मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे
उच्च न्यायालयाने मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांना पाेलीसांच्या परवानगीशिवाय आझाद मैदानात आंदाेलन करण्यास परवानगी नाकारली हाेती.
आझाद मैदानापासून ते पार मुंबईच्या वेशीपर्यंत मराठा मोर्चा मुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून त्यामुळे गणेश भक्तांची मोठी पंचाईत झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तसेच दोन्ही नेत्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहभोजन देखील केले होते. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे फायदे उपटायला पाहात आहेत, त्यांचा फायदा होणार नाही. मोठे नुकसानच होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत हे जरांगे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चांबाबत मोठा खुलासा केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नाही. तसेच मंत्री उदय सामंत आणि माझ्यातही त्याबाबत काही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!, असेच चित्र ठाकरे बंधूंच्या आजच्या तिसऱ्या भेटीवरून दिसून आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गणपतीच्या दर्शनाला गेले. त्यांच्याबरोबर नेहमीप्रमाणे अर्थातच रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही होते. दोन्ही बंधूंनी एकमेकांचे कुशल मंगल विचारले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांनी बसविलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. पण प्रबोधनकार, बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे यांच्या चित्रासमोर फोटोला पोज देताना दोन्ही बंधूंनी आपापली हातांची घडी घातलेली दिसली.
महाराष्ट्राच्या राजकारणात गावकी भावकीने नेहमीच धुमाकूळ घातला. राजकारणाच्या धबडग्यात अनेकांच्या भावक्या फुटल्या. अनेक भावांनी परस्पर विरोधी मार्ग धरले. पण पवार घराण्याने मात्र आपण अजूनही एक असल्याचे दाखविले होते.
मराठा आरक्षणाचे आंदोलन करताना मनोज जरांगे श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात काही बोलत नाहीत. तेच मराठा आरक्षणातले खरे अडथळा आहेत.
मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर-गोंदिया नियंत्रित प्रवेश द्रुतगती मार्ग प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या तीन तासांहून अधिक वेळेवरून सुमारे ९० मिनिटांपर्यंत कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे कार्यान्वित केला जाईल आणि मंत्रिमंडळाने भूसंपादनासाठी ३,१६२ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. १६२.५ किमी लांबीच्या या मार्गाचा नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील ११५ गावांना फायदा होईल. यामुळे आदिवासीबहुल आणि मागासलेल्या भागांची नागपूर आणि मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढेल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा सामाजाला आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. 27 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत. त्यात आता गणेशोत्सव सुरू होणार असून मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. अशात आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असल्याने भाजपकडून मनोज जरांगे यांनी आंदोलन पुढे ढकलावे अशी विनंती करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना म्हटले की हे फडणवीसांचे षड्यंत्र असून मी ते उधळून लावणार असल्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाचा हा निर्णय येताच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत जरांगेंवर टीका केली आहे. तसेच ते मुंबईत आले तर जेलमध्ये जावे लागणार, असा दावा देखील सदावर्ते यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला असून, मनोज जरांगे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. हायकोर्टाने त्यांना मुंबई येण्यापासून मनाई केली असली, तरी ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मात्र सावध भूमिका घेत मौन बाळगल्याचे दिसून येत आहे. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल माध्यमांसमोर कोणतेही विधान न करू नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केले होते. शरद पवारांना देखील आपण विचारले पाहिजे
अथर्व सुदामेने सेक्युलारिझमचा संदेश देणारा फक्त एक व्हिडिओ डिलीट केला. त्याबरोबर सेक्युलर भारतावर हिंदुत्वाची ढगफुटी झाली. त्या ढगफुटीच्या पावसात सेक्युलर भारतातल्या लिबरल लोकांची घरे दारे, एनजीओची कार्यालये, त्यांची बँक खाती सगळे सगळे वाहून गेले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लागोपाठ दुसरा धक्का दिला.
विशेष प्रतिनिधी बीड: Police sent back Laxman Hake: बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात मराठा आणि ओबीसी गटांमधील वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App