अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा देत, “शांतता करार झाला नाही तर आम्ही इराणवर अत्यंत कठोर हल्ला करू,” असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरलेल्यांचे लोढणे गळ्यात बांधून घ्यायला काँग्रेसचा नकार; ममता आणि पवार यांना बाहेरच ठेवणार!!, हेच राजकीय चित्र काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या आजच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून बाहेर आले.
राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत आता काँग्रेसमध्येच मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांनीच गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मध्य प्रदेशमधून काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन रद्द झाले आहे. भोपाळमध्ये राज्यसभा रिटर्निंग ऑफिसरने मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारांच्या छाननीनंतर अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार तरुण चुग, महेश केवट आणि रजनीश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात दोन बटूंकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करणारे आशुतोष ब्रह्मचारी महाराज त्यांच्या आरोपांवरून मागे हटले आहेत. त्यांनी मंगळवारी फेसबुकवर एक व्हिडिओ जारी करून सांगितले की, जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी रामचंद्र दास यांनी दबाव टाकून त्यांच्याकडून अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करून घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. ‘भारत मंडपम’ येथे आयोजित एनडीएच्या (NDA) बैठकीत, पदावरील ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील Adani Energy Solutions ने देशातील आघाडीची स्मार्ट मीटर कंपनी इंटेलीस्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे 100% अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. या व्यवहाराची किंमत तब्बल 3,050 कोटी रुपये असून या डीलनंतर अदानी समूह भारतातील सर्वात मोठा स्मार्ट मीटर प्लॅटफॉर्म बनणार आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पक्षाच्या राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वासह पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर टीएमसीमधील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच आणखी एक राज्यसभा खासदार पक्षापासून दूर गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे.
कॉकरोचला मारायला विरोधकच धावले; धर्मेंद्र प्रधानांच्या (न झालेल्या) राजीनाम्याचे श्रेय घेण्यासाठी भांडले!!, हेच राजकीय सत्य संजय राऊत यांच्या आजच्या तथाकथित खळबळजनक दाव्याने उघड्यावर आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपची मालक कंपनी मेटा यांनी गुजरातमधील जामनगर येथे अत्याधुनिक AI-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे. हा प्रकल्प 168 मेगावॅट क्षमतेचा असेल आणि पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ब्लॅक मनी (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) कायद्यांतर्गत सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयाने आयकर विभागाला कोणतीही दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई न करण्याचे अंतरिम निर्देश दिले आहेत.
युट्यूबर आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेला प्रत्युत्तर देत त्याने आता ‘खरगोश जनता पार्टी’ (KJP) नावाची काल्पनिक राजकीय चळवळ सुरू केल्याचा दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधकांमध्ये नवा वाद रंगला आहे.
कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजस्थान आणि पंजाबमध्ये धडक कारवाई केली आहे. तपासात तब्बल 36 हजार भारतीय सिम कार्ड कंबोडियामध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले असून, त्यापैकी सुमारे 5,300 सिम कार्डांचा वापर भारतातील सायबर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून देशभरातील नागरिकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भारताच्या आर्थिक वाढीचा वेग कमी होऊ शकतो, तर महागाई पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांनी याबाबत इशारा दिला असून, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ!!, असाच मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत मंडपम मध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना दिला, पण तो न बोलता आणि कृतीतून!!
वृत्तसंस्था पाटणा : Khan Sir खान सर यांच्या कोचिंगवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्या सुटकेच्या मागणीसाठी विद्यार्थी आज तिसऱ्यांदा […]
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!, हीच राजकीय वस्तुस्थिती शरद पवारांच्या आजच्या भाषणातून समोर आली.
देशाचे सर्वाधिक काळ सलग राहिलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मागे टाकला. संपूर्ण देशभर त्याचे सेलिब्रेशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे मेसेज जगभरातल्या नेत्यांनी केले तर अनेक नेत्यांनी विशेष लेख लिहून मोदींच्या कारकिर्दीची स्तुती केली.
मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन मंगळवारी रद्द करण्यात आले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर रिटर्निंग ऑफिसरने हा निर्णय दिला. या घडामोडीनंतर राज्यातील तिसऱ्या राज्यसभा जागेवर भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
नाशिक : मोदी सरकारची तपपूर्ती; विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी!!, याच राजकीय घडामोडी आज राजधानी नवी दिल्लीतून समोर आल्या. नरेंद्र मोदी निवडून आलेले सर्वाधिक काळ पदावर राहिलेले […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दरघसरणीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचे पाऊल उचलत कांदा दरातील घसरणीवर उपाय शोधण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीला अवघ्या 15 दिवसांत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सेवारत जन स्वधर्म तत्पर, याच शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपपुर्ती म्हणा किंवा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेल्या कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळ बारा […]
तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडे उफाळलेल्या असंतोष आणि काही खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षशिस्त मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने वरिष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील मुख्य व्हिप (Chief Whip) म्हणून नियुक्ती केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आज त्यांच्या कार्यकाळाला 4399 दिवस पूर्ण झाले आहेत.
अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण ठरला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App