मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त चपराक हाणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा कोणत्याही स्थितीत अपमान सहन करणार नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद अबोटाबादच्या लष्करी छावणीतील गुप्तचर संस्था आयएसआयच्या छावणीत जाऊन लपला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्करच्या मदरशात लपून बसलेल्या हाफिजला ‘हल्ल्याची’ भीती वाटत होती. त्यामुळे २७ एप्रिल रोजी मुरीदकेच्या मदरशात होणारा कार्यक्रमही रद्द केला आहे.
गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंद देश नक्षलमुक्त होईल, असे जाहीर केले होते. या मोहिमेअंतर्गत यंदा आतापर्यंत ११४ दिवसांत १६१ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. सुमारे ६०० जणांनी शरणागती पत्करली आहे. २०२४ मध्ये संपूर्ण वर्षात २९६ व २०२३ मध्ये ५६ जण मारले गेले होते. म्हणजे दोन वर्षांतच नक्षलीविरुद्ध घातक कारवाईत ५२८ टक्क्यांची वाढ झाली आहे
पहलगाम मध्ये इस्लामी जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे हत्याकांड केल्यानंतर पाकिस्तानला अनुकूल ठरणाऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी “दहशतवादाला धर्म नसतो
मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने भाजपच्या भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांना मृत्युदंडाच्या शिक्षेची एनआयएने मागणी केली आहे. सर्व आरोपींना बेकायदेशीर कृत्य (यूपीए)च्या कलम १६ अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा युक्तिवाद मुंबईच्या विशेष न्यायालयात एनआयएच्या वतीने केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पाऊल उचलले आहे. यात सर्वात मोठे पाऊल अटारी-वाघा सीमा तात्पुरती बंद केली आहे. ही सीमा दोन्ही देशांत रोज सायंकाळी होणाऱ्या रिट्रीट समारंभ आणि मर्यादित व्यापारासाठी महत्त्वाची मानली जाते. सरकारकडून सांगितले की, जोवर स्थिती सामान्य होत नाही, तोवर अटारी सीमेवर भारतीय गेट उघडले जाणार नाही. यासोबत दररोज सूर्यास्ताला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम आता भारतीय व पाकिस्तानी सैनिकांतील हस्तांदोलन प्रक्रियाही बंद केली आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला उत्तर म्हणून १९६०चा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याच्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या करारात काय समाविष्ट आहे? या करारासाठी कोणता देश सर्वात फायदेशीर आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न – तो खरोखर इस्लामाबादला मोठा धक्का देऊ शकतो का? यांची उत्तर आजच्या द फोकस एक्सप्लेनरमधून जाणून घेऊयात….
जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात काही मोठे निर्णय घेतले. त्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही काही पावले उचलली – जसं की वाघा बॉर्डर बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा थांबवणं आणि भारतीय विमानांसाठी आपली आकाशमर्यादा बंद करणं.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
शिमला करार स्थगित करून पाकिस्तानचा स्वतःच्याच पायावर धोंडा; मोदीजी, तथाकथित “नियंत्रण रेषा” ताबडतोब मोडा!!
२०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.२% दराने वाढेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) वाढीचा अंदाज कमी केला आहे. यापूर्वी, आयएमएफने आर्थिक वर्ष २६ मध्ये विकास दर ६.५% राहण्याचा अंदाज वर्तवला होता.
अंमलबजावणी संचलनालयाने सहरा समूहाविरोधात मनी लाँड्रिंग चौकशी अंतर्गत १५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.
भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तत्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द मानले जातील. शिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध असतील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गुरुवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीत, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी एक मिनिट मौन पाळले. याशिवाय, एक ठरावही मंजूर करण्यात आला.
बिहारमधील मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संबोधित करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी दोन मिनिटे मौन पाळले. पंतप्रधानांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर आणि वरिष्ठ पाकिस्तानी राजनैतिक कर्मचाऱ्यांना हद्दपार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राज्य वक्फ बोर्डातील नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य बार कौन्सिलचा सक्रिय सदस्यच राज्य वक्फ बोर्डाचा सदस्य होऊ शकतो.
पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर याने पाकिस्तानी ओव्हरसीज कॉन्फरन्स मध्ये हिंदुत्वाच्या विरोधात गरळ ओकले
जम्मू-काश्मीरातील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी तंगमार्ग परिसरात दहशतवाद्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि इंडिगो यांनी तिकीट रद्द करणे आणि वेळापत्रक बदलण्याचे शुल्क माफ केले आहे.
याह्या सिनवार, मारवा इसाह, खालिद मशाल, मेहमूद जहर इस्माईल हनिया आणि मोहम्मद दैफ हे 6 जण कोण होते?? ते नेमके काय काम करत होते??
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याबाबत दिल्ली जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि म्हटले की, ‘पहलगाममध्ये निष्पाप लोकांच्या हत्येने आपला विवेक हादरवून टाकला आहे. संपूर्ण देश या भयंकर गुन्ह्याचा एकमताने निषेध करतो.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्राने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वपक्षीय बैठक गुरुवारी (२४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. ज्याचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करतील. या बैठकीत, सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीची आणि सरकारने उचललेल्या पावलांची माहिती सर्व पक्षांना देईल.
जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. तत्पूर्वी, मुंबईत पार्थिव आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App