१९८९ च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्याचे रॉ सचिव रवी सिन्हा यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे.
मुंबई आणि अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिस आणि लष्करी गुप्तचर पथकांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या एमआयडीसी पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली
सीबीआयने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन चक्र-५ अंतर्गत मुंबई आणि अहमदाबादमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. या दरम्यान, टोळीच्या मुख्य आरोपीला २६ जून रोजी मुंबईतून अटक करण्यात आली.
कोलकात्यातील एका नामांकित विधी महाविद्यालयात अमानुष घटना उघडकीस आली असून एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारातच सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देण्याचे समर्थन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह (सरचिटणीस) दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांवर देशात खुली चर्चा झाली पाहिजे. ते म्हणाले की, हे दोन्ही शब्द मूळ संविधानात नव्हते आणि आणीबाणीच्या काळात संसदेच्या संमतीशिवाय जोडले गेले होते.
एअर कंडिशनरचे (AC) तापमान २० ते २८ अंशांच्या दरम्यान ठेवण्याचा नियम आता लागू केला जाणार नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया क्लायमेट समिटमध्ये ही माहिती दिली.
मुलींच्या कॉलेजची फी भरण्यासाठी बनवला अश्लील व्हिडिओ अटक केलेले जोडपे हैदराबादच्या अंबरपेटमधील मल्लिकार्जुन नगर येथील रहिवासी आहे. पती ऑटो रिक्षा चालवतो आणि आजारी होता. तो त्याचा वैद्यकीय खर्चही उचलू शकत नव्हता.
काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी जात, धर्म आणि भाषेच्या राजकारणापेक्षा वर उठून राहणीमान, पायाभूत सुविधांचा दर्जा आणि सार्वजनिक सेवा यासारख्या शहरी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एक नवीन राजकीय पक्षाची गरज व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची’ नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, हर्ष मल्होत्रा आणि माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना अनुक्रमे वरील तीन राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमध्ये आहेत. ते चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या एससीओच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली.
पंजाबमधील बटाला येथे गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या आईची गोळीबारात हत्या झाली आहे. शिवाय, पोलिसांच्या एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही गोळीबारामुळे मृत्यू झाला. बटाला येथील काडिया रोडवर अज्ञात लोकांनी एका स्कॉर्पिओवर गोळीबार केला आणि हल्ल्यानंतर ते पळून गेले.
पक्षातून काढून टाकल्यापासून तेजप्रताप यादव सतत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरील त्यांची विधाने चर्चेत येत आहेत. आता पुन्हा एकदा तेजप्रताप यादव यांनी असं काही म्हटले आहे ज्यामुळे बिहारमधील राजकीय गोंधळ वाढताना दिसत आहे. एका मुलाखतीत तेजप्रताप यादव यांनी दावा केला आहे की ‘’लोक त्यांच्याविरुद्ध कट रचत आहेत, कारण त्यांना माहित आहे की ते पुढचे लालू यादव आहेत.’’
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या दिल्लीतील नेव्ही भवन येथे तैनात असलेल्या अप्पर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) विशाल यादवच्या चौकशीदरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपी विशाल पैशाच्या लोभाने पाकिस्तानी हँडलरला माहिती देत होता. त्याने ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती देखील दिली होती. त्या बदल्यात त्याला ५० हजार रुपये मिळाले होते. आतापर्यंत त्याच्या खात्यात २ लाख रुपये आले होते.
पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांना त्यांच्याच पक्षात मतभेद होत आहेत. आता तामिळनाडूतील विरुधुनगर येथील काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी ‘आझाद पक्षी’वरील थरूर यांच्या पोस्टवर टीका केली आहे
महामार्गावर दुचाकी आणि स्कूटर चालकांना कोणत्याही प्रकारचा टोल कर भरावा लागणार नाही. काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, १५ जुलैपासून दुचाकी चालकांना राष्ट्रीय महामार्गावरही कर भरावा लागेल. महामार्गावर दुचाकी वाहनांवर टोल कर लावण्याच्या बातम्या खोट्या असल्याचे सरकारने म्हटले आहे.
भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी सांगितले की, भारताचे संविधान सर्वोच्च आहे. आपल्या लोकशाहीचे तिन्ही अंग (न्यायपालिका, कार्यकारी आणि विधिमंडळ) संविधानाच्या अंतर्गत काम करतात. सरन्यायाधीश गवई म्हणाले की, काही लोक म्हणतात की संसद सर्वोच्च आहे, परंतु माझ्या मते संविधान सर्वोच्च आहे.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लादल्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी संघ आणि भाजप परिवाराने आणीबाणी विरोधामुळे मोठे कार्यक्रम घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत सर्वांनी त्यात भाग घेतला.
महाराष्ट्रात फडणवीस सरकारने लागू केलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधी मोर्चात एकत्र येण्याची घोषणा ठाकरे बंधूंनी केली. ती त्यांच्या वतीने खासदार संजय राऊत यांनी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे राजभाषा विभागाच्या एका कार्यक्रमात सांगितले – कोणत्याही भाषेला विरोध नाही. कोणत्याही परदेशी भाषेला विरोध नसावा. पण विनंती अशी असली पाहिजे की आपली भाषा बोला, तिचा आदर करा आणि आपल्या भाषेत विचार करा.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अवकाशात जाणारे ६३४ वे अंतराळवीर बनले आहेत. २८ तासांच्या प्रवासानंतर ते गुरुवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) दाखल झाले. शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांचे अंतराळ स्थानकावर एक्सपिडिशन ७३ च्या सदस्यांनी मिठी मारून आणि हस्तांदोलन करून औपचारिक स्वागत केले.
पाकिस्तान दुबईमार्गे सौदी अरेबियाला आपला माल विकत आहे. डीआरआयने ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत पाकिस्तानातून आयात केलेले १,११५ मेट्रिक टन माल वाहून नेणारे ३९ कंटेनर जप्त केले आहेत. त्यांची किंमत सुमारे ९ कोटी रुपये आहे.
काँग्रेस आणि खासदार शशी थरूर यांच्यातील जुगलबंदी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गांधी परिवाराने तर काँग्रेस मधून शशी थरूर यांची पक्षातून वजाबाकीच करून टाकलीय.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर, तपास कर्मचाऱ्यांना विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. त्याची तपासणी सतत सुरू आहे आणि अपघाताशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सरकारी नोकरी देण्याची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेश सरकार क्रिकेटपटू रिंकू सिंगला शिक्षण विभागात नोकरी देणार आहे. रिंकू सिंग यास जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (बीएसए) म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App