संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सोमवारपासून सुरू होणारा अखेरचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. वादग्रस्त परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, २०२६ अर्थात एफसीआरए दुरुस्ती विधेयकावर या आठवड्यात लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता असून, काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे.
NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले.
भारतावर अमेरिकेकडून 100 टक्के टॅरिफ लागू करण्यात आल्यानंतर भारत-अमेरिका संबंधांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे.
लवारीने मच्छर मारू नये अशी मार्मिक टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला खडे बोल सुनावले.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आणि पोलिसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या शाब्दिक वादावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT Delhi) दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. पुढील ३५ वर्षांत विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक देशासाठी काय योगदान देतात
सुपरस्टार थलपती विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विजय आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू होत्या.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
देशात सामाजिक भेदभाव आणि विषमता अस्तित्वात असेपर्यंत आरक्षणाची व्यवस्था कायम राहिली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ढासळलेली प्रतिमा सावरण्यासाठी आता प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक आमदार प्रशांत किशोर मैदानात उतरणार का, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पक्षांतरासंदर्भात शिवसेना शिंदे गटाला धडकी भरवणारी टिप्पणी सर्वाेच्च न्यायालयाने केली आहे.पूर्वी पक्षांतर हा घटनात्मक अपराध मानला जायचा, परंतु आज दुर्दैवाने तो ‘सन्मानाचा बिल्ला’ बनला आहे, असे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे.
काॅक्राेच जनता पार्टी ‘क्या बोलती पब्लिक’ ही राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या जाणार असल्याचे अभिजित दिपके यांनी सांगितले.
दिल्लीत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राजधानीतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक संथ झाली
ई-20 पेट्रोल धोरणाच्या नावाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले कथित डीपफेक व्हिडीओ, मॉर्फ केलेली छायाचित्रे, मीम्स आणि बदनामीकारक मजकूर तत्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टालिन यांना मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) काही लोकप्रिय मद्य उत्पादनांबाबत नियमभंगाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
वैध थर्ड-पार्टी विमा नसलेल्या वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्र सरकारला पायलट प्रकल्प राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 3 ऑगस्टपासून लागू झाला असून, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपयांवरून 3.50 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील कर 15.50 रुपयांवरून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
बिहारमधील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला आहे. अवघ्या नऊ तासांच्या कालावधीत भारताने बॉक्सिंगमध्ये तब्बल 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकत जागतिक स्तरावर आपला दबदबा सिद्ध केला.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक हादरे जाणवल्याने काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, सांस्कृतिक राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि लेखणी आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
राज्यसभेत पेपरफुटीशी संबंधित परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘मनुस्मृती’ विधानावरून गदारोळ झाला. ते शैक्षणिक संस्थांवरील RSS च्या हस्तक्षेपावर बोलत होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App