Thank God सध्याच्या या अडचणी आणि आव्हानांनी भरलेल्या काळात नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आहे, असे उद्गार उद्योगपती बाबा कल्याणी यांनी काढले.
ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल जगाला सांगून परतलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत जेवण केले.
महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी एक मोठी आर्थिक झळ ठरणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मद्याच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, उत्पादन शुल्कात (Excise Duty) वाढ केली आहे. त्यामुळे आता देशी दारूपासून ते विदेशी प्रीमियम ब्रँडपर्यंत सगळ्याच मद्य प्रकारांची किंमत वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडणार असली तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.
शुभांशु शुक्ला हे फ्लोरिडा (यूएसए) येथून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) कडे रवाना झाले आहेत. त्यांच्या १४ दिवसांच्या प्रवासात ते भारतीय संशोधकांनी तयार केलेले सात महत्वपूर्ण प्रयोग करणार आहेत. हे प्रयोग दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कर्नाटक सरकारने राज्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही जनगणना पारदर्शक आणि सर्व समाजघटकांचा समावेश असलेली असेल. या प्रक्रियेसाठी वेळापत्रक लवकरच निश्चित होईल आणि ९० दिवसांत अहवाल तयार केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने जगभरात पाकिस्तानाच खोटारडेपणाचा बुरखा फाडण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची आवश्यकता का होती, हे सांगण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांची भेट घेतली.
भारतीय लष्कराला लवकरच एक नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र, ड्रोन भारताच्या सीमेवरून सहज पाडले जाईल.
दिल्लीतील द्वारका Dwarka येथे आज (मंगळवार) सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. येथील एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली.
राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी एका नवीन पोस्टद्वारे सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी तेज प्रताप यांनी त्यांच्या वडिलांबद्दल पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये तेजप्रताप यांनी एक फोटो शेअर केला आहे आणि एका ओळीचे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये भिंतीवर लालू यादव यांचा फोटो बनवलेला दिसत आहे, ज्याला तेजप्रताप यादव मिठी मारताना दिसत आहेत.
पुण्यातून शरद पवारांचा आणि कोलकत्यातून ममता बॅनर्जींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला, पण दोघांनीही काँग्रेसच्याच पायाखालच्या सतरंज्या खेचल्या हेच राजकीय वास्तव चित्र आज समोर आले.
मणिपूरमधील हिंसाचारानंतर, महामार्ग अडथळे आणि वाहतूक मार्गांमध्ये व्यत्यय आल्याने सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चुराचांदपूर आणि राजधानी इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
भारतीय हवाई दलाला (IAF) लवकरच तीन आधुनिक I-STAR (गुप्तचर, पाळत ठेवणे, लक्ष्य अधिग्रहण आणि शोध) गुप्तचर विमाने मिळणार आहेत. या प्रकल्पाची किंमत १०,००० कोटी रुपये आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध दाखल केलेला फौजदारी खटला रद्द करण्याबाबतची सुनावणी उद्या होणार आहे. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले आहे, असे म्हणत फ्रँचायझीने सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
केरळमधील कोची येथे सोमवारी सकाळी सिंगापूरचे मालवाहू जहाज MV WAN HAI 503 मध्ये आग लागली. घटनेच्या वेळी कार्गोमध्ये 22 क्रू मेंबर्स होते. आग लागल्यानंतर त्यापैकी 18 जणांनी समुद्रात उड्या मारल्या. त्यापैकी काहींना भाजून दुखापत झाली. तथापि, सर्वांना वाचवण्यात आले आहे. परंतु, 4 क्रू मेंबर्स बेपत्ता असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील मुंब्रा येथे सोमवारी घडलेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या अपघातात 13 प्रवासी खाली पडले असून त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला. कसारा आणि कल्याण लोक पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.
सोमवारी मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप मुख्यालयात सरकारचे काम, निर्णय आणि धोरणे यावर पत्रकार परिषद घेतली.
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स भारतात त्यांची स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. गेल्या आठवड्यात, कंपनीला भारतात कामकाज सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना देखील मिळाला. आता, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी पुढील दोन महिन्यांत भारतात त्यांच्या सेवा सुरू करेल.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेच्या पहलगाम मार्गावर फेस रेकग्निशन सिस्टम (FRS) बसवली आहे. काळ्या यादीत टाकलेले लोक आणि खोऱ्यातील सक्रिय दहशतवादी कॅमेऱ्यात कैद होताच ही सिस्टम सुरक्षा दलांना सतर्क करेल, जेणेकरून यात्रेकरूंवर कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला रोखता येईल.
यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) गणेश मूर्ती तयार करण्यावरील आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याची सक्ती कायम राहणार असून, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास सक्त मनाई करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी गोळीबारामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २५ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये असे म्हटले होते की पाकिस्तानी गोळीबारामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी २ लाख रुपये आणि अंशतः उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १ लाख रुपये अतिरिक्त मदत दिली जाईल.
क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंन्सील अर्थात आयसीसीने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी कायद्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शर्मिष्ठा पनोली हिच्याविरोधात तक्रार दाखल करणारा वजाहत खान यालाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे
बांगलादेशातला नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता नाक्यामध्ये लोकशाही वाद्यांच्या निदर्शनांवर बंदी घालून harmony award स्वीकारण्यासाठी लंडनला गेलाय.
आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीने बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणात सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.
संघप्रमुख मोहन भागवत कानपूरमध्ये आहेत. रविवारी संघप्रमुख मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रादेशिक कार्यकर्ता विकास वर्गाला हजेरी लावली. सकाळी ५ वाजता त्यांनी नवाबगंज येथील दीनदयाळ विद्यालयात प्रशिक्षण वर्गातील लोकांसोबत एक शाखा आयोजित केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App