
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर केलेल्या ताज्या वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हिंदुत्ववाद्यांवर निशाणा साधला. प्रत्युत्तरात भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. Political uproar over Rahul Gandhi’s statement on Hindutva, BJP’s criticism: Anti-Hindu slogans will drive Congress away!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर केलेल्या ताज्या वक्तव्यावरून राजकीय वादंग सुरू झाले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हिंदुत्ववाद्यांवर निशाणा साधला. प्रत्युत्तरात भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
राहुल गांधींचे ट्वीट
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, एका हिंदुत्ववादीने गांधीजींना गोळ्या घातल्या. गांधीजी राहिले नाहीत, असे सर्व हिंदुत्ववाद्यांना वाटते. जिथे सत्य आहे, तिथे बापू जिवंत आहेत! #GandhiForever.”
मुझे समझ नहीं आ रहा है कि इस ट्विट में बापू को श्रद्धांजलि दी गई है या जनाब ने सुबह सुबह हिंदुओं के प्रति अपनी नफ़रत -भड़ास बाहर निकाली है। https://t.co/XuAJDeRIxj
— Tarun Chugh (Modi Ka Parivar) (@tarunchughbjp) January 30, 2022
हिंदुत्वविरोधी मंतर काँग्रेसला करणार छूमंतर : नकवी
राहुल यांच्या या ट्विटवर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, “काँग्रेसचा हा हिंदूविरोधी मंत्र काँग्रेसला छूमंतर करेल. हिंदुत्व हा या देशाचा आत्मा आणि संस्कृती आहे.” त्याच वेळी, यूपीमधील भाजप सरकारमधील मंत्री मोहसीन रझा म्हणाले, “हे फूट पाडणारे लोक आहेत. त्यांनी नेहमीच समाजात फूट पाडली आहे. राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव आहे.”
दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते तरुण चुग म्हणाले, “या ट्विटमध्ये बापूंना श्रद्धांजली वाहिली आहे की त्या व्यक्तीने सकाळी-सकाळी हिंदूंबद्दल आपला द्वेष आणि राग काढला आहे हे मला समजत नाही.”
Political uproar over Rahul Gandhi’s statement on Hindutva, BJP’s criticism: Anti-Hindu slogans will drive Congress away!
महत्त्वाच्या बातम्या
- Pegasus : पेगासस हेरगिरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, नवीन तथ्यांसह एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज
- पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना एक फेब्रुवारीला जाहीर होणार
- शिलाटणे गावाजवळ अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
- आधी पुनर्वसन, मगच धरण; कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी धरणग्रस्तांची सडेतोड भूमिका; काम पडले बंद