परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. कीर्ती सिंह म्हणाले की, नागरिकत्व सोडण्याची कारणे वैयक्तिक आहेत आणि ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे त्यालाच हे माहिती आहे.
भारतावर जादा टेरिफ लादून दादागिरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जोरदार टोला हाणला. सब के बॉस तो हम है!!, असे समजणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही, पण भारत वेगाने प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. जागतिक आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी ट्रम्प तात्यांना सुनावले.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले की, २०२१ पासून बांगलादेशात हिंदूंवर हल्ल्याच्या ३,५८२ घटना घडल्या आहेत. रंगपूर-चिट्टागोंगसारख्या भागात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार सुरूच आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार अनिल देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भारताने पाकिस्तानकडे अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचे ३३४ मोठे प्रकरण उपस्थित केले आहेत.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंह यांनी शनिवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. आम्ही त्यांची पाच लढाऊ विमाने पाडली. एपी सिंह यांनी बंगळुरू येथे एका कार्यक्रमात याची पुष्टी केली.
भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. देशाचे वार्षिक संरक्षण उत्पादन 1,50,590 कोटी रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूजवळ एक नवीन क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे. या स्टेडियममध्ये एका वेळी ८० हजार प्रेक्षक बसू शकतील. प्रेक्षक क्षमतेच्या बाबतीत, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर हे देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते बंगळुरू आणि राज्यासाठी अनेक विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांचा एकूण खर्च २२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की, सध्या देशात ज्या विषयांवर चर्चा होत आहे त्यांचे नाव मी घेऊ इच्छित नाही. जगात आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, परंतु जग झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे असे माझे मत आहे. शनिवारी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (VNIT) एका कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे निवडणूक आयोग सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.
कोल्हापूरमधील माधुरी हत्तिणीला परत आणण्यास PETA इंडियाने आक्षेप घेतला आहे. माधुरीला मुक्तपणे फिरण्यासाठी एक शांत जागा, तिच्या वेदना कमी करण्यासाठी आणि तिच्या आजारी पायांना व्यायाम देण्यासाठी एक तलाव आणि तिच्या अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी प्रगत पशुवैद्यकीय उपकरणे आणि कौशल्याची आवश्यकता आहे. वनतारा हे सर्व प्रदान करते आणि सध्या महाराष्ट्रात अशी दुसरी कोणतीही सुविधा नसल्याचा दावा PETA ने केला आहे. जर हे चित्र बदलले आणि महाराष्ट्रात तशा सुविधा तयार झाल्या तर, PETA इंडिया तिच्यावर उपचार करण्यास विरोध करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सांगितले आहे की जर त्यांना मत चोरीचे त्यांचे दावे खरे वाटत असतील तर त्यांनी शपथपत्रावर स्वाक्षरी करावी. जर त्यांना त्यांच्या दाव्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी.
भारतीय हवाईदल प्रमुखांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळले; operation sindoor दरम्यान भारत आणि पाकिस्तानची 5 विमाने पाडल्याचे उघडपणे सांगितले.
शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा आणि नितीश कुमार यांनी सीतामढी येथील माता जानकी मंदिराचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील उपस्थित होते.कार्यक्रमाला संबोधित करताना नितीश कुमार यांनी जुन्या सरकारवर निशाणा साधला. अमित शहा यांनी एसआयआर आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. त्यांनी असेही सांगितले की, मोदीजी बिहारला भेट देत आहेत. मी संघटनात्मक बैठका घेत आहे. बिहारमध्ये स्पष्ट बहुमताने एनडीए सरकार स्थापन होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आजच्या नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत दोन माणसे भेटल्याची स्टोरी सांगितली. पण त्यामुळे पवारांच्या पुड्या सोडण्याच्या जुन्या सवयीची आठवण झाली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दररोज संजय राऊत यांच्यासारखी बडबड करून आंतरराष्ट्रीय संबंधांमधल्या गंभीर चर्चेची चव घालवली असली
टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, भारताने अमेरिकेकडून शस्त्रे आणि विमाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, भारताने नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना थांबवली आहे. हा संरक्षण करार सुमारे ३१,५०० कोटी रुपयांचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. ट्रम्प यांच्यावरील टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी भारत-रशिया संबंध मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
भारतीय लष्कर आणि हवाई दल त्यांच्या जुन्या चेतक आणि चित्ता हेलिकॉप्टरच्या जागी सुमारे २०० नवीन हलके हेलिकॉप्टर खरेदी करण्याची तयारी करत आहेत. यासाठी संरक्षण मंत्रालयाने रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (RFI) जारी केली आहे.
अनुदानित दराने एलपीजी सिलिंडर विकल्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांना ३० हजार कोटी रुपये देईल. ही रक्कम कंपन्यांना १२ हप्त्यांमध्ये दिली जाईल.याशिवाय, उज्ज्वला योजनेच्या अनुदानासाठी १२,००० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आज म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 पेट्रोलवरील टीकेवरून चुकीची माहिती पसरत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आज (8 ऑगस्ट) दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हटले आहे की, ‘जर कोणाला वाटत असेल की E20 पेट्रोलमुळे वाहनांमध्ये समस्या निर्माण होत आहेत, तर त्यांनी असे एक उदाहरण द्यावे.’ त्यांनी दावा केला की, आतापर्यंत या इंधनामुळे कोणत्याही वाहनात कोणतीही समस्या दिसून आलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी एकूण ५२,६६७ कोटी रुपयांच्या निधी/प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या १५व्या दिवशी बिहार एसआयआरवर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षांनी निदर्शने केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभर चालले नाही.गुरुवारीही, विरोधकांच्या गदारोळात राज्यसभेत कोस्टल शिपिंग विधेयक, २०२५ मंजूर करण्यात आले. त्याचा उद्देश भारतीय किनारपट्टीवर मालवाहतूक सुलभ करणे आहे. हे विधेयक ३ एप्रिल रोजी लोकसभेत मंजूर करण्यात आले.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना फोन केला. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या ब्राझील दौऱ्यावर चर्चा केली, ज्यामध्ये त्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि शेती यासारख्या मुद्द्यांवर परस्पर सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शविली.
ब्रिटनमधील एका खासदाराने स्वतःचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अवतार तयार करून नागरिकांशी संवाद साधण्याची नवी पद्धत सुरू केली आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी गुरुवारी राऊस अव्हेन्यू कोर्टात झाली. या दरम्यान न्यायालयाने ईडीकडून आरोपपत्राबाबत स्पष्टीकरण मागितले. आता शनिवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्रावर कधी दखल घेतली जाईल, हे न्यायालय ठरवेल. त्याच वेळी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरही आरोप निश्चित केले जातील.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App