काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार Shashi Tharoor यांनी ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण आवृत्तीच्या सक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. प्रत्येक सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती वाजवणे किंवा गायन करणे ही “अनावश्यक आणि त्रासदायक सक्ती” असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडली
देशातील आघाडीच्या खाण आणि धातू उद्योग समूहांपैकी एक असलेल्या वेदांता समूहावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कथित उल्लंघनप्रकरणी मुंबई आणि दिल्लीसह विविध ठिकाणांवरील कार्यालयांमध्ये झडती मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाने स्वदेशी विकसित ‘रुद्रम-२’ या अत्याधुनिक हवाई-ते-भू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याने भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळांपैकी एक असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (सीबीएसई) मोठी प्रशासकीय उलथापालथ झाली आहे. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थापन प्रकल्पातील कथित अनियमितता, निविदा प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार आणि सायबर सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नांमुळे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
D. K. शिवकुमार यांची शपथविधी पूर्वी गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी!!, असे चतुराईचे राजकारण शिवकुमार यांनी साधून घेतले.
इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची महागाई या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिला. हे तीन केंद्रीय मंत्री आज कार पुलिंग करून एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.
लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मोठी बैठक ८ जून रोजी नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका बसला आग लागल्याने ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले.
मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहिमेत मोठे यश मिळवत गुजरातमध्ये सुरू असलेला एक बेकायदा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. साकीनाका पोलिसांनी राज्याच्या सीमापार जाऊन केलेल्या या कारवाईत सुमारे ७४.७६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ, रसायने आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पक्षातील काही बंडखोर नेत्यांनी तब्बल ५० आमदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांमुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी सलीम डोला याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल २० ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून अमली पदार्थ तस्करी, हवाला व्यवहार आणि बेहिशेबी मालमत्तांच्या जाळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.
लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांतील राजकीय उलथापालथीनंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. ८ जून रोजी नवी दिल्लीत आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून त्यामध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सुमारे १५ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे एक संशयास्पद पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रात भारताचा फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि काही परदेशी नागरिकांचा उल्लेख करण्यात आल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे.
एखाद्या गंभीर आजारामुळे लाखो रुपयांचा खर्च आला तर सामान्य कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू शकते. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली आहे.
केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये थेट जमा केले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.
Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, आणि अमित शाह – अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??, असे सवाल विचारायची वेळ अण्णामलाई यांच्याच आजच्या भेटीगाठी मधून समोर आली.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी निर्धारित तांत्रिक निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट “फसवणूक” आणि “घोटाळा” असे संबोधत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट-यूजी) पुनर्परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी भूमिका न्यायालयाने कायम ठेवली असून संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी आता २१ जूनची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा निर्देशक मानल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात विक्रमी पातळी गाठल्यानंतर मेमध्ये जीएसटी महसूल जवळपास २० टक्क्यांनी घसरून १.९४ लाख कोटी रुपयांवर आला आहे. मात्र वार्षिक तुलनेत महसूलात वाढ कायम असून गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात ११४ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या मोठ्या कराराबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. हा करार झाल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदींपैकी एक ठरणार आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजय यांच्या काळ्या-पांढऱ्या पोशाखाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात विजय हे काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत असल्याने विरोधकांकडूनही त्यावर टीका होत होती. अखेर विजय यांनी स्वतःच या चर्चेला उत्तर देत आपल्या पोशाखामागील राजकीय संदेश स्पष्ट केला आहे.
मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत केरळममध्ये दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App