प्रतिनिधी
मुंबई : आसाम मधील भीमाशंकर आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या मुद्द्यावरून विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगाचा वाद सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने जी भूमिका घेतली होती, की महाराष्ट्रातील भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग मधले आहे. या भीमाशंकरच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात शिंदे – फडणवीस सरकारने विशेष तरतूद केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे यांच्या विकास आणि संवर्धनावर देखील भर देत मोठ्या तरतुदी केल्या आहेत.Maharashtra Budget : large amount allocation for 5 jyotriligas including bhimashankar and other pilgrimage
आसाम मध्ये तिथल्या सरकारने त्यांच्या राज्यातील भीमाशंकरचा उल्लेख सरकारी जाहिरातीत ज्योतिर्लिंग असा केला होता. त्यावरून महाराष्ट्रात विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगासंदर्भात वाद घातला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग खरे असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यावर केवळ शाब्दिक भर देता महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या विकास आणि संवर्धनासाठी आर्थिक वजन ठेवले आहे. विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना फडणवीसांनी याच मुद्द्यावर भर दिला.
त्याचवेळी फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी २० कोटींची तरतूद केली, तर कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान करत श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना जाहीर करण्यात आली.
कोणत्या तीर्थस्थळांसाठी काय तरतूद?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App