असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने ४० प्रादेशिक पक्षांचा उत्पन्न अहवाल प्रसिद्ध केला आहे. या पक्षांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २५३२.०९ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले आहे. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक, सुमारे १७९६.०२४ कोटी रुपये निवडणूक रोख्यांमधून आले आहेत.
नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की उद्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होतील. त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९७९ मध्ये कायद्याची कारकीर्द सुरू केली.
भारतावर अमेरिकी पाठोपाठ युरोपियन युनियन अर्थात EU ने पण ज्यादा टेरिफ लादावेत अशी धमकी ट्रम्प प्रशासनाने दिली. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांशी चर्चा केली.
राज्य विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकांवर विचार करण्यासाठी न्यायालये राज्यपाल आणि राष्ट्रपतींसाठी वेळ मर्यादा ठरवू शकतात का, अशी विचारणा करणाऱ्या राष्ट्रपतींच्या संदर्भावरील याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आठव्या दिवशी सुनावणी झाली.
२२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी, सरकारने कंपन्यांना त्यांच्या जुन्या न विकल्या गेलेल्या स्टॉकची कमाल किरकोळ किंमत (MRP) बदलण्याची परवानगी दिली आहे. उत्पादक, पॅकर आणि आयातदार आता स्टॅम्पिंग, स्टिकर किंवा ऑनलाइन प्रिंटिंगद्वारे जुन्या स्टॉकवर नवीन किंमती टाकू शकतील.
मंगळवारी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या कार्यक्रमात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत हे लष्करासाठी देखील आवश्यक आहे. पूर्वी संघर्षादरम्यान १०० किमीच्या पल्ल्याची शस्त्रे आवश्यक होती, आज ३०० किमीच्या पल्ल्याची शस्त्रे आवश्यक आहेत.
रेणुकास्वामी हत्याकांडात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शनने तुरुंगात विष देण्याची विनंती केली आहे. दर्शन मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६४ व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर झाला.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची दोन्ही मुले समायरा आणि कियान यांनी त्यांचे वडील संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेत वाटा मिळवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.बार अँड बेंचच्या म्हणण्यानुसार, मुलांनी त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव कपूर (संजय कपूरची तिसरी पत्नी) यांच्यावर संजय कपूरच्या मृत्युपत्रात बदल करून संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
राज्यात कांद्याचा गहन प्रश्न समोर उभा राहत असतानाच आणि सध्या कांद्याचे भाव उतरलेले असताना नाफेडने कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी पडले आहेत. कांद्याला सरासरी १४०० ते १५०० रुपये भाव असताना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी खाली आले आहेत आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिली.
पडले तरी काँग्रेसचे नाक वर; वाढलेल्या टक्केवारीतून केली पराभवाची भलामण!!, अशी काँग्रेसच्या नेत्यांची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हरल्यानंतर अवस्था झाली.
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे की, जर एखाद्या सुशिक्षित आणि स्वतंत्र महिलेने स्वतःच्या इच्छेने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवले, तर ती असा दावा करू शकत नाही की तिची दिशाभूल केली जात आहे किंवा तिचे शोषण केले जात आहे.
दुसरी फाटाफूट दिसायला लागल्याबरोबर बांधबंदिस्ती; उद्धव ठाकरेंनी वाढविल्या शिवातीर्थावरच्या भेटी!!, असेच उद्धव ठाकरेंच्या आजच्या शिवतीर्थ भेटीचे वर्णन करता येईल. उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली
मराठा आरक्षणाचा जीआर सरकारने प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप केल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने त्यांचा आरोप धुडकावून लावला आहे. मराठा आरक्षणाचा जीआर काढताना सरकारवर कोणताही दबाव नव्हता. आमच्या उपसमितीने अतिशय विचाराअंती 3-4 बैठका घेऊन हा निर्णय घेतला. उपसमिती त्यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सीपी राधाकृष्णन हे देशाचे १५ वे उपराष्ट्रपती असतील. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. तर आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली. राधाकृष्णन १५२ मतांच्या फरकाने विजयी झाले.
पंजाबमध्ये झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी राज्याच्या दौर्यावर गेले.
केंद्रातले मोदी सरकार पाडण्यासाठी वेगवेगळ्या उंगल्या करायला गेले, पण साधी INDI आघाडीच्या खासदारांची एकजूट नाही टिकवू शकले!!, अशी राहुल गांधींच्या राजकीय कर्तृत्वाची आज पुन्हा एकदा नोंद झाली. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI नुसती हरलीच नाही तर फुटली सुद्धा. कारण काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांची अपेक्षित असलेली 324 मते बी. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांना मिळू शकली नाहीत. त्यांना फक्त 300 मते मिळू शकली. NDA आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, INDI आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त 300 मते मिळाली. याचा अर्थ INDI आघाडीची 25 ते 30 मते फुटली.
नाशिक : Vice Presidential election : लाल संविधान, उभी दांडी, मलेशियातून केली खेळी; तरी विरोधकांची मते फुटली!!, असेच उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वर्णन करावे लागेल. NDA […]
सशस्त्र दलांच्या एलिट कमांडो फोर्सचा संयुक्त युद्ध सिद्धांत तयार करण्यात आला आहे. हा सामान्य दस्तऐवज लष्कराच्या विशेष दलांसाठी, हवाई दलाच्या गरुड कमांडो फोर्ससाठी आणि नौदलाच्या मार्कोस कमांडोसाठी तयार करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आयोजित केलेल्या या सरावात, तिन्ही सैन्याच्या एलिट फोर्सच्या तयारीचे प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सत्ताधारी एनडीए खासदारांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेला संबोधित केले. ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ या थीमवर भर देत, त्यांनी खासदारांना त्यांच्या मतदारसंघात २०-३० स्वदेशी मेळावे आयोजित करण्यास सांगितले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : The existence of 15 political parties : देशातील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका निरपेक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोग वर असते. […]
आज 9 सप्टेंबर 2025 सरकारे कोसळण्याचा दिवस ठरला. फ्रान्स आणि नेपाळ या दोन देशांमधली सरकारे आज एकाच दिवशी घरी जाऊन बसली.
भारतातील लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवरील बंदी उठवण्याची कोणतीही योजना नसल्याचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अश्विनी वैष्णव यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Jaideep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफ आकारणीमुळे या वर्षी भारताचा जीडीपी विकासदर ०.५०% कमी होऊ शकतो. असे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नागेश्वरन म्हणाले… मला आशा आहे की हा अतिरिक्त कर जास्त काळ टिकणार नाही. या आर्थिक वर्षात हा कर जितका जास्त काळ चालू राहील तितका त्याचा परिणाम जीडीपीवर ०.५% ते ०.६% पर्यंत होऊ शकतो. परंतु जर हा कर पुढील वर्षापर्यंत वाढला तर त्याचा परिणाम आणखी जास्त होईल, जो भारतासाठी मोठा धोका निर्माण करू शकतो.
सोमवारी, सर्वोच्च न्यायालयाने बिहारमध्ये एसआयआर (मतदार पडताळणी) विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले – आधार हा ओळखीचा पुरावा, नागरिकत्वाचा नव्हे.न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदार ओळखपत्रासाठी आधार हा १२ वा दस्तऐवज मानण्याचे आदेश दिले. सध्या, बिहार एसआयआरसाठी ११ विहित कागदपत्रे आहेत, जी मतदारांना त्यांच्या फॉर्मसोबत सादर करावी लागतात.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App