आपला महाराष्ट्र

Nitesh Rane

Nitesh Rane : राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही, नितेश राणे यांचा इशारा

येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

Manipur

मणिपूरच्या एका आमदाराने पाठिंबा काढून घेतला अन् विरोधकांना फुटल्या देशभर उकळ्या

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जनता दल युनायटेड चे नितीश कुमार यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या जनता दलाच्या मणिपूरमधील एका आमदाराने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. मात्र त्यामुळे देशातच आता सत्ता बदल होईल यामुळे विरोधकांना देशभर उकळ्या फुटत आहेत.

Suresh Dhas परळीतील चेतना कळसे मृत्यू प्रकरणं ऐकून डोळ्यात येईल पाणी

शिक्षकी किंवा तत्सम पेशाची नोकरी करणारे एक पापभिरू कुटुंब. घरातील तरुण मुलीवर गुंडांची नजर पडते. कुटुंब हादरून जाते पण या गुंडशाहीपुढे दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न. शेवटी घडायचे तेच घडते. मुलीचा जळून मृत्यु होतो. हत्या की आत्महत्या शेवटपर्यंत समजत नाही. पण या झटक्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते.

Davos ‘राष्ट्र प्रथम’… राजकारण विसरून दावोसमध्ये भारतीय राजकारणी एका व्यासपीठावर एकत्र

सध्या दावोसमध्ये जगभरातील नेत्यांचा मेळावा होत आहे. प्रत्येकजण आपल्या देशासाठी गुंतवणूक करण्यासाठी तिथे आला आहे.

Jalgaon

Jalgaon जळगावमध्ये भीषण रेल्वे अपघात ; एका अफवेमुळे गेला १२ प्रवशांचा जीव

जळगाव जिल्ह्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे जिथे ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि चेन खेचून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच प्रवाशांनी दुसऱ्या ट्रॅकवर जाण्याचा प्रयत्न केला

Sanjay Nirupam

Sanjay Nirupam : सैफ अली खान इतका उड्या मारत घरी जात आहे, हे समजण्यापलीकडे आहे’ – शिवसेना नेते संजय निरुपम

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला ५ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो त्याच्या घरी रवाना झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे ज्यामध्ये असे दिसते की सैफला काहीही झाले नाही. या व्हिडिओबाबत शिवसेना नेते संजय निरुपम यांनी सैफ अली खानवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Anjali Damania

Anjali Damania : मुंडेंच्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट, लोकप्रतिनिधी नियमाप्रमाणे आमदारकी रद्द करण्याची अंजली दमानिया यांची मागणी

मंत्री धनंजय मुंडे भागीदार असलेल्या कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमाप्रमाणे मंत्री किंवा आमदार जर लाभ मिळवत असतील तर ते चुकीचे आहे. लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 6,25,497कोटींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : देवेंद्र फडणवीस

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 6 लाख 25 हजार 497 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 1 लाखाच्या वर इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला आहे. तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे.

Bachu Kadu

Bachu Kadu : शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रात लवकरच भाजपसोबत, बच्चू कडू यांचा दावा

नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू भाजपची साथ सोडून गेल्या नंतरची सोय सध्या भाजप बघत आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असा दावा प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांनी केला आहे .

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, जेलवारी आमच्या नशिबी होती ती झाली ..

जेलवारी झाली, त्रास सहन करावा लागला. मग आता काय रडत बसू का? जे झालं ते झालं नशिबात होतं.जेलवारी आमच्या नशिबी होती ती झाली त्याच्यानंतर आपल्याला न्याय तर मिळाला अशी खंत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

Saif Ali Khan

Saif Ali Khan : सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज ; पत्नी करीनासह घरी परतला

मागील आठवड्यात अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

Maharashtra

Maharashtra महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर आता रडारावर, तक्रारींनंतर सरकार कारवाईत

बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खरंतर, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बनावट जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्रे उशीरा दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

Eknath Shinde

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल- ​​​​​​​पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय?, रायगड-नाशिकच्या पालकत्वावर दावा

नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगड, तर दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. यामुळे महायुतीत ताणतणाव सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवण्यात काहीच वावगे नाही

Rahul Shewale

Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचा दावा : 23 जानेवारीला केंद्रासह राज्यात राजकीय भूकंप होणार; ठाकरे गटाचे 15, काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात

आगामी 23 तारखेला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे 15 व काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे 23 जानेवारी रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे त्यांनी म्हटले आहे. या

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधी वरून खर्गे – पवार वाद; पण कुणी कुणाचा, का केला विश्वासघात??

