बांगलादेश स्वतंत्र करण्याची शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबीयांना चुकवावी लागली “किंमत”; हीच खरी मोहम्मद युनूस नावाच्या पाकिस्तानी मनोवृत्तीची फ़ितरत!!, याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशात आला.
केरळ आणि राजस्थानमधील दोन बीएलओंनी SIR शी संबंधित कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. केरळमधील कन्नूर येथील सरकारी शाळेतील कर्मचारी अनिश जॉर्ज (४४) यांनी रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. ते निवडणुकीसाठी बीएलओ होते. एसआयआरशी संबंधित कामाच्या ताणामुळे अनिशने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
काँग्रेसच्या सध्याच्या नामदारांनी त्यांच्याच पक्षाच्या तरुण खासदारांचे करिअर बरबाद केले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला त्यांच्या आरोपाला दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही
लालू कुटुंबातील गोंधळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. कुटुंब आणि पक्षातून काढून टाकण्यात आलेले तेज प्रताप यादव त्यांची बहीण रोहिणी आचार्य हिच्या कुटुंब आणि पक्षातून बाहेर पडण्यामुळे सुरू असलेल्या वादामुळे नाराज आहेत. त्यांच्या पक्षाने काल रात्री उशिरा इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
असदुद्दीन ओवैसी यांना नेहमीच भाजपची बी टीम म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा दुटप्पी व्यवहार आज समोर आला. तेलंगणा मधल्या जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात हे घडले.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने काहीही निष्पन्न झाले नाही. आशा आहे की ते पुन्हा घडणार नाही. “या ऑपरेशनमध्ये आमचे अठरा लोक मारले गेले. आमच्या सीमा धोक्यात आल्या.”
व्हर्जिनिया आणि न्यूजर्सीमधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शुल्क मागे घेत आहेत. ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये बीफ, कॉफी आणि फळांसह डझनभर कृषी उत्पादनांवरील शुल्क हटवले गेले. महागाई हे यामागील एक प्रमुख कारण आहे.
कसली आलीय vote chori??; कमी करा सीना जोरी!! हा सल्ला दुसरा तिसरा कुणी नाही, तर काँग्रेस प्रेमी पत्रकारांनीच राहुल गांधींना आणि काँग्रेसच्या नेत्यांना दिलाय.
बिहारमधील जनता निवडणूक निकालांवर नाराज आहे. जे काही झाले ते निवडणूक आयोगामुळेच झाले. हे निकाल निवडणूक आयोगाच्या मदतीने आले आहेत आणि त्यांच्याशी कोणीही सहमत नाही. बिहारमध्ये पुन्हा निवडणूक झाली पाहिजे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी रविवारी सांगितले की, “१९८९-९० मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला आणि हळूहळू मुंबई, पुणे आणि दिल्लीत पसरला. गेल्या ३० वर्षांपासून भारत दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. आता, मजबूत आणि प्रभावी कारवाईची आवश्यकता आहे.”
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात, एनआयएने रविवारी दहशतवादी उमरचा सहकारी आमिर रशीद अली याला दिल्लीतून अटक केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसंना कमी आरक्षण मिळाले आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. या प्रकरणी फेरविचार करावा अन्यथा कोर्टात जावू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर लालू कुटुंबात मोठी फूट पडली आहे. रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, “मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी असलेले संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करण्यास सांगितले आणि मी सर्व दोष घेत आहे.”
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार आक्षेपांनंतरही भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे. हेलसिंकी-आधारित सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालानुसार, ऑक्टोबरमध्ये रशियाने $2.5 अब्ज (अंदाजे 22.17 हजार कोटी रुपये) आयात केले, ज्यामुळे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार बनला.
दिल्ली स्फोट आणि एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल समोर आल्यानंतर फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध दिल्लीत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पहिला खटला नियमांचे उल्लंघन करण्याशी संबंधित आहे, तर दुसरा खटला विद्यापीठाच्या कथित अयोग्य मान्यतेचा आरोप करतो.
बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, काँग्रेस पक्षाने शनिवारी दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. ही बैठक पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली, जिथे राहुल गांधी, केसी वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते.
बिहार विधानसभा निवडणूक यांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातून जे मोठे राजकीय भाकीत वर्तविले, ते काँग्रेस फुटीचे आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून काँग्रेसच्या सध्याच्या आमदारांच्या विरोधात काँग्रेस मधले नेते आणि कार्यकर्ते बंडखोरी करायच्या तयारीत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काम केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सध्याच्या नामदारांचे नेतृत्व मान्य नाही कारण सध्याच्या नामदारांनी मूळ काँग्रेसची “मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस” करून टाकली आहे, अशी खिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उडवली. त्यापुढे जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठी फूट पडेल, असे भाकीत केले.
जयपूरमध्ये मोहन भागवत म्हणाले, “जगातील ४% लोक ८०% संसाधनांचा वापर करतात, तर ९६% लोक त्यापासून वंचित आहेत. विकास होत आहे, परंतु ज्यांच्यासाठी ते घडत आहे ते खूप कमी आहेत. त्यांच्यासाठी निर्माण होणारी संसाधने विकासापासून वंचित राहिलेल्या लोकांकडून घेतली जात आहेत.”
पंतप्रधान मोदींनी शनिवारी सुरत विमानतळावर बिहारच्या जनतेला संबोधित केले. भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, बिहारने अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत जातीच्या राजकारणाला नकार दिला.
भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात, १६,००० फूट उंचीवर चालण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोहोचवता येतात.
बिहार विधानसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आणि आज असे दोन वेळा वर्तविले
कर्नाटकातील बागलकोटमध्ये, ऊसाच्या किमती वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. रबकावी-बनहट्टी तालुक्यातील गोदावरी साखर कारखान्यात ऊसाने भरलेले १०० हून अधिक ट्रॅक्टर जाळण्यात आले.
ब्रिटनमधील आघाडीची मीडिया संस्था बीबीसीने गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी केलेल्या भाषणाचे चुकीचे संपादन केल्याबद्दल त्यांची माफी मागितली.
फक्त जातीच्या समीकरणावर निवडणूक लढा आणि हमखास पडा!!; बिहारने शिकवला धडा!!, असे म्हणायची वेळ विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी आणली.राहुल गांधींच्या काँग्रेसने आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने कितीही सामाजिक न्यायाच्या बाता मारल्या, तरी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुका केवळ जातीच्या समीकरणावरच लढविल्या होत्या हे सत्य लपून राहिले नाही
कर्नाटक सरकारने राज्यात पीरियड लीव्ह पॉलिसी 2025″ लागू करणारा अधिकृत आदेश जारी केला आहे. यामुळे सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दरवर्षी १२ पगारी सुट्ट्या किंवा महिन्याला एक पगारी मासिक पाळीची रजा मिळेल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App