दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनेही प्रवेश केला आहे. त्याने एक व्हिडिओ जारी करून दावा केला आहे की त्याने CJP च्या नेत्यांसोबत झूम मीटिंग केली आहे. यात आंदोलनाबाबत चर्चा झाली. व्हिडिओमध्ये पन्नू म्हणत आहे – आज झूम मीटिंगमध्ये CJP आणि मी जी घोषणा केली आहे, ती लक्षात ठेवा. दिल्लीला आणि मोदींना पाडायचे आहे. मोदींच्या सत्तेचे तख्ता पलट केले जाईल. हा निश्चित उपाय नाही. याचा निश्चित उपाय भारताचे विघटन करणे आहे, भारताला तोडणे आहे.
मध्य प्रदेशचे निवर्तमान मुख्य सचिव अनुराग जैन यांची नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) बुधवारी संध्याकाळी याचा आदेश जारी केला. यानुसार, 1989 च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी अनुराग जैन, नीती आयोगात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांपर्यंत या पदावर राहतील.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन चिघळले. ते राहुल गांधींनी काँग्रेसच्या ताब्यात घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तच चिथावणी मिळाली. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी आणि देशभरात सरकारच्या बाजूने सकारात्मक संदेश वाचविण्यासाठी जी पावले उचलली, त्यामध्ये एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याच्या मध्यस्थीसाठी निवडले. जगत प्रकाश नड्डा यांनी आंदोलनाच्या लाठीमारात जखमी झालेल्या रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी सोनं वांगचुक याची सुद्धा मेदांता रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
दिल्लीतल्या जंतर – मंतर वर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. कारण विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेला होता त्यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर काँग्रेसनेही आंदोलन केलं. या सगळ्या घटना घडत असताना शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या प्रतिनिधींनी दोन वेळा सरकारशी चर्चा केली. पण दोन्ही चर्चांमधून तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना आत्तापर्यंत किमान चार वेळा चर्चेचे निमंत्रण दिले. पण या पार्टीने सरकारचे निमंत्रण अद्याप तरी स्वीकारलेले दिसले नाही, उलट त्यांनी ते निमंत्रण धुडकावले. त्या पार्टीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्र्यांनीच जंतर – मंतरवर येऊन चर्चा करायची मागणी केली.
पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान गदारोळ झाला. टीएमसी आमदार कुणाल घोष यांना मार्शल्सनी उचलून सभागृहाबाहेर काढले.
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी 16 वर्षांनंतर भारतात परतण्याच्या तयारीत आहेत. एका अपीलीय न्यायाधिकरणाने 16 जुलै रोजी आयपीएल 2009 च्या दक्षिण आफ्रिकेतील आयोजनाशी संबंधित फेमा प्रकरणात निकाल दिला होता. यात मोदींना दिलासा देत ईडीने लावलेला दंड रद्द केला होता.
भारतातील चीनचे नवीन लष्करी मुत्सद्दी यू जियान यांनी भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, भारताने केरळच्या किनाऱ्याजवळ आग लागलेल्या मालवाहू जहाजातून 12 चिनी नागरिकांना वाचवले होते. चीन ही मदत कधीही विसरणार नाही.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात काँग्रेस सह बाकीचे विरोधी पक्ष घुसल्याने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची खुर्ची खुंटा हलवून बळकट झाली, पण त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा करून राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि विरोधकांवर मात केली.
नवी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “काहीही झालं तरी जंतरमंतरवरील जागा सोडू नका, वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील,” असा शब्द जरांगे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला ‘उलटं करण्याची’ ताकद आपल्यात असून, पुन्हा हल्ला झाल्यास नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. ही भेट संसद भवनात झाली.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्या आरोपांना उत्तर दिले. नड्डा म्हणाले- राहुल यांनी सांगावे की जेव्हा काँग्रेस सरकारच्या काळात पेपर फुटतात, तेव्हा ते प्रश्न का विचारत नाहीत.
नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या चांगलेच तापले असून, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्याला आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे उद्या (गुरुवारी) अहिल्यानगर शहरात मौन धरणे आंदोलन करणार आहेत.
बुधवारी रात्री दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. सीजेपीच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. या घटनेचे व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये आंदोलक काठ्या घेऊन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिरात दान चोरीचा अलीकडचा वाद हा भारतीय प्रामाणिकपणाच्या सर्वात खालच्या पातळीचे प्रतीक आहे. ते म्हणाले, ‘राम मंदिरात दानाच्या चोरीनंतरही जर समाज विचलित होत नसेल तर त्याला लज्जित करणारी कोणतीही गोष्ट उरत नाही.’ ही टिप्पणी त्यांनी उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईशी संबंधित प्रकरणात आपल्या ५१ पानांच्या स्वतंत्र निर्णयात केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेसच्या ताब्यात घेतल्यानंतर आज काँग्रेसचे मुख्यालय इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार पुढे तीन मागण्या मांडल्या.
कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात कॉक्रोच आंदोलनाला नेमका पैसा कुठून मिळतोय?? आणि त्यांची कुमक कुठून येते आहे??, याविषयी गंभीर सवाल उत्पन्न झालेत.
अमेरिका-भारत व्यापार कराराच्या निषेधार्थ पंजाबच्या शेतकऱ्यांचा मंगळवारी (२१ जुलै) दिल्लीकडे निघणारा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर शेतकरी शंभू सीमेवरून परत फिरू लागले.
इराणवर अमेरिकेचा हल्ला आणि इस्रायल-गाझा तणाव असूनही या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या कुटुंबाला पाठवल्या जाणाऱ्या रकमेत कपात केलेली नाही. उलट, त्यांनी यंदा कुटुंबांसाठी विक्रमी रक्कम पाठवली. अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढावा दस्तऐवजाच्या आधारे सरकारने लोकसभेत सांगितले आहे की, २०२५-२६ मध्ये भारताला मिळणाऱ्या नेट प्रायव्हेट ट्रान्सफरची रक्कम यंदा वाढून सुमारे १४ लाख कोटी रुपयांपर्यंत (१४४.८ अब्ज डॉलर) पोहोचली आहे. २०२४-२५ मध्ये ही रक्कम सुमारे १२ लाख कोटी रुपये (१२४.६ अब्ज डॉलर) होती.
योगी सरकार पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी देईल. याचा फायदा अशा विद्यार्थिनींना होईल, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपर्यंत असेल. स्कूटी प्रत्येक विद्यापीठातील आणि महाविद्यालयातील टॉप 5% विद्यार्थिनींनाच मिळेल.
मंगळवारी दुपारी ३:३० वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सायंकाळी ६:३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले.
याला म्हणतात, Assignment based काम, असंच म्हणायची वेळ शरद पवारांनी आज घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर आली.
लडाखचे पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते अशी प्रतिमा तयार केलेले सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
CJP कॉकरोज जनता पार्टीने सुरू केलेल्या आणि सगळ्या विरोधकांनी सामील होऊन चिघळलेल्या आंदोलनाचे खरे टारगेट मोदी – शहाच आहेत
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App