पश्चिम बंगाल निवडणुकीवरून तृणमूल काँग्रेस (TMC) आणि निवडणूक आयोग आमनेसामने आले आहेत. खासदार डेरेक ओ’ब्रायन यांच्या नेतृत्वाखालील TMC चे शिष्टमंडळ बुधवारी सकाळी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी पोहोचले.
बुधवारी इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतमध्ये हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ८९ लोकांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक लोक जखमी झाले. ही माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. ‘एपी’ (AP) या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यानंतर इराणने पुन्हा एकदा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद केली आहे.
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे माजी पंजाब अध्यक्ष नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. नवजोत कौर सिद्धू यांनी त्यांच्या X हँडलवर पोस्ट करत नवीन पक्षाची घोषणा केली.
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात नरेंद्र मोदींनी म्हणे टेलिफोन ऑपरेटरची भूमिका अदा केली. जागतिक प्रवक्ते संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. पण अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात जर मोदी टेलिफोन ऑपरेटर असतील तर मग जे. डी. व्हान्स आणि वांग यी हे कोण आहेत??, असा सवाल समोर आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने मंगळवारी, केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देणारा आदेश कायम ठेवावा की नाही, यावर सुनावणीचा पहिला दिवस आयोजित केला.
\ संत मलूक दास यांची काल ४५२ वी जयंती होती. वृंदावन येथील मलूक पीठात त्यांचा जन्मोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे. यात RSS प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहिले. मंचावर संत रसिक माधव दास यांनी मोहन भागवत यांना शाल पांघरून स्वागत केले.
आसाम पोलिसांचे पथक काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पवन घरी नाहीत. आसाम पोलिस त्यांची चौकशी करण्यासाठी वाट पाहत आहेत. दिल्ली पोलीसही सोबत उपस्थित आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकातावर हल्ला करण्याच्या धमकीला प्रत्युत्तर दिले. राजनाथ म्हणाले की, आसिफ यांनी अशा प्रकारचे प्रक्षोभक विधान करायला नको होते. 55 वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, तेव्हा त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले होते. जर त्यांनी बंगालवर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला, तर देवच जाणे की यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील.
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाच्या ट्विटरवर उड्या, पण प्रत्यक्षात डच्चू मिळण्याची शक्यता!!, हेच राजकीय वास्तव एका फोन कॉल मुळे समोर आले.
मेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला असला तरी यातली पाकिस्तानची मध्यस्थी फक्त नावापुरतीच, खरी स्क्रिप्ट अमेरिकेचीच!!, हेच राजकीय वास्तव पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे समोर आले. त्यामुळे ते ट्रोल झाले. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा ‘Draft’ हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर निवडणूक आयोग देशभरात विशेष सघन पुनर्पडताळणी (SIR) च्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याची अंमलबजाणी करण्याच्या तयारीत आहे. यात दिल्लीसह 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने स्वतःला राज्यात जनतेसाठी तिसरा पर्याय म्हणून सादर केले.
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा दोन मुले आणि त्यांची आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. आई जखमी झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, जर बँकेने कोणतेही खाते फसवणूक (फ्रॉड) म्हणून घोषित केले तर, त्यापूर्वी कर्जदाराला समोरासमोर (वैयक्तिक) सुनावणीची संधी देणे आवश्यक नाही. न्यायालयाने म्हटले की, नोटीस देणे आणि उत्तर देण्याची संधी देणे पुरेसे आहे.
अमेरिका आणि इराणमधील शाब्दिक युद्ध वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ‘नरक’ बनवण्याची धमकी दिल्यानंतर इराणने जागतिक पुरवठा थांबवण्याची धमकी दिली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढत असल्याने सध्या चौथ्या स्थानावर आहे पण काँग्रेसने लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर पैशांच्या घोषणांचा तुफान पाऊस पडलाय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात त्यांनी बंगाली जनतेला तुफानी आश्वासने दिली.
दिल्ली विधानसभा परिसरात सोमवारी दुपारी सुरक्षेत त्रुटी आढळली. दुपारी सुमारे 2 वाजता, यूपी क्रमांकाची एक कार व्हीआयपी प्रवेशासाठी असलेल्या गेट नंबर-2 ची बॅरिकेडिंग तोडून आत घुसली. कार चालकाने मुखवटा घातला होता.
मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या विक्रीचे नियम सोपे केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती पत्त्याच्या पुराव्याशिवाय छोटा गॅस सिलेंडर खरेदी करू शकेल.
कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान्यांनी त्रिवेणी मंदिराबाहेर भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली. खलिस्तान्यांच्या एकत्र येण्यामुळे शहरात 2 तास तणावपूर्ण वातावरण होते. हिंसक घटना रोखण्यासाठी कॅनडा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाने 2021 च्या एका एकल न्यायाधीशांच्या आदेशाला रद्द केले आहे. त्या आदेशात म्हटले होते की, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गरिबांच्या घराचे भाडे भरण्याची घोषणा कायदेशीररित्या अंमलात आणण्यासारखी होती.
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मध्ये कार्यरत असलेल्या ७ न्यायिक अधिकाऱ्यांच्या घेराव आणि त्यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांना फटकारले आहे. न्यायालयाने सोमवारी आपल्या पूर्ण अधिकारांचा (संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत मिळालेले अधिकार) वापर करत प्रकरणाचा तपास NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे सोपवला.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने टीकास्त्र सोडले, पण त्यानंतर आज लगेच सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण फसल्यावर सुप्रिया सुळे यांनी नवा “डाव” टाकला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावावर 12 मार्च रोजी 193 विरोधी खासदारांनी (लोकसभेचे 130 आणि राज्यसभेचे 63) स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
अमेरिकेने इराणमध्ये बेपत्ता झालेल्या दोन्ही वैमानिकांना 36 तासांच्या आत वाचवले. इराणमध्ये 3 एप्रिल रोजी एका मोहिमेवर गेलेल्या F-15E फायटर जेट्सवर हल्ला झाला होता. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडले होते.
नांदेड शहर सोमवारी आणखी एका हत्येने हादरले. आज पहाटे 5.30 च्या सुमारास मॉर्निंग वॉगसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हल्लेखोरांनी भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. गत 3 दिवसांतील शहरातील हत्येची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नांदेड पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App