Pakistani Rangers : आणखी दोन पाकिस्तानी रेंजर्स ठार, भारतीय हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची संख्या 13 वर पोहोचली

Pakistani Rangers

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : Pakistani Rangers भारतासोबतच्या अलिकडच्या लष्करी चकमकीत आणखी दोन पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षात आतापर्यंत एकूण १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ही माहिती पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने बुधवारी दिली.Pakistani Rangers

ISPR नुसार, हे दोन्ही सैनिक भारतीय हल्ल्यात जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख हवालदार मोहम्मद नवीद (पाकिस्तानी लष्कर) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ मोहम्मद अयाज (पाकिस्तानी हवाई दल) अशी झाली आहे.



१३ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू

पाक लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांचे हौतात्म्य देशाच्या सामूहिक स्मृतीत नेहमीच राहील आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. मंगळवारी, लष्कराने माहिती दिली होती की भारतासोबतच्या संघर्षात ११ सैनिक ठार झाले आणि ७८ जखमी झाले.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. यानंतर, पाकिस्तानने ८, ९ आणि १० मे रोजी भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष चार दिवस चालला

चार दिवस चाललेल्या या संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तानने शनिवारी संघर्ष संपवण्याचे मान्य केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचा एक भाग म्हणून, भारताने चकलाला येथील नूर खान, शोरकोटमधील रफीकी, चकवालमधील मुरीद, सुक्कुर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, स्कार्दू, भोलारी आणि जेकबाबाद येथील लष्करी प्रतिष्ठाने आणि विमानतळांना लक्ष्य करून पाकिस्तानला नामोहरम करून सोडले.

Two more Pakistani Rangers killed, toll in Indian attack reaches 13

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात