झारखंडची राजधानी रांचीमध्ये पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) मोठी कारवाई होताना दिसत आहे. आयुष्मान भारत योजनेत मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडी रांचीमधील २१ ठिकाणी छापे टाकत आहे.
राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर शुक्रवारी काही वेळातच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पश्चिम बंगालमध्ये, शाळा निवड आयोगाने (SSC) 2016 मध्ये 25 हजार शिक्षक आणि शिक्षकेतरांची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाने या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवल्या होत्या.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात अॅक्सिओम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊ शकतात. या मोहिमेत तीन देशांचे चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एका अपडेटमध्ये ही माहिती दिली.
waqf सुधारणा विधेयक लोकसभा आणि राज्यसभा यांनी बहुमताने मंजूर केले संसदेत हे विधेयक रोखून धरण्यात काँग्रेस सह सगळ्या विरोधकांना अपयश आले
पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका वर्षाने वाढवली. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपीठाने सांगितले की, वायू प्रदूषणाची पातळी बऱ्याच काळापासून धोकादायक राहिली आहे.
तेलंगणा बीआरएसच्या १० बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना त्यांच्या एका विधानाबद्दल फटकारले. २६ मार्च रोजी तेलंगणा विधानसभेत १० आमदारांना संबोधित करताना रेवंत रेड्डी म्हणाले होते की राज्यात पोटनिवडणुका होणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सहाव्या बिम्सटेक शिखर परिषदेसाठी गुरुवारी थायलंडच्या बँकॉक शहरात दाखल झाले. आगमनावेळी मोदी यांना रामायणाची थाई आवृत्ती ‘रामकियेन’ दाखवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
1955 पासून ते अगदी 2022 पर्यंत चीनने भारताची जमीन बळकावली. पण या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील भांडणे केक कापणे आणि चायनीज सुप पिणे या मुद्द्यांवर येऊन धडकली!!
लोकसभेपाठोपाठ वक्फ दुरुस्ती विधेयक १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री २.३३ वाजता राज्यसभेत १२८ विरुद्ध ९५ मतांनी मंजूर झाले.
अखिल भारतीय मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ चे स्वागत केले आहे. त्यांनी या विधेयकाचे वर्णन भारत सरकारने वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी उचललेले एक चांगले पाऊल असल्याचे सांगितले.
विनोदी अभिनेता कुणाल कामराच्या अडचणी सतत वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता, कामराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) लेखी तक्रार देण्यात आली आहे. यामध्ये त्याला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत चीनवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. प्रत्युत्तरादाखल, भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि निशिकांत दुबे यांनी आरोप केला की काही लोक चीनशी संगनमत करून आणि त्यांचा राजकीय अजेंडा पुढे नेऊन आरोप करतात, तर त्यांच्या पक्षाच्या राजवटीत भारताची जमीन या शेजारच्या देशाला देण्यात आली. ठाकूर यांनी शून्य प्रहरात असा प्रश्नही उपस्थित केला की राजीव गांधी फाउंडेशनने चीनकडून पैसे घेतले होते का आणि कोणत्या उद्देशाने?
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ममता सरकारला मोठा झटका बसला आहे. २५,००० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या परिणामांचे आम्ही विश्लेषण करत आहोत, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खातेधारकांसाठी एक नवीन अपडेट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खात्यांसाठी नॉमिनीची संख्या अपडेट करण्यासाठी किंवा नवीन जोडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी सांगितले.
लोकसभेतून वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर, केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार सभागृहात जे काही सादर करते ते विरोधकांना असंवैधानिक वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बँकॉकला रवाना झाले आहेत. ते थायलंडच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडचे पंतप्रधान पैटोंगटार्न शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या थायलंड दौऱ्यावर आहेत.
शिवसेना नेते राहुल कनाल यांनी बुक माय शो या ऑनलाइन प्लॅटफॉर्मला पत्र लिहिले आहे, जे कार्यक्रमांसाठी तिकिटे बुक करते. गुरुवारी एक पत्र लिहून, शिवसेना नेत्याने विनंती केली की कुणाल कामराला त्यांच्या भविष्यातील शोसाठी तिकीट प्लॅटफॉर्म प्रदान करू नये.
जयपूर बॉम्बस्फोट मालिकेच्या कटात सहभागी असलेल्या फरार दहशतवादी फिरोज खानला रतलाम पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या दहशतवाद्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
केंद्र सरकारने अवयवदानावर सरकारी कर्मचाऱ्यांना ४२ दिवसांची विशेष कॅज्युअल रजा देण्याची तरतूद केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत या संदर्भात माहिती दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने 2016 साली केलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याला सुप्रीम कोर्टाने आज जबरदस्त दणका दिला. त्यामुळे तब्बल 25000 शिक्षकांना नोकऱ्या गमवायची वेळ आली. शिक्षक भरती प्रक्रियेत सरकारने नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये वशिलेबाजी, लाचखोरी असे गैरव्यवहार आणि गैरप्रकार केले.
सरकारने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. पूनम यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
Waqf सुधारणा नाकारून उत्तर प्रदेशातील संभलचा खासदार जिया उर रहमान बर्कने थेट भारतावरच मालकी हक्क सांगितला. Sambhal MP
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App