रेल्वेने जम्मू-काश्मीरमधील बर्फाळ आणि थंड हवामानासाठी खास डिझाइन केलेली वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे, जी 30 एप्रिलपासून जम्मू ते श्रीनगरपर्यंत धावेल. ही ट्रेन अवघ्या 6 तासांत हा सुंदर प्रवास पूर्ण करेल.
वॉशिंग्टनमध्ये वार्षिक व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट डिनरदरम्यान गोळीबार झाला. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्यासह अनेक मोठे अधिकारी उपस्थित होते.
तेलंगणाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी कुटुंब आणि पक्षापासून वेगळा मार्ग निवडत नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या नव्या पक्षाचे नाव ‘टीआरएस’ (तेलंगणा राष्ट्र सेना) असेच ठेवण्यात आले आहे—जे नाव पूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे मूळ नाव होते.
AAP खासदार संजय सिंह यांनी रविवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांना याचिका सादर करून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. सिंह म्हणाले की, या सदस्यांनी पक्ष सोडणे हे पक्षांतरबंदी कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे.
मालीचे संरक्षण मंत्री सादियो कामारा यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. शनिवारी राजधानी बमाकोपासून सुमारे 15 किमी दूर असलेल्या काटी शहरात त्यांच्या घरावर आत्मघाती कारने हल्ला करण्यात आला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी झाले. स्विस एअरलाइन्सचे LX147 विमान शनिवारी रात्री 1:08 वाजता टेकऑफ करणार होते. तेव्हा त्याचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. त्यानंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगळी येथील हरिपाल येथे रॅली घेतली. त्यांनी बनगावमध्ये म्हटले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानात टीएमसीचा अहंकार मोडला आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित होताना दिसत आहे.
गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना तीन दिवसांची संधी मिळणार असून येत्या १ मे ते ३ मे २०२६ असा तीन दिवसांचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केला आहे.
बीजेपीने शनिवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 95 लोधी इस्टेट येथील निवासस्थानाचे फोटो जारी केले. दिल्लीचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी आरोप केला की, त्यांच्या मनात अजूनही ‘शीशमहल’ राहतो. त्यांनी आपले सरकारी निवासस्थान आलिशान बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या डिनरच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह गडद झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन भरपूर खुलासा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या टीममध्ये आता 33% महिला पदाधिकारी समाविष्ट असतील. हे सूत्र संसदीय मंडळापासून ते सचिव स्तरापर्यंत लागू होईल. राज्यांमध्येही हीच व्यवस्था अवलंबली जाईल. संघटन महासचिवांच्या देखरेखीखाली याची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे रॅली घेतली. ते म्हणाले – माझ्यावर ३६ खटले आहेत कारण मी भाजपशी लढत राहतो. ईडीने माझी ५५ तास चौकशी केली. माझे घर काढून घेण्यात आले होते. पण ममताजींसोबत असे का झाले नाही? कारण जे ममता बंगालमध्ये करत आहेत, तेच मोदीजी देशात करत आहेत.
मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांततेची मागणी करणाऱ्या हजारो लोकांची शनिवारी पोलिसांशी झटापट झाली. हे सर्व मुख्यमंत्री निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यासाठी निघाले होते, परंतु पोलिसांनी त्यांना रोखले. आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचे अनेक गोळे फेकले.
आम आदमी पार्टी (आप) आपल्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यासाठी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे. आपचा आरोप आहे की या खासदारांचे पाऊल असंवैधानिक आहे आणि त्यांना अपात्र घोषित केले पाहिजे.
दिल्लीहून इंदूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2515 विमानाला तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून परत टर्मिनलवर आणावे लागले. धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानात एअर कंडीशनिंग (AC) बंद करण्यात आले. प्रचंड उष्णता आणि बंद केबिनमध्ये तासभर अडकल्याने प्रवाशांची तब्येत बिघडायला लागली.
भारत इराणच्या चाबहार बंदरातील आपला हिस्सा इराणी कंपनीला सोपवू शकतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या निर्बंधांमधून मिळालेली सूट संपल्यानंतरही काम सुरू ठेवता यावे यासाठी हे पाऊल तात्पुरते उचलले जाऊ शकते.
सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाला होता. त्यांनी रेडिएशन थेरपीने यावर गुपचूप उपचार केले. सुमारे दोन महिने हा आजार सार्वजनिक करण्यात आला नाही आणि आता उपचार पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यात आली आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ एआय मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे एआय मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात.
नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील दमदममध्ये रॅली घेतली. ते म्हणाले की, टीएमसीचा दिवा विझणार आहे. विझणारा दिवा फडफडतो. बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राष्ट्र सेविका समिती स्थापनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शारीरिक-घोष विभागामार्फत येत्या शुक्रवारी, १ मे २०२६ रोजी भव्य विजयघोष – २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज आज २४ एप्रिलपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App