कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक रॅकेटचा मोठा पर्दाफाश करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजस्थान आणि पंजाबमध्ये धडक कारवाई केली आहे. तपासात तब्बल 36 हजार भारतीय सिम कार्ड कंबोडियामध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले असून, त्यापैकी सुमारे 5,300 सिम कार्डांचा वापर भारतातील सायबर फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून देशभरातील नागरिकांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भारताच्या आर्थिक वाढीचा वेग कमी होऊ शकतो, तर महागाई पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांनी याबाबत इशारा दिला असून, युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारताला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ!!, असाच मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत मंडपम मध्ये मित्र पक्षांच्या नेत्यांना दिला, पण तो न बोलता आणि कृतीतून!!
वृत्तसंस्था पाटणा : Khan Sir खान सर यांच्या कोचिंगवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्या सुटकेच्या मागणीसाठी विद्यार्थी आज तिसऱ्यांदा […]
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!, हीच राजकीय वस्तुस्थिती शरद पवारांच्या आजच्या भाषणातून समोर आली.
देशाचे सर्वाधिक काळ सलग राहिलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मागे टाकला. संपूर्ण देशभर त्याचे सेलिब्रेशन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे मेसेज जगभरातल्या नेत्यांनी केले तर अनेक नेत्यांनी विशेष लेख लिहून मोदींच्या कारकिर्दीची स्तुती केली.
मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन मंगळवारी रद्द करण्यात आले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर रिटर्निंग ऑफिसरने हा निर्णय दिला. या घडामोडीनंतर राज्यातील तिसऱ्या राज्यसभा जागेवर भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
नाशिक : मोदी सरकारची तपपूर्ती; विरोधकांच्या (बचावासाठी) गाठीभेटी!!, याच राजकीय घडामोडी आज राजधानी नवी दिल्लीतून समोर आल्या. नरेंद्र मोदी निवडून आलेले सर्वाधिक काळ पदावर राहिलेले […]
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दरघसरणीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचे पाऊल उचलत कांदा दरातील घसरणीवर उपाय शोधण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीला अवघ्या 15 दिवसांत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सेवारत जन स्वधर्म तत्पर, याच शब्दांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तपपुर्ती म्हणा किंवा सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेल्या कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. पंतप्रधान पंडित नेहरूंच्या काळ बारा […]
तृणमूल काँग्रेसमध्ये अलीकडे उफाळलेल्या असंतोष आणि काही खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षशिस्त मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाने वरिष्ठ खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेतील मुख्य व्हिप (Chief Whip) म्हणून नियुक्ती केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आज त्यांच्या कार्यकाळाला 4399 दिवस पूर्ण झाले आहेत.
अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण ठरला.
पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!, ही महत्वाची घडामोड आज घडली.
देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद उद्योगांपैकी एक असलेल्या विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये (विझाग स्टील प्लांट) सोमवारी भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. द्रवरूप पोलाद (मोल्टन स्टील) वाहून नेणाऱ्या प्रचंड क्षमतेच्या लॅडलमध्ये बिघाड होऊन स्फोट झाल्याने किंवा ती कोसळल्याने सुमारे आठ कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर भाजले गेले आहेत.
पश्चिम आशिया संघर्षामुळे होणारी वसुलीतील तूट भरून काढण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या ओझ्याखाली दबलेल्या ग्राहकांना आधार देण्यासाठी भारत सरकारने तेल विपणन कंपन्यांना (OMC) अंदाजे १.२३ लाख कोटी रुपयांची आज आर्थिक मदत दिल्याने भारतातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळायची सोय झाली.
मुंबई उच्च न्यायालयाने भारती एअरटेल लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेडवर केंद्र सरकारने लादलेला वन-टाइम स्पेक्ट्रम चार्ज (OTSC) रद्द केला आहे. न्यायालयाने निर्णय दिला की, दूरसंचार परवाने दिल्यानंतर अनेक वर्षांनी आर्थिक अटी पूर्वलक्षी प्रभावाने (रेट्रोस्पेक्टिव्ह) बदलण्याचा सरकारला कोणताही अधिकार नाही.
आमदारांनंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनीही ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पक्षाच्या २८ लोकसभा खासदारांपैकी २० खासदारांनी एनडीए (NDA) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण सोहळ्यात सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि विविध राज्यांच्या पोलिस दलातील शूर जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. यामध्ये विशेषतः नक्षलविरोधी मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) च्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक अनुदानित LPG सिलिंडरच्या रिफिलची संख्या 9 वरून 4 पर्यंत कमी केली आहे. म्हणजेच, उज्ज्वला योजनेअंतर्गत ₹642 मध्ये आता फक्त 4 सिलिंडरच मिळतील.
जागतिक स्तरावरील संरक्षण आणि शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवणाऱ्या Stockholm International Peace Research Institute (SIPRI) या संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात वाढ झाली असून देशाकडे आता अंदाजे 190 अण्वस्त्रे आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 180 होता. म्हणजेच एका वर्षात भारताच्या अण्वस्त्रसाठ्यात 10 अण्वस्त्रांची भर पडल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC)च्या एका स्थानिक नेत्याशी संबंधित नाट्यमय घटना चर्चेचा विषय ठरली आहे. कथित ‘कट मनी’ (सरकारी योजनांतील कमिशन) घोटाळ्याच्या आरोपांनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी संबंधित नेता चक्क साड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली लपल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांबाबत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष Akhilesh Yadav यांनी राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. यावर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस Champat Rai यांनी आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Suvendu Adhikari यांनी राज्यातील कथित बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात आतापर्यंत 4,800 हून अधिक बेकायदा बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 836 जणांना हद्दपार (Deport) करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App