भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.
राज्य सरकारने सरकारी योजनांतील बोगस लाभार्थ्यांचा मुद्दा कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एक गोल्डन डेटा तयार केला आहे. या डेटामध्ये राज्यातील सर्वच नागरिकांची इत्यंभूत माहिती अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सरकारला भविष्यातील कोणत्याही योजनेसाठी वेगळा सर्व्हे करण्याची काहीच गरज उरणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ कार्यक्रम
अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जी स्वबळाची उबळ आणली, तिच्या मागे ताकद नाही, त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात त्यांना भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!, हीच दोन प्रमुख कारणे दिसतायेत. बाकी मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाला फारशी संधी नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जे थोडेफार राजकीय अस्तित्व उरले आहे, ते जिल्हा परिषदांमध्ये, निवडक कारखान्यांमध्येच!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : ST employees strike : यंदाच्या दिवाळीच्या सणासमयी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी […]
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा सध्या संपूर्ण राज्यात तीव्र निषेध केला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी उघड उघड नाराजी व्यक्त केली तर काहींनी यावर पडळकरांना खडे बोल देखील सुनावले.
भाजपच्या सत्तेच्या वळसणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली असल्याचे आज दिसून आले. पण त्याच वेळी मागच्या दाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी केल्याचा डावही समोर आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या गोपीचंद पडळकर यांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला!!, असे आज गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील अशा रंगलेल्या सामन्यात घडले.
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला जावे. शासनाने त्यांना तिथे नोकरी शोधून द्यावी. मात्र, गावातील ओबीसीच्या अन्नात माती मिसळू नये, अशी खोचक टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना केली.
मराठा समाज संपूर्ण देशात विखुरलेला आहे. त्यामुळे लवकरच करोडो समाजबांधवांना घेऊन दिल्लीला जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. गुरुवारीते आंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलत होते. हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे आभार मानले. न्यायदेवता गोरगरिबांसाठी काम करते. देशात लोकशाही जिवंत आहे, असे जरांगे यावेळी म्हणाले.
आरक्षण प्रश्नावर सामंजस्य हवे असे सांगणारे शरद पवार दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला का आले नाही, असा सवाल ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
साहेब खडे, तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!, अशाच शब्दांनी शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीचे वर्णन करावे लागेल. शरद पवारांनी नाशिक मध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबिर घेतले.
पुणे : Gajanan Bhaskar Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे (वय ७८) यांचे काल सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन […]
विशेष प्रतिनिधी सांगली : Gopichand Padalkar : महाराष्ट्र, हे पुरोगामी राज्य म्हणून गौरवले जाते, जिथे राजकीय संस्कृतीत वैचारिक मतभेद आणि टीकाटिप्पणी ही नेहमीच राजकारणाचा भाग राहिली […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे महाराष्ट्र शासन आणि ‘नाम फाऊंडेशन’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. नगर विकास मंत्री म्हणून […]
बीडमध्ये देखील रेल्वे सेवा सुरू व्हावी या मागणीला यश आले असून गेल्या अनेक दशकांपासूनचे बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आजपासून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावण्यास सुरू झाली आहे.
अनेक वर्षांची प्रतीक्षा, तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सामाजिक वीण दुबळी होत असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारला रास्त तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. सध्या दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणालेत.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती, ती आता नव्याने सुरू होणार आहे.
राज्य शासनाने मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला अध्यादेश रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समााजाच्या वतीने बुधवारी कळमनुरीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मराठवाड्यातून ओबोसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. आता मनोज जरांगे यांनी राजधानी दिल्लीत जाणार असल्याची घोषणा केली आहे.
शरद पवार + सुरेश कलमाडी भेटीने (न मिळालेल्या) पंतप्रधान पदाच्या चर्चेला उजाळा; दोन्ही नेत्यांमध्ये nostalgic चर्चा!!, ही राजकीय घडामोडी आज पुण्यात घडली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते. त्यामुळे तुम्ही उगाचच दावा करू नका. केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नसतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरेंना लगावला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबईत आयोजित केलेल्या ‘विजय संकल्प मेळाव्या’तून भाजपने मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App