विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांचा समावेश लष्कराच्य अभ्यसक्रमात करण्याचा विचार सरकार करत आहे.Bhagwat Gita and Kotilya economics to be included in army training curriculum, The Congress opposes saying the victory of the Kargil war with the help of Muslim soldiers,
मात्र, याला धार्मिक रंग देऊन कॉँग्रेसने विरोध केला आहें. मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युध्द जिंकले असल्याने लष्करात धार्मिक अभ्यासक्रम असू नये असे कॉँग्रेसने म्हटले आहे.संरक्षण अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीडीएम) नुकत्याच केलेल्या अंतर्गत अभ्यासात सध्याच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमात कौटिल्याच्या अर्थशास्त्र आणि भागवत गीता सारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांची शिकवण समाविष्ठ करण्याची शिफारस केली आहे. यावर अभ्यासासाठी इंडियन कल्चर स्टडी फोरमची स्थापना करण्यात यावी असेही म्हटले आहे.
सशस्त्र दलांमध्ये धोरणात्मक विचार आणि नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्राचीन भारतीय ग्रंथांच्या शिकवणीचा उपयोग करावा, असे संरक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. यातून लष्करी मुत्सदेगिरीमध्ये अधिकाºयांना नवीन शिकवण मिळेल, असेही म्हटले आहे.
याला धार्मिक रंग देत कॉँग्रेसने विरोध केल आहे. काँग्रेसचे प्रवक्ते के के मिश्रा म्हणले, किमान सैन्याशी संबंधित बाबींचे राजकारण करू नये. सरकारने लष्करी बाबींमध्ये राजकारण करू नये, आम्ही मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगिल युद्ध जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App