पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ मधून तिसऱ्यांदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. नीट पेपर फुटी विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या आदल्या दिवशी मोदींनी व्हिडिओ करून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती आणि त्याच दिवशी शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!, या दोन समांतर राजकीय घडामोडी आज घडल्या.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॉलिवूड आणि मनोरंजन उद्योगातील अनेक मोठ्या व्यक्तीमत्त्वे उघडपणे पुढे आली आहेत. आलिया भट्ट, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रियंका चोप्रा, स्वरा भास्कर, तिलोत्तमा शोम, भूमी पेडणेकर, हुमा कुरेशी, ईशान खट्टर, अभिषेक बॅनर्जी, वीर दास, समय रैना, विजय वर्मा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात यूपी सरकारने नवीन विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. यात तीन सदस्य आहेत. याची कमान आयजी लखनऊ रेंज किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीचे अध्यक्षपद आयएएस अधिकारी विजय विश्वास पंत भूषवत होते. किरण एस. त्यांच्या टीममध्ये होते, पण टीमचे प्रभारी विश्वास पंत होते.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी किमान वय २५ वर्षांवरून २१ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर, तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.
संघाचा एक मंत्री गेला, संघाचा दुसरा मंत्री आला, अशा शब्दांमध्ये कम्युनिस्टांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा फुगा फोडला.
कॉकरोच जनता पक्षाने शनिवारी आपले आंदोलन संपवले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह आणि प्रवक्ते सौरभ दास व आशुतोष रांका यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सौरभ दास म्हणाले की, जंतर मंतरवर उपस्थित असलेल्या सर्व आंदोलकांनी आता घरी परतावे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर धरणे आंदोलन करत होती.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले – प्रधान यांना जावेच लागणार होते. चांगले झाले ते गेले. ते भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाची शिक्षण व्यवस्था पोखरली गेली आहे. यात जेवढी चूक पंतप्रधानांची आहे, तेवढीच RSS ची आहे.
नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला
कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केल्यानंतर 36 दिवसांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, पण एकट्या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तरी राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत सगळ्या विरोधकांना आपण मोदी सरकारलाच हटविल्याची आनंदाची उकळी फुटली.
भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी शुक्रवारी त्या मीडिया रिपोर्ट्सना “निष्काळजी आणि बेजबाबदार रिपोर्टिंग” म्हटले, ज्यात दावा केला होता
हिमाचल प्रदेशातील आदिवासी जिल्हा लाहौल-स्पीतीमध्ये आज (शुक्रवारी) दुपारच्या वेळी उदयपूर-किलाड रस्त्यावर कडू नाल्याजवळ धावत्या गाडीवर दरड कोसळली. यामुळे टाटा सूमो टॅक्सीमधील 13 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना सुखरूप वाचवण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयाच्या कामकाजाची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यावर बंदी घातली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिरिक्त किंमत देऊन शरद पवारांची संसदेतल्या कार्यालयात भेट घेतली. त्याचा दुष्परिणाम आज दिसला. मधल्या मध्ये शरद पवारांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे उपटून घेतले.
TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनातली पुढची धोकादायक वळणे लक्षात घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज अखेर राजीनामा दिला.
नीट परीक्षा फुटीच्या पार्श्वभूमीवर कॉकरोज जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनात नेमके कोण सामील झाले आणि त्यातले सोशल मीडिया हॅण्डलिंग कुणी आणि कसे केले??, याची धक्कादायक आकडेवारी दिल्ली पोलिसांनी आज जाहीर केली.
केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा २४ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. बिट्टू यांना काही काळापूर्वी भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, त्यामुळे ते आता खासदार नव्हते.
अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यातील सुमारे दोन दशकांपासून रखडलेल्या अणु करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या झाल्या, परंतु 24 तासांच्या आतच हा करार थांबला आहे.
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी सुनावणी झाली. पेपरफुटी रोखण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. हे विधेयक 27 जुलै रोजी संसदेत सादर केले जाऊ शकते.
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने उभारलेले आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार आदी नेते शिरले.
रामतीर्थ गोदावरी आरती समितीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची दुतोंड्या मारुती मूर्ती जवळ दररोज नियमित महाआरती केली जात आहे. पाऊस,उन्हाळा अथवा हिवाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये ही सेवा अखंडपणे सुरू असून, गोदामातेप्रती श्रद्धा आणि कृतज्ञतेचे हे एक अनोखे उदाहरण ठरले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App