बारामतीजवळ गेल्या महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या डीजीसीएला अनेक त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी आता व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांची उड्डाणे थांबवली आहेत. या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले होते.
केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस देशभरात १४ वर्षांच्या मुलींसाठी विशेष एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. गर्भाशय मुख कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशीनुसार एकच मात्रा लसीकरण केले जाईल
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पश्चिम बंगालमधील SIR मध्ये 80 लाख दावे आणि आक्षेपांवर कार्यवाही करण्यासाठी दिवाणी न्यायाधीशांना (सिव्हिल जजेस) तैनात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाने आदेश दिला की, कलकत्ता उच्च न्यायालय पश्चिम बंगालमधील मतदार यादी SIR प्रक्रियेला गती देण्यासाठी झारखंड-ओडिशाच्या दिवाणी न्यायाधीशांची मदत घेऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन कार्यालय ‘सेवा तीर्थ’मध्ये मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी केरळ सरकारचा राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सूत्रांनुसार, हे पाऊल एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या केरळ विधानसभा निवडणुकांपूर्वी उचलण्यात आले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने सोमवारी इंडियन एअर फोर्स (IAF) च्या तेजस फायटर जेटच्या क्रॅशच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. HAL ने म्हटले आहे की, जमिनीवर विमानामध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड झाला होता. हवेत असा कोणताही अपघात झालेला नाही.
अभिनयातून राजकारणात आलेल्या विजय यांनी सोमवारी वेल्लोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांचे खरे मित्र लाचखोरी आणि भ्रष्टाचार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले की, कोळशावर चालणारे उद्योग एनसीआरमधून बाहेर हलवता येतील का?
गृह मंत्रालयाने सोमवारी ‘प्रहार’ नावाचे भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जारी केले. यात सर्व प्रकारच्या दहशतवादाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी एक सुव्यवस्थित आणि गुप्त माहितीवर आधारित चौकट मांडली आहे.
जागतिक तंत्रज्ञान कंपन्या मेटा आणि व्हॉट्सॲपने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, त्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) च्या गोपनीयता आणि जाहिरातींशी संबंधित डेटा शेअर करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि NCLAT च्या निर्देशांचे पालन करतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी बँकांना जोरदार फटकारले. त्यांनी बँकांकडून विम्यासारख्या आर्थिक उत्पादनांची चुकीच्या पद्धतीने विक्री (मिसेल-सेलिंग) करण्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्यांना त्यांच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. अर्थ मंत्रालयानेही बँका आणि विमा कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांनी ग्राहकांना चुकीच्या पॉलिसी विकू नयेत.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सणांच्या काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत खासगी विमान कंपन्यांकडून हवाई भाडे वाढवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने म्हटले की, हा एक अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे. अन्यथा, आम्ही 32 याचिकांवर विचार केला नसता.
तेलंगणामध्ये दोन मुद्द्यांवरून राजकीय भूकंप झाला आहे. पहिला मुद्दा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे विधान आहे, जे त्यांनी आदल्या दिवशी हैदराबादमधील हरिता व्हॅली रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले. यात त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, गांधी कुटुंबाला गरज भासल्यास आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी तयार राहावे. जर गांधी कुटुंबाने मदत मागितली तर ते १ हजार कोटी रुपयेही जमा करू शकतात. या विधानानंतर रेवंत रेड्डी विरोधकांच्या निशाण्यावर आले.
मुंबई उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मिळालेला दिलासा देणारा आदेश रद्द केला आहे. या निर्णयानंतर आता बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि आयडीबीआय बँक अंबानी यांना ‘फ्रॉड’ (फसवणूक करणारा) कर्जदार घोषित करण्याची कार्यवाही पुन्हा सुरू करू शकतील.
निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) 2026 अंतर्गत तामिळनाडूची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यानुसार, राज्यात आता एकूण 5.67 कोटी मतदारांची नावे आहेत. या प्रक्रियेत सुमारे 74 लाख लोकांची नावे वगळण्यात आली आहेत.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या विरोधात अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे. प्रयागराजच्या झूंसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये शंकराचार्यांचे शिष्य मुकुंदानंद यांचेही नाव आहे. झूंसी पोलीस ठाण्याचे प्रभारी महेश मिश्रा यांच्या माहितीनुसार, 2-3 अज्ञात व्यक्तींविरोधातही पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केरळमध्ये ‘केरळ स्टोरी 2 : गोज बियॉन्ड’ या चित्रपटाविरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने आयोजित केलेल्या बीफ फेस्टवर इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) ने टीका केली आहे. अशा प्रकारचा विरोध लोकांच्या भावना भडकावणारा आहे, असे लीगने म्हटले आहे.
रविवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चतरू भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय परिषदेतील कपडे काढून केलेल्या आंदोलनावरून काँग्रेसवर संतापले. मेरठमध्ये रविवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले- भारतात जगातील सर्वात मोठी एआय परिषद झाली. संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला, पण काँग्रेस आणि तिच्या इकोसिस्टमने काय केले? जागतिक कार्यक्रमाला घाणेरड्या आणि नग्न राजकारणाचा आखाडा बनवले. परदेशी पाहुण्यांसमोर काँग्रेसचे नेते कपडे काढून पोहोचले.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजधानी नवी दिल्लीतील गुलामीची अनेक चिन्हे हटवली. त्यामध्ये मुस्लिम बादशहांच्या नावांच्या रस्त्यांना भारतीय नेत्यांची नावे दिली.
राहुल गांधींच्या नेतृत्वात मणिशंकर अय्यर यांनी आज दुसरा खोडा घातला. त्यांनी INDI आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींच्या ऐवजी दुसऱ्या नेत्याकडे सोपवावे
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी दावा केला की, भारताने इतरांच्या सेवेसाठी ‘रॉ’ टॅलेंट तयार केले आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेवर (टेक्नोलॉजी इकोसिस्टम) बोलताना सॅम म्हणाले की, ‘१.५ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाकडे स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार करार (ITA) बाबतची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. वृत्तसंस्था PTI ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या फास्टॅगमध्ये टोल परतावा दिला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.
टी-२० विश्वचषकाच्या तिसऱ्या सुपर ८ सामन्यात गतविजेत्या भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषकात सलग १२ सामने जिंकल्यानंतर संघाला पराभव पत्करावा लागला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला दोन-तीन महिनेच उरले आहेत. येथे अजून भाषणे आणि रॅलींचा गलबलाट नाही. पण, राजकारण चांगलेच तापले आहे. कोलकाताच्या न्यू मार्केटपासून चांदनी चौकपर्यंत, न्यू टाऊनपासून जेसप बिल्डिंगपर्यंत आणि मुर्शिदाबादच्या बेलडांगापासून बर्धमानपर्यंत सुमारे 600 किमीच्या प्रवासात हे स्पष्ट झाले की, सध्या मतदार यादीच निवडणुकीचे रणांगण बनली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App