भारत माझा देश

Surya Chauhan

Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अकरावीत शिकणाऱ्या सूर्या प्रताप चौहान या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलिस चकमकीत ठार झाला आहे. शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Pune Hooch Tragedy

Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींशी त्यांचे कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून विशेष तपास पथकाकडून या दुव्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Brahmos

Brahmos : मोठी बातमी: ब्रह्मोस-आकाशच्या जोरावर भारताची शस्त्रनिर्यात झेपावली; २१ हजार कोटींचा टप्पा पार, जगभरातून वाढली मागणी

एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी असलेला भारत आता संरक्षण सामग्री निर्यातीत मोठी झेप घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट प्रणाली, ड्रोन आणि दारूगोळ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. केंद्र सरकारने २०२९ पर्यंत हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Navnath Ban

Navnath Ban : ‘अभिषेक बॅनर्जींसाठी कळवळा, पण बंगालमधील हिंसाचारावर मौन का?’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करणारे राऊत, बंगालमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या बैठकीला आमदारांची दांडी? ८० पैकी फक्त २० आमदार उपस्थित, टीएमसीमध्ये नाराजीच्या चर्चांना उधाण

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आक्रमक भूमिका घेत असताना पक्षातच मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावर रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी केवळ २० आमदार उपस्थित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Abhishek Banerjee

Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी रुग्णालयात दाखल; डोक्याला मार लागल्यानंतर रक्ताची गाठ, ममता बॅनर्जींकडून भेट

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताची गाठ झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

Malappuram

Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

केरळमधील मलप्पुरम येथे जप्त करण्यात आलेल्या मोठ्या बेकायदेशीर स्फोटकसाठा प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत स्फोटकांच्या पुरवठा साखळी, वाहतूक नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Jacqueliene Fernandez

Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन, सुकेश चंद्रशेखर आणि अन्य १५ आरोपींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

वन्यजीवांचे संरक्षण त्यांच्या नैसर्गिक किंवा सध्या ज्या सुरक्षित वातावरणात ते राहत आहेत त्या ठिकाणीच होणे आवश्यक आहे. कायदेशीर परवानगीनंतर सुरक्षित आश्रयस्थानी ठेवण्यात आलेल्या प्राण्यांना पुन्हा दुसरीकडे हलवणे हे त्यांच्यावरील क्रूरतेसमान ठरू शकते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

Ramesh Pandav

देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व संघात; मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही राष्ट्रीय बनवायचेय; रमेश पांडव यांचे प्रतिपादन

देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.

Army Chief

Army Chief : ‘ऑपरेशन सिंदूर २.० साठीही भारतीय सेना सज्ज’; लष्करप्रमुखांचे स्पष्ट संकेत, पाकिस्तानला इशारा

ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सैन्य कोणत्याही नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. गरज पडल्यास ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ राबवण्यासही सेना तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्याकडे भारताच्या संरक्षण धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

DK Shivakumar

DK Shivakumar : डीके शिवकुमार कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री असतील; सिद्धरामय्यांनी नाव पुढे केले, त्यांचा मुलगाही मंत्री होईल

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आता राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनतील. बंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. 28 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे सिद्धरामय्या यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

West Bengal

पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!

पश्चिम बंगाल मध्ये हल्ल्यांची नौटंकी; अभिषेक बॅनर्जी यांच्या पाठोपाठ पुढे आले कल्याण बॅनर्जी!!, हेच राजकीय वास्तव आज पश्चिम बंगाल मधून पुन्हा समोर आले.

IPL 2026 Final Craze

IPL 2026 Final Craze : IPL फायनलची उत्कंठा शिगेला, अहमदाबादेत हॉटेलचे दर तिप्पट, विमानभाडेही गगनाला भिडले

आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून त्याचा थेट परिणाम अहमदाबादच्या पर्यटन आणि प्रवास उद्योगावर दिसून येत आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी देशभरातून हजारो क्रिकेटप्रेमी अहमदाबादकडे रवाना होत असल्याने हॉटेलचे दर आणि विमानभाड्यात मोठी वाढ झाली आहे.

