: पुण्यातील स्वारगेट बस स्थानक उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर बलात्कार करून तिला धमकावलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कनेक्शन उघड्यावर आले. त्याचा फोटो माजी आमदाराच्या बॅनरवर आढळला आणि खुद्द दत्तात्रय च्या व्हाट्सअप डीपीवर विद्यमान आमदाराचा फोटो आढळला.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केले.
त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा हल्लाबोल केला. आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी महाकुंभाला उपस्थित न राहून हिंदुत्वाचा अपमान केला आहे. रामदास आठवले पुढे म्हणाले की, हिंदू मतदारांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर बहिष्कार टाकावा.
पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बुधवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगीकार करीत हशुजी अडवाणी यांनी समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले.
एरवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे या सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाबद्दल बोलताना आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांच्या नेहमी बाता मारत असतात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटप कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
अंधेरी विभागातील शेर ए पंजाब नगर येथील बीएमसी मैदान येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींच्या आभार सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मनोगत मांडताना विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही महायुतीला भक्कम साथ देण्याचे आवाहन लाडक्या बहिणींना केले.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सीएसआर निधीच्या उपयोगातून समतोल विकास साधल्या जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.राज्यातील १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी काल मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भेट घेतली. यासंबंधीची बातमी आज मराठी माध्यमांनी फोडली त्यानंतर जयंत वाटलांनी आपण “त्या” कारणासाठी नव्हे, तर “या” कारणासाठी बावनकुळे यांची भेट घेतल्याची कबुली दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीएसआर फॉर चेंज : अॅक्सलरेटिंग शेड्युल्ड ट्राईब्स डेव्हलपमेंट थ्रू सीएसआर पार्टनरशिप’ हा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.5 टक्के आदिवासी समुदाय असल्याचे सांगत, त्यांच्या संस्कृतीच्या समृद्धीला अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
राजस्थानमधील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुण्यात शनिवारी, १ मार्च रोजी होणार्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हॉटेलमध्ये चाललेला कुंटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला यात दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली असून हॉटेल मालक मात्र फरार झाला.
महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. या चर्चेदरम्यान, महाराष्ट्र लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल तसेच राज्य शासन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करून प्रशासन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देत असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे.
फसवणुकीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा उठवल्यानंतर मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भाषा झाली “सरळ” आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे शरणागती पत्करली. पुण्यातल्या कृषी खात्यातल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या नाड्या कशा आवळल्या याचे वर्णन त्यांनी केले.
“पवार संस्कारित” माणसे मुकाटपणे कापताहेत सत्तेच्या सुमडीत कोंबड्या; “ठाकरे संस्कारित” माणसे काढताहेत एकमेकांच्या चड्ड्या!! हे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे आजचे चित्र आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App