थंडी सुरु झाली की आपल्याकडे विषेष पाहुण्यांचे आगमन होते त्यांचे नाव आहे फ्लेमिंगो, पार लांबच्या सैबेरिया प्रांतातून हे सुदंर व नजाकतदार पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत दूर दूरच्या देशात येतात. सैबेरियात प्रतिकूल थंड वातावरणात टिकाव न लागल्याने ते भारतासारख्या उष्ण प्रदेशात येतात. पक्ष्यांचे स्थलांतर हा मोठा कुतूहलाचा विषय मानला जातो. कोणत्याही प्रदेशातील वातावरण हे नेहमी बदलत असते. त्यामुळे त्यानुसार पक्ष्यांनाही जुळवून घ्यावे लागते. निसर्गातील या ऋतूचक्रानुसार त्यांचे स्थलांतर ठरते.How do flamingos migrate thousands of miles?
पाणी व अन्नासाठी पक्षी दरवर्षी नित्यनियमाने एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करतात. प्रत्येक प्रदेशांत ऋतुमानानुसार फरक पडत असतो. तेथील तापमान बदलत असते, पावसाचे प्रमाण बदलते. पर्यावरणातील हे बदल पचवून टिकून राहण्यासाठी पक्षी स्थलांतर करतात. वातावरण बदलले की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांच्या स्त्राव होवू लागते. तो त्यांना उडत दूर जाण्यासाठी प्रेरणा देतो.
स्थलांतरासाठीचा प्रदेश या पक्ष्यांनी पूर्वीच ठरवलेला असतो. म्हणजे ते लहान असताना ज्या प्रदेशात जात असतात तेथेच ते मोठे झाल्यावरही जातात. त्यामुळे त्यांची निश्तिच वहिवाट ठरलेली असते. पक्षी थव्याने स्थलांतर करतात. दूर उडत जाण्यासाठी त्यांना शरिरीक तयारी करावी लागते. त्यासाठी पुरेसे अन्न खावून ते चरबी साठवतात. त्याशिवाय त्यांना स्थलांतर करता येत नाही. स्थलांतर करताना पक्षी प्रामुख्याने सहा ते आठ हजार मीटर उंचावरुन उडतात. सतत उडत राहण्याने शरीराचे जे तापमान वाढलेले असते
त्याचा निचरा करण्यासाठी ही उंची पक्ष्यांना उपयुक्त ठरते. काही पक्षी काही किलोमीटर तर काही पक्षी हजारो किलोमीटर स्थलांतर करताता. आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी रशियातील सैबेरिया प्रांतातून दरवर्षी सैबेरियन क्रोंच हे पक्षी हजारो किलोमीटर उडत उडत स्थलांतर करुन येतात. हे स्थलांतर कायमस्वरुपी नसते. काही विशिष्ट काळासाठी ते दुसऱ्या प्रदेशात जातात. त्यानंतर पुन्हा ते आपल्या मुळ प्रदेशात जातात. इवलासा पक्षी हजारो किलोमीटर उडत प्रवास करतो ही थक्क करणारी प्रक्रिया आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App