कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सूचनेनंतर राजीनामा दिला खरा, पण राज्यसभेची खासदारकी नाकारून त्यांनी कर्नाटकातल्या सत्तेच्या चाव्या स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा “डाव” खेळला.
: गुजरातमधील मुंद्रा किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात ATSने संयुक्त कारवाई करत तब्बल 118 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे ₹1000 ते ₹1150 कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, ही अलीकडच्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या सागरी ड्रग्ज कारवायांपैकी एक मानली जात आहे.
दोन राष्ट्रीय पक्षांना भाकऱ्या फिरविण्यात यश; पण प्रादेशिक पक्षांची सत्तेत आणि विरोधातही धडपड आणि तडफड!!, हेच राजकीय चित्र आज समोर आले.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस प्रमुख Mamata Banerjee पुन्हा एका नव्या वादात सापडल्या आहेत. कोलकात्यातील ईद कार्यक्रमादरम्यान त्यांनी कथितपणे “सनातन धर्म” संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सिलिगुडी येथे त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या एडटेक कंपनींपैकी एक असलेल्या BYJU’Sचे संस्थापक Byju Raveendran यांना सिंगापूरमधील न्यायालयाने अवमान प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मालमत्तेशी संबंधित न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाची ही कारवाई घटनात्मकदृष्ट्या वैध, न्याय्य आणि कायदेशीर अधिकारांच्या चौकटीत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बिहार निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या मोठ्या राजकीय वादावर महत्त्वाचा निर्णय आला आहे.
देशभरात ‘नौतपा’ सुरू होताच उष्णतेची तीव्र लाट पसरली असून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवस भीषण उष्णतेचा आणि हीटवेव्हचा इशारा दिला असून अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी केरळचे माजी मुख्यमंत्री Pinarayi Vijayan यांच्या निवासस्थानासह राज्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई CMRL अर्थात कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेडशी संबंधित कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात करण्यात आली असून, या प्रकरणात विजयन यांच्या मुलीच्या कंपनीचे नाव समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील एका डॉक्टरसह पुण्यातील कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केली आहे. या नव्या अटकेनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या 13 वर पोहोचली असून तपासाचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे.
आफ्रिकेतील इबोला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये एक मोठी आरोग्य सतर्कता निर्माण झाली. युगांडाहून आलेल्या 28 वर्षीय महिलेमध्ये इबोलासदृश लक्षणे आढळल्यानंतर तिला तातडीने विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र प्राथमिक तपासणीत तिचा इबोला अहवाल निगेटिव्ह आला असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
यूपीच्या प्रयागराजमध्ये झालेल्या SSC-GD भरती परीक्षेदरम्यान मंगळवारी सर्व्हर फेल झाल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यांनी खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक आणि खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू लागले.
डी. के. शिवकुमार यांना दिलेला शब्द खराब होऊन राहुल गांधींनी वाचविले कर्नाटक मधले काँग्रेसचे सरकार!!, या शब्दांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधल्या घडामोडींचे वर्णन करावे लागेल.
अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित कंपन्यांच्या तत्कालीन संचालकांविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) कफ परेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर बँकेकडून 150 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते इतर कामांसाठी वळवल्याचा आणि डिफॉल्ट केल्याचा आरोप आहे.
भारताने चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनात जम्मू-काश्मीरच्या उल्लेखाला पूर्णपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अभिन्न आणि अविभाज्य भाग आहेत. भारताने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवरही तीव्र आक्षेप घेतला.
केरळात भांडण काँग्रेस आणि कम्युनिस्टांचे; पण बदनामी मात्र सावरकरांची!!, असला प्रकार आज समोर आला.
ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी मंगळवारी सिडनीमध्ये सांगितले की, एआयच्या जलद वाढीमुळे आणि वापरामुळे जगात जॉब्स एपोकॅलिप्स म्हणजेच नोकऱ्यांचे संकट येणार नाही.
12 जून 2025 रोजी दुपारी 1:38 वाजता अहमदाबादच्या मेघाणीनगर परिसरात असलेल्या ‘अतुल्यम हॉस्टेल’च्या इमारतीवर एअर इंडियाचे विमान कोसळले होते, तेव्हा या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने डॉक्टर आणि पीजी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बदलाच्या अटकळांदरम्यान मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली.
बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी बांगलादेशींना देश सोडून जाण्यास सांगितले. ते म्हणाले- राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींची ओळख पटवून त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, त्यानंतर बीएसएफ त्यांना परत पाठवण्यासाठी मदत करेल. ते म्हणाले- लवकर लवकर इथून पळा, नाहीतर कारवाई करू. आम्ही घुसखोरांना तुरुंगात पाठवून भाकरी खाऊ घालणार नाही. ते जावई नाहीत. त्यांना हाकलून लावले जाईल. त्यांच्या (बांगलादेशच्या) अधिकाऱ्यांनीही सांगितले आहे की, जे आमचे लोक असतील, त्यांना ते परत घेतील.
केंद्र सरकारने देशाच्या लोकसंख्येत होत असलेल्या असामान्य बदलांच्या अभ्यासासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नावलेकर (निवृत्त) यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने NEET पेपरफुटी प्रकरणी सोमवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले – हे दुर्दैवी आहे की NTA ने यापूर्वी झालेल्या पेपरफुटी प्रकरणातून कोणताही धडा घेतला नाही.
आसाम विधानसभेत समान नागरी संहिता (UCC) विधेयक सोमवारी सादर करण्यात आले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वतीने राज्याचे संसदीय कार्यमंत्री अतुल बोरा यांनी ते पटलावर ठेवले. या विधेयकाला दोन आठवड्यांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉकरोच जनता पार्टी (CJP) शी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला.
अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपी सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना नोटीस बजावली आहे. कनिष्ठ न्यायालयाने गिरिबाला सिंह यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामीन रद्द करण्याच्या मागणीसह, राज्य सरकार आणि ट्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये. न्यायालयाने केंद्र सरकारला 30 जानेवारीच्या न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे लागू करण्यास सांगितले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App