मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर कार्यवाही केली नाही, तर जून महिन्यात पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणाच्याही विनंतीकडे लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संबंधित मंत्र्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक असून, नव्या समितीच्या माध्यमातून प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.