थरूर यांच्यावर भाजपचे सुपर प्रवक्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – Shashi Tharoor सध्या काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नसल्याचेच दिसत आहे. कारण, तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील अलिकडच्या तणावातून हेच सूचित होते. खरंतर, खर्गे यांनी थरूर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की काही लोकांसाठी मोदी आधी येतात आणि देश नंतर.Shashi Tharoor
आता शशी थरूर यांनी यावर एक सोशल मीडिया पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘’पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचे नाही. उडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही.’’ यापूर्वीही अनेक वेळा थरूर यांचे मत पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळे राहिले आहे, त्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टिप्पणी केली होती.
केला. या फोटोवर लिहिले होते, ‘उडण्याची परवानगी मागू नका. पंख तुमचे आहेत आणि आकाश कोणाचे नाही.’
ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरात झालेल्या सर्वपक्षीय बैठकांमध्ये शशी थरूर यांचाही समावेश होता. पक्षात अनेक वेळा विरोधाला तोंड देणाऱ्या शशी थरूर यांना यावेळी उघड विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर भाजपचे सुपर प्रवक्ता असल्याचा आरोपही करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याबद्दल अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
यानंतर थरूर म्हणाले होते की जेव्हा ते जागतिक स्तरावर असतात तेव्हा ते पक्ष आणि इतर सीमांच्या पलीकडे जातात. आरोपांवर थरूर म्हणाले होते की त्यांच्यासाठी देश आधी येतो आणि पक्ष नंतर येतो. द हिंदू वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखानंतर काँग्रेस हायकमांडची त्यांच्याबद्दलची नाराजी वाढल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App