भारत माझा देश

Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींविरोधात बंडाची कुजबुज? ८० पैकी ५० आमदारांच्या गुप्त बैठकीचा दावा; ‘तृणमूल आता ममतांचा पक्ष राहिलेला नाही’

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पक्षातील काही बंडखोर नेत्यांनी तब्बल ५० आमदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांमुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ED

ED :दाऊदच्या हस्तकाविरुद्ध ईडीची मोठी कारवाई; महाराष्ट्र-गुजरातमध्ये २० ठिकाणी छापे, अमली पदार्थांच्या साम्राज्याचा शोध

फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंधित आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी सलीम डोला याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल २० ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली असून अमली पदार्थ तस्करी, हवाला व्यवहार आणि बेहिशेबी मालमत्तांच्या जाळ्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

शरद पवारांची उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळमध्ये पण फुटली; पवारांची मोदी स्तुती पक्षाला भोवली!!

शरद पवारांनी स्थापन केलेली अखंड राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात तर फुटलीच, पण त्यांची उरलीसुरली राष्ट्रवादी काँग्रेस केरळ मध्ये पण फुटली. पवारांनी केलेली मोदींची स्तुती पक्षाला भोवली.

INDIA Alliance

INDIA Alliance : दिल्लीत 8 जूनला ‘इंडिया’ आघाडीची महाबैठक; ममता, राहुल, अखिलेश एकाच मंचावर, विरोधकांची नवी रणनीती ठरणार

लोकसभा निवडणुकीनंतर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकांतील राजकीय उलथापालथीनंतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. ८ जून रोजी नवी दिल्लीत आघाडीतील प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता असून त्यामध्ये ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सुमारे १५ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmedabad

Ahmedabad : अहमदाबादला बॉम्बस्फोटाची धमकी; दाऊद, लष्कर-ए-तोयबा आणि परदेशी नागरिकांचा उल्लेख असलेले पत्र सापडल्याने खळबळ

गुजरातमधील अहमदाबाद शहरात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे एक संशयास्पद पत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. या पत्रात भारताचा फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि काही परदेशी नागरिकांचा उल्लेख करण्यात आल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे.

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजना 2026: 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार कसे मिळतात? पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

एखाद्या गंभीर आजारामुळे लाखो रुपयांचा खर्च आला तर सामान्य कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटू शकते. अशा परिस्थितीत गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) सुरू केली आहे.

PM Kisan Yojana 2026

PM Kisan Yojana 2026: पीएम किसान योजना काय आहे? पात्रता, अर्ज प्रक्रिया, हप्ते आणि लाभार्थी यादीची संपूर्ण माहिती

केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये थेट जमा केले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

K Annamalai

Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??; अमित शाह आणि अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??

Annamalai भाजप सोडणार असल्याच्या अफवा की विरोधकांनी सोडल्या पुड्या??, आणि अमित शाह – अण्णामलाई यांची बॉडी लँग्वेज काय सांगते??, असे सवाल विचारायची वेळ अण्णामलाई यांच्याच आजच्या भेटीगाठी मधून समोर आली.

Rahul Gandhi

Rahul Gandhi : ‘मोबाइलवरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या, हा सरळसरळ घोटाळा’; राहुल गांधींचा सीबीएसईवर गंभीर आरोप

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी निर्धारित तांत्रिक निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट “फसवणूक” आणि “घोटाळा” असे संबोधत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.

NEET Re-Exam

NEET Re-Exam : नीट पुनर्परीक्षा ऑफलाइनच होणार; सर्वोच्च न्यायालयाचा संगणकाधारित परीक्षेला नकार, २१ जूनलाच परीक्षा

वैद्यकीय शिक्षणासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या (नीट-यूजी) पुनर्परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २१ जून रोजी होणारी पुनर्परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी भूमिका न्यायालयाने कायम ठेवली असून संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी आता २१ जूनची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

GST Collection

GST Collection : मे महिन्यात ₹1.94 लाख कोटी जीएसटी कलेक्शन; मागील महिन्यापेक्षा 20% कमी

देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा निर्देशक मानल्या जाणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात मे महिन्यात मोठी घट नोंदवली गेली आहे. एप्रिल महिन्यात विक्रमी पातळी गाठल्यानंतर मेमध्ये जीएसटी महसूल जवळपास २० टक्क्यांनी घसरून १.९४ लाख कोटी रुपयांवर आला आहे. मात्र वार्षिक तुलनेत महसूलात वाढ कायम असून गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Rafale Fighter Jets

Rafale Fighter Jets : भारत पुन्हा खरेदी करणार ११४ राफेल लढाऊ विमाने; फ्रान्ससोबत मोठ्या संरक्षण कराराची चर्चा वेगात

भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यात ११४ अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या मोठ्या कराराबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. हा करार झाल्यास तो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संरक्षण खरेदींपैकी एक ठरणार आहे.

CM Vijay

CM Vijay : ‘माझे कपडेही काळे-पांढरे, राजकारणही काळे-पांढरेच’; मुख्यमंत्री विजय यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजय यांच्या काळ्या-पांढऱ्या पोशाखाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात विजय हे काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत असल्याने विरोधकांकडूनही त्यावर टीका होत होती. अखेर विजय यांनी स्वतःच या चर्चेला उत्तर देत आपल्या पोशाखामागील राजकीय संदेश स्पष्ट केला आहे.

