भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.
विरोधकांनी मतदार याद्यांवर तीव्र आक्षेप घेऊन निवडणुकीच्या विरोधात वातावरण निर्मिती केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सरकारने 21 महत्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यातल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांमध्ये लक्ष घातले. या प्रकल्पांमध्ये नेमके काय अडथळे आहेत
\ महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने सोमवारी सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांची वकिलीची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करून त्यांना जोरदार झटका दिला. असीम सरोदे हे सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. पण आता त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या प्रकरणात कोणताही युक्तिवाद करता येणार नाही.
मविआकडून ठरवून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. त्यासाठी निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. मविआमधील अनेक नेत्यांच्या मतदारसंघात ते जितक्या मतांनी निवडून आले त्या पेक्षा जास्त मुस्लिम दुबार मतदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे. तर ठाकरे बंधूंना केवळ हिंदू दुबार मतदार दिसले असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी थेट फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली आहे. मृत डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजूनही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रूपात अडकले आहेत? असा सवाल महाजन यांनी विचारला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले की, मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. या वादग्रस्त विधानामुळे सुर्वे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला आयते कोलित दिले आहे, तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी हवा मिळून मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील घर देखील समाविष्ट आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ₹३,०८४ कोटी असल्याचा अंदाज आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी तो उतरत होता. चालत्या ट्रेनमधून उतरण्याची चूक त्याने केली आणि तो पडला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये सापडून अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले परंतु, त्याचा मृत्यू झाला.
ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीने दिली भाजपला संधी; आशिष शेलारांनी वाचली मुस्लिम दुबार मतदारांची यादी!!, असे आज घडले. त्यामुळे Vote chori विरुद्ध Vote jihad असा नवा डाव खेळायला सुरुवात झाली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारजी, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का?”
प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी त्यांच्या शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, राज्यभरात त्यांच्या आंदोलनाची प्रशंसा करण्याऐवजी बदनामी अधिक केली जात आहे आणि ‘आम्ही मॅनेज झालो’ असे बोलणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल त्यांनी केला आहे.
काकाला चुलीत घालायला पुतण्या तयार; “पवार संस्कारांची” दिसायची राहिली होती हीच किनार!!, असं म्हणायची वेळ शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडिया पोस्ट मुळे आली.
शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसकट ठाकरे बंधू मुंबईच्या सत्याच्या मोर्चात; पण देवेंद्र फडणवीस मात्र बिहार निवडणुकीच्या प्रचारात!!, असे आजच्या दिवसभरातले राजकीय चित्र राहिले पण त्यातले अर्धेच चित्र मराठी माध्यमांनी दाखविले.
महाराष्ट्रातल्या मतदार याद्या शुद्धीकरणासाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या सत्याच्या मोर्चात शरद पवार त्यांच्या वयोमानानुसार चालले नाहीत, पण ते त्या मोर्चाच्या सभेत मात्र सामील झाले. या मोर्चाचे मुख्य भाषण खुद्द त्यांनीच केले.
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि मनसे यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात भाजपने मुंबईत मूक आंदोलन केले. पण त्या आंदोलनाकडे भाजपच्याच प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले.
सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंवर फोकस; त्यांच्या मागे पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची फरफट!!, असे एक राजकीय चित्र आजच्या मुंबईतल्या सत्याच्या मोर्चातून पुढे आले.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत करण्यात येणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन, राज्याचे पोलिस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, हा संपूर्ण तपास एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून केला जाईल, जेणेकरून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून अजितदादा करताहेत गेमा; वेळीच सावध व्हा!!, असं म्हणायची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजकीय करतुतीने आली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सध्याच्या कार्यकारिणीच्या काही सदस्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विधान परिषदेतील आमदार संदीप जोशी यांनी काल पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळले असून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.
मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढत आहेत. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू दीर्घकाळानंतर एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पोहोचणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते झाला. शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीपूजन आणि मोळी टाकून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. पारंपरिक संगीत, शेतकऱ्यांचा उत्साह आणि कारखान्याच्या परिसरात उभा असलेला गजबजलेला माहोल यामुळे संपूर्ण परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य करत राज्याच्या आर्थिक आणि कृषी धोरणांबाबत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App