जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. पक्षाने म्हटले आहे की, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या (AITC) सर्व संघटनात्मक समित्या पक्षाच्या घटनेनुसार 2027 पर्यंत वैध आहेत आणि बंडखोर गटाचा दावा वस्तुस्थितीनुसार आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे.
मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुमारे 1:50 वाजता नुंगशांग कोंगजवळ 40 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले.
प्रियांका गांधींचा केरळ मधला लोकसभेचा मतदारसंघ वायनाड मध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा भूस्खलन झाले आहे.
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याच्या म्हणजेच प्रत्यार्पणाच्या प्रकरणात उरलेली शेवटची कायदेशीर अडचणही दूर झाली आहे.
मायक्रोसॉफ्ट आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2.1% कपात करत आहे, ज्या अंतर्गत सुमारे 4,800 कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल.
राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेसचे आणि समाजवादी पार्टीचे नेते वक्फच्या नावाखाली हजारो हेक्टर जमीन विकली गेली ती गरिबांची जमीन होती पण ती विकली गेल्याबद्दल कधी बोलले का??, असा परखड सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज जाहीरपणे केला.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) सोमवारी सांगितले की, राज्यांमधील महिलांशी संबंधित रोख मदत योजनांच्या रकमेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. परिषदेने म्हटले की, महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास रोख रक्कम वाढवली पाहिजे.
अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या घटनेनंतर, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. चंपत राय यांच्या जागी निवृत्त आयएफएस अधिकारी कृष्ण मोहन यांची प्रभारी महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इंस्टाग्रामवर मुलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींबाबत सरकारने मूळ कंपनी मेटाला नोटीस पाठवली. न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, कंपनीला 7 दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे लागेल. ही नोटीस 4 जुलै रोजी जारी करण्यात आली आहे.
श्री राम जन्मभूमी मंदिरातला चोरीचा मामला समोर आल्यानंतर संपूर्ण देशभर खळबळ उडाली. राम जन्मभूमी ट्रस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले.
श्रीराम जन्मभूमी मंदिरातील चोरीचा मामला समोर आल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले. राम जन्मभूमी ट्रस्टने आज विशेष बैठक घेऊन या दोघांचे राजीनामे स्वीकारले.
अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी मंदिरातल्या चोरीच्या मामल्यामध्ये राम जन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा राजीनामा आज मंजूर केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये सुरू असलेल्या बंडखोरीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पक्षाचे निवडणूक चिन्ह कुठेही जाणार नाही. जर मला थांबवायचे असेल तर मला मारावे लागेल.
देशात लिक्विफाइड नॅचरल गॅस म्हणजेच LNG चा पुरवठा आता सामान्य झाला आहे. केंद्र सरकारने अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धादरम्यान देशात लागू केलेल्या ‘इमर्जन्सी नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर’चे आदेश मागे घेतले आहेत. LNG चा वापर उद्योगांमध्ये जास्त होतो, त्यामुळे या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळेल.
पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज पक्षाकडून प्रशांत किशोर उमेदवार असतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज भारती यांनी याची घोषणा केली आहे.
देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम (हिंदू) सदस्यांची नियुक्ती झाली आहे. मध्य प्रदेश सरकारने वक्फ बोर्डाची पुनर्रचना करताना इंदूरचे मनोज मालपाणी आणि गुना येथील राघौगडचे रहिवासी अनिमेष भार्गव यांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. यासोबतच सनवर पटेल यांची पुन्हा बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात चोरी करणाऱ्यांना कठोरातले कठोर शासन करा!!, अशी मागणी करणारे जाहीर पत्र राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी आज प्रसिद्धीला दिले.
भारतीय सैन्य दले मजबूत करणाऱ्या अग्निवीरांसाठी लवकरच खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही सशस्त्र सैन्य दलाने 4 वर्षांनंतर 25 % हून अधिक अग्निवीरांना नोकरीत कायम ठेवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125 वी जयंती आज स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनी सार्थक ठरली!! कारण भारताला खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 79 वर्षांनी शामाप्रसाद मुखर्जींचे एक महत्त्वाचे स्वप्न त्यांच्या राज्यात साकार झाले.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपच्या वादग्रस्त युझरनेम फीचरवर उत्तर देण्यासाठी मेटाची मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, आता कंपनीला 9 जुलैपर्यंत आपले उत्तर सादर करावे लागेल. यापूर्वी सरकारने या प्रकरणी व्हॉट्सॲपकडून 6 जुलैपर्यंत उत्तर मागितले होते.
पुरीचे गजपती महाराज आणि श्रीजगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती (SJTMC) चे अध्यक्ष दिब्यसिंह देब यांनी इस्कॉनला चुकीच्या वेळी रथयात्रा न काढण्याचे आवाहन केले आहे. इस्कॉन अशा तारखांना यात्रेचे आयोजन करत आहे, ज्या शास्त्रानुसार नाहीत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
जम्मू-काश्मीर प्रशासनाने नोंदणी न करता अमरनाथला पोहोचणाऱ्या यात्रेकरूंना त्यांची यात्रा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सांगितले आहे. प्रशासनानुसार, 9 जुलैपर्यंत सर्व नोंदणी स्लॉट पूर्णपणे भरले आहेत.
“हिंदूंचे संघटन हे कोणाच्याही विरोधात नाही. हिंदू असण्याचा गौरव बाळगणे म्हणजे शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज उभा करणे होय. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली हिंदूंची ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे
जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App