देशातील मोठ्या खासगी बँका आणि दूरसंचार कंपन्या ‘सायलेंट ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानावर काम करत आहेत. यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना वन-टाइम पासवर्ड (OTP) ची गरज संपेल. ही प्रणाली बॅकग्राउंडमध्येच तपासणी करेल की बँक ॲपमध्ये नोंदणीकृत नंबर आणि फोनचे सिम कार्ड जुळत आहेत की नाही.
संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे आजचे कामकाज पूर्ण झाले. सरकारने सध्याचे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा आणि लोकसभा आता 13 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा एकत्र येतील. 3 दिवस चालणाऱ्या या सत्रात महिला आरक्षण कायद्यातील सुधारणेशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा केली जाईल.
ब्रिटनच्या पुढाकाराने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी ६० हून अधिक देशांच्या उपस्थितीत एक मोठी ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
पश्चिम बंगालच्या मालदामध्ये ७ न्यायालयीन अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याबद्दल गुरुवारी सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने स्वतःहून दखल घेत या घटनेचा तपास सीबीआय किंवा एनआयएकडे सोपवण्याचे आदेश दिले. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (डीजीपी), मालदाचे जिल्हाधिकारी (डीएम) आणि एसएसपी यांना नोटीस बजावून ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता ऑनलाइन हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुजच्या सामुद्रधुनीभोवतीचे संकट आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. इराणच्या आक्रमक भूमिकेमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित यश मिळाले नाही. नाकेबंदी उठवण्यात अपयश आल्यानंतर “अमेरिकेला होर्मुजची गरज नाही” अशी भूमिका त्यांनी घेतल्याने अमेरिका या समीकरणातून काहीशी बाजूला पडल्याचे संकेत मिळत आहेत.
उद्योगपती अनिल आणि त्यांच्या कंपनीविरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात नवीन गुन्हा दाखल केला असून, भारतीय आयुर्विमा महामंडळाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जगभरात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे. केंब्रिज विद्यापीठ च्या अभ्यासानुसार, AI डेटा सेंटर्समुळे स्थानिक तापमानात लक्षणीय वाढ होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम दौऱ्यात भाजप-एनडीए यावेळी विजयाची हॅटट्रिक निश्चित असल्याचा दावा केला. विरोधकांवर टीका करताना त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता “काँग्रेसचा तथाकथित राजकुमार पराभवाच्या उंबरठ्यावर आहे” असे म्हटले.
आंतरराष्ट्रीय बाजारात जेट इंधन म्हणजेच एटीएफ (Aviation Turbine Fuel) चे दर 100% पेक्षा जास्त वाढले असतानाही भारत सरकारने देशांतर्गत बाजारात दरवाढ केवळ 25% पर्यंत मर्यादित ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशांतर्गत विमानप्रवासाच्या तिकिटांमध्ये मोठी झेप येण्यापासून काही प्रमाणात बचाव होणार आहे.
मार्च 2026 मध्ये देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, या महिन्यात एकूण GST संकलन वार्षिक आधारावर 8.8% वाढून ₹2 लाख कोटींच्या पुढे गेले. मागील वर्षी मार्च 2025 मध्ये हे संकलन ₹1.83 लाख कोटी होते.
अख्खी राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढून भाजपमध्ये येऊन कर्तृत्व गाजविणाऱ्या नेत्याला राहुल गांधींनी आज सर्वांत “भ्रष्ट” मुख्यमंत्री असल्याचे “सर्टिफिकेट” देऊन टाकले
शहरातील भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी संध्याकाळी स्फोटाची घटना घडल्याने खळबळ उडाली. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या, तर इमारतीच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात तुकड्यांचे खुणा उमटल्याचे दिसून आले.
देशाच्या सुरक्षेशी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान निवासस्थानी सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा भारतावर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
देशातील सर्वात मोठ्या एअरलाईन्सपैकी एक असलेल्या IndiGo ने प्रवाशांना पुन्हा एकदा महागाईचा धक्का दिला आहे. कंपनीने गुरुवारपासून विमान तिकिटांच्या दरात वाढ जाहीर केली असून, देशांतर्गत उड्डाणांसाठी ₹950 पर्यंत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ₹10,000 पर्यंत अतिरिक्त इंधन शुल्क आकारले जाणार आहे. हे नवीन दर 2 एप्रिलच्या मध्यरात्री 12:01 पासून लागू झाले आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कंपन्यांची चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढत आहे आणि कंपन्या किमती वाढवण्याचा विचार करत आहेत. यामुळे बाटलीबंद पाणी, मीठ, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तू, एसी, फ्रीज यांसारख्या टिकाऊ वस्तू तसेच नॉन-सर्जिकल वैद्यकीय वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
कॅगचा अहवाल सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. अहवालात अनेक लष्करी रुग्णालयांच्या देखभालीतील त्रुटींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. मोठ्या संख्येने लष्करी जवानांना त्यांचे वेतन आणि भत्ते वेळेवर आणि योग्य प्रकारे मिळाले नाहीत, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी शीतला माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला. गर्दीत दबल्याने ८ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर एका पुरुषाने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी शीतला अष्टमीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात पोहोचले होते. तिथे जत्राही भरली होती. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसे बंदोबस्त नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या वाव-थराड येथे २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, ऊर्जा गरजांची समस्या जगभरात वाढली आहे. अशा संकटातही भारताने परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
कोलकाता येथे निवडणूक आयोग कार्यालयाबाहेर (ECO) मंगळवारी भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, टीएमसी-समर्थित बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचा (BLOs) एक गट मतदार यादीतील फेरफाराविरोधात निदर्शने करत होता. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली.
लाल टी-शर्ट मध्ये मारली स्टालिन अण्णांनी स्टाईल; भाजी मंडई शिरून मारली राहुल गांधींची कॉपी!!, असे आज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात घडले.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ प्रभावित झाल्याने जगभरात ऊर्जा संकटापाठोपाठ आता इंटरनेट ठप्प होण्याचा धोका आहे. याचे कारण असे की, होर्मुझ मार्गातून केवळ जगातील 20% कच्चे तेल आणि 25% LNG जात नाही, तर या मार्गाखाली इंटरनेट केबल्सही टाकलेल्या आहेत.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या हिंदू महिलेला तिच्या आई-वडिलांकडून वारसा हक्काने मालमत्ता मिळाली असेल आणि तिचा मृत्यू अपत्यहीन, तसेच कोणतीही इच्छापत्र न करता झाला असेल, तर त्या मालमत्तेवर पती किंवा सासरच्या मंडळींचा कायदेशीर हक्क राहणार नाही. अशी मालमत्ता महिलेच्या वडिलांच्या कायदेशीर वारसांना मिळेल
: केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान नियमन- २०२१ मध्ये बदलांचा नवीन मसुदा जारी केला आहे. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सरकारी निर्देशांकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. त्यांना निर्देश, मार्गदर्शक तत्त्वे, सल्ला पाळावाच लागेल. जर त्यांनी असे केले नाही, तर संबंधित डिजिटल मीडिया कंपन्या थेट जबाबदार धरल्या जातील.
पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. रेटिंग एजन्सी केअरएज ग्लोबलनुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल प्रत्येक 10 डॉलरच्या वाढीमुळे भारतात किरकोळ महागाई 60 बेसिस पॉइंट्स (0.60%) पर्यंत वाढू शकते.
भारतीय रुपया आज म्हणजेच 30 मार्च रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88 पैशांनी घसरून प्रति डॉलर 95.22 च्या पातळीवर आला आहे. अमेरिका-इझ्रायलचे इराणसोबत सुरू असलेले युद्ध आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे रुपयामध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App