: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC)च्या एका स्थानिक नेत्याशी संबंधित नाट्यमय घटना चर्चेचा विषय ठरली आहे. कथित ‘कट मनी’ (सरकारी योजनांतील कमिशन) घोटाळ्याच्या आरोपांनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांपासून बचाव करण्यासाठी संबंधित नेता चक्क साड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली लपल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांबाबत पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष Akhilesh Yadav यांनी राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. यावर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस Champat Rai यांनी आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री Suvendu Adhikari यांनी राज्यातील कथित बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात आतापर्यंत 4,800 हून अधिक बेकायदा बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 836 जणांना हद्दपार (Deport) करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री Ashok Gehlot यांनी काँग्रेसच्या 2022 मधील अध्यक्षपद निवडणुकीबाबत मोठा खुलासा करत पुन्हा एकदा पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. जर Sonia Gandhi किंवा पक्षश्रेष्ठींनी स्पष्टपणे सांगितले असते, तर आपण काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी नाकारली नसती, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. तसेच त्या काळात आपल्याविरोधात “मोठा राजकीय कट” रचण्यात आला आणि आपली चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!, हेच चित्र आजच्या बैठकीतून समोर आले. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधींना मिठी मारल्याचा फोटो व्हायरल झाला.
दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!, हे राजकीय चित्र आजच्या INDI आघाडीच्या बैठकीच्या वेळी समोर आले.
अटी शर्ती लादणाऱ्या भुजबळांना कात्रजचा घाट आणि पटेलांनीही केली पवारांवर “मात”!!, असेच राजकीय चित्र राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवारीच्या निमित्ताने समोर आले छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर अटी शर्ती लादून आपला कात्रजचा घाट करून घेतला.
INDI आघाडीच्या बैठकीत उद्या 23 पक्षांची बेरीज; पण मुख्य 3 घटकांच्या वजाबाकीने वाताहत!!, असेच राजकीय चित्र आठ जूनच्या बैठकीपूर्वी निर्माण झालेले दिसले.
तमिळनाडूतील राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असून भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष K. Annamalai यांनी भाजपचा राजीनामा देऊन नवी राजकीय चळवळ सुरू केल्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष Karu Nagarajan यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अण्णामलाई यांच्या नव्या चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीच्या निकालानंतर शुक्रवारी भारतीय चलनात वाढ दिसून आली.
सामान्य ग्राहकांना खाद्यतेल खरेदी करताना फसवणूक होऊ नये आणि उत्पादनाबाबत स्पष्ट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागाने खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना पॅकेजिंगवरील माहिती अधिक पारदर्शक करण्याचे निर्देश दिले असून यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपविरोधी INDIA आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. विविध राज्यांतील राजकीय रणनीती, नेतृत्वाचा प्रश्न आणि काँग्रेसच्या भूमिकेबाबत मित्रपक्षांमध्ये वाढती नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे. आम आदमी पक्ष (AAP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि द्रमुक (DMK) यांसह काही प्रमुख घटक पक्षांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नेमका वाद कशावरून?
अदानी समूहाचे अध्यक्ष Gautam Adani यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. शेअर बाजारातील जोरदार तेजी आणि अदानी समूहातील कंपन्यांच्या वाढत्या मूल्यांकनामुळे त्यांनी Mukesh Ambani यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. याचबरोबर जपानमधील तंत्रज्ञान गुंतवणूकदार Masayoshi Son यांची संपत्तीही त्यांनी ओलांडली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी मुकाट्याने INDI आघाडीच्या बैठकीसाठी कोलकत्यातून दिल्लीला रवाना झाल्या. ममता बॅनर्जी कोलकात्याहून दिल्लीला रवाना झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी त्यांच्या समवेत खासदार डोला सेन आणि खासदार कल्याण बॅनर्जी हे दोन नेते देखील होते.
देशातील वाढत्या इंधन खर्चाला पर्याय म्हणून केंद्र सरकार आणि वाहन उद्योग फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानावर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत E85 फ्लेक्स-फ्युएलची विक्री सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत हे इंधन सुमारे 25 ते 30 टक्के स्वस्त असल्याचा दावा केला जात असून, त्यामुळे वाहनचालकांच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने भारतातील आपल्या विस्तार योजनांना आणखी वेग दिला आहे. कंपनीने हरियाणातील गुरुग्राम येथे तब्बल 6.17 लाख चौरस फूट ऑफिस स्पेस पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली असून यासाठी एकूण ₹671 कोटी खर्च करणार आहे. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील हा व्यवहार अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या ऑफिस लीज करारांपैकी एक मानला जात आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे मुसलमानांनी फिरवली पाठ, म्हणून ते झाले फ्लॉप!!, हेच राजकीय वास्तव या आंदोलनाच्या निमित्ताने समोर आले.
स्वतःचे घर असावे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतीमुळे अनेकांना स्वतःचे घर घेणे कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे.
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका झाल्या की अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, विधानसभा असताना विधान परिषदेची गरज काय? आणि एखादा नेता विधान परिषदेत निवडून आला तर त्याला नेमका काय फायदा होतो?
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी ‘निपुण सेतू’ योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड न झालेल्या, मात्र प्रतीक्षा यादीत असलेल्या गुणवंत उमेदवारांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जागतिक आर्थिक अनिश्चितता, युद्धजन्य परिस्थिती आणि मंदावलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज समोर आला आहे. भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 2026-27 या आर्थिक वर्षात 7.7 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज जागतिक वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून पंतप्रधान Narendra Modi आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार विकासाच्या नावाखाली देशाची नैसर्गिक संपत्ती, जंगलसंपदा आणि आदिवासींचे हक्क धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाकिस्तानकडून ७ जून रोजी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे अधिकृत निषेध नोंदवत, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
Abijeet Dipke च्या भाषणात कन्हैया कुमारचा आवेश; मोदी सरकारला शिव्या घालायचे मुद्दे तेच!!, हे चित्र आज आज दिल्ली विमानतळावर दिसले आणि त्यानंतर जंतर-मंतरवर दिसले
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App