वृत्तसंस्था
नवी दिल्ली / सुरजकुंड : गेल्या काही वर्षात देशातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विविध कायद्यांमध्ये सुधारणा करत कठोरता आणली आहे. तपास यंत्रणांच्या कामकाजात देखील वेग आणून सुधारणा केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्याच्या तपास यंत्रणांना एकमेकांबरोबर सहकार्य करून गुन्ह्यांचा तपास वेगाने करणे शक्य झाले आहे. Prime Minister Modi made the states aware of their duty
अर्थात यासाठी सर्व राज्यांनी आपापली कर्तव्य निभावून केंद्रीय आणि राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने हरियाणातील सुरज कुंड येथे आयोजित केलेल्या सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राज्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. गेल्या काही वर्षात केंद्रीय तपास यंत्रणांना अनेक राज्यांमध्ये तपास कामासाठी परवानगीची गरज लागू लागली आहे.
बीते वर्षों में भारत सरकार के स्तर पर कानून व्यवस्था से जुड़े सुधार हुए हैं, जिसने पूरे देश में शांति का वातावरण बनाने का काम किया है। – पीएम @narendramodi pic.twitter.com/1feGquT7WQ — BJP (@BJP4India) October 28, 2022
बीते वर्षों में भारत सरकार के स्तर पर कानून व्यवस्था से जुड़े सुधार हुए हैं,
जिसने पूरे देश में शांति का वातावरण बनाने का काम किया है।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/1feGquT7WQ
— BJP (@BJP4India) October 28, 2022
अनेक राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. यामध्ये राजकीय पक्षांच्या स्थानिक राजकारणाचा मोठा संदर्भ आहे. तसेच राजकीय नेत्यांचे एकमेकांशी असलेले विरोधाचे मुद्दे देखील समाविष्ट आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या तपास यंत्रणा यांच्या सहकार्यावर आणि राज्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यावर भर दिला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App