काश्मीरमध्ये सैन्य दलाची नवे पाऊल; दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद; आपल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले आवाहन


वृत्तसंस्था

श्रीनगर – जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५ ए कलम हटविल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. यातला एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आज केला. Lt Gen DP Pandey, GoC Chinar Corps, along with GoC Victor Force, Maj Gen Rashim Bali and IGP Kashmir, Mr Vijay Kumar, addressed 83 family members

भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सध्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या मुलांच्या पालकांशी आणि कुटुंबातील सदस्यांशी सैन्य दलाने थेट संवाद साधला आहे. सैन्य दलांकडे आणि जम्मू – काश्मीर पोलीसांकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीपैकी ८३ जणांच्या कुटुंबीयांशी आणि पालकांशी चिनार कॉर्पसचे लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे, व्हीक्टर फोर्सचे मेजर जनरल रेशीम बाली आणि काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी शोपियांमध्ये संवाद साधला.

भारतीय सैन्य दल आणि पोलीस या कुटुंबीयांना सर्व मदत करायला तयार आहे. त्यांनी आपल्या मुलांना दहशतवादाचा मार्ग सोडून देण्यास सांगावे. प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन लेफ्टनंट जनरल पांडे, मेजर जनरल बाली आणि विजय कुमार यांनी केले.

सुरक्षा दलांनी चकमकीत मारलेला काश्मीरी दहशतवादी बुऱ्हान वाणी याच्या वडिलांच्या हस्ते यंदा स्वातंत्र्य दिनी काश्मीरमधल्या एका शाळेत ध्वजारोहण करण्यात आले होते, याची आठवण मेजर जनरल बाली यांनी यावेळी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आणि पालकांना आवर्जून करून दिली.

Lt Gen DP Pandey, GoC Chinar Corps, along with GoC Victor Force, Maj Gen Rashim Bali and IGP Kashmir, Mr Vijay Kumar, addressed 83 family members

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात