संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकातावर हल्ला करण्याच्या धमकीला प्रत्युत्तर दिले. राजनाथ म्हणाले की, आसिफ यांनी अशा प्रकारचे प्रक्षोभक विधान करायला नको होते. 55 वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते, तेव्हा त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले होते. जर त्यांनी बंगालवर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला, तर देवच जाणे की यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील.
अमेरिका आणि इराण यांच्या युद्धात मध्यस्थीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानाच्या ट्विटरवर उड्या, पण प्रत्यक्षात डच्चू मिळण्याची शक्यता!!, हेच राजकीय वास्तव एका फोन कॉल मुळे समोर आले.
मेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम (Ceasefire) जाहीर झाला असला तरी यातली पाकिस्तानची मध्यस्थी फक्त नावापुरतीच, खरी स्क्रिप्ट अमेरिकेचीच!!, हेच राजकीय वास्तव पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे समोर आले. त्यामुळे ते ट्रोल झाले. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी ‘X’ (ट्विटर) वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा ‘Draft’ हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला.
पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर निवडणूक आयोग देशभरात विशेष सघन पुनर्पडताळणी (SIR) च्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याची अंमलबजाणी करण्याच्या तयारीत आहे. यात दिल्लीसह 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असेल.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने स्वतःला राज्यात जनतेसाठी तिसरा पर्याय म्हणून सादर केले.
मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात काही अतिरेक्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा दोन मुले आणि त्यांची आई त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. आई जखमी झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले की, जर बँकेने कोणतेही खाते फसवणूक (फ्रॉड) म्हणून घोषित केले तर, त्यापूर्वी कर्जदाराला समोरासमोर (वैयक्तिक) सुनावणीची संधी देणे आवश्यक नाही. न्यायालयाने म्हटले की, नोटीस देणे आणि उत्तर देण्याची संधी देणे पुरेसे आहे.
अमेरिका आणि इराणमधील शाब्दिक युद्ध वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ‘नरक’ बनवण्याची धमकी दिल्यानंतर इराणने जागतिक पुरवठा थांबवण्याची धमकी दिली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढत असल्याने सध्या चौथ्या स्थानावर आहे पण काँग्रेसने लाडक्या बहिणींवर आणि शेतकऱ्यांवर पैशांच्या घोषणांचा तुफान पाऊस पडलाय. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यात त्यांनी बंगाली जनतेला तुफानी आश्वासने दिली.
दिल्ली विधानसभा परिसरात सोमवारी दुपारी सुरक्षेत त्रुटी आढळली. दुपारी सुमारे 2 वाजता, यूपी क्रमांकाची एक कार व्हीआयपी प्रवेशासाठी असलेल्या गेट नंबर-2 ची बॅरिकेडिंग तोडून आत घुसली. कार चालकाने मुखवटा घातला होता.
मध्य पूर्वेकडील वाढता तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या विक्रीचे नियम सोपे केले आहेत. आता कोणतीही व्यक्ती पत्त्याच्या पुराव्याशिवाय छोटा गॅस सिलेंडर खरेदी करू शकेल.
कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान्यांनी त्रिवेणी मंदिराबाहेर भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली. खलिस्तान्यांच्या एकत्र येण्यामुळे शहरात 2 तास तणावपूर्ण वातावरण होते. हिंसक घटना रोखण्यासाठी कॅनडा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
दिल्ली उच्च न्यायालयाने 2021 च्या एका एकल न्यायाधीशांच्या आदेशाला रद्द केले आहे. त्या आदेशात म्हटले होते की, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची गरिबांच्या घराचे भाडे भरण्याची घोषणा कायदेशीररित्या अंमलात आणण्यासारखी होती.
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालमध्ये विशेष सघन पुनरावलोकन (SIR) मध्ये कार्यरत असलेल्या ७ न्यायिक अधिकाऱ्यांच्या घेराव आणि त्यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नारियाला यांना फटकारले आहे. न्यायालयाने सोमवारी आपल्या पूर्ण अधिकारांचा (संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत मिळालेले अधिकार) वापर करत प्रकरणाचा तपास NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडे सोपवला.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारने टीकास्त्र सोडले, पण त्यानंतर आज लगेच सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण फसल्यावर सुप्रिया सुळे यांनी नवा “डाव” टाकला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याचा महाभियोग प्रस्ताव फेटाळला आहे. या प्रस्तावावर 12 मार्च रोजी 193 विरोधी खासदारांनी (लोकसभेचे 130 आणि राज्यसभेचे 63) स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
अमेरिकेने इराणमध्ये बेपत्ता झालेल्या दोन्ही वैमानिकांना 36 तासांच्या आत वाचवले. इराणमध्ये 3 एप्रिल रोजी एका मोहिमेवर गेलेल्या F-15E फायटर जेट्सवर हल्ला झाला होता. विमान कोसळण्यापूर्वी दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडले होते.
नांदेड शहर सोमवारी आणखी एका हत्येने हादरले. आज पहाटे 5.30 च्या सुमारास मॉर्निंग वॉगसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हल्लेखोरांनी भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. गत 3 दिवसांतील शहरातील हत्येची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नांदेड पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तमिळनाडूच्या मदुराई सत्र न्यायालयाने सोमवारी सथानकुलम कोठडीतील मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने याला ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ (रेयरेस्ट ऑफ रेअर) असे म्हटले आणि हे अत्यंत क्रूरता आणि सत्तेच्या गैरवापराचे प्रकरण असल्याचे सांगितले.
मी तर जामिनावर बाहेर आहे, असे सांगून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला, की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल राहुल गांधींच्या आजच्या केरळ मधल्या भाषणातून समोर आला.
अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने 2017 मध्ये उद्योगपती अनिल अंबानीसमोर स्वतःला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील व्हाईट हाऊसचा ‘इनसाइडर’ म्हणून सादर केले होते. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघांमध्ये दोन वर्षांपर्यंत शेकडो मेसेज आणि ईमेलची देवाणघेवाण झाली.
निवडणुकीतील मोफत रेशन, महिलांना रोख रक्कम यांसारख्या ‘मोफतच्या रेवड्या’ (फुकटच्या योजना) राज्यांसाठी मोठा भार बनत आहेत. परिस्थिती अशी आहे की, या योजना पूर्ण करण्यासाठी राज्ये पुरेसे संसाधन (साधनसामग्री) गोळा करू शकत नाहीत आणि संतुलित अर्थसंकल्पही तयार करू शकत नाहीत.
रविवारी पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, राज्यातील भ्रष्टाचार, घुसखोरी आणि महिलांवरील अत्याचारामुळे जनता भीती व असुरक्षिततेच्या वातावरणात लोटली गेली आहे.
काँग्रेसने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुईया सरमा यांच्यावर दुहेरी नागरिकत्वाचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी रविवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे इजिप्त, अँटिगुआ-बार्बुडा आणि यूएई या तीन देशांचे पासपोर्ट आहेत.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद घेऊन देशभरातील गॅस सिलेंडर तुटवड्याचा विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या 6 एप्रिल 2026 रोजी “नरेंदर कब मिलेगा सिलेंडर?” या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App