राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत तरी कुठे लागला दिवा??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेत्याच्या परफॉर्मन्स वरून आली.
काश्मीरमधील जगप्रसिद्ध डल लेकच्या स्वच्छतेसाठी एक डच महिला पर्यटक एलिस हुबर्टिना स्पानडरमन (वय ६९) गेल्या पाच वर्षांपासून झटत आहेत. नेदरलँड्समधून आलेल्या या पर्यटकाने स्वखर्चाने, कोणतीही जाहिरात न करता आणि कोणताही मोबदला न घेता दररोज स्वतः बोट चालवत डल लेकमधील प्लास्टिक आणि इतर कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.
दहशतवाद्यांना माफ करण्याचा काळ आता संपला आहे, आणि भारत आण्विक धमक्यांना घाबरणार नाही,” अशी ठाम भूमिका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये मांडली. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी बोलताना त्यांनी जगाला आवाहन केलं की, दहशतवादाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता ‘शून्य सहनशीलता’चं धोरण स्वीकारावं.
काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, जर केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, तर आरएसएसवर बंदी घातली जाईल. प्रियांक यांनी आरएसएसवर धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या विरोधात काम करण्याचा आरोपही केला.
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक जण जखमी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै ते १० जुलै या कालावधीत पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या पाच देशांपैकी तीन देशांना – घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि नामिबियाला भेट देणार आहेत.
लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा; संसदीय भाषणे सगळ्यात कमी, बाकीच्याच कार्यक्रमांचा गाजावाजा!!, हे सत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या अहवालातून समोर आले नसून दस्तूर खुद्द राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उघड झाले आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे एक सुनियोजित आर्थिक युद्ध होते. त्याचा उद्देश काश्मीरमधील पर्यटन उद्योग नष्ट करणे होता.
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.
पाकिस्तानला मंगळवारपासून जुलै २०२५ महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळाले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य म्हणून पाकिस्तानच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा एक भाग आहे. पाकिस्तानला UNSC चा तात्पुरता सदस्य होण्यासाठी १९३ पैकी १८२ मते मिळाली. परिषदेचे अध्यक्षपद दरमहा त्याच्या १५ सदस्य देशांमध्ये वर्णक्रमानुसार फिरते आणि या क्रमाने पाकिस्तानला UNSC चे अध्यक्षपद मिळाले आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव गंभीर वळण घेण्याआधीच अमेरिकेने मध्यस्थी केली आणि सध्यातरी शांतता पसरली. पण ही शांतता तात्पुरती आणि एकतर्फी वाटते. कारण इराणमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात एक फतवा काढण्यात आला आहे. या दोघांना ‘मोहरिब’ म्हणजेच ‘अल्लाहचे शत्रू’ ठरवून त्यांना शिक्षा देण्याचे आवाहन केले गेले आहे. यासाठी इराणच्या धर्मगुरूंनी इतर इस्लामिक देशांनाही एकत्र येण्यास सांगितले आहे.
दहशतवाद माजवणाऱ्या देशांना आणि दहशतवाद पीडित देशांना एकाच तागडीत तोलू नका, अशा परखड शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांना सुनावले.
इंदूरमधील ७५ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा घेतली जाणार आहे. इंदूर उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) पुन्हा परीक्षा घेण्याचे आणि निकाल लवकरच जाहीर करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याचा रँक केवळ पुनर्परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विचारात घेतला जाईल.
कोलकात्यातील साउथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये घडलेल्या २४ वर्षीय विधी विद्यार्थिनीवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात गंभीर खुलासे समोर येत आहेत. या गुन्ह्याचा कट आरोपींनी दोन दिवस आधीपासूनच रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१), जो कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या कर्मचारी आणि तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी शाखेचा सक्रिय नेता आहे, त्याच्यासोबत झैब अहमद आणि प्रमीत मुखर्जी या दोन सध्याच्या विद्यार्थ्यांनी हा घृणास्पद गुन्हा केला, असा आरोप आहे.
दिल्लीच्या एका न्यायालयाने सोमवारी सीबीआयला जेएनयूच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचे नजीब अहमद प्रकरण बंद करण्याची परवानगी दिली, जो १५ ऑक्टोबर २०१६ रोजी बेपत्ता झाला होता. न्यायालयाने म्हटले की, एजन्सीने तपासाचे सर्व पर्याय वापरले आहेत. सुनावणीदरम्यान, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ज्योती माहेश्वरी यांनीही आशा व्यक्त केली की नजीब लवकरच सापडेल.
ऑपरेशन सिंदूर नंतर, भारत आता अंतराळात आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करणार आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की २०२९ पर्यंत (पुढील ४ वर्षांत) ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवले जातील, हे सर्व उपग्रह अंतराळात भारताचे डोळे बनतील आणि पाकिस्तान-चीन सीमेवर सतत लक्ष ठेवतील.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अग्नि-५ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या दोन नवीन आवृत्त्या विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या अणुप्रणाली, रडार प्रणाली, नियंत्रण केंद्र, शस्त्रास्त्रांचा साठा जड बंकरमध्ये आणि जमिनीत ८०-१०० मीटर खोलीवर जाऊन नष्ट करेल.
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मोदी सरकारवर देश विकल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मित्र आदानी आणि अंबानी यांना देश विकला
पंजाबच्या फिरोजपूर मध्ये भारतीय हवाई दलाच्या हवाई पट्टीची जमीन परस्पर विकली. त्याबद्दल 28 वर्षांनंतर आई आणि मुलाविरुद्ध केस रजिस्टर झाली.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर गंभीर आणि खळबळजनक आरोप करताना दावा केला आहे की, काँग्रेसच्या काळात तब्बल १५० खासदार हे सोव्हिएत युनियनचे एजंट म्हणून कार्यरत होते. त्यांना थेट सोव्हिएत युनियनकडून निधी मिळत होता.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका १५ वर्षीय दलित मुलीचे अपहरण करून तिला केरळला नेण्यात आले, जिथे तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याचा आणि जिहादी कारवायांसाठी प्रशिक्षण घेण्याचा दबाव टाकण्यात आला.
भारत सतत आपली लष्करी क्षमता वाढवत आहे. याच पार्श्वभूमीवर, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने अग्नि-५ क्षेपणास्त्राची नवीन नॉन-न्यूक्लियर आवृत्ती बनवण्याची तयारी सुरू केली आहे.
कोलकाता येथील एलएलबी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी (३० जून २०२५) जेडीयू नेते नीरज कुमार यांनी या प्रकरणावर म्हटले की, केवळ आरोपीला अटक करणे हीच सरकारची जबाबदारी नाही. कारण तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, म्हणून तृणमूल काँग्रेसने केवळ शिस्तभंगाची कारवाई करावी असे नाही तर जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही वेळेच्या आत आरोपपत्र निश्चित करावे. जलदगतीने खटला चालवा, जेणेकरून न्याय मिळण्याची आशा अबाधित राहील.
तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. असे सांगितले जात आहे की टी राजा सिंह तेलंगणा भाजप अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांनी तेलंगणा भाजप अध्यक्ष जी किशन रेड्डी यांना राजीनामा पाठवला आहे. टी राजा सिंह यांनी धक्का आणि निराशेचे कारण देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतासोबतच्या व्यापार कराराबद्दल विधान केले आहे. त्यांनी सांगितले की भारतासोबत लवकरच व्यापार करार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की भारताला अमेरिकेसोबत नक्कीच चांगला करार करायचा आहा, परंतु त्यासाठी काही अटी असतील
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App