याला म्हणतात, तंगडी वर; पाकिस्तानी लष्कराची लघुशंका अमेरिका, चीन आणि तुर्कांवर!!, असे म्हणायची वेळ पाकिस्तानी सैन्य दलांच्या प्रमुखाच्या मुलाखतीने आणली. भारत अशी लढाई करताना पाकिस्तानने कुठल्याही आपल्या देशाची मदत घेतली नाही, असा अजब दावा पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला. ही मुलाखत पाकिस्तानी माध्यमांनी ठळकपणे छापली.Pakistan neither sought, nor received external help during confrontation with India: CJCSC
वास्तविक operation sindoor दरम्यान भारताने पाकिस्तानला अवघ्या आठ तासांमध्ये ठोकले. भारताला 48 तासांच्या आत मध्ये गुडघ्यावर आणू, अशी पाकिस्तानी लष्कराची भारतीय सैन्य दलाने आठ तासांमध्ये पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या घशात घातली. पाकिस्तानातल्या 9 शहरांमध्ये हल्ला करून दहशतवादी अड्डे नष्ट केले. पाकिस्तानातल्या एकूण हवाई दलाच्या क्षमतेपैकी 20 % हवाई दल नष्ट केले.
भारतीय सैन्य दलाने स्वतःहून ठरविलेल्या स्ट्रॅटेजीनुसार पाकिस्तान मध्ये खोलवर घुसून हल्ले केले. या कल्याण मध्ये चिनी बनावटीची विमाने J17 आणि मिसाइल्स, अमेरिकेन बनावटीची विमाने, तुर्की बनावटीचे ड्रोन नष्ट केले. पाकिस्तानच्या अणुबॉम्ब साठ्याला धक्का लावला म्हणून पाकिस्तान गुडघ्यावर आला.
– चिनी विमाने, मिसाईल्स आणि तुर्की ड्रोन नष्ट
भारतीय हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ले केले. त्यासाठी तुर्की ड्रोन आणि चिनी बनावटीची मिसाईल्स वापरली. ती सगळी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी निकामी केली. या सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ भारतीय सैन्य दलाने जाहीरपणे सगळ्या माध्यमांना दाखविले. खुद्द पाकिस्तानने भारताने फक्त 9 ठिकाणी नव्हे, तर 28 ठिकाणी हल्ले केल्याचे मान्य केले. त्याचे तपशील लष्करी अहवालातून समोर आले.
भारताने केलेले हल्ले खूप खोलवर आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हवाई आणि लष्करी क्षमता पूर्ण नष्ट होऊ शकते, हे लक्षात येताच पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अमेरिकेकडे धाव घेतली. भारताला शस्त्रसंधी करण्यासाठी भाग पाडावे, अशी विनंती अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली. त्यानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान शहाबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर या दोघांनी तुर्कस्तान, अझरबैजान, ताजिकिस्तान या देशांचे उंबरे झिजवले. रशियाच्या अध्यक्षांना पर्सनल पत्र लिहिले. पाकिस्तानी जगाच्या नाकदुऱ्या काढल्या.
– पाकिस्तानी लष्कराची “लघुशंका”
पण एवढे सगळे झाल्यानंतर देखील पाकिस्तानी लष्कराने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार तंगड्या वरच केल्या. अमेरिका, चीन आणि तुर्कस्तान यांनी केलेल्या मदतीवर पाकिस्तानी लष्कराने “लघुशंका” केली.
पाकिस्तानी सैन्य दलांचा प्रमुख जनरल साहीर शमशाद मिर्झा याने बीबीसीला मुलाखत देऊन पाकिस्तानने भारताविरुद्धचे युद्ध स्वतःच्या बळावर लढले इतर कुठल्याही देशाची कुठलीही मदत घेतली नाही, असा दावा केला.
– या मुलाखतीत जनरल शमशाद मिर्झा म्हणाला :
– भारताबरोबर पाकिस्तानचा 96 तास संघर्ष झाला. या संघर्षात पाकिस्तानने पाकिस्तानातच बनवलेली शस्त्रास्त्रे वापरली. पाकिस्तानने भारताविरुद्धची सगळी लढाई स्वबळावरच लढली. लढाईच्या वेळी इतर कुठल्याही देशांची मदत घेतली नाही. पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत क्षमतेनुसार विकसित केलेली शस्त्रास्त्रे आणि अन्य सामग्री वापरली. अन्य कुठल्याही देशांची मदत घेण्याची पाकिस्तानला गरज पडली नाही.
– भारतासारख्या आक्रमक अणुशक्तीशी लढण्यात पाकिस्तान सक्षम आहे हे आम्ही जगाला दाखवून दिले. भारताने पाकिस्तानात ज्या पद्धतीने हल्ले केले, ते पाहता इथून पुढची लढाई फक्त काश्मीर किंवा सीमावर्ती राज्यांपुरती मर्यादित राहणार नाही. ती दोन्ही देशांमधल्या कुठल्याही शहरांपर्यंत पोहोचू शकेल.
– पाकिस्तानने आपली संरक्षण क्षमता वाढवून मारक क्षमता अधिक मजबूत केली आहे. भारताशी लढाई करताना इतर देशांच्या मदतीची पाकिस्तानला गरज लागली नाही. हे या लढाईतून समोर आले.
ही मुलाखत देऊन शमशाद मिर्झाने मोठी डिंग मारली आणि अमेरिका, चीन, तुर्कस्तान, अझरबैजान, ताजिकिस्तान या पाकिस्तानच्या मित्र देशांनी केलेल्या मदतीवर “लघुशंका” केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App