‘काँग्रेसमध्ये गेलेल्या बीआरएस आमदारांच्या अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी संबंधित आमदारांना नोटीस बजावण्यास दहा महिने का लावले?’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत हे बुधवारी नागपुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातील परकीय आक्रमणांकडून पराभवाची शतकानुशतके जुनी परंपरा संपवली. त्यांनी देशातील आक्रमणांचे चक्र मोडून काढले. म्हणूनच त्यांना त्या काळातील युगपुरुष म्हटले जाते.
वक्फ सुधारणा विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए या विधेयकाला पाठिंबा देत आहे, तर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत.
बुधवारी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक २०२४ सादर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले- ‘वक्फ विधेयक चोरीसाठी नाही तर गरिबांसाठी आहे. एक सदस्य म्हणत आहे की अल्पसंख्याक ते स्वीकारणार नाहीत, तुम्ही काय धमकी देत आहात भाऊ. हा संसदेचा कायदा आहे, तो स्वीकारावाच लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ बुधवारी लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ खासदारांनी बाजूने मतदान केले, तर २३२ खासदारांनी विरोधात मतदान केले.
विरोधकांनी आठ तासांची चर्चा नामंजूर करून 12 तासांची चर्चा मागितली होती, पण लोकसभेमध्ये Waqf सुधारणा विधेयकावर तब्बल 14 तासांची चर्चा झाली आणि काल मध्यरात्री लोकसभेने बहुमताने waqf board सुधारणा विधेयक मंजूर केले. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली.
वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२५ बुधवारी दुपारी लोकसभेत सादर करण्यात आले. तब्बल १२ तास प्रदीर्घ चर्चेनंतर ते मंजूर झाले.
मोदी सरकारने आणलेल्या waqf सुधारणा विधेयकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतल्या चर्चेत सहभाग नोंदवला.
Waqf bill, Rahul + Priyanka and Supriya sule skipped participation in discussion in Loksabha
कर्नाटकातील रायचूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परंपरेच्या नावाखाली येथे अनेक जंगली ससे मारले गेले आहेत. या प्रकरणात काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि भावासह ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपला फटकारून अखिलेश यादव यांनी घराणेशाहीच्या पक्षांच्या अध्यक्षांवर आज अमित शाह यांच्याकडून पुढच्या 25 वर्षांचे “शिक्कामोर्तब” करवून घेतले.
दरवर्षी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक हिमाचल प्रदेशात येतात. प्रत्येकजण इथे फिरायला आणि मजा करायला येतो. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी, हिमाचलमध्ये जगातील सर्वात लांब रोपवे बांधला जाणार आहे. हिमाचलमधील पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी, येथील सरकार शिमला ते परवाणू पर्यंत जगातील सर्वात लांब रोपवे बांधणार आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांना विधेयक सादर होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी असेही म्हटले की, जे लोक या विधेयकाला विरोध करत आहेत
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी असा दावा केला आहे की पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत. आलम यांचे हे विधान माध्यमांमध्ये आले आहे. बांगलादेशी न्यूज पोर्टल bdnews24.com नुसार, हसीनाच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या ईद समारंभात आलम यांनी हे विधान केले.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या Waqf board सुधारणा कायद्यामध्ये मुसलमानांच्या धार्मिक व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा मुद्दा नाही त्याचबरोबर धार्मिक संस्थांमध्येही हस्तक्षेप होणार नाही
गुजरातमधील एका फटाक्याच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन मध्य प्रदेशातील २१ कामगारांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ८ वाजता बनासकांठाजवळील डीसा येथे हा दुर्घटना घडली. ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.
Waqf board सुधारणा कायद्याद्वारे सरकारचा मुसलमानांच्या कुठल्याही धार्मिक बाबींमध्ये, धार्मिक संस्थांमध्ये आणि धार्मिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेत नाही
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले जाईल. ज्यासाठी सरकारने सर्व पक्षांशी चर्चा केली आहे. परंतु या विधेयकाबाबत विरोधी पक्ष सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहे. या विधेयकाबाबत एनडीएचे सर्व पक्ष एकमत झाले आहेत. अशा परिस्थितीत, आजच लोकसभेत हे विधेयक मंजूर होईल असे मानले जात आहे. तथापि, या काळात विरोधी पक्ष सभागृहात मोठा गोंधळ घालू शकतात.
केंद्रातल्या मोठी सरकारला Waqf board सुधारणा विधेयक का आणावे लागले??, यासंबंधीचा धक्कादायक खुलासा केंद्रीय कायदेमंत्री किरण यांनी आज लोकसभेत केला.
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यात सीबीआयने काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आरोपी बनवले आहे. सीबीआयने म्हटले आहे की ते देखील लाभार्थ्यांमध्ये होते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून अॅडव्हान्स क्लेमच्या ऑटो सेटलमेंट (ASAC) ची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी २८ मार्च रोजी श्रीनगर येथे झालेल्या ईपीएफओच्या कार्यकारी समितीच्या (ईसी) ११३ व्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला.
केंद्रातील मोदी सरकारचे कायदेमंत्री किरण रिजिजू हे Waqf board सुधारणा विधेयक लोकसभेत मांडत असतानाच, दुसरीकडे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन देशभरात आंदोलन भडकवायची तयारी असल्याची धमकी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (१ एप्रिल) माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर ५ जणांविरुद्धच्या एफआयआर आदेशावरील स्थगिती वाढवली. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात या आदेशावर अंतरिम स्थगितीही दिली होती.
संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत हिंदुत्वाच्या मिशांना पीळ भरला. देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हापासून आम्ही आमच्या मिशांना हिंदुत्वाचा पीळ भरतोय. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे संजय राऊत म्हणाले, पण त्याचवेळी त्यांनी Waqf board सुधारणा बिलाचा विषय डायव्हर्ट केला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App