विशेष प्रतिनिधी
मुंबई : ST employees strike : यंदाच्या दिवाळीच्या सणासमयी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या संघटनेचे नेतृत्व करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (अध्यक्ष) आणि आमदार सदाभाऊ खोत (कार्याध्यक्ष) यांनी सरकारला मागण्या मान्य न केल्यास आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील MSRTC मुख्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन आणि धरणे आंदोलन केले जाईल, असे संघटनेने जाहीर केले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
वा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने खालील मागण्या शासनाकडे ठेवल्या आहेत:
या मागण्यांवर शासनाने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा कर्मचारी आक्रमक पवित्रा घेतील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
स्थावर मालमत्तेचा मुद्दा
महामंडळाच्या स्थावर मालमत्तेचा (MSRTC Properties) वापर उद्योगधंद्याच्या धर्तीवर करावा किंवा ती शासनात विलीन करावी, अशी मागणीही संघटनेने लावून धरली आहे. यामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.
आंदोलनाची तयारी
28 सप्टेंबरपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, 1 ऑक्टोबरपासून मुंबईतील MSRTC मुख्यालयासमोर सर्व स्तरांवरील कर्मचारी धरणे आंदोलन करतील. शासनाने या मागण्यांवर वेळेत निर्णय न घेतल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यास प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शासन आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चेतून लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App