Bangladesh : भारताच्या कारवाईनंतर बांग्लादेश आक्रमक; भारतीयांसाठी व्हिसा सेवा तात्पुरती स्थगित

Bangladesh

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Bangladesh  भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत असताना बांग्लादेशने प्रत्युत्तरात्मक पाऊल उचलले आहे. नवी दिल्लीतील बांग्लादेश उच्चायोगाने सोमवारी भारतातील नागरिकांसाठी कांसुलर तसेच व्हिसा सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. आजतकशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, बांग्लादेशचे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.Bangladesh

भारताने आधीच व्हिसा सेवा रोखल्या होत्या

यापूर्वी भारताने बांग्लादेशच्या दक्षिण-पूर्वेकडील बंदर शहर चटगांव येथील इंडियन व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरमधील व्हिसा सेवा पुढील आदेशापर्यंत थांबवल्या होत्या. शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. हादी हे मागील वर्षी शेख हसीना यांना सत्तेतून हटवणाऱ्या आंदोलनातील प्रमुख नेते होते.Bangladesh



बांग्लादेशने निर्णय का घेतला?

बांग्लादेश उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अपरिहार्य परिस्थितीमुळे नवी दिल्लीतील मिशनकडून दिल्या जाणाऱ्या सर्व कांसुलर आणि व्हिसा सेवा पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात येत आहेत.” या निर्णयामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल उच्चायोगाने खेदही व्यक्त केला आहे.

सुरक्षा कारणांमुळे भारताची भूमिका

चटगांवमध्ये भारतीय व्हिसा सेवा स्थगित करण्याचा भारताचा निर्णय त्या घटनेनंतर घेण्यात आला, ज्यामध्ये बांग्लादेशच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरात असलेल्या भारतीय सहायक उच्चायोगाच्या (AHCI) बाहेर मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

निदर्शकांकडून हिंसाचाराची धमकी

सूत्रांच्या माहितीनुसार, निदर्शकांनी राजशाही येथील इंडियन व्हिसा सेंटरमध्ये रक्तपाताची धमकी दिली होती. गरज पडल्यास शस्त्रे उचलण्याचीही भाषा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय प्रशासनाने स्पष्ट केले की, चटगांव येथील भारतीय सहायक उच्चायोगात घडलेल्या अलीकडील सुरक्षा घटनेमुळे 21 डिसेंबर 2025 पासून तेथील व्हिसा सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील.

या घडामोडींमुळे भारत–बांग्लादेश संबंध आणखी तणावपूर्ण झाले असून, पुढील काळात दोन्ही देश काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bangladesh Suspends Visa Services Indians High Commission Tensions Photos VIDEOS Report

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात