15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा चव्हाण + पवारांचा निर्णय 1988 पासून लागू; पण 2025 मध्ये आव्हाड + राऊतांनी उकरून काढला वाद!!

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये झाला. त्यानंतर तो मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी यावर्षीपासून कायम ठेवला. पुढच्या सरकारांनी सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. 2025 मध्ये अचानक जितेंद्र आव्हाड + संजय राऊत आणि बाकीच्या विरोधकांनी हा वाद उकरून काढला.

स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवावेत. मांस विक्री बंद ठेवावी, असे आदेश वेगवेगळ्या महापालिकांनी काढले. मात्र, त्यावरून ब्राह्मणवादाचा वाद उकरून काढत जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्यावर टीका केली. त्यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे संजय राऊत हे देखील सरकारवर शरसंधान साधायला पुढे आले. नेहमीप्रमाणे त्यात संविधान, काय खावे काय खाऊ नये, यासंबंधी लोकांचे अधिकार वगैरे बाबी मिसळल्या. त्यामध्ये अजित पवारांनी विरोधकांच्या बाजूने मत व्यक्त करून वादाला फोडणी दिली, पण फडणवीस सरकारने कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.

या पार्श्वभूमीवर मूळ निर्णयाचा शोध घेतला असता तो निर्णय 12 मे 1988 रोजी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना घेतला गेला होता. त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनी 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवले होते. त्यानंतरच्या सरकारांनी त्या निर्णयाचे पालन केले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील 15 ऑगस्ट 2021 ला कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. त्या मंत्रिमंडळात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही होते. त्यावेळी त्यांनी कत्तलखाने बंद ठेवायला विरोध केला नव्हता.

पण आता 2025 च्या स्वातंत्र्यदिनाआधी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय फक्त फडणवीस सरकारनेच घेतला आहे असे भासवून जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला.

Slaughterhouses closing decision was earlier taken by congress governments

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात