भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. भारत सरकारचे सचिव विवेक अग्रवाल यांची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. FATF ही जगभरातील मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या फंडिंगवर लक्ष ठेवणारी सर्वात महत्त्वाची संस्थांपैकी एक आहे.
मान्सून लवकरच हळूहळू पुढे सरकू शकतो. हवामान विभागाच्या मते, २३ जूनपर्यंत तो छत्तीसगडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनसाठी आवश्यक प्रणाली सक्रिय झाली आहे.
राहुल गांधींनी काल 19 जून रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा केला. त्यासाठी ते 24 अकबर रोड या जुन्या काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले होते. पण मराठी माध्यमांनी त्या वाढदिवसाची फारशी दखलच घेतली नाही.
NEET पेपर लीक आणि परीक्षा प्रणालीतील गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करतील. यापूर्वी अभिजीत यांनी 6 जून रोजी जंतर-मंतरवर निदर्शने केली होती. CJP ने आतापर्यंत पुणे, लखनऊ, अमृतसर, हैदराबाद, बेंगळूरु, जयपूर आणि नागपूर येथेही आंदोलने केली आहेत.
NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेपूर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शनिवारी देशभरात मॉक ड्रिल करेल. परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय एजन्सीजसोबत मिळून मल्टी लेयर सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
देशातील एका माजी पंतप्रधानांच्या कुटुंबालाही सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल यांच्या कंपनीची तब्बल 7.8 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण फसवणूक केवळ व्हॉट्सअॅपवरील एका बनावट प्रोफाइलच्या माध्यमातून करण्यात आली.
12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. यापैकी 19 जागा एनडीएला, इंडिया ब्लॉकला 6 आणि एक जागा मिझोरामच्या झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला मिळाली. या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया ब्लॉकला प्रत्येकी एका जागेचा फायदा झाला.
वाराणसीत राहुल गांधींच्या फोटोची परशुराम रुपात पूजा; एका हातात परशु, दुसऱ्या हातात घटना!!, असला प्रकार आज घडला.
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर श्रीराम जन्मभूमी निर्माण समितीचे अध्यक्ष आणि माजी आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरासाठी भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या दानामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना “सात पिढ्यांपर्यंत शाप लागेल” असे वक्तव्य करत त्यांनी व्यवस्थापनातील त्रुटींवरही बोट ठेवले.
शिवसेनेतील फूट, शिवसेनांच्या वर्धापन दिनावर मराठी माध्यमांचे लक्ष, पवारांच्या हालचालींच्या बातम्यांचीही भरमार; पण राहुल गांधींच्या वाढदिवसाकडे पूर्ण दुर्लक्ष!!, हेच राजकीय वास्तव आजच्या बातम्यांमधून समोर आले.
देशातील 7 कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खातेदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफवरील 8.25 टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी पीएफवरील व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांतील भारताच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. या काळात भारताने आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा करत त्यांनी देशातील विविध क्षेत्रांतील बदलांची आकडेवारी मांडली.
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावानंतर दोन्ही देशांनी सामंजस्य कराराचा (एमओयू) १४ कलमी मसुदा जाहीर केला आहे. अंतिम करारावर १९ जून रोजी स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा असून, त्यापूर्वी समोर आलेल्या या मसुद्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष कमी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या दहशतवादी मॉड्यूलविरोधात मोठी कारवाई करत आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी मंगळवारी या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे या संपूर्ण मॉड्यूलमधील अटक आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता उत्तर प्रदेशातील राजकारणातही मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि सुभासपा प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात झालेला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) आता 15 जुलै 2026 पासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे अंमलबजावणीची तारीख जाहीर केली असून, या करारामुळे भारत आणि यूकेमधील व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पॅरिसमध्ये दाखल झाले. जी-7 शिखर परिषदेत सहभाग घेतल्यानंतर ते फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचले. विमानतळावर भारतीय वंशाच्या नागरिकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
राजस्थानमधील कोटा येथे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी १७ जून रोजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर, परीक्षा व्यवस्थेवर आणि पेपरफुटीच्या घटनांवर जोरदार टीका केली. हा कार्यक्रम “छात्रों की गूंज” या मोहिमेचा भाग असून, देशव्यापी विद्यार्थी आंदोलनाची सुरुवात कोट्यातून करण्यात आली.
फ्रान्समध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतावर कोणताही हल्ला झाला तर अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासन दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत मोदींच्या नेतृत्वाची अफाट स्तुती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होर्मूज मध्ये तीन भारतीय खलाशी मारले गेल्याचा विषय उपस्थित केला. त्यालाही डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले, पण ते “सौम्य” होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्याचा सगळा भर नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक स्तुतीवर आणि भारत – अमेरिका संबंधांवर दिला.
तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निर्णय घेतील.
भारत सरकारने NEET-UG च्या पुनर्परीक्षेच्या संदर्भात भारतात टेलिग्राम मेसेजिंग ॲपच्या वापरास तात्पुरती बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी एक प्रेस रिलीज जारी करून ही माहिती दिली.
कफ सिरप आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणार नाहीत. केंद्र सरकारने औषध नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार, सिरपला आता त्या यादीतून वगळण्यात आले आहे, ज्यात औषधे थेट दुकानातून खरेदी करता येत होती.
ममता, उद्धव नंतर अखिलेशचा नंबर; पण शरद पवारांचे आठ खासदार बसणार हात चोळत!!, असेच राजकीय अवस्था दिल्लीत दिसून येतेय.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाला कोलकाता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी आपल्या याचिकेत न्यायालयाला निकालाच्या वैधतेवर विचार करण्याची मागणी केली आहे. ममता स्वतः मंगळवारी याचिका दाखल करण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचल्या होत्या.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App