Amit Shah : ‘ममता बॅनर्जींना सत्तेवरून हटवल्यावरच बंगालमधील घुसखोरी थांबेल’

Amit Shah

गृहमंत्री अमित शहांचा जोरदार हल्लाबोल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, बंगालमधील जनता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेवरून काढून टाकेल आणि राज्यात भाजपचे सरकार स्थापन करेल तेव्हा बेकायदेशीर घुसखोरीची समस्या सुटेल. ममता बॅनर्जी सर्वांना सांगत राहतात की बीएसएफ केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तेच आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करतात. म्हणून, घुसखोरीसाठी केंद्राला जबाबदार धरले पाहिजे.Amit Shah



त्यांनी सांगितले की, माझा त्यांना प्रश्न आहे की अशा घुसखोरांचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड कोणी बनवले. हे सर्व मतदार ओळखपत्र उत्तर २४ परगणा जिल्ह्यात बनवण्यात आले आहेत. एका कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या

अमित शहा यांनी स्पष्ट केले की, आगामी बिहार विधानसभा निवडणुका जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. म्हणाले की, विरोधी आघाडी इंडि आघाडीला घुसखोरांमध्ये मतपेढी दिसते.

Amit Shah said infiltration in Bengal will stop only after Mamata Banerjee is removed from power

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात