नेपाळमध्ये जनरेशन झेडच्या आंदोलनाने ओली सरकारचा पाडाव केला आणि संपूर्ण देश हादरला. भारतातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र तज्ज्ञांच्या मते भारतीय तरुणाईची मानसिकता, सामाजिक रचना आणि संस्थात्मक ताकद यामुळे नेपाळसारखा उठाव भारतात होणे जवळपास अशक्य आहे.
नेपाळच्या राजकारणात इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवक रस्त्यावर उतरले आणि अवघ्या काही दिवसांत देशाचे राजकीय समीकरण पालटले. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल या दोघांनी जनआंदोलनासमोर झुकून राजीनामा दिला. या नाट्यमय घडामोडींच्या केंद्रस्थानी दोन चेहरे झळकत आहेत: काठमांडूचे महापौर बलेंन शाह आणि ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे संस्थापक सुधान गुरूंग.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकत्याच झालेल्या ब्रिक्स (BRICS – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) देशांच्या बैठकीत जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, काही देशांनी उभारलेल्या टॅरिफ युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेला मोठा फटका बसतोय आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण होतेय.
देशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा सादर केला आहे.
ट्रम्प यांचा ५०% टॅरिफ लागू झाल्यानंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करारांवर चर्चा वेगवान केली आहे. युरोपियन युनियन (EU) ची टीम व्यापार चर्चेसाठी ८ सप्टेंबर रोजी दिल्लीत आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल १२ सप्टेंबर रोजी एफटीएवरील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ईयूच्या व्यापार आयुक्तांना भेटतील.
आज 9 सप्टेंबर 2025 सरकारे कोसळण्याचा दिवस ठरला. फ्रान्स आणि नेपाळ या दोन देशांमधली सरकारे आज एकाच दिवशी घरी जाऊन बसली.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) मधील फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले आहे. जपानी माध्यमांनी एनएचकेने हे वृत्त दिले आहे.
कॅनडाच्या सरकारने कबूल केले आहे की खलिस्तानी दहशतवादी संघटना देशाच्या भूमीवर सक्रिय आहेत. त्यांना कॅनडामध्येही निधी मिळत आहे. त्यांचे उद्दिष्ट नवीन राजकीय व्यवस्था निर्माण करणे किंवा हिंसाचाराद्वारे विद्यमान व्यवस्था बदलणे आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, १ लाख लोक गाझा शहर सोडून गेले आहेत. जेरुसलेममध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, हमास लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करता येईल. इस्रायली पंतप्रधानांच्या मते, हमासने महिला आणि मुलांना गोळ्या घालून रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या फॅक्ट चेक फीचरने ट्रम्प सल्लागार पीटर नवारो यांच्या भारताने रशियन तेल खरेदी केल्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे.
पाकिस्तान पुन्हा एकदा बाॅम्बस्फाेटाने हादरले असून बाजौर जिल्ह्यातील खार तालुक्यातील कौसर क्रिकेट मैदानात शनिवारी संध्याकाळी सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून मुलांसह अनेक प्रेक्षक जखमी झाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांच्या मृत्यूच्या अफवांची खिल्ली उडवली. ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या.
शुक्रवारी भारताविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर सुमारे १२ तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला. व्हाईट हाऊसमध्ये सायंकाळी ६ ते ७ वाजता पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले – ‘मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास मी नेहमीच तयार आहे.’
अमेरिका आता एवढी powerfull उरलेली नाही, पण इजराइलने चालवण्या इतपत ती दुबळी झालीय का??, असा सवाल विचारायची वेळ एका अमेरिकन पत्रकार आणि विश्लेषकाच्या वक्तव्यामुळे समोर आली. Rick Sanchez
ब्रिटनच्या उपपंतप्रधान अँजेला रेनर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक माध्यमांनुसार, त्यांनी कबूल केले की, त्यांच्या नवीन घरासाठी मालमत्ता कर भरताना त्यांनी चूक केली होती आणि त्यांनी निर्धारित करापेक्षा कमी कर भरला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारताविरुद्धच्या त्यांच्या विधानावरून सुमारे १२ तासांत माघार घेतली. संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले – मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन. मी भारताशी संबंध पुन्हा स्थापित करण्यास नेहमीच तयार आहे.
शुक्रवारी ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना अमेरिकेचे उद्योग सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी २५% अतिरिक्त कर रद्द करण्यासाठी भारतावर तीन अटी घातल्या. ते म्हणाले की, भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे लागेल, ब्रिक्सपासून वेगळे व्हावे लागेल आणि अमेरिकेला पाठिंबा द्यावा लागेल.
माजी थायलंड पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा हे देश सोडून त्यांच्या खासगी विमानाने दुबईला गेले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची माहिती दिली. थायलंड न्यायालय ९ सप्टेंबर रोजी थाकसिन यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात निकाल देणार आहे.
अमेरिकेला एक ट्रम्प नाही पुरला म्हणून दुसरा पुढे आला; भारत अमेरिकेला sorry म्हणेल, असा त्याने दावा केला!! ट्रम्प प्रशासनाचे डोके फिरलेले आहे असेच म्हणायची वेळ वेगवेगळ्या दाव्यांमुळे आली.
भारताबरोबर टेरिफ युद्ध सुरू केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाउंट वर सत्य बोलले, पण ते अर्धसत्य ठरले!! 5 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेतत गमावले. त्यांचे संबंध तिथे तरी दीर्घकाळ चांगले राहोत, असे लिहिले.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी ट्रम्प यांना सांगितले की, ‘तुम्ही भारत किंवा चीनशी अशा प्रकारे बोलू शकत नाही.’ ते म्हणाले की अमेरिका अधिक टॅरिफ आणि निर्बंध लादून या देशांवर दबाव आणू इच्छित आहे. बुधवारी चीनच्या विजय दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुतिन यांनी ट्रम्प प्रशासनावर आशियातील दोन सर्वात मोठ्या शक्तींना कमकुवत करण्याचा आरोप केला.
भारताबरोबर टेरिफ युद्ध मांडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या CEO गाला डिनर पार्टीत भारतीय कम्युनिस्ट दिग्गज नेत्याचा बडा भांडवलदार पुतण्या सामील झाला होता, पण त्याकडे भारतीय माध्यमांचे किंवा जागतिक माध्यमांचे नेमकेपणाने लक्ष गेले नाही.
गेल्या २३ महिन्यांपासून इस्रायली हल्ल्यांमुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझाला दुबईसारखे पर्यटन आणि आर्थिक स्थळ बनवण्याची योजना समोर आली आहे.
मंगळवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या एका बोटीवर हल्ला केला, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी खुलासा केला आहे की ट्रम्प यांनी स्वतः बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.
अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलीयेव यांनी भारतावर पाकिस्तानशी असलेल्या अझरबैजानच्या जवळीकतेचा जागतिक व्यासपीठांवर बदला घेतल्याचा आरोप केला आहे. सोमवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी हे विधान केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App