पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ‘कट मनी’ अर्थात सरकारी योजनांतील कथित कमिशनखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घरकुल योजनेत लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा आरोप झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याला ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी राजकीय खेळी करत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
देशात नैर्ऋत्य मान्सूनने अखेर दमदार हजेरी लावली असून केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळसह दक्षिण भारतातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवरून एक अविश्वसनीय आणि थरारक घटना समोर आली आहे. सहा दिवसांपासून बेपत्ता असलेला नेपाळी शेर्पा मार्गदर्शक […]
दिल्लीतील कार्यक्रम आटोपून महाराष्ट्रात परतण्यापूर्वी अभिजित डिपके यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ६ जून रोजी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने येऊ नये आणि कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी मानली जाणारी कामगिरी करून पंजाबमधील तरुण संशोधक गुरनूर कौर चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्वचेच्या रंगामुळे ऑक्सिमीटरच्या रीडिंगमध्ये होणाऱ्या त्रुटींवर उपाय शोधणारे तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा समोर आल्यानंतर तिचे नाव जागतिक स्तरावर गाजत आहे.
भारत आणि अमेरिकेदरम्यान बहुप्रतिक्षित व्यापार कराराच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेने भारतासह ५४ देशांवर मोठी कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सक्तीच्या मजुरीतून तयार होणाऱ्या वस्तूंवर प्रभावी बंदी न घातल्याचा आरोप करत भारतातून येणाऱ्या आयातीवर अतिरिक्त १२.५ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांवर नव्या अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
: पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील बंडखोर आमदारांचा एक गट स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असून सुमारे ५० ते ५८ आमदार या गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भारत आता व्हेनेझुएला कडून इंधन खरेदी करणार असल्याची बाब आज स्पष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत दौऱ्यावर आलेल्या व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक अध्यक्षा डेल्सी रॉड्रिगेझ यांचे नवी दिल्लीत स्वागत केले. त्यांच्याशी द्विपक्षीय वाटाघाटी केल्या.
कर्नाटकच्या राजकारणातील अनेक महिन्यांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेसने या सोहळ्यातून पक्षातील एकजूट आणि सत्तेचे सुरळीत हस्तांतरण दाखवण्याचा प्रयत्न केला.
: गुजरातमधील अहमदाबाद शहरात पोलिसांनी बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात मोठी मोहीम राबवत तब्बल ८९० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून सुरक्षा यंत्रणांनी याला महत्त्वपूर्ण यश म्हटले आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संकटाचा परिणाम भारतीय प्रवासी, उद्योग क्षेत्र आणि परदेशात काम करणाऱ्या लाखो भारतीयांवर होऊ नये यासाठी विमानभाड्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच रोजगार आणि अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीने २२ जणांचा बळी घेतला असून मृतांमध्ये ११ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. आग इतकी भीषण होती की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बचाव पथके घटनास्थळी पोहोचेपर्यंत धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या दुर्घटनेनंतर हॉटेलच्या बांधकाम आणि परवानग्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जागतिक शेअर बाजारात दक्षिण कोरियाने मोठी कामगिरी करत भारताला मागे टाकले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्धसंवाहक उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य ५ लाख कोटी डॉलरच्या पुढे गेले आहे. यामुळे आशियातील प्रमुख भांडवली बाजारांच्या क्रमवारीत दक्षिण कोरियाने भारतावर आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचे सरकार जाऊन शुभेंदू अधिकारी यांचे भाजपचे सरकार आल्याबरोबर बांगलादेश बॉर्डरवर कुंपण घालण्याचे काम सुरू झाले. त्याचबरोबर पश्चिम बंगाल मध्ये बांगलादेशातून घुसलेले घुसखोर पुन्हा बांगलादेशात परतायला सुरुवात झाली.
बिहारची राजधानी पटणा येथे प्रसिद्ध शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक खान सर यांच्या कोचिंग संस्थेत घुसून काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात संस्थेच्या सुरक्षा रक्षकाला गंभीर मारहाण करण्यात आली असून तो जखमी झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार Shashi Tharoor यांनी ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण आवृत्तीच्या सक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. प्रत्येक सरकारी किंवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी ‘वंदे मातरम्’ची संपूर्ण आवृत्ती वाजवणे किंवा गायन करणे ही “अनावश्यक आणि त्रासदायक सक्ती” असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षात फूट; पण शिंदे पॅटर्नची मात्र खोटी हूल!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी करून पक्षात फूट पाडली
देशातील आघाडीच्या खाण आणि धातू उद्योग समूहांपैकी एक असलेल्या वेदांता समूहावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कथित उल्लंघनप्रकरणी मुंबई आणि दिल्लीसह विविध ठिकाणांवरील कार्यालयांमध्ये झडती मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दलाने स्वदेशी विकसित ‘रुद्रम-२’ या अत्याधुनिक हवाई-ते-भू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याने भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर पडणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक मंडळांपैकी एक असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (सीबीएसई) मोठी प्रशासकीय उलथापालथ झाली आहे. ऑनलाइन परीक्षा व्यवस्थापन प्रकल्पातील कथित अनियमितता, निविदा प्रक्रियेतील संशयास्पद व्यवहार आणि सायबर सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नांमुळे मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
D. K. शिवकुमार यांची शपथविधी पूर्वी गांधी परिवार स्तुती; आज सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडे आशीर्वाद फेरी!!, असे चतुराईचे राजकारण शिवकुमार यांनी साधून घेतले.
इंधन टंचाई आणि पेट्रोल डिझेलची महागाई या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला आज तीन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिसाद दिला. हे तीन केंद्रीय मंत्री आज कार पुलिंग करून एकाच कारमधून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पोहोचले.
लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मोठी बैठक ८ जून रोजी नवी दिल्लीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका बसला आग लागल्याने ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App