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला नमाजासाठी मशिदी कमी पडताहेत, म्हणून रस्त्यावर नमाज; पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याचा कांगावा!!

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला माझ्यासाठी मशिदी कमी पडत आहेत म्हणून रस्त्यावर नमाज पठण करावे लागते, असा कांगावा पवार आणि ममता प्रेमी मुस्लिम नेत्याने आज केला. ज्येष्ठ वकील असलेल्या या नेत्याने अप्रत्यक्षपणे रस्त्यावरच्या नमाजाचे समर्थन केले.

Kerala Monsoon

Kerala Monsoon : मान्सून 2-3 दिवसांत केरळममध्ये पोहोचेल; देशभरातील उष्णतेची लाट संपली; राजस्थानमधील 3 जिल्ह्यांमध्ये गारपीट

भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे की, नैऋत्य मान्सून पुढील 2 ते 3 दिवसांत केरळममध्ये दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळममध्ये दाखल होतो, परंतु यावेळी त्याचा वेग थोडा मंद राहिला आहे.

Surya Chauhan

Surya Chauhan : बकरी ईदच्या दिवशी झालेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असद पोलिस चकमकीत ठार; सूर्या चौहान प्रकरणाला नवे वळण

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अकरावीत शिकणाऱ्या सूर्या प्रताप चौहान या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असद हा पोलिस चकमकीत ठार झाला आहे. शनिवारी उशिरा रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान ही चकमक घडल्याचे सांगितले जात असून या घटनेमुळे राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Pune Hooch Tragedy

Pune Hooch Tragedy : पुणे विषारी दारू प्रकरणात दोन पोलिस अधिकारी निलंबित; आरोपींशी संबंधांचा संशय, मृतांचा आकडा २४ वर

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई करत दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींशी त्यांचे कथित संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून विशेष तपास पथकाकडून या दुव्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

Brahmos

Brahmos : मोठी बातमी: ब्रह्मोस-आकाशच्या जोरावर भारताची शस्त्रनिर्यात झेपावली; २१ हजार कोटींचा टप्पा पार, जगभरातून वाढली मागणी

एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदार देशांपैकी असलेला भारत आता संरक्षण सामग्री निर्यातीत मोठी झेप घेत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, अकाश हवाई संरक्षण प्रणाली, पिनाका रॉकेट प्रणाली, ड्रोन आणि दारूगोळ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीमुळे भारताची संरक्षण निर्यात २१ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. केंद्र सरकारने २०२९ पर्यंत हा आकडा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Navnath Ban

Navnath Ban : ‘अभिषेक बॅनर्जींसाठी कळवळा, पण बंगालमधील हिंसाचारावर मौन का?’; नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करणारे राऊत, बंगालमध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या वेळी गप्प का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Mamata Banerjee

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींच्या बैठकीला आमदारांची दांडी? ८० पैकी फक्त २० आमदार उपस्थित, टीएमसीमध्ये नाराजीच्या चर्चांना उधाण

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आक्रमक भूमिका घेत असताना पक्षातच मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणावर रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी केवळ २० आमदार उपस्थित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Abhishek Banerjee

Abhishek Banerjee : अभिषेक बॅनर्जी रुग्णालयात दाखल; डोक्याला मार लागल्यानंतर रक्ताची गाठ, ममता बॅनर्जींकडून भेट

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूर येथे झालेल्या हल्ल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताची गाठ झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

Malappuram

Malappuram : केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूत एनआयएचे १९ ठिकाणी छापे; मलप्पुरम स्फोटकसाठा प्रकरणात मोठी कारवाई

केरळमधील मलप्पुरम येथे जप्त करण्यात आलेल्या मोठ्या बेकायदेशीर स्फोटकसाठा प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोठी कारवाई करत केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांतील १९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत स्फोटकांच्या पुरवठा साखळी, वाहतूक नेटवर्क आणि संबंधित व्यक्तींबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Jacqueliene Fernandez

Jacqueliene Fernandez : जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांना मोठा धक्का; २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि कथित महाठग सुकेश चंद्रशेखर यांना २०० कोटी रुपयांच्या खंडणी व मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस न्यायालयाने जॅकलिन, सुकेश चंद्रशेखर आणि अन्य १५ आरोपींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता या बहुचर्चित प्रकरणाच्या खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Supreme Court : वन्यजीव जंगलातच सुरक्षित; सुरक्षित वातावरणातून प्राण्यांना हटवणे म्हणजे क्रूरता, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

वन्यजीवांचे संरक्षण त्यांच्या नैसर्गिक किंवा सध्या ज्या सुरक्षित वातावरणात ते राहत आहेत त्या ठिकाणीच होणे आवश्यक आहे. कायदेशीर परवानगीनंतर सुरक्षित आश्रयस्थानी ठेवण्यात आलेल्या प्राण्यांना पुन्हा दुसरीकडे हलवणे हे त्यांच्यावरील क्रूरतेसमान ठरू शकते, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

Ramesh Pandav

देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व संघात; मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही राष्ट्रीय बनवायचेय; रमेश पांडव यांचे प्रतिपादन

देशातील प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असून, पहिल्या टप्प्यात भूमीपुत्र असणाऱ्या हिंदू समाजाला राष्ट्रीय बनवावे लागेल. त्यानंतर मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही आम्हाला राष्ट्रीय बनवायचे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक समरसता गतीविधीचे अखिल भारतीय मंडळ सदस्य रमेश पांडव यांनी केले.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात