तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं असल्याचंही सांगितलं आहे
विशेष प्रतिनिधी
पाटणा – Tej Pratap Yadav पक्षातून काढून टाकल्यापासून तेजप्रताप यादव सतत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरील त्यांची विधाने चर्चेत येत आहेत. आता पुन्हा एकदा तेजप्रताप यादव यांनी असं काही म्हटले आहे ज्यामुळे बिहारमधील राजकीय गोंधळ वाढताना दिसत आहे. एका मुलाखतीत तेजप्रताप यादव यांनी दावा केला आहे की ‘’लोक त्यांच्याविरुद्ध कट रचत आहेत, कारण त्यांना माहित आहे की ते पुढचे लालू यादव आहेत.’’ Tej Pratap Yadav
तेजप्रताप यादव मुलाखतीदरम्यान उघडपणे म्हणाले, त्यांनी सांगितले की या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीनंतर त्यांचा भाऊ तेजस्वी यादव बिहारचा मुख्यमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना किंगमेकरची भूमिका साकारायची आहे.
याशिवाय तेजप्रताप यादव यांनी असंही सांगितलं की, आता ते आमदार आहेत आणि आता ते मतदारसंघांमध्ये दौरे सुरू करतील. ते जनतेमध्ये जातील आणि त्यांच्या समस्या ऐकतील, त्या सोडवतील. तसेच म्हणाले की ते लवकरच सार्वजनिक दरबार भरवण्यास सुरुवातही करतील.
याचबरोर तेजप्रताप यादव यांनी म्हटले की आपण ६ वर्षांसाठी पक्षाबाहेर आहोत, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःला घरी बांधून ठेवले पाहिजे. आपण आपले काम करत राहिले पाहिजे. पक्षातून काढून टाकल्याच्या प्रश्नावर तेजप्रताप यादव म्हणाले की मला वाईट तर वाटले, खूप वाईट वाटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App