राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळी तरी कुठे लागला दिवा??

Rahul Gandhi,

नाशिक : Rahul Gandhi राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत तरी कुठे लागला दिवा??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेत्याच्या परफॉर्मन्स वरून आली.Rahul Gandhi

वास्तविक लोकसभेतला विरोधी पक्षनेता सर्वाधिक प्रभावी असला पाहिजे. भारताच्या लोकसभेत याची उदाहरणे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासून ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेक दिसली. राम सुभग सिंह, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, सोनिया गांधी, सुषमा स्वराज आदी नेत्यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद प्रभावी भाषणांनी गाजविले. या मोठ्या नेत्यांनी अनेकदा पंडित नेहरू ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासारख्या पंतप्रधानांना वाकविले. अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांना फिरवायला लावले. राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी हे तर एकाच घरातले 3 विरोधी पक्षनेते झाले.



पण राहुल गांधींचा गेल्या वर्षभरातला लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याचा लेखाजोखा पाहिला, तर वर दिलेल्या उदाहरणांमधला मागमूसही त्यांच्यात आढळला नाही. कारण राहुल गांधींनी लोकसभेत सगळ्यात कमी म्हणजे फक्त 16 भाषणे केली. बाकीच्या कार्यक्रमांवर जास्त भर दिला. राहुल गांधींच्या या राजकीय कृतीवर आक्षेप घ्यायचे कारण नाही. पण लोकसभेत कमी भाषणे करणे हे काही चांगल्या विरोधी पक्षनेत्याचे लक्षण नाही, ही देखील वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.

जातनिहाय जनगणनेचा प्रादेशिक पक्षांचा अजेंडा राहुल गांधींनी काँग्रेसचा म्हणून उचलून धरला त्यावर राज्यघटनेचे लाल पुस्तक हातात घेऊन ठिकठिकाणी भाषणे केली. मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे क्रेडिट स्वयंघोषित पद्धतीने स्वतःच घेतले. पण त्यापलीकडे जाऊन प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींनी स्वतःला सिद्ध केले का?, या खऱ्या सवालाचे उत्तर काँग्रेसमध्ये देखील संशोधनाचा विषय ठरला.

राहुल गांधींच्या लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदाला एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांनी आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. त्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरात विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला आलेले अनुभव वेगवेगळ्या लेखांमधून सादर केले. आपण संविधानाची लढाई कशी लढलो देशाच्या अर्थव्यवस्थेवर कशी भाषणे केली नेमके काय बोललो मणिपूर शेतकरी दलित अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या विषयी काय भूमिका मांडली यावर राहुल गांधींनी सविस्तर भाष्य केले. आपले लेख लोकांनी वाचावे असे आवाहन केले.

– ग्राफिक मधली आकडेवारी

पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी जी आकडेवारी सादर केली, त्या आकडेवारीतून त्यांनी संसदीय भाषणे सगळ्यात कमी आणि बाकीचेच कार्यक्रम जास्त केल्याचे उघड झाले. गेल्या वर्षभरात राहुल गांधींनी फक्त 16 संसदीय भाषणे केली. संसदीय भाषणांपेक्षा जास्त म्हणजे 18 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. त्यांनी 16 राज्यांचे दौरे केले. 35 अधिकृत कार्यक्रम केले. 60 पेक्षा अधिक जनसभांना संबोधित केले. 115 जनसंवाद कार्यक्रम केले. ही सगळी आकडेवारी ग्राफिक मध्ये मांडून त्यांनी सोशल मीडिया हँडलवर सादर केली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात प्रभावी भाषणे करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तिथे सगळ्यात कमी भाषणे केली. आणि बाकीचेच कार्यक्रम जास्त केले हे सत्य या आकडेवारीतून समोर आले.

– चुकीचे संदर्भ आणि प्रभावहीन भाषणे

गेल्या वर्षभरामध्ये लोकसभेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे विधेयक waqf सुधारणा कायद्यासंबंधी होते मात्र त्यावरच्या चर्चेला विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी सुरुवात केली नाही, तर त्यांनी लोकसभेतले काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना त्या चर्चेची सुरुवात करायला सांगितले.

राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल लोकसभेत झालेल्या चर्चेची सुरुवात राहुल गांधींनी केली, पण सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखातला चुकीचा संदर्भ देऊन मोदी सरकारवर आणि सावरकरांवर टीका केली. लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून आपण सर्वांत कमी भाषणे केली याची कबुली त्यांनीच आकडेवारीतून दिली, पण जी कमी भाषणे केली, ती तरी खऱ्या अर्थाने किती प्रभावी ठरली?, हा सवाल त्यांना कोणी केला नाही. त्यामुळे त्या सवालाचे उत्तर त्यांनी दिले नाही. पण म्हणून हा सवाल बेमतलब समजायचे कारण नाही.

राहुल गांधींनी लोकसभेत कमी भाषणे केली. ती देखील फारशी प्रभावी ठरली नाहीत. पण त्यापलीकडे जाऊन राहुल गांधींनी जी कार्यक्रम घेतले, ते तरी कार्यक्रम कितपत प्रभावी ठरले? लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा काँग्रेसला काय फायदा झाला?, हा संशोधनाचा विषय आहे.

Rahul Gandhi, a proven most ineffective leader of the opposition in lok sabha as he spoke very less than others

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात