प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत भव्य जनजाती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर आजपासून ४ दिवस नाशिक, संभाजीनगर दौऱ्यावर, महिला कायदे अंमलबजावणीसंबंधी सरकारी बैठकांचा धडाका!!
काही दिवसांत त्यांचे लग्न होणार होते. विशेष प्रतिनिधी पुणे : Shirish More महाराष्ट्रातील पुणे येथील तीर्थक्षेत्र देहू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : बीड जिल्ह्यातल्या राजकीय साठमारीत आज आष्टी मध्ये अवतरली होती बॉलीवूड मधली, ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रे. या सगळ्यांची जुगलबंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेत उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणीवर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
तत्कालीन शिंदे सरकारमध्ये धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना राज्यात ५ हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर विद्यमान कृषिमंत्री माणिकराव काेकाटे यांनीही ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचे मान्य केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन पर्व प्रदेश कार्यशाळेत भाजपचे जे आमदार गैरहजर होते त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे समोर आले आहे. मुंबई येथे प्रदेश कार्यशाळेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी भाजप पक्षातील संघटन कौशल्यावर भाष्य केले, मात्र दुसरीकडे याच पक्षातील काही आमदार कार्यक्रमात अनुपस्थित असल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत MAITRI 2.0 (Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell) च्या http://maitri.maharashtra.gov.in या नूतनीकृत पोर्टलचे लोकार्पण केले. राज्यातील गुंतवणूकदारांना उद्योगासंबंधी परवाने, मंजुरी आणि आवश्यक सेवा सुलभ करण्यासाठी हे पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
राजीव गांधींच्या 21व्या शतकाच्या भाषणबाजीची लक्ष्मण कार्टूनने उडवली खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितली कहाणी!!
उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला. त्यापाठोपाठ गुजरात सरकारने देखील त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली. त्या संदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त चौंडी (जि.अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५.०० यावेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली.
महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने मराठी भाषेचे काटेकोर पालन करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. जर कोणी राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी गेला तर त्याला फक्त मराठी भाषेत बोलावे लागेल.
गोदातटीच्या माहेरवाशीणीचा गौरव करण्याची अप्रतिम संधी लवकरच नाशिककरांना मिळणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांचा नाशिकमध्ये गुरुवारी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
देशातील 5 राज्यांमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात त्यांची संख्या 149 झाली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे.
पुण्यात विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांचा सत्कार झाला. या संमेलनाला राज ठाकरेंनी उपस्थित रहावं अशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांना गळ घातली होती
मराठी भाषेसाठी जे-जे आम्ही करू त्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे. पण तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल करू नका.
गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेली गोदावरी संवर्धन परिषद नाशिक मध्ये यशस्वी पार पडली. यावेळी गोदावरी खोरे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गोदावरी आणि पर्यावरणवादी यांनी गोदावरी नदीच्या समस्या मांडून त्यावर मंथन केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.
तुमची भावकी टक्केवारी घेऊन पैसे खाते, अशी तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी, राज्य मत्स्यव्यवसाय विभागाने शुक्रवारी सूचना जारी केल्या. राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारी करणाऱ्या प्रत्येक खलाशासाठी विभागाने क्यूआर कोड असलेले आधार कार्ड बाळगणे अनिवार्य केले आहे.
देशाच्या विविध भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान, महाराष्ट्रातील मालेगावमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्रे बनवणाऱ्या एका तहसीलदार आणि एका नायब तहसीलदाराला निलंबित करण्यात आले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याच्या मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारने रचलेल्या कथित कटाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले.
भाजपला 2014 मध्ये 122 त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना 132 जागा मिळाल्या हे समजू शकतो. मात्र अजित पवार यांना 42 जागा कशा मिळाल्या? यावर कोणाचा तरी विश्वास बसू शकतो का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला. स्वत:च्या घरात झालेल्या पराभवाचा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांसारखे पहाटे 5 वाजल्यापासून कामाला लागले पाहिजे, असा सल्ला देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना दिला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App