जम्मू-काश्मीर प्रशासनाने नोंदणी न करता अमरनाथला पोहोचणाऱ्या यात्रेकरूंना त्यांची यात्रा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सांगितले आहे. प्रशासनानुसार, 9 जुलैपर्यंत सर्व नोंदणी स्लॉट पूर्णपणे भरले आहेत.
“हिंदूंचे संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू असण्याचा गौरव बाळगणे म्हणजे शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज उभा करणे होय. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली हिंदूंची ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे
जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते.
राम मंदिर देणगीची नुसती चोरी झाली नाही, तर तिथे लूट केली गेली आहे. दरोडा घातला गेला आहे, असा घणाघाती आरोप राम मंदिर निर्माण ट्रस्टचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला होता. पण नृपेंद्र मिश्रा यांचे त्या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी आज छेद दिला.
राम मंदिर देणगीतील कथित अफरातफर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत चंपत राय यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणे
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते. दुपारी सुमारे 12 वाजता ते बालोतरा येथील पचपदरा येथे पोहोचले. येथे त्यांनी देशातील सर्वात आधुनिक रिफायनरीच्या कंट्रोल रूमला भेट दिली आणि तज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रिफायनरीचे उद्घाटन केले. जयपूर मेट्रोच्या फेज-2 ची (आभासी) पायाभरणीही केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातच्या साणंद येथे देशातील तिसऱ्या सेमीकंडक्टर प्लांटचे उद्घाटन केले. साणंद येथील सीजी सेमीच्या ओएसएटी (OSAT) प्लांटमध्ये आजपासून उत्पादन सुरू झाले आहे.
केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तान आणि पीओकेमधून भारतविरोधी नेटवर्क चालवणाऱ्या २३ दहशतवाद्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आरएसएस मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी मोहंमद मुसद्दिक याचाही समावेश आहे. याशिवाय लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज मोहंमद सईदचा जावई हाफिज वलीद याच्या नावाचाही समावेश आहे.
आता तुम्ही टेलिग्राम ॲपवर मोफत मिळणारे पायरेटेड चित्रपट आणि वेब सिरीज डाउनलोड करू शकणार नाही. केंद्र सरकारने मेसेजिंग ॲपवर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटचे पायरेटेड व्हर्जन उपलब्ध करून देणारे चॅनेल्स आणि ग्रुप्स हटवण्यास सांगितले आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून सुरू असलेल्या विरोधादरम्यान, शनिवारी सरकारने सांगितले की इथेनॉल मिश्रणाचे (ब्लेंडिंगचे) काम रातोरात झालेले नाही. ही एक तपासलेली, वैज्ञानिक आणि टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. पेट्रोलमध्ये ते मिसळण्याची जागतिक पद्धत स्वीकारली आहे आणि शीर्ष एजन्सींनीही त्याची चाचणी केली आहे.
आधार कार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने नवीन आधार ॲपद्वारे ही सुविधा सुरू केली असून, नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरूनच ई-मेल आयडी मोफत अपडेट करता येणार आहे.
एकीकडे पंजाबात काँग्रेसमध्ये दलित नेत्याचे बंड; तर दुसरीकडे काँग्रेसचे मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष त्यामुळे बडे नेते तीव्र नाराज झाल्याची बातमी समोर आली. काँग्रेसने मुस्लिम नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने मुस्लिमांमध्ये बडे नेते तीव्र नाराज झालेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर गटाने शुक्रवारी कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेत्यांनी मेट्रोपॉलिटन येथील मुख्यालयाचे कुलूप बदलले, नवीन पोस्टर्स लावले, ज्यात ममता बॅनर्जी यांचा फोटो नव्हता. मात्र, कार्यालयाच्या आत आधीपासून लावलेले ममता बॅनर्जी यांचे फोटो आणि कटआउट काढण्यात आले नाहीत.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे तब्बल २८ हेक्टर जागेत भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) नागपूरचा अत्याधुनिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण कॅम्पस उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे
उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एलपीजी टँकर टोल प्लाझाला धडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की टोल प्लाझाला धडकल्यानंतर टँकर फुटला. गॅस गळती सुरू झाली. काही सेकंदात 30-40 फूटपर्यंत गॅस पसरला.
पश्चिम आशिया मधल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरची किंमत २००० रुपयांवर गेली असती, पण सरकारने ती घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९५० वरच ठेवली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शुक्रवारी अयोध्या राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणासंदर्भात आपले पहिले निवेदन जारी केले. महासचिव दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, “रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमधून निधीची चोरी होणे दुर्दैवी आहे. यामुळे रामभक्तांच्या भावना आणि श्रद्धेला धक्का बसला आहे. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
विपक्षी पक्षांच्या INDIA ब्लॉक आघाडीने भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) एक संयुक्त पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपाची मागणी केली आहे. पत्रात (SIR) थांबवण्याची आणि आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याचा विचार करण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका स्वयंसेवकाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या (Defamation) खटल्यात न्यायालयाने प्रियांक खर्गे आणि मोहम्मद हॅरिस नलापाद यांना अधिकृत समन्स बजावले असून २१ जुलै २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
जोगेश्वरी पश्चिम परिसरातील एका सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर केबिनला शुक्रवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत धुराची बाधा झाल्यामुळे आणि भाजल्याने तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका १३ वर्षीय मुलासह अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले असून, इतर ९ जणांवर ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ममता आणि पवारांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या नुसत्याच चर्चा पण अजून कार्यवाही का होई ना??, असा सवाल काही राजकीय हालचालींमुळे आणि त्या संबंधांमधल्या बातम्यांमुळे समोर आला.
भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंडने बुधवारी रात्री एडनच्या आखातात एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. एमव्ही गोल्डन आर्सेनल या जहाजावर एक भारतीय खलाशीही होता आणि ते भारतासाठी महत्त्वाचा माल घेऊन येत होते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार केलेल्या बनावट कायदेशीर उदाहरणांचा वापर धोकादायक आहे. याची गंभीरता समजावून सांगण्यासाठी न्यायालयाने म्हटले की, हा धोका भोपाळ गॅस दुर्घटनेतील विषारी (AI) वायू गळतीइतकाच मोठा आहे.
अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात देणगीची चोरी झाली. या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज अधिकृतपणे कठोर भूमिका जाहीर केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App