अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टालिन यांना मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. ‘लगान’ आणि ‘गजनी’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) काही लोकप्रिय मद्य उत्पादनांबाबत नियमभंगाची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
वैध थर्ड-पार्टी विमा नसलेल्या वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत केंद्र सरकारला पायलट प्रकल्प राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल 3 ऑगस्टपासून लागू झाला असून, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स 2.50 रुपयांवरून 3.50 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील कर 15.50 रुपयांवरून 24 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
बिहारमधील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला आहे. अवघ्या नऊ तासांच्या कालावधीत भारताने बॉक्सिंगमध्ये तब्बल 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके जिंकत जागतिक स्तरावर आपला दबदबा सिद्ध केला.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पहाटे गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक हादरे जाणवल्याने काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य, सांस्कृतिक राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि लेखणी आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
राज्यसभेत पेपरफुटीशी संबंधित परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘मनुस्मृती’ विधानावरून गदारोळ झाला. ते शैक्षणिक संस्थांवरील RSS च्या हस्तक्षेपावर बोलत होते.
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पेपरफुटीशी संबंधित दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी सभात्याग केला.
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात भोजशाळेशेजारील जमीन मुस्लिम समाजाला नमाजसाठी दिली आहे. येथे दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत नमाज अदा करता येईल.
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी एका मोठ्या छाप्यात ₹28 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि 15 किलो सोने जप्त केले आहे. सोन्याची किंमत सुमारे ₹21 कोटी अंदाजित करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण जप्ती सुमारे ₹49 कोटींची आहे. नोटांचा ढिगारा इतका मोठा होता की, ते मोजताना 5 चलन मोजणी यंत्रे (करन्सी काउंटिंग मशीन्स) खराब झाली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पेपरफुटी रोखण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी रात्री १०:४० वाजता इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणाले, दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला अशा पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे मुलांच्या भविष्यालाही धोका निर्माण होत आहे. हे सर्व लक्षात घेता, देशभरात, सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रीय स्तरावर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे अनिवार्य झाले आहे आणि तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करणे आवश्यक आहे.
लवप्रीत सिंगने कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले. तर, महिलांच्या डिस्कस थ्रो स्पर्धेत सीमाने कांस्यपदक पटकावले.
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात कोळसा ब्लॉक वाटप प्रकरणात सुरू असलेला फौजदारी खटला बंद केला आहे. न्यायालयाने सीबीआयने 2014 मध्ये दाखल केलेल्या दोन क्लोजर रिपोर्टला सहमती दर्शवली आहे. न्यायालयाने म्हटले की, त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी कोणतीही पुरेशी सामग्री किंवा ठोस कारण नव्हते.
धर्मांतर करून मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण इंधन नियंत्रण स्विचमधील बिघाड नव्हते. ही माहिती सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, विमान उत्पादक कंपनीच्या प्रगत चाचणीतही या प्रणालीमध्ये कोणताही दोष आढळला नाही.
एलन मस्क यांनी X मनी फीचरचा रोलआउट सुरू केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ला ‘एव्हरीथिंग ॲप’ बनवण्याच्या योजनेतील हे एक मोठे पाऊल आहे. कंपनीने सध्या फक्त अमेरिकेत आपल्या प्रीमियम आणि प्रीमियम+ सबस्क्रायबर्ससाठी या बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत.
लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘लोक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ बुधवारी ध्वनी मताने मंजूर झाले.
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत दीपके महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत.
राहुल गांधी यांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले की, ‘आज मला लोकसभेत बोलू दिले नाही. रिजिजू आणि राजनाथ सिंह यांना बोलू दिले. याचे कारण असे की, मी अमित शाह यांच्याबद्दल म्हटले होते की, ते विद्यार्थ्यांवर झालेल्या क्रूरतेसाठी जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा.’
“नीट” पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पण त्या राजीनाम्याचे श्रेय काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांना मिळण्याऐवजी कॉकरोच जनता पार्टीला मिळाले त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले
विद्यार्थी आंदोलनात कुठेही गोळीबार केलाच नाही. फक्त अश्रूधुराचा वापर केला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांचे खंडण केले. राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गोळीबाराचा आदेश दिल्याचा आरोप केला होता.
मेरिकेतील विद्यापीठांना मिळणाऱ्या परदेशी निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना एक नवीन खुलासा झाला आहे. यामुळे विद्यापीठे आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षण विभागाच्या पोर्टलनुसार, हार्वर्डला परदेशी स्रोतांकडून विक्रमी ४३,१०० कोटी रुपये मिळाले आहेत, जे देशात सर्वाधिक आहेत. यापैकी सहा हजार कोटी चीनमधून आले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App