विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे म्हणाले, ज्यांना उपोषणाला बसायचे आहे तेच सहभागी होतील.
कोणावरही दबाव आणला जाणार नाही. शिवाय, घरच्यांचा विरोध असल्यास कोणीही उपोषणाला बसू नये. उपोषणाची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील मराठा अंतरवालीत येतील.
Maharashtra cabinet expansion : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!
छगन भुजबळ यांच्या मंत्रीपद डावलल्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. तो राजकीय विषय आहे, आरक्षणाचा नाही. मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचे सर्व प्रश्न निकाली काढले जातील, अशी अपेक्षा आहे.
मात्र, सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही आंदोलनासाठी सज्ज आहोत.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App