जागतिक बाजारपेठेतील आर्थिक अनिश्चितता असूनही, भारताची वस्तू आणि सेवा निर्यात आर्थिक वर्ष २०२५ मध्ये विक्रमी ८२० अब्ज डॉलर्स ओलांडण्याची शक्यता आहे, जी मागील आर्थिक वर्षातील ७७८ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. बहुतेक देशांचे शेअर बाजार कोसळले आहेत. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. ते म्हणाले की जागतिक अनिश्चितता असूनही, आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत आहे. बाह्य दबावामुळे भारतातील नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही. भारताची अर्थव्यवस्था अशा दबावाला तोंड देण्यास सक्षम आहे.
काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे सूप वाजले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गृह राज्यामधूनच त्यांच्या केंद्रातल्या राजवटीला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अहमदाबाद मध्ये निर्धार केला.
भारतीय नौदलाला लवकरच २६ राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. ६३ हजार कोटी रुपयांचा हा करार लवकरच होणार आहे.
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील तिरुपती ते काटपाडी पर्यंतच्या १०४ किमीच्या सिंगल रेल्वे लाईनचे दुहेरी लाईनमध्ये रूपांतर केले जाईल.
काकांना दैवत म्हणून पुतण्याची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काकांच्या पक्षातून स्वतःच्या पक्षाची नवी भरती!! असला प्रकार अजितदादांच्या रणनीतीतून समोर आला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काबाबत, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, या शुल्काचा भारतावर काय परिणाम होईल हे अद्याप माहित नाही. भविष्यात त्याचा काय परिणाम होईल हे आपल्याला माहिती नाही. आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही या मुद्द्यावर ट्रम्प प्रशासनाशी अतिशय खुल्या आणि सकारात्मक पद्धतीने चर्चा करू.
भारताने बांगलादेशला दिलेली वस्तू हस्तांतरण सुविधा (ट्रान्स-शिपमेंट सुविधा) काढून घेतली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने ८ एप्रिल रोजी या निर्णयाची माहिती देणारे परिपत्रक जारी केले.
काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे होत आहे. ते दोन दिवसांसाठी (८ आणि ९ एप्रिल) आहे. राहुल गांधी अधिवेशनात म्हणाले- काही दिवसांपूर्वी भाजपने लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर केले
पवारांच्या “घरात” पवार साहेब दैवत, देशामध्ये पंतप्रधान मोदी नेते मजबूत; अजितदादांच्या गुगलीने पवारांची राष्ट्रवादी घातली तंबूत!!
बुधवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात घोषणाबाजीने सुरू झाली आणि गदारोळाचे रूपांतर परस्पर हाणामारीत झाले. आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सभागृहात एकमेकांशी भिडले.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील मुस्लिम समुदायाला आश्वासन दिले की त्यांचे सरकार त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करेल. जैन समुदायाने आयोजित केलेल्या विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त बोलताना ममता यांनी भाजपवर टीका केली आणि एकतेचा पुरस्कार केला आणि त्या म्हणाल्या की त्या वक्फ विधेयक बंगालमध्ये लागू होऊ देणार नाहीत आणि बंगालचे धार्मिक आधारावर विभाजन होऊ देणार नाही.
भारताने फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या करारावर लवकरच स्वाक्षरी केला जाईल.
देशाची मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलन समितीच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यापैकी एक रेपो रेटबाबतही घेण्यात आला आहे. आरबीआयने रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वक्फवरील नवीन कायदा तयार झाल्यानंतर सार्वजनिक व्यासपीठावरील त्यांच्या पहिल्याच वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा नवीन कायदा वक्फच्या पवित्र भावनेचे रक्षण करेल. ते म्हणाले की, गरीब मुस्लिमांना याचा फायदा होईल. पंतप्रधान मोदींनी रायझिंग इंडिया समिट २०२५ च्या व्यासपीठावरून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा बुधवारी भारतात येऊ शकतो. भारताच्या एजन्सी अमेरिकेत आहेत. राणा २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी आहे. दिल्ली तुरुंग सतर्क आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राणा कसाबच्या बॅरेकमध्येच बंद असेल.
मंगळवारी एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या अधिकारांच्या ‘मर्यादा’ निश्चित केल्या. तामिळनाडू प्रकरणात निकाल देताना न्या. जे. बी. पार्डीवाला व न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘राज्यपालांना कोणतीही व्हेटो पॉवर नाही.’ विधानसभेने मंजूर केलेली १० विधेयके रोखून ठेवल्याबद्दल न्यायालयाने राज्यपाल आर. एन. रवी यांना कडक शब्दांत फटकारले. तसेच कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या असाधारण अधिकारांचा वापर करून विधेयके राज्यपालांकडे परत पाठवल्याच्या तारखेलाच मंजूर झाली, असे मानले गेले. यातील बहुतांश विधेयके जानेवारी २०२० ते एप्रिल २०२३ दरम्यान मंजूर झाली. बहुतांश विधेयके राज्य विद्यापीठांत कुलगुरू नियुक्तीशी संबंधित होती.
अनेकदा लंब्या चवड्या भाषणांपेक्षा एखादा फोटो किंवा एखादा छोटा व्हिडिओ खरे बोलून जातो, याचा प्रत्यय आज अहमदाबादेत काँग्रेसच्या महाअधिवेशनात आला.
एरवी सीमा तंट्यामध्ये भारताशी पंगा घेऊन भारतीय भूमीत घुसखोरी करणाऱ्या चीनला अखेर हिंदी – चिनी भाई भाई आठवले.
मनात नेहरू + इंदिरा, ओठांवर गांधी + पटेल; पण काँग्रेसचे हे नवे सूत्र जनतेला “पटेल”??, हे शीर्षक आकाशातून पडून सूचलेले नाही,
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘अल्लाहने मला एका उद्देशाने जिवंत ठेवले आहे. तो दिवस नक्कीच येईल जेव्हा अवामी लीग नेत्यांना लक्ष्य करणाऱ्यांना शिक्षा होईल.
मंगळवारपासून देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेने २ एप्रिल रोजी आणि राज्यसभेने ३ एप्रिल रोजी मंजूर केले. ५ एप्रिल रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा लागू झाला.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये नवीन वक्फ कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांनी रस्ता रोखला आणि पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांना एकाच ठिकाणी निषेध करण्यास सांगितले, परंतु अचानक आंदोलकांनी निर्दिष्ट केलेल्या जागेच्या पलीकडे जाण्यास सुरुवात केली.
वाराणसीमध्ये २३ तरुणांनी एका विद्यार्थिनीचे अपहरण केले आणि तिच्यावर ७ दिवस सामूहिक बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओही बनवले. विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांना सांगितले की, ही घटना २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घडली.
जयपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे पत्र बाथरूममध्ये सापडले आहे. सुदैवाने, विमान उतरल्यानंतर, एका एअरलाइन कर्मचाऱ्याला बाथरूममध्ये ते पत्र सापडले. विमानाचे सामान्य लँडिंग झाले आणि प्रवासी उतरल्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विमानाच्या बाथरूममध्ये पत्र आढळले,
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App