विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारत आणि चीन या देशां मधील संघर्ष अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये युद्ध झाले. यामध्ये चीनने भारतीय सैनिकांवर वेगवेगळ्या आधुनिक शस्त्रांचा वापर करून हल्ला केला होता. या मध्ये बरेच भारतीय सैनिक जखमी झाले आहेत.
Inspired by conventional weapons, India developed new modern weapons to fight against China
तारांचे आवरण असलेल्या काठय़ांसह चीनने अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला होता. ही शस्त्रे वापरण्याचा उद्देश हा होता की, सैन्याला फक्त जखमी करून सोडणे. त्यांचा जीव घेणे हा उद्देश न्हवता. त्यामुळे भारताने देखील यावर आता एक नवी युक्ती शोधून काढली आहे. नव्या शस्त्रास्त्र निर्मितीमुळे भारतीय जवानांना आता शत्रूशी दोन हात करताना बरीच मोठी मदत मिळणार आहे. नवीन विकसित करण्यात आलेली शस्त्रे ही भगवान इंद्राचं शस्त्र वज्र आणि भगवान शंकरांचे शस्त्र त्रिशूळ यांच्यापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहेत.
Indian diaspora shouts “Shame on China” at protest against China’s expansionist policies outside Chinese Embassy in London.
अँपस्रोन कंपनीद्वारे ही शस्त्रे बनवण्यात आली आहेत. या कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कुमार मोहिते यांनी सांगितले आहे की, गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर ताऱ्यांच्या काठ्यांचा आणि टेसर्स यांचा वापर केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी देखील अशाप्रकारे जीव घेणार नाही पण शत्रूला जखमी करून सोडण्यात येईल अशी शस्त्रे बनवण्यावर भर दिला आहे.
A UP-based firm has developed non-lethal weapons inspired by traditional Indian weapons for security forces Security forces asked us to develop non-lethal weapons after the Chinese used wired sticks, tasers against our soldiers in Galwan clash: Mohit Kumar, CTO, Apastron Pvt Ltd pic.twitter.com/5rOinDuGIK — ANI (@ANI) October 18, 2021
A UP-based firm has developed non-lethal weapons inspired by traditional Indian weapons for security forces
Security forces asked us to develop non-lethal weapons after the Chinese used wired sticks, tasers against our soldiers in Galwan clash: Mohit Kumar, CTO, Apastron Pvt Ltd pic.twitter.com/5rOinDuGIK
— ANI (@ANI) October 18, 2021
पुढे ये असे म्हणाले, तर भारतातील पारंपरिक शस्त्रास्त्रांकडून प्रेरणा घेऊनच आम्ही नवीन शस्त्र विकसित केली आहेत. जी चीनच्या शस्त्रांपेक्षा अधिक घातक आहेत. खिळ्यांचा वापर करून धातूच्या काठ्या बनवल्या आहेत. याचा उपयोग असा होईल की शत्रूवर आक्रमक हल्ला केला तर शत्रू सैनिकांच्या बुलेटप्रूफ वाहनाचे टायर पंक्चर करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहेत. अशी माहितीदेखील कुमार मोहित कुमार यांनी या वेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App