वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी सोमवारी (5 जून) एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात की, आम्ही प्रेमाचे दुकान चालवत आहोत. पण प्रत्यक्षात त्यांनी द्वेषाचा मेगा शॉपिंग मॉल उघडला आहे.WATCH It is not a shop of love but a big shopping mall of hate, BJP President JP Nadda attacks Rahul Gandhi
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, भारत जेव्हा जेव्हा नवीन विक्रम प्रस्थापित करतो तेव्हा कॉंग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी भारताचा अभिमान पचवू शकत नाहीत. एकीकडे ते सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करतात, हिंदू-मुस्लिम फूट पाडण्याची चर्चा करतात आणि दुसरीकडे आम्ही प्रेमाचे दुकान चालवत आहोत, असे सांगतात.
#WATCH 2014 से पहले के दौर और 2014 के बाद के दौर में जमीन-आसमान अंतर है। लोगों का मानना था कि कुछ भी नहीं बदलेगा और भ्रष्टाचार सब जगह होगा, हम सुधरने वाले नहीं हैं, यह देश की मानसिकता बन गई थी। हमारे देश की गिनती भ्रष्ट देशों में होती थी। कोई नेतृत्व, इरादा या नीति नहीं थी।… pic.twitter.com/oH7i7mAUSU — ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2023
#WATCH 2014 से पहले के दौर और 2014 के बाद के दौर में जमीन-आसमान अंतर है। लोगों का मानना था कि कुछ भी नहीं बदलेगा और भ्रष्टाचार सब जगह होगा, हम सुधरने वाले नहीं हैं, यह देश की मानसिकता बन गई थी। हमारे देश की गिनती भ्रष्ट देशों में होती थी। कोई नेतृत्व, इरादा या नीति नहीं थी।… pic.twitter.com/oH7i7mAUSU
— ANI_HindiNews (@AHindinews) June 5, 2023
ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली
मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कार्यावरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात जेपी नड्डा हे तीन मूर्ती भवन येथे बोलत होते. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
9 वर्षांच्या कार्यांची चर्चा केल्यास एक ग्रंथ होईल
ते म्हणाले की, पीएम मोदींच्या 9 वर्षांच्या कामांवर चर्चा केल्यास एक पुस्तक होईल, पण हे पुस्तक थोडक्यात लिहिले आहे. घागरीत सागर भरण्याचे काम लेखकांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहेत. नड्डा म्हणाले की, आम्हाला राजपथ या शब्दाची सवय झाली होती, पण पंतप्रधान मोदींनी हा एक कर्तव्य पथ बनवला आहे. आम्ही राज्य करत नाहीत, देशवासीयांचे जीवन बदलत आहोत.
2014 पूर्वी आणि नंतर
जेपी नड्डा पुढे म्हणाले, “2014 पूर्वीचा काळ आणि 2014 नंतरचा काळ यात खूप फरक आहे. लोकांचा विश्वास होता की काहीही बदलणार नाही आणि भ्रष्टाचार सर्वत्र असेल, आम्ही सुधारणार नाही, ही देशाची मानसिकता आहे.” आपल्या देशाची गणना भ्रष्ट देशांमध्ये होती. कोणतेही नेतृत्व, हेतू किंवा धोरण नव्हते. तरीही लोकांनी भाजपला मतदान केले आणि 2014 मध्ये भारताला एक नेतृत्व मिळाले जे भारताला पुढे नेत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App