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी वरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे नेमका कुणी कुणाचा, का केला विश्वासघात??

एकनाथ शिंदे म्हणाले, अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण नाराजीचे खरे कारण अजितदादांच्या राष्ट्रवादीला झुकते माप??

महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदांच्या वादावर सातारा जिल्ह्यातील दरेगावी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना नेत्यांनी अपेक्षा बाळगण्यात गैर काय??, पण त्यामुळे सवाल निर्माण झाला, की अजितदादांना झुकते माप दिले म्हणून एकनाथ शिंदे यांचे मंत्री नाराज झाले का??

Uday Samant शिवसेनेतल्या “नव्या उदयाचा” प्लॅन फसला की भाजपने “विजय” दारातच अडवला??

महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये पालकमंत्री पदाच्या वाटपाचा विषय चिघळल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा खुलासा समोर आला. महाराष्ट्रात म्हणे शिवसेनेत “नवा उदय” करायचा प्लॅन होता, पण तो फसला, पण त्याच वेळी भाजपने “विजय” दारातच अडवला अशीही बातमी उघड्यावर आली.

Congress विजय वडेट्टीवारांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा; पण काँग्रेसला अजूनही मर्मावर घाव का घालता येईना??

विजय वडेट्टीवार यांनी वाचला महायुतीतल्या संघर्षाचा पाढा, पण त्यांच्या काँग्रेसला अजूनही पराभवातून सावरून मर्मावर घाव का घालता येईना??, असा सवाल वडेट्टीवार यांच्याच वक्तव्यामुळे समोर आला आहे.

Fadnavis

फडणवीस सरकारला ग्रासले Problem of plenty ने; पालकमंत्री पदाच्या वादाने त्यावर कळस ठेवले!!

देवेंद्र फडणवीस सरकारला Problem of plenty ने ग्रासले आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने सरकार चालायला हवे होते, तसे ते चालत नसल्याचा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी चालवला आहेच, पण महाराष्ट्राच्या ज्या मतदारांनी भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है नॅरेटिव्हनुसार पुढाकार घेऊन मतदान केले,

Nawab Malik

Nawab Malik : बीड प्रकरणावरून नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर; राज्यात पक्ष आणि पक्षनेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचे नाही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी भाषण करताना बीड प्रकरणावरून पक्षाला घरचा आहेर दिला. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे

Dhananjay Munde

Dhananjay Munde : शिर्डीत धनंजय मुंडे म्हणाले- मला ठरवून टार्गेट केले जातंय; पण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे.

Nitesh Rane

Nitesh Rane : नीतेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर पलटवार- या हिरव्या सापांना दूध पाजणारे मातोश्रीवर वावरतात, बांगलादेशी घुसखोरांनाही इशारा

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये शनिवारी रात्री उशीरा अटक केली. ठाण्यातील कासारवडवली येथून त्याला ताब्यात घेतले. हा आरोपी बांगलादेशचा असल्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यावरून बांगलादेशींविरोधात आक्रमक मोहिम राबवण्यात येईल,

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले- येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा विचार पोहोचवा

येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले. योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्यास सुरुवात केली पाहिजे,

Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- मोठ्या नेटवर्कने संतोष भैय्याचा जीव घेतला; खंडणी, अपहरण, बलात्कार, चोरीसाठी वेगळ्या टीम; सर्वांना सांभाळणारा एक

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी भाषण केले.

Aditi Tatkare

Aditi Tatkare : रायगडच्या पालकमंत्री पदावर अदिती तटकरेंची निवड; मंत्री भरत गोगावलेंचे समर्थक आक्रमक, 32 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. त्यानंतर अनेकांना पालकमंत्री पद मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना न मिळाल्याने नाराजीचे सुर उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे रायगडचा पालकमंत्री म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते व रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची निवड होणार अशी चर्चा होती, पण त्यांना वगळण्यात आले आहे

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात