गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केरळमध्ये सांगितले की, विरोधी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांनी नक्षलवाद्यांना मदत केली होती. मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
नवीन आयकर कायदा २०२५ ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने नवीन नियम अधिसूचित केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ते १९६१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल. कर कायदे सोपे करण्यासाठी सरकारने नवीन आयकर विधेयक आणले आहे. यामुळे कर दरात कोणताही बदल होणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारने बंदी घातलेल्या जमात ए इस्लामी संघटनेच्या 215 शाळा केंद्र सरकारने बंद केल्या होत्या. जम्मू काश्मीर मधल्या विद्यार्थ्यांना इस्लामी कट्टरपंथाकडे ढकलण्याची प्रक्रिया थांबवली होती. त्याचे चांगले परिणाम गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिसले. जम्मू काश्मीर मधला फुटीरतावाद कमी झाला. विद्यार्थ्यांमधली विष पेरणी कमी झाली. काश्मीर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 215 शाळा बंद ठेवल्या. परंतु, त्याचा वेगळा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष देखील व्हायला लागले. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी जम्मू-काश्मीरमधल्या उमर अब्दुल्ला सरकारने केंद्र सरकारच्या पाठिंब्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) शुक्रवारी भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल प्रदर्शित केले. उद्या म्हणजेच २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन आहे. आज तत्पूर्वी, दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. भारत २०२८ पर्यंत बीएएसचे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे.
देशातील ३० मुख्यमंत्र्यांपैकी १२ म्हणजे ४० टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत. त्यापैकी १० म्हणजे ३३ टक्के मुख्यमंत्र्यांवर खून करण्याचा प्रयत्न, अपहरण आणि लाचखोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हातात लाल संविधान घेऊन आणि मुखात लोहिया + मधू लिमये यांच्या गोष्टी सांगत INDI आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी करायची असल्याचा दावा केला.
भारत आणि चीनने उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून व्यापार पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली होती. १८-१९ ऑगस्ट रोजी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. लिपुलेखसोबतच, शिपकी ला आणि नाथू ला खिंडीतूनही व्यापार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होणार आहेत. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळण्यास विरोध केला आहे. या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे.
शुक्रवारी संध्याकाळपासून ५ वर्षांनी भारतात चिनी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकची वेबसाइट अनब्लॉक करण्यात आली आहे. यासोबतच ऑनलाइन शॉपिंग साइट्स Aliexpress आणि Shein चे वेब पेज देखील उघडत आहेत. भारत आणि चीनमधी
शुक्रवारी रात्री उशिरा उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील थराली येथे ढगफुटी झाली. ही घटना रात्री १२:३० ते १ च्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस आणि ढिगाऱ्यांमुळे एसडीएम निवासस्थानासह अनेक घरांमध्ये ढिगारा घुसला. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. २ जण बेपत्ता आहेत.Cloudburst, Chamoli, Uttarakhand, Tharali, Rain, Rajasthan
राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ आरोपांवर तथ्याधारित प्रत्युत्तर दिल्याने काँग्रेसने पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. थेट सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करून काँग्रेसने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याची चर्चा सुरु आहे.
पावसाळी अधिवेशनात भाजपविरोधी पक्ष पुन्हा एकत्र आले असले तरी त्यांच्या आघाडीच्या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कधी ‘इंडिया ब्लॉक’, कधी ‘संयुक्त विरोधक’, तर कधी फक्त ‘विरोधक’ असा उल्लेख केला जातो. नावावरूनच गोंधळ असताना भाजप विरोधात लढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मल्याळम अभिनेत्री रेनी अँन जॉर्ज हिने केरळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि पलक्कडचे आमदार राहुल ममकुट्टाथिल यांच्यावर आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा आणि हॉटेलमध्ये आमंत्रित केल्याचा आरोप केला आहे.
मोदी सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वस्तू आणि सेवा करात (GST) मोठा बदल जाहीर केला आहे. दीर्घकाळ चर्चेत असलेले दोन स्लॅब रद्द करून आता कररचना अधिक सोपी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना थेट दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील होण्यापूर्वी गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तावडकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तावडकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा राजभवन येथे दुपारी १२ वाजता राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी बुधवारी तावडकर आणि कामत यांना मंत्री केले जाईल याची पुष्टी केली.
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद नावाचा उपक्रम हाती घेऊन त्याचा दुसरा उपक्रम आज पासून दोन दिवस मुंबईत आयोजित केला.
भारत आणि चीनने उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील लिपुलेख खिंडीतून व्यापार पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या अलीकडील १८-१९ ऑगस्ट रोजी झालेल्या भारत भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.
शरद पवारांचा INDI उमेदवाराला पाठिंबा; पण त्यांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, असे “पवार बुद्धीचे” तिरके राजकारण आज एकाच दिवशी घडले.
shivkumar कर्नाटक काँग्रेसमध्ये राजकीय अस्वस्थता आहे. राज्यात काँग्रेसचे सत्ता असताना सुद्धा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातली दरी रुंदावत चालली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना “चोर” शब्दाचे एवढे आकर्षण का आहे??, नेमकं रहस्य काय आहे??, असे सवाल काँग्रेसच्या नेत्यांच्या गेल्या काही महिन्यांमधल्या वर्तणुकीतून आणि राजकीय वक्तव्यातून समोर आलेत.
आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू झाले. दोन्ही सभागृहांमध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेव्यतिरिक्त, या अधिवेशनात फारच कमी काम झाले आहे. महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेने १२ आणि राज्यसभेने १४ विधेयके मंजूर केली. परंतु वारंवार व्यत्यय, तहकूब आणि बहिष्कार सुरूच राहिले.
आसाममध्ये १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी नवीन आधार कार्ड बनवले जाणार नाहीत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले – बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापासून रोखण्यासाठी आसाम मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.
जीएसटी परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५% आणि १८% स्लॅबना मान्यता दिली आहे. लक्झरी वस्तू ४०% च्या ब्रॅकेटमध्ये येतील. जीओएमचे संयोजक सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली. सध्या जीएसटीचे ५%, १२%, १८% आणि २८% असे ४ स्लॅब आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले की, निवडून आलेली सरकारे राज्यपालांच्या इच्छेनुसार चालवू शकत नाहीत. जर राज्य विधानसभेने एखादे विधेयक मंजूर केले आणि ते दुसऱ्यांदा राज्यपालांकडे आले तर राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत.
महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी राजकीय विश्लेषण संस्था सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे संचालक संजय कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १७५, ३५३(१)(B), २१२ आणि ३४०(१)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयवर चुकीची माहिती देणे आणि निवडणुकीशी संबंधित उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App