पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर शांतता होती. पण पाच दिवसांनंतर परिस्थिती सामान्य होत आहे. २५ एप्रिल रोजी येथे फक्त ११० पर्यटक आले. २६ तारखेला ही संख्या ४०० पर्यंत वाढली
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी अनेक बाबी समोर आल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार हल्ल्याच्या पाच दिवस आधी बैसरन भागात एक अज्ञात डीजेआय मॅट्राइस ३०० आरटीके ड्रोनचे उड्डाण दिसून आले होते.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्राच्या करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काल रात्री उशीरा बॅलार्ड पियर येथील ED कार्यालयात आग लागल्याने गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. ईडी कार्यालयात पहाटे २:३० वाजता लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले.
सरकारने शनिवारी माध्यमांना लष्कराच्या कारवाया आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण करू नये, असे निर्देश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारचे वृत्तांकन अनावधानाने शत्रूंना मदत करू शकते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील परदेशी नागरिकांवर कारवाई सुरू झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद (८९०) आणि सुरत (१३४) येथे पोलिसांनी शनिवारी महिला आणि मुलांसह सुमारे एक हजार बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ताब्यात घेतले. जर वैध कागदपत्रे सापडली नाहीत, तर त्यांना भारतातून हद्दपार केले जाईल.
नाशिक : पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचा सूड उगवण्यासाठी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोक शांतपणे कामात मग्न, पण इतरांच्याच फुकट फाका, बडबड आणि फडफड!!, अशी सगळ्या देशात […]
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्रता झारखंडमधील धनबादपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी सकाळपासून एटीएसने धनबाद शहरातील वासेपूरसह अनेक भागात तळ ठोकला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळाने अनंत अंबानी यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्सने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मानव संसाधन, नामांकन आणि पुनर्निर्मिती समितीच्या शिफारशीनुसार, बोर्डाने मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांची १ मे २०२५ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे, जी आता भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक पुन्हा पाकिस्तानात पाठवून देण्याची सक्त सूचना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात भाषण दिले. यावेळी त्यांनी देशातील तरुणांचे कौतुक करताना सांगितले की, तरुणांनी भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पहलगाम हल्ल्यावर विधान केले. पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले, ‘अहिंसा हा आपला स्वभाव आहे, आपले मूल्य आहे, परंतु काही लोक बदलणार नाहीत, तुम्ही काहीही केले तरी ते जगाला त्रास देत राहतील, मग आपण त्यांच्याबद्दल काय करावे?’
आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींमध्ये नाव, पत्ता, मोबाइल नंबर बदलण्यासाठी आता लोकांना वेगवेगळ्या कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येणार नाही. केंद्र सरकार युनिफाइड डिजिटल आयडेंटिटी सिस्टिम लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तयार होत असलेल्या पोर्टलवर एकाच ठिकाणी पत्ता, नंबर आदी अपडेट करता येईल. सर्व आवश्यक ओळखपत्रांमध्ये हे बदल ऑटोमॅटिक अपडेट होतील.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात दहशतीचे वातावरण आहे. भारतीय लष्करी हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी सैन्यात गोंधळ माजला आहे. लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या पंजाब प्रांतातील मुरीदके व बहावलपूर येथील ठिकाणांवर हल्ल्याची भीती आहे. या ठिकाणांवरील मशीद आणि मदरसे आता रिकामे झाले आहेत.
आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करेल. एनआयएचे पथक आधीच पहलगाममध्ये पोहोचले आहे आणि त्यांनी आपले काम सुरू केले आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या व्यक्तीवर गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल पाठवल्याचा आरोप आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सर्वात महत्त्वाचा जो सिंधू जल करार चर्चेत आलाय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले, परंतु खोऱ्यातील धोका अद्याप संपलेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर आता आणखी एका हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार, लोकांना लष्कर-ए-तैयबाच्या धोकादायक मॉड्यूलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे. दहशतवादी कारवायांचे आयोजक, गुन्हेगार आणि वित्तपुरवठा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
सध्या पाकिस्तानवर वॉटर स्टाइक आणि पॉलिटकल स्टाइक झाला आहे आणि पाकिस्तानची भीतीही समोर आली आहे. मात्र पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत, २४ तासांत दुसऱ्याता नियंत्रण रेषेवर गोळीबार केला गेला आहे. तर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात शुक्रवारी (२५ एप्रिल) हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी, दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राला पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे आवाहनही केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान संबंध खूपच कटुतेच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. दरम्यान, पूर्व भारतात, सैनिकांनी लाल दहशतवादाविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे.
भारताच्या लष्करी हालचाली आणि कारवायांचे शत्रूला फायदेशीर ठरणारे बेबंद प्रक्षेपण नको, अशा स्पष्ट सूचना माहिती प्रसारण मंत्रालयाने जाहीर केल्यात
केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आपले उत्तर दाखल केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, १९२३ पासून, वक्फ बाय युजर तरतुदी अंतर्गत नोंदणी अनिवार्य झाल्यानंतर, त्याचा गैरवापर केला जात आहे आणि खासगी आणि सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. हे थांबवणे आवश्यक होते.
पहलगाम मधला हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून आपापल्या राज्यातले पाकिस्तानी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठविण्याच्या सूचना केल्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App