वत्तसंस्था
मुंबई : देशातली महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलली खरी, पण समान्यांना महागाईचे चटके बसतच आहेत. रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात २५ बेसिस पॉइंटची वाढ करून तो ६.५० टक्क्यांवर पोचवला. त्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांच्या मासिक हप्त्यात वाढीबरोबर अन्य परिणामांनाही सामान्यांना सामोरे जावे लागणार आहे. rbi announced 25 basis points increase in repo rate to crub the infaliton
रेपो दर ६.५० टक्के – महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पावले, पण सामान्यांना महागाईचे चटके
रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे. महागाई आटोक्यात येत असल्याने रेपो दरात मोठी वाढ करण्यात आलेली नाही. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना कर्ज पुन्हा महाग मिळतील. तर ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना वाढीव ईएमआयचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे. महागाईपासून सूटका होण्यासाठीचा हा उपाय जनतेला मात्र महागाईत लोटत आहे.
7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली होती.
आरबीआय गव्हर्नर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर महागाई दर आर्थिक वर्ष 2023-24 साठी 4 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जागतिक अर्थव्यवस्था आणि महागाईचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडल्याचे सांगितले. जागतिक आव्हाने असतानाही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याचा दावा ही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App