राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
व्होट चोरी’चा गाजावाजा करून निवडणूक आयोगावर बोट ठेवणारे राहुल गांधी आता स्वतःच वादात अडकले आहेत.
व्होट चोरी’चा गाजावाजा करून निवडणूक आयोगावर बोट ठेवणारे राहुल गांधी आता स्वतःच वादात अडकले आहेत.
दिल्लीत, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईओ) ज्ञानेश कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बुधवारी बैठक सुरू आहे. यामध्ये, देशभरातील मतदार यादीचे विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) म्हणजेच मतदार पडताळणी करण्याच्या तयारीवर चर्चा केली जात आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतदान चोरीचा आरोप करून संपूर्ण देशात जी राजकीय राळ उडवून दिली आहे, त्या मतदान चोरीचे डिजिटल धागेदोरे म्यानमार मध्ये आढळले आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर संशयाचे वारे फिरले आहे.
याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!, असला प्रकार अमेरिकेतल्या दोन नामवंत विद्यापीठांमधून समोर आलाय. एकीकडे अमेरिकेतले ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध अतिरेकी भूमिका घेऊन भारतावर ट्रम्प टेरिफ लादलेय. टेरिफच्या लढाईत भारत अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलेय. पण त्याचवेळी अमेरिकेतल्या दोन विद्यापीठांमध्ये भारतातल्या भांडवलशाही विरोधात fake narrative पसरविणाऱ्या कार्यशाळा आयोजित केल्या जाताहेत. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी बर्कले विद्यापीठाच्या स्टीफन सेंटर मध्ये ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी सुषिला कार्की नेपाळचे नेतृत्व करणार आहेत.
जम्मू–कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारतीय जवानांनी दिलेल्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर भारत–पाकिस्तान आशिया कप टी-20 सामना (१४ सप्टेंबर, दुबई) रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात झाली आहे. या संदर्भात उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार विधी विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार वाटाघाटी आणि जकातींवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की वॉशिंग्टन आणि दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या चर्चा लवकरच चांगल्या निष्कर्षापर्यंत पोहोचतील असा त्यांना विश्वास आहे. ट्रम्प म्हणाले की, येत्या आठवड्यात ते सर्व प्रकारचे व्यापार अडथळे दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘राज्यातील बंगाली हिंदूंनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत (सीएए) अर्ज केलेला नाही कारण त्यांना खात्री आहे की ते भारतीय नागरिक आहेत.’ते म्हणाले- बंगाली हिंदूंना परदेशी मानण्याचे कोणतेही कारण नाही, कारण ते १९७१ च्या आधी येथे आले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांना १९७१ मध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांनी कधीही असे म्हटले नव्हते की त्यांना परत पाठवले जाईल.
भारताचा “नेपाळ” करायचा लिबरल लोकांनी डाव आखला; पण नाही करू शकले मोदी सरकारचा केस देखील वाकडा!!, अशीच अवस्था नेपाळ आणि भारतातल्या दोन दिवसांमध्ये घडामोडींनी दिसली.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने बुधवारी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला सिम कार्ड पुरवल्याबद्दल एका नेपाळी नागरिकाला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपी प्रभात कुमार चौरसियाला दिल्लीतील लक्ष्मी नगर येथून अटक करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीत बिहारमधील ७६१६ कोटींच्या गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
विरोधक नुसतीच करत राहिले रिटायरमेंटची चर्चा; पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना नव्या संकल्पासह दिल्या 75 च्या शुभेच्छा!
जागतिक रेटिंग एजन्सी फिचने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ६.५% वरून ६.९% पर्यंत वाढवला आहे. देशांतर्गत मागणी आणि मजबूत आर्थिक क्रियाकलापांमुळे हा बदल झाला आहे.
नेपाळ मधली सत्ता उखडली जाताच नेपाळचे माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी भारताविरुद्ध गरळ ओकले, पण त्याच वेळी नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी नेपाळच्या महाराजांचा फोटो लावून देशाला संबोधित केले.
राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मंजुरीची डेडलाइन मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी नेपाळ बंडाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपल्या संविधानाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, शेजारील देशांमध्ये काय चालले आहे ते पहा. आपण ते नेपाळमध्ये पाहत आहोत.”
मंगळवारी कतारची राजधानी दोहामध्ये अनेक मोठे स्फोट ऐकू आले. इस्रायली सैन्याने हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करून हवाई हल्ले केल्याची घोषणा केली.हा हल्ला हमास प्रमुख खलील अल-हय्या यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-हय्या या हल्ल्यात बचावले, तर इतर ६ जणांचा मृत्यू झाला.
नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही सरकारविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत. बुधवारी बजेट कपातीविरोधात आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी १ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेट नुसार शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले. यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करत आज त्याची बैठक देखील पार पडली. ही बैठक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मंत्री छगन भुजबळ हे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याची टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी केली. छगन भुजबळ महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते. आता ते सरकारलाच घातक ठरत असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात टाका, असे ते म्हणालेत.
ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या जीआरवर आपला संताप व्यक्त केला. सरकारने कुणबी नोंदी संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार आहे. विशेषतः मागील 20 वर्षांत ओबीसी समाजाला फार कमी निधी मिळाला. पण त्या तुलनेत मागील 2-3 वर्षांतच मराठा समाजाला त्याहून कितीतरी जास्त निधी मिळाला, असे ते म्हणालेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने ४० प्रादेशिक पक्षांचा उत्पन्न अहवाल प्रसिद्ध केला आहे. या पक्षांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २५३२.०९ कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले आहे. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक, सुमारे १७९६.०२४ कोटी रुपये निवडणूक रोख्यांमधून आले आहेत.
नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की उद्या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होतील. त्यांच्या नावावर एकमत झाले आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशीला कार्की यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९७९ मध्ये कायद्याची कारकीर्द सुरू केली.
ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच दिवसात ४०% पेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे, त्यांची एकूण संपत्ती सुमारे ९ लाख कोटींनी वाढली, जी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीच्या जवळपास आहे.
भारतावर अमेरिकी पाठोपाठ युरोपियन युनियन अर्थात EU ने पण ज्यादा टेरिफ लादावेत अशी धमकी ट्रम्प प्रशासनाने दिली. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधानांशी चर्चा केली.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुसऱ्यांदा शिवतीर्थावर गेले. त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा रंगली.