लक्ष्य करण्यात आले. अमेरिकन हवाई दलाने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणु तळांवर हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले ७ स्टेल्थ बी-२ बॉम्बर्सने करण्यात आले, ज्यामध्ये १२ जड बॉम्ब टाकण्यात आले. या अत्यंत गोपनीय लष्करी मोहिमेत १२५ हून अधिक विमाने सहभागी होती आणि एक विशेष ‘फसवणूक’ रणनीती देखील अवलंबण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) देशभरातील प्राथमिक सदस्यत्व १४ कोटींच्या वर गेले असून, हे एक ऐतिहासिक यश असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत ही घोषणा केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या विरोधात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, सरकारचे ध्येय ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद्यांचा पूर्णपणे नायनाट करणे आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दिशेने एकत्र काम करत आहेत.
‘इराणवर हल्ला करणे ही नाइकेची जाहिरात नाही, फक्त करा…’, असे मध्य पूर्व तज्ज्ञ आरोन डेव्हिड मिलर यांनी अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्याबद्दल म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणविरुद्ध युद्ध करण्याचा निर्णय केवळ अमेरिकेची शक्ती दर्शवत नाही तर तेल समृद्ध प्रदेशात बदलाचे संकेतदेखील देतो. ते अमेरिकेला कायमच्या युद्धात ओढते, जसे इराक आणि अफगाणिस्तानात झाले होते, ज्यामध्ये ट्रम्प यांनी देशाला सहभागी न करण्याचे वचन दिले होते.
इराण-इस्रायल युद्ध सुरू होवून दहा दिवस झाले आहेत. १३ जून रोजी सुरू झालेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. काल रात्री अमेरिकेनेही या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने इराणच्या अणु तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी एक मोठा पुढाकार घेतला आहे.
तेल आणि गँसच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात एक मोठे संकट येणार असल्याचे दिसून येत आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इराणच्या संसदेने रविवारी एक मोठे पाऊल उचलले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
आता लडाखची राजधानी लेहमध्ये स्वच्छ ऊर्जेवरील बस धावणार आहे. ही केवळ लडाखसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक नवीन सुरुवात आहे.
चीन आणि रशियाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेने थेट इराण-इस्रायल युद्धात उडी घेतली आहे. रविवारी पहाटे ४.३० वाजता अमेरिकेच्या हवाई दलाच्या बी२ बॉम्बर्सनी इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. यामध्ये, जमिनीखाली ८०-९० मीटर अंतरावर बांधलेल्या फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर १४ हजार टन वजनाचे महाकाय बॉम्ब डागण्यात आले. तर नातानझ आणि इस्फहान अणुऊर्जा प्रकल्पांवर टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला.
इंडिगोच्या गुवाहाटी ते चेन्नई विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. आपत्कालीन लँडिंगपूर्वी वैमानिकांनी मेडे कॉल केला होता. यावेळी विमानात १६८ प्रवासी होते. अहमदाबादमधून टेकऑफ झाल्यानंतर लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर विमानाचा अपघात झाल्याच्या एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकाने मेडे कॉल केला होता.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला आणि पहिल्यांदाच या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. आरसीबीचे सर्व चाहते खूप आनंदी होते की त्यांच्या संघाने अखेर ही ट्रॉफी जिंकली आहे. एकत्रितपणे हा विजय साजरा करण्यासाठी आरसीबीने बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी रॅलीची घोषणा केली होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आणि पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारत पाकिस्तानसोबतचा हा करार पूर्ववत करण्याच्या मनस्थितीत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी स्पष्ट केले की पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार कधीही पूर्ववत होणार नाही. अमित शहा यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. त्यांनी सांगितले की पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणी अंतर्गत वापरासाठी वळवले जाईल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांना आश्रय देण्यात सहभागी असलेल्या दोघांना एजन्सीने अटक केली आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांना पूर्ण नियोजन करून आश्रय देण्यात आला होता. धार्मिक ओळखीच्या आधारे पर्यटकांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे हा हल्ला आणखी क्रूर आणि वेदनादायक मानला जात आहे.
१०० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी परतावा घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी बिहार आणि झारखंडमधील सात ठिकाणी छापे टाकले. बनावट निर्यात बिलांद्वारे कर परतावा मिळवल्याच्या आरोपांच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. तपासात सहभागी असलेल्या पाच कस्टम अधिकाऱ्यांमध्ये पाटण्याचे अतिरिक्त जीएसटी आयुक्त रणविजय कुमार यांचाही समावेश आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तपासणीत धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. CDSCO च्या तपासणीत हिमाचल प्रदेशातील ३७ औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या ५० औषधां
भारतानं आपल्या शेजारी देशांशी कसे संबंध ठेवावेत, यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की शेजारी देशांशी नेहमीच सुलभ संबंध ठेवता येतील, अशी अपेक्षा नको. पण भारतानं परिपक्व धोरण तयार केलं आहे, ज्यामुळे सरकारं बदलली तरी संबंध बिघडत नाहीत.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी म्हटले की, अमेरिका इतर देशांचा मित्र आहे जोपर्यंत त्यांचा फायदा होतो. तो स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतो.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी इस्रायलने इराणवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी द हिंदूमधील एका लेखात लिहिले आहे की, इस्रायल स्वतः एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे, परंतु अण्वस्त्रे नसतानाही इराणला लक्ष्य केले जात आहे. हा इस्रायलचा दुटप्पीपणा आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App