Abhishek Banerjee

Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण, म्हणाले- ‘मला ठार मारण्याचाच कट होता’

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे शनिवारी हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारातील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेल्या बॅनर्जी यांच्यावर संतप्त जमावाने दगडफेक, अंडीफेक आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

NIA

NIA : पाकिस्तानशी जोडलेल्या दहशतवादी जाळ्यावर NIAची मोठी कारवाई; राजस्थानसह ४ राज्यांत धाडसत्र

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कट प्रकरणात राजस्थानसह चार राज्यांत मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे NIAच्या पथकांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील तब्बल १२ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

RBI

RBI : जागतिक संकटांमध्येही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार; २०२६-२७ मध्ये ६.९% वाढीचा RBIचा अंदाज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक तणाव, महागाईचा दबाव आणि पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था २०२६-२७ या आर्थिक वर्षात ६.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज RBIने आपल्या वार्षिक अहवालात व्यक्त केला आहे.

Supreme Court

Supreme Court : ‘तारीख पे तारीख’ला लगाम; निकाल राखून ठेवल्यानंतर ३ महिन्यांत निर्णय द्या, सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टांना आदेश

देशातील न्यायालयीन विलंबावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता उच्च न्यायालयांनी (हायकोर्ट) राखून ठेवलेले निकाल जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आत जाहीर करणे बंधनकारक असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व हायकोर्टांसाठी याबाबत बंधनकारक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

CBSE

CBSE : सीबीएसई बारावी पुनर्मूल्यांकन पोर्टलला तांत्रिक अडचणी; आता १ जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला तात्पुरता विलंब दिला आहे. सुरुवातीला २९ मेपासून सुरू होणारे ऑनलाइन पोर्टल आता १ जून २०२६ रोजी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा बोर्डाने केली आहे.

Cockroach Janata Party

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या एक्स खात्यावरील बंदीवरून दिल्ली हायकोर्टात सुनावणी; केंद्र सरकार आणि एक्सला नोटीस

दिल्ली उच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या व्यंगात्मक डिजिटल गटाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर घालण्यात आलेल्या बंदीप्रकरणी केंद्र सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला नोटीस बजावली आहे. मात्र, न्यायालयाने तत्काळ खाते पुन्हा सुरू करण्यास नकार दिला.

Monsoon

Monsoon : केरळमध्ये मान्सूनची दमदार एंट्री; 78 सेमीपर्यंत पावसाचा अंदाज, जून-जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेचा इशारा

देशात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच हवामान विभागाने केरळमध्ये यंदा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळ आणि आसपासच्या भागांत काही ठिकाणी 78 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे, जून आणि जुलै महिन्यांतही देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

NEET Paper Leak

NEET Paper Leak : NTAला सर्वोच्च न्यायालयाचे फटकारे; ‘मागच्या चुका असूनही धडा घेतला नाही’, NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र-सीबीआयला नोटीस

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच National Testing Agency (NTA) वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “इतक्या मोठ्या गोंधळानंतरही NTAने मागील घटनांमधून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Amit Shah

Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक

केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी देशातील बेकायदेशीर घुसखोरीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कठोर भूमिका घेत मोठे वक्तव्य केले आहे. “देशात घुसखोरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून त्यांना भारताबाहेर पाठवले जाईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सीमासुरक्षा, लोकसंख्यात्मक बदल आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आता अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

Packaging Material

Packaging Material : कच्च्या मालाच्या महागाईने उद्योगांवर दबाव; पॅकेजिंग साहित्य 56% महाग, कंपन्यांसमोर नवे आर्थिक संकट

इराण-मध्य पूर्व संघर्ष, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यांचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः पॅकेजिंग उद्योगाला मोठा फटका बसला असून प्लास्टिक, पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन आणि इतर पॅकेजिंग साहित्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक उद्योग संघटनांच्या मते, काही पॅकेजिंग साहित्याचे दर 56% पर्यंत वाढले आहेत. यामुळे FMCG, औषधनिर्मिती, खाद्यपदार्थ, ई-कॉमर्स आणि ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्यांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.

Mukesh Ambani

सहाव्या वर्षीही मुकेश अंबानींनी घेतला नाही पगार; रिलायन्समधून ‘झिरो सॅलरी’, तरीही लाभांशातून मोठी कमाई

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षीही रिलायन्स इंडस्ट्रीजमधून कोणताही पगार न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. 2025-26 आर्थिक वर्षातही त्यांनी वेतन, भत्ते, कमिशन किंवा इतर कोणतेही मानधन स्वीकारले नाही. कंपनीच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात