• Download App
    बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरुच, गंगा नदीने धोक्याची पातळी गाठली Heavy rain in Bihar and UP worsen flood condition

    बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरुच, गंगा नदीने धोक्याची पातळी गाठली

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – मुसळधार पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्याची स्थिती बिघडली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. दोन्ही राज्यातील नदीकाठावर असलेल्या भागात पूर आला असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरले असून नागरिक मोठ्या संख्येने स्थलांतरित होत आहेत. Heavy rain in Bihar and UP worsen flood condition

    बिहारच्या नदीकाठावर असलेल्या जिल्ह्यात २२ लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यातून गंगा नदी वाहते. बक्सर, भोजपूर, पाटणा, सारन, वैशाली, बेगुसराय, मुंगेर, खगाडिया आणि कटिहारच्या दियारा भागात शेकडो गावे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागत आहे.



    उत्तर प्रदेशात अनेक भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडला आहे. राज्यातील २३ जिल्ह्यातील १२४३ गावांत ५ लाख ४६ हजाराहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. सिंचन विभागाच्या मते, बदायूं, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, गाझीपूर, बलिया जिल्ह्यात गंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. याप्रमाणे ओरिया, जालौन, हमीरपूर, बांदा आणि प्रयागराज येथे यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक वाहत आहे.

    Heavy rain in Bihar and UP worsen flood condition

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!

    E20 janata party : मोदींना हरवू आणि हलवू शकत नाही म्हणून त्यांच्या विश्वासू मंत्र्यांवर हल्लाबोल!!

    धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींची स्तुती; शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट अभिजीत दिपकेच्या घरी!!