NEET पेपर फुटी नंतर कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनात देशविघातक घटक घुसले आणि त्यांनी हिंसाचार केला. आता सुप्रीम कोर्टाने त्यांना चाप लावला.
शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी धर्मेंद्र प्रधान संसदेत पोहोचले. ते येताच भाजप आणि एनडीए खासदारांची गर्दी त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचली. सत्तापक्षाव्यतिरिक्त विरोधी पक्षाचे लोकही टिप्पणी करण्यासाठी त्यांना भेटायला पोहोचले होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, केन-बेतवा लिंक प्रकल्पातून आदिवासींची जमीन तर घेतली गेली, पण त्यांना ना योग्य मोबदला मिळाला ना सन्मानजनक पुनर्वसन.
भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी देवीने महिलांच्या 58 किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 199 किलो (87 किलो स्नॅच + 112 किलो क्लीन अँड जर्क) वजन उचलून कांस्यपदक पटकावले. यासोबतच भारताची एकूण 6 पदके झाली आहेत. वेटलिफ्टिंगमधील हे पाचवे पदक आहे.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते.
कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सोमवारी इशारा दिला की, जर आंदोलकांवरील पोलीस कारवाई थांबली नाही आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नाही, तर ते पुन्हा आंदोलन सुरू करतील.
बाजारात लवकरच ₹10 आणि ₹20 च्या प्लास्टिक नोटा दिसतील. रिझर्व्ह बँक 100-100 कोटी म्हणजेच एकूण 200 कोटी पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकपासून बनवलेल्या नोटा छापेल. हा प्लास्टिक चलनाचा प्रयोग आहे, जर तो यशस्वी झाला तर पुढे आणखी नोटा छापल्या जातील.
पंजाब पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI द्वारे चालवल्या जाणाऱ्या एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. सीमेपलीकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या नेटवर्कविरोधात कारवाई करत, काउंटर इंटेलिजन्स जालंधर आणि जालंधर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे.
नीट परीक्षेतली पेपर फुटी आणि त्यानंतर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे काँग्रेस सह सर्व विरोधकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी संसदेची कोंडी केली होती. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कामकाज होऊ दिले नव्हते. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर संसदेतील कोंडी फुटायची शक्यता निर्माण झाली असून केंद्र सरकारने मांडलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकावर उद्यापासून संसदेत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे की, ते 2028 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. मात्र, ते राजकारणात सक्रिय राहतील आणि जनतेचे प्रश्न मांडत राहतील. त्यांनी शनिवारी मंड्या जिल्ह्यातील के.आर. पेट येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, राजकारण आता पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे आणि प्रामाणिक राजकारणासाठी जागा राहिलेली नाही.
कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापनदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारत नवनवीन कल्पनांचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत जहाजे डिझाइन करत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी डिझाइनमध्ये गुंतलेला आहे. भारत स्टार्टअप इकोसिस्टम उभारत आहे, तर पाकिस्तान दहशतवादी इकोसिस्टम उभारत आहे. भारत सेमीकंडक्टर बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती हल्लेखोर तयार करत आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान आज पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. संसद भवनात प्रवेश करताच भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे घोषणाबाजी करत उत्साहात स्वागत केले.
राहुल गांधींनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सांगितले की, 20 जुलै रोजी झालेल्या CJP च्या संसद मार्चदरम्यान पोलिसांनी जाणूनबुजून लोकांना लक्ष्य केले आणि पॅलेट गनने हल्ला केला. यामुळे 19 वर्षांच्या साहिल लोचबची डोळ्यांची दृष्टी गेली.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, विवाह जीवनात शिस्त आणतो आणि धर्म व जबाबदारीची भावना निर्माण करतो. याउलट, लिव्ह-इन संबंधांमध्ये लोक जबाबदारीपासून पळ काढत केवळ सुख शोधतात.
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी या राजीनाम्याचे स्वागत करत तो विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, प्रधान यांच्या कार्यकाळात एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच प्रधानांचा राजीनामा मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी धडा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर यशस्वी झाल्याचे मानले गेले. त्या पाठोपाठ E20 जनता पार्टीचा सुद्धा उदय झाला.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर जेन झी च्या दंडात बेटकुळ्या फुटल्यानंतर जेन झी ने पुढचे टार्गेट ठेऊन वाटचाल चालू केली. त्यातूनच E20 janata party प्रसवली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट करणे चालू केले.
पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. मोदी म्हणाले – मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे. ज्या लोकांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला, ते तुरुंगात सडत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका.
सर्वोच्च न्यायालय सोमवारी दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. या याचिकांमध्ये आरोप आहे की, NEET पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अत्याचार केले. या याचिका २० जुलैच्या संसद मार्चशी संबंधित आहेत, जो कॉकरोच जनता पार्टीने आयोजित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ मधून तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी मोदींनी व्हिडिओ करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तीमत्त्वे उघडपणे पुढे आली आहेत. आलिया भट्ट, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, तिलोत्तमा शोम, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, ईशान खट्टर, अभिषेक बॅनर्जी, वीर दास, समय रैना, विजय वर्मा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात यूपी सरकारने नवीन विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. यात तीन सदस्य आहेत. याची कमान आयजी लखनऊ रेंज किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीचे अध्यक्षपद आयएएस अधिकारी विजय विश्वास पंत भूषवत होते. किरण एस. त्यांच्या टीममध्ये होते, पण टीमचे प्रभारी विश्वास पंत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी किमान वय २५ वर्षांवरून २१ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर, तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App