केरळ मध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने डाव्या लोकशाही आघाडीच्या पराभव करून तब्बल १० वर्षानंतर सत्ता मिळविल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी व्ही. डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आज शपथ घेतली. त्यावेळी काँग्रेसने मुस्लिम लीगला “धर्मनिरपेक्षतेचे” “सर्टिफिकेट” देऊन तब्बल 5 आमदारांना मंत्रीपदे बहाल केली.
NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवव्या आरोपीला CBI ने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. जिथे कोर्टाने बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.
केरळममध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) च्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह २१ मंत्री असतील. शपथविधीपूर्वी रविवारी २० मंत्र्यांची नावे निश्चित झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त ११ मंत्री काँग्रेसचे आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या ५ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. केरळम काँग्रेस, केरळम काँग्रेस (जेकब), रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (RSP) आणि CMP (कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पार्टी) मधून प्रत्येकी १ मंत्री असतील.
स्वीडनमध्ये पंतप्रधान मोदींना ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा स्वीडनचा कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांना किंवा सरकार प्रमुखांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी सांगितले की, जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात दहशतवाद सुरू ठेवला, तर त्यांना स्वतःच ठरवावे लागेल की ते येत्या काळात भूगोलाचा भाग राहणार की इतिहासाचा.
मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शनिवारी त्यांच्या परजीवी आणि झुरळांच्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माध्यमांच्या एका वर्गाने माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला. CJI म्हणाले, माझी टिप्पणी विशेषतः अशा लोकांसाठी होती, जे बनावट आणि खोट्या पदव्यांच्या आधारावर वकिलीसारख्या व्यवसायात आले आहेत. माध्यम, सोशल मीडिया आणि इतर प्रतिष्ठित व्यवसायांमध्येही असे लोक घुसले आहेत. ते परजीवींसारखे आहेत.
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शनिवारी राहुल गांधींना 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची वकिली केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आधी राहुल गांधींच्या नावाची घोषणा करेल आणि नंतर I.N.D.I.A. ब्लॉकच्या मित्रपक्षांना पाठिंब्यासाठी मनवले जाईल.
राष्ट्रीय महिला आयोगाने संपूर्ण देशातील महिलांना सन्मान, सुरक्षा आणि समान संधीचा अधिकार देण्यासाठी सुरू केलेला शक्ती संवादाचा उपक्रम आज जम्मू – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा शक्ती संवादाचा उपक्रम श्रीनगर येथे संपन्न झाला.
CBSE ने आपल्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 9वी आणि 10वीमध्ये त्रिभाषा धोरण अनिवार्य केले आहे. यानुसार 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषांचा अभ्यास करावा लागेल. यापैकी 2 भारतीय भाषा असाव्यात.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथे पक्ष कार्यकर्त्यांना टीएमसीची संघटना नव्याने उभी करण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही पक्षाची कार्यालये पुन्हा उघडणार, त्यांना रंगवणार आणि मजबूतपणे कामावर परतणार. गरज पडल्यास मी स्वतःही कार्यालये रंगवण्यासाठी तयार आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात तिसऱ्या मुलाच्या जन्मावर कुटुंबाला 30 हजार रुपये आणि चौथ्या मुलाच्या जन्मावर 40 हजार रुपये दिले जातील.
यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असतानाच आता अल-निनो पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे. अमेरिकेची हवामान संस्था National Oceanic and Atmospheric Administration (NOAA) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे ते जुलैदरम्यान अल-निनोची स्थिती विकसित होऊ शकते.
केंद्र सरकारने शनिवारी चांदीच्या 3 श्रेणींच्या आयातीवर नवीन निर्बंध लादले आहेत. सरकारी अधिसूचनेनुसार, आता 99.9% शुद्धता असलेल्या चांदीच्या बार, अनरॉट चांदी (घडवलेली नसलेली चांदी) किंवा चांदीची पावडर परदेशातून मागवण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी द हेगमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना जगातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
15 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून 96.14 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे.
सरकारला देशातील पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी फ्लेक्स-फ्यूल गाड्या वेगाने रस्त्यावर आणायच्या आहेत, पण हा प्लॅन आता ‘आधी कोंबडी की अंडे’ या कोंडीत सापडला आहे.
राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये साम्य काय??; तर ते लाडक्या नेत्यांना मुख्यमंत्री पद देऊ शकत नाय!!, हे राजकीय वास्तव केरळ मधल्या विधानसभा निवडणुकीनंतर समोर आले.
बसपा प्रमुख मायावती, सपा नेते राजकुमार भाटी यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या टिप्पणीमुळे संतापल्या. त्यांनी शुक्रवारी ‘X’ वर लिहिले- सपा प्रवक्त्याचे विधान बेजबाबदारपणाचे आहे. सपा प्रमुखांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि ब्राह्मण समाजाची क्षमा मागून पश्चात्ताप करावा.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील भोजशाळेला वाग्देवी मंदिर म्हणून मान्यता दिली आहे. शुक्रवारी दिलेल्या आपल्या निर्णयात, उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांनी पुरातत्वीय आणि ऐतिहासिक तथ्ये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चा सर्वेक्षण अहवाल, ASI कायद्यातील तरतुदी, तसेच अयोध्या प्रकरणाचा विचार केला आहे.
मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटले. ते म्हणाले- काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करू लागतात.
पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश प्रवासावर भारत सरकारकडून कर-सेस लावण्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले – हे पूर्णपणे चुकीचे आहे. यात अजिबात सत्य नाही.
दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा वेळेपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी धडकू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये सामान्यतः मान्सून १ जून रोजी दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून २६ मे या तारखेच्या चार दिवस आधी किंवा मागे-पुढे येऊ शकतो.
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा झालेला पराभव पाहून मुस्लिमांनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या खुर्ची खाली “राजकीय बॉम्ब” पेरलाय, की काही दुसरीच खेळी केली आहे??, असा सवाल उत्पन्न करणारे वक्तव्य मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी यांनी आज केले. त्यांनी अचानक अखिलेश यादवांच्या विरोधात वक्तव्य केल्याने राजकीय संशय बळावला. मुस्लिम खरोखरच अखिलेश यादवांच्या विरोधात जातील का??, असा संशय निर्माण झाला.
पंतप्रधान मोदी 9 वर्षांनंतर नेदरलँड्सच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. हा दौरा भारत आणि नेदरलँड्समधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या भेटीत व्यापार, तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, जल व्यवस्थापन, हरित ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य यांसारख्या अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App